शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

रामनाथ कोविंदांचे पारडे जड

By admin | Updated: July 17, 2017 20:43 IST

भारताच्या १४ व्या राष्ट्रपतीपदासाठी सोमवारी संसद भवनात मतदान झाले. एनडीए उमेदवार रामनाथ कोविंद आणि युपीएच्या उमेदवार मीराकुमार यांच्यात सरळ लढत आहे.

सुरेश भटेवरानवी दिल्ली, दि. 17 : भारताच्या १४ व्या राष्ट्रपतीपदासाठी सोमवारी संसद भवनात मतदान झाले. एनडीए उमेदवार रामनाथ कोविंद आणि युपीएच्या उमेदवार मीराकुमार यांच्यात सरळ लढत आहे. उद्या दिल्लीत तमाम राज्यातल्या मतपेट्यांचे आगमन होईल व निवडणुकीची मतमोजणी २0 जुलैला संपन्न होईल. राष्ट्रपती प्रणव मुखर्जींचा कार्यकाल २४ जुलै रोजी संपतो आहे. त्यापूर्वी २0 जुलै रोजीच नवनिर्वाचित राष्ट्रपतींचे नाव जाहीर होईल. एकुण मतदानापैकी एनडीएकडे ६३ टक्के मतांचे पाठबळ असल्याने रामनाथ कोविंद यांचा विजय निश्चित असल्याचे मानले जात आहे.संसद भवनात राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीचे मतदान शांततेत आणि खेळीमेळीच्या वातावरणात पार पडले. पंतप्रधान मोदी संसद भवनात मतदानासाठी वेळेपूर्वीच उपस्थित होते. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह गुजराथ विधानसभेत अहमदाबादच्या नारणपुरा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. त्यांनीही संसद भवनात मतदान केले. या केंद्रावर मतदान करणाऱ्यांमधे प्रामुख्याने काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, माजी पंतप्रधान मनमोहनसिंग, माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी, केंद्रीय मंत्रिमंडळाचे सदस्य, काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी, बसपच्या प्रमुख मायावती आदींचा समावेश होता. खासदार अभिनेता परेश रावल व हेमामालिनी यांनीही संसद भवनात मतदान केले. मतदान केंद्रावर खासदारांसाठी हिरव्या रंगाच्या तर आमदारांसाठी गुलाबी रंगाच्या मतपत्रिका होत्या.

आणखी वाचा 
 
देशाचे १४ वे राष्ट्रपती निवडण्यासाठी दिवसभर देशाच्या ३१ विधानसभांमधे मतदान झाले. हाती आलेल्या माहितीनुसार त्रिपुरा, उत्तरप्रदेश व गुजराथमधे क्रॉस व्होटिंग झाले. त्रिपुरात पक्षाचा आदेश झुगारून तृणमूलच्या ६ व काँग्रेसच्या १ बंडखोराने रामनाथ कोविंद यांना मतदान केल्याचे समजते. उत्तरप्रदेशात मुलायमसिंगांचे बंधू शिवपाल यादव यांच्या दाव्यानुसार समाजवादी पक्षातल्या सुमारे १0 आमदारांनी कोविंद यांना मतदान केले तर गुजराथमधे भाजपचे बंडखोर आमदार नलिन कोटडिया यांनी मीराकुमारांना मतदान केल्याचे समजले. देशात राजस्थान एकमेव असे राज्य आहे, जिथे ३ तास अगोदर मतदान समाप्त झाले. महाराष्ट्रात २ तर झारखंडात ४ आमदारांना तुरूंगातून मतदानासाठी आणले गेले. राष्ट्रपतीपदाची निवडणूक जिंकण्यासाठी एकुण मतदानाच्या ५0 टक्यांहून अधिक मते हवीत. एनडीएकडे स्वत:चे ४८ टक्के मतदान आहे. याखेरीज ६ विरोधी पक्षांसह ज्या १६ पक्षांनी एनडीए उमेदवार कोविंद यांना पाठिंबा दिला, त्यांचे मतदान १५ टक्के आहे. अशाप्रकारे रामनाथ कोविंद यांच्याकडे ६३ टक्के मतदानाचे पाठबळ असल्याने, त्यांचा विजय निश्चित मानला जात आहे.