शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Railway Accident: ठाण्याजवळ रेल्वे दुर्घटना! धावत्या ट्रेनमधून ट्रॅकवर पडले प्रवासी, पाच जणांचा मृत्यू; बचावकार्य सुरू
2
सोनम, सुपारी अन् सरेंडर, समोर आला लव्ह ट्रँगल...! कोण आहे राज कुशवाह? याच्यामुळेच तर झाला नसेल राजाचा 'मर्डर'?
3
दारावर लटकून प्रवास, समोरच्या ट्रेनमधील प्रवाशांना धडक अन्...; मुंब्रामधील रेल्वे दुर्घटनेचे कारण समोर
4
"मी सिनेइंडस्ट्रीतला नाही...", मुंबई सोडून गावाला का स्थायिक झाले नाना पाटेकर?, बिग बींना सांगितलेलं कारण
5
'आम्ही कोणत्याही पक्षाशी...' ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेवर आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले!
6
Mumbai Local: नव्या लोकलचे दरवाजे आपोआप बंद होणार, मुंबई रेल्वे अपघातानंतर प्रशासनाला जाग!
7
Raja Raghuvanshi : सोनम बेवफा! ११ मे ला लग्न, २० ला हनिमून, २३ ला हत्या; १७ दिवसांनी कोणाला केला पहिला फोन?
8
Vat Purnima 2025: सावित्रीने सत्यवानाचे प्राण वाचवले, तेव्हा यमाशी कसा झाला होता अखेरचा संवाद? वाचा!
9
अहिल्यानगर : एमपीएल क्रिकेट सामना बघून परताना गाडीचा भीषण अपघात; जळगावमधील दोन ठार, ११ जखमी
10
मुलाचा जन्म, पण उपचारादरम्यान मातेचा मृत्यू; छत्रपती संभाजीनगरात पुण्याच्या घटनेची पुनरावृत्ती
11
"मला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला", २५ वर्ष लहान अभिनेत्रीने मिथुन चक्रवर्तींवर केलेला आरोप
12
पोलिस मेघालय-मध्य प्रदेशात शोधत राहिले; 'बेवफा' सोनम प्रियकरासोबत युपीत सापडली...
13
Vat Purnima 2025: वडाची पूजा झाल्यावर 'हा' श्लोक म्हणायला विसरू नका, तरच पूर्ण होईल व्रत!
14
Vat Purnima 2025: केवळ सौभाग्यासाठी नाही, तर दीर्घायुष्यासाठी करा वटवृक्षाची पुजा!
15
भारतात पहिल्यांदाच MCX नं केलं असं काम की विक्रमी उच्चांकी स्तरावर पोहोचले शेअर्स, जाणून घ्या
16
"आमची मुलगी असं का करेल? असं करायचं असतं, तर ती..."; सोनमच्या वडिलांची पहिली प्रतिक्रिया काय?
17
"गेल्या १० वर्षांपासून मी मानसोपचार...", अमृता सुभाषने केला खुलासा; कारणही सांगितलं
18
अनिल अंबानींची कंपनी करणार ₹५००० कोटींची गुंतवणूक; संरक्षण क्षेत्रात इतिहास रचण्यास तयार
19
७ वर्षांत एफडीआयमध्ये महाराष्ट्र टॉप, परदेशातील सर्वाधिक गुंतवणूक राज्यात; पायाभूत सुविधांतील सुधारणा ठरतेय मोठ्या फायद्याची

तडजोडीनंतरही बलात्कार, खुनाचा गुन्हा रद्द केला जाऊ शकत नाही

By admin | Updated: July 30, 2014 01:08 IST

पीडित आणि आरोपीमध्ये तडजोड झाल्यावरदेखील बलात्कार आणि खुनासारख्या गंभीर आरोपांमध्ये फौजदारी कारवाई रद्द केली जाऊ शकत नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे.

नवी दिल्ली : पीडित आणि आरोपीमध्ये तडजोड झाल्यावरदेखील बलात्कार आणि खुनासारख्या गंभीर आरोपांमध्ये फौजदारी कारवाई रद्द केली जाऊ शकत नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. असे केल्यास त्याचा समाजावर वाईट परिणाम होईल, असे न्यायालय म्हणाले. 
सार्वजनिक शांततेशी संबंधित नसलेला आणि दोन व्यक्ती किंवा समूहार्पयत मर्यादित असलेला गुन्हा दोन्ही पक्षामध्ये समझोत्या झाल्यानंतर रद्द केला जाऊ शकतो, असे न्या. रंजना प्रकाश देसाई आणि न्या. एन.व्ही. रमण यांचे पीठ म्हणाले. 
उच्च न्यायालय कारवाई रद्द करण्याबाबत आपल्या विवेकाचा वापर करू शकते. ते संबंधित प्रकरणातील तथ्य आणि परिस्थितींवर अवलंबून असेल. परंतु बलात्कार आणि खून यासारख्या गंभीर गुन्हा असलेल्या प्रकरणात कारवाई रद्द केली जाऊ शकत नाही. कारण यामुळे समाजावर हानिकारक परिणाम होऊ शकतो, असे पीठ म्हणाले. 
गंभीर गुन्हा असलेल्या प्रकरणात असे म्हटले जाऊ शकत नाही की, ते प्रकरण दोन व्यक्ती किंवा समूहार्पयत मर्यादित आहे आणि असे गुन्हे रद्द केल्यास समाजात चुकीचा संदेश जाईल, असे सर्वोच्च न्यायालय म्हणाले. ज्या प्रकरणांमध्ये दोन्ही पक्षांमध्ये समझोता झाला असेल, अशा प्रकरणात दम राहत नाही आणि ते प्रकरण पुढे रेटल्यास वेळ आणि शक्ती वाया जाते, असेही न्यायालय 
म्हणाले. 
सर्वोच्च न्यायालयाने विविध दोषींनी दाखल केलेल्या याचिकेवर हा आदेश दिला. पीडितांबरोबर आमचा सौहार्दपूर्ण समझोता झाला आहे. त्यामुळे आमच्याविरुद्धची प्रलंबित कारवाई रद्द करण्यात यावी, अशी विनंती याचिकेत करण्यात आली होती. (लोकमत न्यूज नेटवर्क)
 
सामाजिक शांततेला तडा जाणार नसल्यास हरकत नाही
च्गुन्हा वैयक्तिक स्वरूपाचा आहे आणि दोन्ही पक्षांमध्ये समझोत्यामुळे सार्वजनिक शांततेला तडा जाणार नाही किंवा त्यामुळे सार्वजनिक शांतता टिकून राहण्यास मदत मिळू शकते, असे न्यायालयाला  वाटल्यास अशावेळी गुन्हा रद्द केला जाण्यास काहीच हरकत नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले.