शहरं
Join us  
Trending Stories
1
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
2
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
3
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
4
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
5
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
6
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
7
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
8
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
9
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
10
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
11
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
12
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
13
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
14
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
15
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
16
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
17
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
18
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
19
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या

रेशनवरील धान्य स्वस्तच

By admin | Updated: June 29, 2017 00:27 IST

रेशनवरील तांदूळ, गहू आणि भरडधान्याचे भाव आणखी एक वर्ष न वाढविण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यात दर

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : रेशनवरील तांदूळ, गहू आणि भरडधान्याचे भाव आणखी एक वर्ष न वाढविण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यात दर तीन वर्षांनी रेशनवरील धान्याच्या भावाबाबत आढावा घेण्याची तरतूद आहे. संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारने २०१३मध्ये हा कायदा संमत केला होता. सध्या अत्यंत सवलतीच्या दरात १ ते ३ रुपये किलोप्रमाणे देशभरातील ८१ कोटींहून अधिक लोकांना रेशन दुकानांमार्फत अन्नधान्य पुरविले जाते. यामुळे वर्षाकाठी सरकारच्या तिजोरीवर १.४ लाख कोटी रुपयांचा बोजा पडतो. राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यात रेशनवरील अन्नधान्याचे दर आणखी एक वर्ष न वाढविण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतला असल्याचे अन्नमंत्री रामविलास पासवान यांनी टिष्ट्वटरवर म्हटले आहे. या निर्णयातून सरकार गरीब आणि वंचित घटकांतील जनतेच्या भल्यासाठी बांधील असल्याचे स्पष्ट होते, असेही त्यांनी म्हटले आहे. देशभरातील ५ लाख रेशन दुकानांमार्फत (सार्वजनिक वितरण प्रणाली) प्रति व्यक्ती दरमहा ५ किलो धान्य स्वस्त दरात दिले जाते. रेशनवरील तांदळाचा दर प्रति किलो ३ रुपये, गव्हाचा दर प्रति किलो २ आणि भरडधान्याचा दर प्रति किलो १ रुपया आहे. राष्ट्रीय सुरक्षा कायदा नोव्हेंबर २०१६पासून देशभरात लागू करण्यात आला. यापुढे पाऊल टाकत सार्वजनिक वितरण प्रणालींतर्गत नोंदणीकृत घटकांंना म्हणजे शिधापत्रिकाधारकांच्या पोषण सुरक्षेवर सरकार लक्ष केंद्रित करणार आहे.