शहरं
Join us  
Trending Stories
1
यवत हिंसाचारात कोणाचं किती नुकसान, सध्याची परिस्थिती कशी? जाणून घ्या ताजी अपडेट्स!
2
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
3
IND vs ENG : सिराजसह प्रसिद्ध कृष्णानं मारला 'चौकार'! यजमान इंग्लंडचा पहिला डाव अल्प आघाडीसह संपला
4
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
5
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
6
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
7
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
8
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
9
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
10
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
11
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
12
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
13
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
14
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
15
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
16
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
17
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
18
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
19
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
20
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)

काँग्रेसची खरी कसोटी विधानसभेवेळी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2017 01:13 IST

येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत गुजरातनाट्याचा दुसरा अंक पाहायला मिळू शकतो. अहमद पटेल यांनी गुजरातमधून भाजपाला उखडण्याची भाषा मंगळवारी विजयी झाल्यानंतर केली खरी; पण तसे करणे सोपे नाही. कारण त्यांनाच काही प्रमाणात गुजरातेत अंतर्गत विरोध आहे.

ठळक मुद्देयेणाऱ्या विधानसभा निवडणुकीत गुजरातनाट्याचा दुसरा अंक पाहायला मिळू शकतो. अहमद पटेल यांनी गुजरातमधून भाजपाला उखडण्याची भाषा मंगळवारी विजयी झाल्यानंतर केली खरी; पण तसे करणे सोपे नाही. कारण त्यांनाच काही प्रमाणात गुजरातेत अंतर्गत विरोध आहे.तेच जर विधानसभेच्या लढाईत सेनापती म्हणून पुढे आले, तर ही लढाई कोणत्या दिशेला जाईल हे सांगता येणार आहे. त्यातच पंतप्रधान व भाजपाध्यक्ष दोघे गुजरातचे असताना, त्या राज्यात मुसंडी मारून वर येणे हे काँग्रेससमोर आव्हान आहे.पटेल यांच्या सध्याच्या विजयामुळे काँग्रेसमध्ये चैतन्याचे वातावरण असले तरी जनता त्या पक्षाला विधानसभेत निवडून देते का, हा खरा मुद्दा आहे.

- संजीव साबडे येत्या काही महिन्यांत होणाऱ्या विधानसभा निवडणुकीआधी गुजरातमध्ये राज्यसभेच्या जागेसाठी भाजपाविरोधात काँगे्रस असा सामना रंगला. त्यात अहमद पटेल यांची जागा राखण्यात काँग्रेस यशस्वी ठरली असली तरी तब्बल १६ आमदार भाजपाच्या वाटेवर असल्याने आता येत्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसची खरी कसोटी लागणार आहे.गुजरात नाट्याचा पहिला अंक राज्यसभेच्या तीन जागांच्या निवडणुकांच्या निमित्ताने मंगळवारी रात्री पाहायला मिळाला. एका जागेसाठी काँग्रेस आणि भाजपातील बड्या नेत्यांनी आपली ‘वकिली’ बुद्धिमत्ता पणाला लावल्याचेही दिसून आले. नाट्य सुरू झाले काँग्रेसचे नेते अहमद पटेल यांना राज्यसभेवर निवडून आणण्याच्या लढाईने. मंगळवारी झालेल्या राज्यसभा निवडणुकीत काँग्रेसच्या दोन आमदारांनी आपली मते दाखवल्याबद्दल ती बाद ठरविण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने रात्री ११.३० वाजता मान्य केल्यानंतर मतमोजणी होऊ न १२.३० वाजेपर्यंत निकाल लागणे अपेक्षित होते; पण भाजपाने नंतरही आक्षेप घेतले आणि ती रखडली. त्यामुळे निकालास १.४५ वाजले. त्यात पटेल ४४ मते मिळवून विजयी झाल्याचे सांगत काँग्रेसचे आमदार धावतच १ वाजून ४२ मिनिटांनीबाहेर आले आणि मग काँग्रेस कार्यकर्त्यांनी तिथे फटाक्यांची आतशबाजी आणि मिठाईचे वाटप सुरू केले. त्या वेळी भाजपा नेते व कार्यकर्त्यांच्या चेहºयावर प्रचंड अस्वस्थता दिसत होती. अहमद पटेल यांनी केलेल्या ‘सत्यमेव जयते’ अशा टिष्ट्वटनंतर विजयावर शिक्कामोर्तब झाले. त्यानंतर पाच मिनिटांनी भाजपाचे अध्यक्ष अमित शहा व केंद्रीय मंत्री स्मृती इराणी हे दोघे ४६ मते मिळवून निवडून आल्याचे जाहीर झाले. मात्र, भाजपामध्ये उत्साह नव्हता. कारण पटेल जिंकले होते. ते शल्य त्यांच्या चेहºयावर जाणवत होते.फुटलेली दोन मते बाद ठरविण्यासाठी काँग्रेस नेत्यांनी सारी कायदेशीर ताकद पणाला लावली. निवडणूक आयोगाने ती बाद ठरवली नसती, तर पहिल्या फेरीत पटेल विजयी झालेच नसते. दोन मते बाद झाली नसती, तर बलवंतसिंह राजपूत यांची मतसंख्या ४0 झाली असती, तर पटेल यांच्या पारड्यात ४२ मते असती. निवडून येण्यासाठी ४४चा कोटा असल्याने मतदारांच्या दुसऱ्या पसंतीच्या मतांची मोजणी घ्यावी लागली असती आणि त्यात राजपूत सहजच विजयी झाले असते. हे लक्षात आल्यानेच काँग्रेसने सारा आटापिटा केला; पण ५१ आमदार असतानाही पटेल यांना त्याहून कमी मते मिळाली. हे काँग्रेससाठी चिंतेची बाब आहे. राष्ट्रवादी, संयुक्त जनता दल व भाजपा बंडखोर यांचे प्रत्येकी एक मत पटेल यांना मिळाले, हे लक्षात घेता, काँग्रेस आमदारांची ४१ मतेच पटेल यांना मिळाली, असे दिसते. ५७ पैकी ६ आमदार आधीच काँग्रेसबाहेर पडलेले आहेत. आता या निवडणुकीच्या माध्यमातून आणखी दहा जण ‘बाहेर’च्या वाटेवर असल्याचेसिद्ध झाले आहे. ही काँग्रेससाठी डोकेदुखी आहे.