वासनेची निवृत्ती करण्यासाठी रामनामाची गरज
By admin | Updated: August 28, 2015 23:37 IST
बार्शी: रामनामाला अनन्यसाधारण महत्त्व असून, रामनामाने वासना जळून जात़े वासनेची उत्पत्ती म्हणजे बंधन आणि वासनेची निवृत्ती म्हणजे मोक्ष होय, असे सांगत वासनेची निवृत्ती करण्यासाठी रामनामाची गरज असल्याचे प्रतिपादन जयवंत बोधले महाराज यांनी केल़े ते भगवंत मंदिरात र्शावणमासानिमित्त भगवंत देवस्थान व बोधराज भक्त मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या अध्यात्म रामायण या विषयावरील प्रवचनमालेत बोलत होत़े
वासनेची निवृत्ती करण्यासाठी रामनामाची गरज
बार्शी: रामनामाला अनन्यसाधारण महत्त्व असून, रामनामाने वासना जळून जात़े वासनेची उत्पत्ती म्हणजे बंधन आणि वासनेची निवृत्ती म्हणजे मोक्ष होय, असे सांगत वासनेची निवृत्ती करण्यासाठी रामनामाची गरज असल्याचे प्रतिपादन जयवंत बोधले महाराज यांनी केल़े ते भगवंत मंदिरात र्शावणमासानिमित्त भगवंत देवस्थान व बोधराज भक्त मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या अध्यात्म रामायण या विषयावरील प्रवचनमालेत बोलत होत़ेरामनामामध्ये र, अ, म ही तीन अक्षरे येतात़ र म्हणजे अग्निबीज, अग्निबीज म्हणजे पाप जाळून टाकणे, अ म्हणजे सूर्यबीज, सूर्यबीज म्हणजे प्रकाश निर्माण करणे, म म्हणजे चंद्रबीज, चंद्रबीज म्हणजे शांतता निर्माण करण़े याचा दुसरा अर्थ सांगताना महाराज म्हणाले, र म्हणजे वैराग्य, अ म्हणजे ज्ञानप्राप्ती आणि म म्हणजे भक्तीप्राप्ती़ राम म्हणत असताना रा म्हणताना ओठ उघडतात, म म्हणताना ओठ बंद होतात़ याचे महत्त्व सांगताना ते म्हणाले की, ओठ उघडणे म्हणजे पोटातील पापे बाहेर जाण़े आणि म म्हटल्यावर ओठ बंद होणे म्हणजे बाहेरची पापे आत न येण़े राम नाम हे मोक्षदायक असून, या रामनामाने निष्कामता प्राप्त होत़े हे सांगताना संत कबीर व संत कमालाचे वचने सांगून सीता अशोक वनात असताना ती रामनामाचा जप करत होती़ ते पाहून राक्षस सुध्दा रामनामात तल्लीन होत होत़े तोंडाने राम घेणे आणि मनातल्या मनात रामनाम घेण़े याचा विचार करताना रामनामाने वासना जळून जाते, असे त्यांनी स्पष्ट केल़े रामनामामध्ये जीव विश्वरूप आहे याची जाणीव होत़े