शहरं
Join us  
Trending Stories
1
Sikandar Shaikh Arrested: महाराष्ट्र केसरी सिकंदर शेखला अटक, पंजाब पोलिसांची कारवाई; प्रकरण काय?
2
"सारखं फुकटात, सारखं फुकटात; सारखं माफ, कसं व्हायचं"; कर्जमाफीवरून अजित पवारांनी शेतकऱ्यांना सुनावलं
3
"रुपाली चाकणकरांनी एका बाईला आमदाराविरोधात व्हिडीओ तयार लावलेला, ती बाई..."; रुपाली ठोंबरेंचा स्फोटक आरोप
4
किंमती वाढल्या, भारतात सोने खरेदी वाढली की कमी झाली? अवाक् करणारी आकडेवारी
5
Babar Azam World Record: धावांसाठी संघर्ष करणाऱ्या बाबर आझमनं मोडला हिटमॅन रोहित शर्माचा विश्वविक्रम
6
"मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राजीनामा देते"; रुपाली ठोंबरे पाटलांचा पोलीस ठाण्यात संताप, माधवी खंडाळकर प्रकरण तापलं
7
वडिलांचे निधन, स्वतः आयसीयूत दाखल... तरीही स्वप्न केले पूर्ण ! राज्यसेवा परीक्षेत नागपूरची प्रगती अनुसूचित जातीतून आली राज्यात पहिली
8
"नाव लक्षात ठेवा!" नेहमी तिखट भाष्य करणाऱ्या इंग्लिश क्रिकेटरचं जेमी संदर्भातील 'ते' ट्विट व्हायरल
9
संजय राऊतांची प्रकृती बिघाड, २ महिने उपचार घेणार; PM नरेंद्र मोदींनी घेतली दखल, म्हणाले...
10
टोयोटा २०३० पर्यंत भारतात १५ नवीन वाहने आणणार, दोन नवीन SUV अन् एक पिकअप ट्रकचा समावेश
11
Smartphones: नवा फोन घेण्याचा विचार करताय? थांबा! बाजारात येतायेत एकापेक्षा एक भारी फोन
12
धक्कादायक! विद्यापीठात महिलेवर लैंगित अत्याचार; बंगळुरू विद्यापीठाच्या प्राध्यापकाला अटक
13
"काहीतरी गडबड आहे!" आरोपी रोहित आर्यवर कसा आला संशय?; प्रत्यक्षदर्शीने सांगितली रेस्क्यू कहाणी
14
मेट्रो ठेकेदार जे. कुमार इन्फ्राला ५ लाखाचा दंड; व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर एमएमआरडीएचा दणका
15
Dularchand Yadav: दुलारचंद यादव यांचा मृत्यू गोळी लागल्याने झाला नाही, डॉक्टरांचा मोठा खुलासा!
16
'BJP पटेलांच्या वारशाचा अपमान करत आहे; RSS वर पुन्हा बंदी घाला', खरगेंचा सरकारवर हल्लाबोल
17
मोबाईलचे जीपीएस ठरू शकते तुमच्या डिजिटल अरेस्टचे कारण; आयआयटी दिल्लीत महत्त्वाचा रिसर्च
18
बॉर्डर पार करुन एकाचा भारतात प्रवेश करण्याचा प्रयत्न; BSF जवानांनी पाकिस्तानी नागरिकाला पकडले
19
ICC T20 Rankings : टीम इंडियाचं अव्वलस्थान धोक्यात! ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पराभवानंतर दुहेरी आव्हान
20
"मी त्याला काही वर्षांपूर्वीही भेटले होते...:, रोहित आर्याबद्दल रुचिता जाधवचा खुलासा, ९ मिनिटं...

काँग्रेसची खरी कसोटी विधानसभेवेळी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2017 01:13 IST

येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत गुजरातनाट्याचा दुसरा अंक पाहायला मिळू शकतो. अहमद पटेल यांनी गुजरातमधून भाजपाला उखडण्याची भाषा मंगळवारी विजयी झाल्यानंतर केली खरी; पण तसे करणे सोपे नाही. कारण त्यांनाच काही प्रमाणात गुजरातेत अंतर्गत विरोध आहे.

ठळक मुद्देयेणाऱ्या विधानसभा निवडणुकीत गुजरातनाट्याचा दुसरा अंक पाहायला मिळू शकतो. अहमद पटेल यांनी गुजरातमधून भाजपाला उखडण्याची भाषा मंगळवारी विजयी झाल्यानंतर केली खरी; पण तसे करणे सोपे नाही. कारण त्यांनाच काही प्रमाणात गुजरातेत अंतर्गत विरोध आहे.तेच जर विधानसभेच्या लढाईत सेनापती म्हणून पुढे आले, तर ही लढाई कोणत्या दिशेला जाईल हे सांगता येणार आहे. त्यातच पंतप्रधान व भाजपाध्यक्ष दोघे गुजरातचे असताना, त्या राज्यात मुसंडी मारून वर येणे हे काँग्रेससमोर आव्हान आहे.पटेल यांच्या सध्याच्या विजयामुळे काँग्रेसमध्ये चैतन्याचे वातावरण असले तरी जनता त्या पक्षाला विधानसभेत निवडून देते का, हा खरा मुद्दा आहे.

- संजीव साबडे येत्या काही महिन्यांत होणाऱ्या विधानसभा निवडणुकीआधी गुजरातमध्ये राज्यसभेच्या जागेसाठी भाजपाविरोधात काँगे्रस असा सामना रंगला. त्यात अहमद पटेल यांची जागा राखण्यात काँग्रेस यशस्वी ठरली असली तरी तब्बल १६ आमदार भाजपाच्या वाटेवर असल्याने आता येत्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसची खरी कसोटी लागणार आहे.गुजरात नाट्याचा पहिला अंक राज्यसभेच्या तीन जागांच्या निवडणुकांच्या निमित्ताने मंगळवारी रात्री पाहायला मिळाला. एका जागेसाठी काँग्रेस आणि भाजपातील बड्या नेत्यांनी आपली ‘वकिली’ बुद्धिमत्ता पणाला लावल्याचेही दिसून आले. नाट्य सुरू झाले काँग्रेसचे नेते अहमद पटेल यांना राज्यसभेवर निवडून आणण्याच्या लढाईने. मंगळवारी झालेल्या राज्यसभा निवडणुकीत काँग्रेसच्या दोन आमदारांनी आपली मते दाखवल्याबद्दल ती बाद ठरविण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने रात्री ११.३० वाजता मान्य केल्यानंतर मतमोजणी होऊ न १२.३० वाजेपर्यंत निकाल लागणे अपेक्षित होते; पण भाजपाने नंतरही आक्षेप घेतले आणि ती रखडली. त्यामुळे निकालास १.४५ वाजले. त्यात पटेल ४४ मते मिळवून विजयी झाल्याचे सांगत काँग्रेसचे आमदार धावतच १ वाजून ४२ मिनिटांनीबाहेर आले आणि मग काँग्रेस कार्यकर्त्यांनी तिथे फटाक्यांची आतशबाजी आणि मिठाईचे वाटप सुरू केले. त्या वेळी भाजपा नेते व कार्यकर्त्यांच्या चेहºयावर प्रचंड अस्वस्थता दिसत होती. अहमद पटेल यांनी केलेल्या ‘सत्यमेव जयते’ अशा टिष्ट्वटनंतर विजयावर शिक्कामोर्तब झाले. त्यानंतर पाच मिनिटांनी भाजपाचे अध्यक्ष अमित शहा व केंद्रीय मंत्री स्मृती इराणी हे दोघे ४६ मते मिळवून निवडून आल्याचे जाहीर झाले. मात्र, भाजपामध्ये उत्साह नव्हता. कारण पटेल जिंकले होते. ते शल्य त्यांच्या चेहºयावर जाणवत होते.फुटलेली दोन मते बाद ठरविण्यासाठी काँग्रेस नेत्यांनी सारी कायदेशीर ताकद पणाला लावली. निवडणूक आयोगाने ती बाद ठरवली नसती, तर पहिल्या फेरीत पटेल विजयी झालेच नसते. दोन मते बाद झाली नसती, तर बलवंतसिंह राजपूत यांची मतसंख्या ४0 झाली असती, तर पटेल यांच्या पारड्यात ४२ मते असती. निवडून येण्यासाठी ४४चा कोटा असल्याने मतदारांच्या दुसऱ्या पसंतीच्या मतांची मोजणी घ्यावी लागली असती आणि त्यात राजपूत सहजच विजयी झाले असते. हे लक्षात आल्यानेच काँग्रेसने सारा आटापिटा केला; पण ५१ आमदार असतानाही पटेल यांना त्याहून कमी मते मिळाली. हे काँग्रेससाठी चिंतेची बाब आहे. राष्ट्रवादी, संयुक्त जनता दल व भाजपा बंडखोर यांचे प्रत्येकी एक मत पटेल यांना मिळाले, हे लक्षात घेता, काँग्रेस आमदारांची ४१ मतेच पटेल यांना मिळाली, असे दिसते. ५७ पैकी ६ आमदार आधीच काँग्रेसबाहेर पडलेले आहेत. आता या निवडणुकीच्या माध्यमातून आणखी दहा जण ‘बाहेर’च्या वाटेवर असल्याचेसिद्ध झाले आहे. ही काँग्रेससाठी डोकेदुखी आहे.