शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही इंग्रजी आहोत का? इथे लंडनमधून राहायला आलोय का?" बावनकुळेंनी ठाकरे बंधूंना सुनावलं
2
"भजन करायला थोडीच बसलोय, मठ पुरेसे आहेत...!"; हा श्लोक म्हणत CM योगी भरविधानसभेत कडाडले
3
शिवसेना-मनसे युती, संजय राऊतांना मानाचे स्थान, पण बाळा नांदगावकर कुठेच दिसेना; गेले कुठे?
4
ऐन महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत राज्य मंत्रिमंडळाची बैठक; चार मोठे निर्णय घेतले
5
टीम इंडियाचा ICC क्रमवारीत धुमधडाका! एक-दोन नव्हे, तब्बल ५ स्टार क्रिकेटर रँकिंगमध्ये अव्वल
6
अतिशय गुप्तपणे भारताने बंगालच्या खाडीत केला मोठा धमाका; कित्येक किमी पसरला आवाज, चीनला धडकी
7
"भगवा झेंडा पाहून TMC चा लाठीचार्ज, गुंडांना पोलिसांच्या मागे लपवणं..."; ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
8
Viral Video: भगवान विष्णूची कंबोडियातील मूर्ती लष्कराने पाडली, व्हायरल होत असलेला व्हिडीओचे सत्य काय?
9
"आमचं हिंदुत्व अस्सल, फक्त मतांसाठी भगवी शाल घालणारे आम्ही नाहीत"; मुख्यमंत्र्यांचे राज ठाकरेंना सडेतोड उत्तर
10
भाजपाला धक्का, महादेव जानकरांची काँग्रेससोबत आघाडी, एकत्र निवडणूक लढवणार  
11
Eknath Shinde: आपली पोरं सांभाळू शकत नाहीत, मुंबई काय सांभाळणार? एकनाथ शिंदेंची ठाकरे बंधूंवर टीका
12
'धुरंधर'च्या यशावर रणवीर सिंह गप्प का? सिनेमातील 'डोंगा'नेच दिली प्रतिक्रिया; म्हणाला...
13
Taurus Yearly Horoscope 2026: वृषभ राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल, प्रतिभा आणि संयमाची कसोटी; 'या' वर्षात कुटुंबाची साथ ठरेल यशाची गुरुकिल्ली!
14
"पराभव समोर दिसताच भाजप पैसा आणि जातीचे राजकारण सुरू करते" आदित्य ठाकरेंची बोचरी टीका!
15
विराट सेंच्युरी! किंग कोहलीनं मोडला मास्टर ब्लास्टर सचिनचा रेकॉर्ड; वेगाने गाठला १६००० धावांचा पल्ला
16
नितेश राणे, प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड यांना कोर्टाचा दणका, बजावलं अजामिनपात्र वॉरंट
17
जपानमध्ये शंभरी पार करणार्‍यांची संख्या लक्षावधी, महिलांचे प्रमाण अधिक; दीर्घायुष्याचे गुपित काय?
18
युतीची घोषणा मात्र जागांचा सस्पेन्स; उद्धवसेना-मनसेत जागावाटपावर 'असा' ठरलाय फॉर्म्युला?
19
सोनं थांबेना, चांदी आवरेना! सोन्याच्या दरात ७०% तर चांदीत १५० टक्क्यांची वाढ; पाहा कुठे पोहोचतील किमती?
20
राष्ट्रवादीचे नेते राहुल कलाटे भाजपमध्ये;पक्षातील कार्यकर्त्यांचा विरोध डावलून दिला प्रवेश
Daily Top 2Weekly Top 5

रेशनवरील धान्य स्वस्तच

By admin | Updated: June 29, 2017 00:27 IST

रेशनवरील तांदूळ, गहू आणि भरडधान्याचे भाव आणखी एक वर्ष न वाढविण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यात दर

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : रेशनवरील तांदूळ, गहू आणि भरडधान्याचे भाव आणखी एक वर्ष न वाढविण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यात दर तीन वर्षांनी रेशनवरील धान्याच्या भावाबाबत आढावा घेण्याची तरतूद आहे. संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारने २०१३मध्ये हा कायदा संमत केला होता. सध्या अत्यंत सवलतीच्या दरात १ ते ३ रुपये किलोप्रमाणे देशभरातील ८१ कोटींहून अधिक लोकांना रेशन दुकानांमार्फत अन्नधान्य पुरविले जाते. यामुळे वर्षाकाठी सरकारच्या तिजोरीवर १.४ लाख कोटी रुपयांचा बोजा पडतो. राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यात रेशनवरील अन्नधान्याचे दर आणखी एक वर्ष न वाढविण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतला असल्याचे अन्नमंत्री रामविलास पासवान यांनी टिष्ट्वटरवर म्हटले आहे. या निर्णयातून सरकार गरीब आणि वंचित घटकांतील जनतेच्या भल्यासाठी बांधील असल्याचे स्पष्ट होते, असेही त्यांनी म्हटले आहे. देशभरातील ५ लाख रेशन दुकानांमार्फत (सार्वजनिक वितरण प्रणाली) प्रति व्यक्ती दरमहा ५ किलो धान्य स्वस्त दरात दिले जाते. रेशनवरील तांदळाचा दर प्रति किलो ३ रुपये, गव्हाचा दर प्रति किलो २ आणि भरडधान्याचा दर प्रति किलो १ रुपया आहे. राष्ट्रीय सुरक्षा कायदा नोव्हेंबर २०१६पासून देशभरात लागू करण्यात आला. यापुढे पाऊल टाकत सार्वजनिक वितरण प्रणालींतर्गत नोंदणीकृत घटकांंना म्हणजे शिधापत्रिकाधारकांच्या पोषण सुरक्षेवर सरकार लक्ष केंद्रित करणार आहे.