शहरं
Join us  
Trending Stories
1
ICC Womens World Cup 2025 : टीम इंडियाची विजयी सलामी! दीप्ती-अमनजोतसह राणाचा अष्टपैलू बाणा
2
"हमासकडे शेवटचे ३-४ दिवस शिल्लक, जर त्यांनी ऐकलं नाही तर..."; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट धमकी
3
वर्ल्ड कपच्या पहिल्याच सामन्यात दीप्ती शर्मानं रचला इतिहास; अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय
4
धनगर आरक्षणासाठी तरूणाने स्वतःची कार जाळून केला सरकारचा तीव्र निषेध; जालना तालुक्यातील घटना
5
World Cup की सौंदर्य स्पर्धा... 'या' ८ महिला क्रिकेटर्सना बघून म्हणाल- हिरोईन दिसते हिरोईन!
6
शिर्डीत ५६ भिक्षेकरी पोलिसांच्या ताब्यात; महाराष्ट्रासह ७ राज्यांतील भिक्षेकऱ्यांचा समावेश
7
आमची ट्रॉफी, मेडल्स आम्हाला परत द्या... BCCI चा मोहसीन नक्वी यांना इशारा, ACC बैठकीत राडा
8
ग्राहक न्यायालयाच्या लाचखाेर लिपिकास एक वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा; ठाण्यातील प्रकरण
9
कापूस खरेदीस ‘पणन’ला परवानगी; लवकरच सीसीआयसोबत करार; आर्थिक मदतीची मागणी
10
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
11
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
12
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
13
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
14
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
15
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
16
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
17
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
18
नागपूरमधील प्रकल्प इतर राज्यांकडे वळण्याच्या प्रयत्नात ? ८८४४ कोटींचे प्रकल्प जमिनीअभावी अडकले !
19
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
20
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?

रामनाथ कोविंद यांचा अर्ज दाखल

By admin | Updated: June 24, 2017 02:55 IST

राष्ट्रपतीपदाचे भाजप व राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे उमेदवार रामनाथ कोविंद यांनी आपला अर्ज शुक्रवारी लोकसभेच्या महासचिवांच्या कार्यालयात जाऊ

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : राष्ट्रपतीपदाचे भाजप व राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे उमेदवार रामनाथ कोविंद यांनी आपला अर्ज शुक्रवारी लोकसभेच्या महासचिवांच्या कार्यालयात जाऊ न सादर केला आणि त्यामुळे त्यांचा राष्ट्रपती भवनात जाण्याचा मार्ग सुकर झाला. कोविंद यांनी अर्जाचे तीन सेट लोकसभा महासचिवांकडे सादर केले. निवडणूक अर्जाचा चौथा सेट ते २८ जून रोजी सादर करणार आहेत. त्यांच्याविरोधात विरोधकांतर्फे काँग्रेस नेत्या मीरा कुमार रिंगणात असल्या तरी १७ जुलै रोजी होणारी निवडणूक ही केवळ उपचार असेल. मतदानानंतर तीन दिवसांनी म्हणजे २0 जुलै रोजी मतमोजणी होणार आहे. सध्याचे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची मुदत २४ जुलै रोजी संपणार आहे.कोविंद यांचा विजय निश्चित आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, पक्षाध्यक्ष अमित शहा, ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी व मुरली मनोहर जोशी यांच्यासह जवळपास सर्व केंद्रीय मंत्री, भाजप व रालोआशासित अनेक राज्यांचे मुख्यमंत्री हेही रामनाथ कोविंद निवडणूक अर्ज दाखल करताना यांच्यासोबत होते. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू, महाराष्ट्राचे देवेंद्र फडणवीस, हरयाणाचे मनोहरलाल खट्टर, उत्तर प्रदेशचे योगी आदित्यनाथ, तेलंगणाचे के. चंद्रशेखर राव, तामिळनाडूचे मुख्यमंत्री पलानीस्वामी आणि अण्णा द्रमुकच्या दुसऱ्या गटाचे नेते माजी मुख्यमंत्री ओ. पनीरसेल्वम हे त्यात होते. अर्ज भरल्यानंतर कोविंद म्हणाले की, मी बिहारचा राज्यपाल झालो, तेव्हाच मी सक्रिय राजकारणापासून दूर झालो होतो. तेव्हाच राजकारणापलीकडील व्यक्ती झालो. राष्ट्रपती म्हणूनही मी राजकारणाशी संबंध नसलेला व्यक्ती म्हणूनच काम करेन आणि माझी राष्ट्रपती म्हणून असलेलीच कर्तव्ये बजावेन. ठाकरेंची अनुपस्थितीकोविंद उमेदवारी अर्ज दाखल करीत असताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी उपस्थित राहणे टाळणे भाजपाला खटकेल आहे. शिवाय ठाकरेंनी आपला प्रतिनिधी म्हणूनही कोणाला पाठविले नव्हते आणि हीच बाब भाजप नेत्यांना सर्वात जास्त खटकली. एवढेच नाही तर केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अनंत गिते यांनीही यावेळी संसद संकुलात उपस्थित राहणे टाळले. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यासाठी विमानाने दिल्लीला येणार होते. त्यांनी ठाकरेंना तुम्ही येणार असाल तर माझ्यासोबत येऊ शकता, असे सुचविले होते. चर्चा होऊ न जाऊ देत : मीरा कुमार : राष्ट्रपतीपदासाठी उभे असलेले दोन्ही उमेदवार केवळ दलित आहेत, याकडे महत्त्व न देता, त्यांचे आतापर्यंतचे कार्य, अनुभव आणि प्रश्नांकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टिकोन याकडे पाहणे गरजेचे आहे. त्यासाठी जाहीरपणे चर्चा व्हायला हवी, असे आव्हान काँग्रेसच्या उमेदवार मीरा कुमार यांनी कोविंद यांना दिले.याचा काहीही अर्थ काढू नये. आम्ही कोविंद यांचे नाव सुचविले असून, आम्ही त्यांना मतदान करणार आहोत. कोकणात आमचा आज कार्यक्रम होता आणि सर्व प्रमुख नेते त्यात सहभागी झाले होते. - खा. संजय राऊत, शिवसेनेचे नेते