शहरं
Join us  
Trending Stories
1
मनोज जरांगे राहुल गांधींना म्हणाले 'दिल्लीचा लाल्या', काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया, पाटलांना दिलं असं नाव  
2
VIDEO: पंतप्रधान मोदी नवी मुंबई विमानतळाच्या उद्घाटनावेळी मराठीत काय बोलले? ऐका...
3
मुंबईवरील हल्ल्यानंतर कुणाच्या सांगण्यावरून गुडघे टेकले? चिदंबरम यांच्या विधानावरून मोदींनी काँग्रेसला घेरले 
4
रोहित शर्मा पुन्हा बनला कर्णधार, मिळाला नवा 'ओपनिंग पार्टनर'; Playing XI मध्ये आणखी कोण?
5
नवी मुंबई विमानतळाचा उदघाटन सोहळा मंत्री राममोहन नायडूंनी गाजवला, केलं मराठीतून भाषण, म्हणाले... 
6
AUS W vs PAK W : वर्ल्ड चॅम्पियन ऑस्ट्रेलिया टॉपला; पराभवाच्या हॅटट्रिकसह पाकिस्तान रसातळाला!
7
VIDEO: शत्रूवरही अशी वेळ नको रे देवा... नवरदेवाची भर लग्नमंडपात होणाऱ्या बायकोसमोर 'फजिती'
8
"त्या सरकारनं 'हे' कामच थांबवलं होतं, हे एखाद्या पापापेक्षा कमी नाही!", PM मोदी 'ठाकरे' सरकारवर बरसले
9
सैराटची पुनरावृत्ती! पाच भावांनी मिळून केली बहीण आणि भाओजींची हत्या, घरी बोलावले आणि...  
10
‘मेस्मा’ लागू, सात वीज कर्मचारी संघटनांचा संप बेकायदेशीर
11
Beth Mooney Incredible Hundred : अविस्मरणीय सेंच्युरी! पाक संघाला रडवणारी 'रन'रागिणी ठरली बेथ मूनी
12
नवी मुंबई विमानतळ प्रवाशांच्या सेवेत! कधीपासून उड्डाणे सुरू होणार? कुठे-कुठे जाता येणार?
13
नवी मुंबई विमानतळ आशियातील सर्वात मोठे 'कनेक्टिव्हिटी हब' बनणार; पंतप्रधान मोदींना विश्वास
14
तुमच्या आयफोनची चार्जिंग लवकर संपतेय? बॅटरी लाईफ वाढवण्यासाठी 'या' टिप्स वापरा!
15
"तडजोड कर नाहीतर तुझीच बदनामी होईल"; छेडछाड करणाऱ्यालाच पीडितेच्या घरी घेऊन गेले पोलीस!
16
Cough Syrup : "डॉक्टरवर चुकीचा..."; कफ सिरप मृत्यू प्रकरणी मेडिकल असोसिएशनच्या सरकारकडे मोठ्या मागण्या
17
नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन होताच CM फडणवीसांची मोठी घोषणा, म्हणाले, “आता चौथी मुंबई...”
18
पाकिस्तानची जिरवल्यावर कुणाला सुचली 'ती' भन्नाट आयडिया? वरुण चक्रवर्तीन शेअर केली त्यामागची स्टोरी
19
ऑटो क्षेत्र सुसाट! नवरात्रीदरम्यान दर तासाला 1,000 हून अधिक गाड्यांची विक्री
20
दि.बा. पाटलांचा उल्लेख, 'मविआ'वर टीकेचे बाण; PM मोदी नवी मुंबई विमानतळ उद्घाटनाच्या कार्यक्रमात काय म्हणाले?

तडजोडीनंतरही बलात्कार, खुनाचा गुन्हा रद्द केला जाऊ शकत नाही

By admin | Updated: July 30, 2014 01:08 IST

पीडित आणि आरोपीमध्ये तडजोड झाल्यावरदेखील बलात्कार आणि खुनासारख्या गंभीर आरोपांमध्ये फौजदारी कारवाई रद्द केली जाऊ शकत नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे.

नवी दिल्ली : पीडित आणि आरोपीमध्ये तडजोड झाल्यावरदेखील बलात्कार आणि खुनासारख्या गंभीर आरोपांमध्ये फौजदारी कारवाई रद्द केली जाऊ शकत नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. असे केल्यास त्याचा समाजावर वाईट परिणाम होईल, असे न्यायालय म्हणाले. 
सार्वजनिक शांततेशी संबंधित नसलेला आणि दोन व्यक्ती किंवा समूहार्पयत मर्यादित असलेला गुन्हा दोन्ही पक्षामध्ये समझोत्या झाल्यानंतर रद्द केला जाऊ शकतो, असे न्या. रंजना प्रकाश देसाई आणि न्या. एन.व्ही. रमण यांचे पीठ म्हणाले. 
उच्च न्यायालय कारवाई रद्द करण्याबाबत आपल्या विवेकाचा वापर करू शकते. ते संबंधित प्रकरणातील तथ्य आणि परिस्थितींवर अवलंबून असेल. परंतु बलात्कार आणि खून यासारख्या गंभीर गुन्हा असलेल्या प्रकरणात कारवाई रद्द केली जाऊ शकत नाही. कारण यामुळे समाजावर हानिकारक परिणाम होऊ शकतो, असे पीठ म्हणाले. 
गंभीर गुन्हा असलेल्या प्रकरणात असे म्हटले जाऊ शकत नाही की, ते प्रकरण दोन व्यक्ती किंवा समूहार्पयत मर्यादित आहे आणि असे गुन्हे रद्द केल्यास समाजात चुकीचा संदेश जाईल, असे सर्वोच्च न्यायालय म्हणाले. ज्या प्रकरणांमध्ये दोन्ही पक्षांमध्ये समझोता झाला असेल, अशा प्रकरणात दम राहत नाही आणि ते प्रकरण पुढे रेटल्यास वेळ आणि शक्ती वाया जाते, असेही न्यायालय 
म्हणाले. 
सर्वोच्च न्यायालयाने विविध दोषींनी दाखल केलेल्या याचिकेवर हा आदेश दिला. पीडितांबरोबर आमचा सौहार्दपूर्ण समझोता झाला आहे. त्यामुळे आमच्याविरुद्धची प्रलंबित कारवाई रद्द करण्यात यावी, अशी विनंती याचिकेत करण्यात आली होती. (लोकमत न्यूज नेटवर्क)
 
सामाजिक शांततेला तडा जाणार नसल्यास हरकत नाही
च्गुन्हा वैयक्तिक स्वरूपाचा आहे आणि दोन्ही पक्षांमध्ये समझोत्यामुळे सार्वजनिक शांततेला तडा जाणार नाही किंवा त्यामुळे सार्वजनिक शांतता टिकून राहण्यास मदत मिळू शकते, असे न्यायालयाला  वाटल्यास अशावेळी गुन्हा रद्द केला जाण्यास काहीच हरकत नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले.