शहरं
Join us  
Trending Stories
1
IND W vs PAK W "म्हारी छोरियां छोरो से कम है के.." हरमनप्रीत ब्रिगेडनंही पाकची जिरवली!
2
'अमेरिकेसोबत काही मुद्दे सोडवायला हवेत', ट्रेड डील आणि टॅरिफबाबत जयशंकर यांचे मोठे विधान
3
मुंबईतील राजकीय नेत्याच्या मुलाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार, शौचालयात गाठले आणि...
4
गाझातील सत्ता सोडण्यास नकार दिल्यास हमासची धुळधाण उडवू, डोनाल्ट ट्रम्प यांची ताकिद 
5
नेपाळमध्ये हाहाकार... मुसळधार पावसाचा कहर! आतापर्यंत 51 जणांचा मृत्यू; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केलं दुःख, म्हणाले - भारत...!
6
Muneeba Ali Controversial Run Out : हुज्जत घालून पाक क्रिकेटच्या इज्जतीचा फालुदा; असं काय घडलं?
7
हिमालयात दार्जिलिंगपासून माऊंट एव्हरेस्टपर्यंत विध्वंस, ६० हून अधिक मृत्यू, कारण काय?
8
IND vs AUS : ३०० पारच्या लढाईत अभिषेक-तिलकनं तलवार केली म्यान; वादळी शतकासह प्रभसिमरन सिंगची हवा
9
'जेव्हा शिंदे CM आणि फडणवीस DCM होते तेव्हा...!', अमित शाह यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
10
प्रवाशांनी भरलेली विरार ते पालघर रो-रो बोट जेट्टीवर अडकली; हायड्रॉलिक पाईप तुटल्याने मनस्ताप
11
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
12
’अमित शाह महाराष्ट्रात आले पण नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत शब्दही बोलले नाहीत’, काँग्रेसची टीका   
13
Irani Cup 2025: नागपूरच्या मैदानात फुल्ल राडा! यश धुलला तंबूत धाडल्यावर ठाकूर त्याच्या अंगावर धावला (VIDEO)
14
ऑटो कंपनीची 'कमाल', गुंतवणूकदारांना केलं मालामाल...! 1 वर्षात पैसा डबल; सोमवारी दिसणार चमत्कार?
15
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
16
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
17
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
18
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 
19
सयाजी शिंदेंचा मोठा निर्णय, 'सखाराम बाईंडर'च्या १० प्रयोगांचे मानधन पूरग्रस्त शेतकऱ्यांना देणार
20
“धर्म-भाषा काहीही असो, आपण सर्व हिंदू आहोत; ब्रिटिशांनी आपल्यात फूट पाडली”- मोहन भागवत

रेशनवरील धान्य स्वस्तच

By admin | Updated: June 29, 2017 00:27 IST

रेशनवरील तांदूळ, गहू आणि भरडधान्याचे भाव आणखी एक वर्ष न वाढविण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यात दर

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : रेशनवरील तांदूळ, गहू आणि भरडधान्याचे भाव आणखी एक वर्ष न वाढविण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यात दर तीन वर्षांनी रेशनवरील धान्याच्या भावाबाबत आढावा घेण्याची तरतूद आहे. संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारने २०१३मध्ये हा कायदा संमत केला होता. सध्या अत्यंत सवलतीच्या दरात १ ते ३ रुपये किलोप्रमाणे देशभरातील ८१ कोटींहून अधिक लोकांना रेशन दुकानांमार्फत अन्नधान्य पुरविले जाते. यामुळे वर्षाकाठी सरकारच्या तिजोरीवर १.४ लाख कोटी रुपयांचा बोजा पडतो. राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यात रेशनवरील अन्नधान्याचे दर आणखी एक वर्ष न वाढविण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतला असल्याचे अन्नमंत्री रामविलास पासवान यांनी टिष्ट्वटरवर म्हटले आहे. या निर्णयातून सरकार गरीब आणि वंचित घटकांतील जनतेच्या भल्यासाठी बांधील असल्याचे स्पष्ट होते, असेही त्यांनी म्हटले आहे. देशभरातील ५ लाख रेशन दुकानांमार्फत (सार्वजनिक वितरण प्रणाली) प्रति व्यक्ती दरमहा ५ किलो धान्य स्वस्त दरात दिले जाते. रेशनवरील तांदळाचा दर प्रति किलो ३ रुपये, गव्हाचा दर प्रति किलो २ आणि भरडधान्याचा दर प्रति किलो १ रुपया आहे. राष्ट्रीय सुरक्षा कायदा नोव्हेंबर २०१६पासून देशभरात लागू करण्यात आला. यापुढे पाऊल टाकत सार्वजनिक वितरण प्रणालींतर्गत नोंदणीकृत घटकांंना म्हणजे शिधापत्रिकाधारकांच्या पोषण सुरक्षेवर सरकार लक्ष केंद्रित करणार आहे.