शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंसोबत जायचं की 'मविआ'तच राहायचं? उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिला स्पष्ट 'मेसेज'
2
"भारतात घरं जाळण्याच्या धमक्या..."; शाहिद आफ्रिदी पुन्हा बरळला, इरफान पठाणचीही उडवली खिल्ली
3
सोलापूर भाजपात नाराजीचं सत्र सुरूच; नव्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे, ५० जणांनी सोडले पद, कारण...
4
रशियात ७.४ तीव्रतेच्या भूकंपाच्या धक्क्यानं पुन्हा हादरली जमीन; त्सुनामीचा धोका, यंत्रणा अलर्ट
5
मोदी सरकार देतेय क्रेडिट कार्ड, ५ लाख रुपयांपर्यंत लिमिट; 'या' लोकांसाठी आनंदाची बातमी
6
Elphinstone Bridge: एल्फिस्टन पूल बंद होताच एसटीचे भाडे वाढले, आता तिकीट किती रुपयांनी महागले?
7
"भारताच्या 'टीम' बद्दल बोला..."; 'त्या' खेळाडूचं नाव ऐकताच कपिल देवने पत्रकारांना सुनावलं
8
प्रियाने निधनाच्या आदल्या रात्रीच शंतनुची मालिका पाहिली अन्...बहिणीविषयी बोलताना सुबोध भावुक
9
"लढली ती...पण शेवटी कॅन्सरने तिचा घास घेतला", सुबोध भावेने सांगितल्या प्रिया मराठेच्या आठवणी
10
Rohit Godara : कोण आहे रोहित गोदारा? दिशा पाटनीच्या घरावरील हल्ल्याची व्हॉइस मेसेज पाठवून घेतली जबाबदारी
11
Tarot Card: यशाचे शिखर गाठले तरी पाय जमिनीवर ठेवा, हे शिकवणार पुढचा आठवडा; वाचा टॅरो भविष्य!
12
Ind vs Pak Asia Cup 2025 Live: मोबाइलवर मोफत पाहू शकता मॅच; 'या' रिचार्ज प्लान्ससह मिळतेय संधी
13
दुसऱ्या महायुद्धानंतर प्रथमच युरोपावर युद्धाचे ढग; पोलंडने सीमेवर तैनात केले ४० हजार सैनिक
14
पत्नीला पळवून नेल्याचा राग अनावर झाला; कोल्हापुरात पतीने घरात घुसून तरुणाला संपवला
15
कुजबुज: मोहित कंबोज यांचा संन्यास, सरनाईकांची टेस्ला खरेदी अन् बरंच काही...
16
Elphinstone Bridge: प्रभादेवी रेल्वेस्थानकावरील पुलावर अखेर 'हातोडा', पाडकामास प्रचंड बंदोबस्तात सुरूवात
17
अरे बापरे! घरात २ जण अन् १.६५ लाख लीटर पाण्याचं आलं बिल; भाडेकरूने मांडली व्यथा
18
अमेरिकन शेअर मार्केटला येणारे 'हॉर्ट अटॅक'; एक्सपर्टनं ३ कारणं देत दिला इशारा; कोणता दिला सल्ला?
19
नेपाळची संसद भंग, निवडणुकीच्या तारखांची घोषणा; शुक्रवारी रात्री शेजारील देशात काय काय घडलं?
20
Asia Cup 2025 IND vs PAK: भारत-पाक सामना टीव्हीवर दाखवू नका, फिल्म संबंधित संघटनेची मागणी

राममंदिर, कलम ३७० अजेंड्यावरच

By admin | Updated: June 17, 2015 02:45 IST

अयोध्येत राममंदिराची निर्मिती, जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम ३७० रद्द करणे हे मुद्दे भाजपच्या अजेंड्यावर कायम असून त्याबाबत व्यापक सल्लामसलतीनंतरच निर्णय घेतला जाईल

नवी दिल्ली : अयोध्येत राममंदिराची निर्मिती, जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम ३७० रद्द करणे हे मुद्दे भाजपच्या अजेंड्यावर कायम असून त्याबाबत व्यापक सल्लामसलतीनंतरच निर्णय घेतला जाईल, असे कायदामंत्री डी. व्ही. सदानंद गौडा यांनी स्पष्ट केले.नरेंद्र मोदी यांच्या सरकारने तूर्तास चांगले प्रशासन आणि विकासावर लक्ष केंद्रित केले आहे. संपुआच्या सरकारने गेल्या दहा वर्षांत त्याकडे दुर्लक्ष केले होते. मी राज्यसभेत याबाबत आधीच निवेदन दिले आहे. त्यामुळे भाजपच्या अजेंड्यावर हा मुद्दा असून आम्ही जाहीरनाम्यातही कलम ३७० मध्ये सुधारणा करण्याची गरज अधोरेखित केली आहे. मी एक पाऊल पुढे जात तेच सांगत आहे. विविध पक्षांशी सल्लामसलत केली जाईल. विशेष दर्जाचा काही भागाला लाभ होत आहे, त्या भागालाही चर्चेत सहभागी करण्याची काळजी घेतली जाईल, असे ते एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत म्हणाले. संबंधितांची यादी बरीच मोठी असून त्यांच्याशी सल्लामसलत व्हायला हवी. त्यानंतरच समोर जाता येईल. सर्व पक्षांमध्ये सहमती घडवून आणल्याखेरीज घिसाडघाईने निर्णय घेता येणार नाही. त्यामुळे आम्ही सावकाश वाटचाल करू. हा मुद्दा आम्ही सोडलेला नाही, हाच त्याचा अर्थ होतो, असेही ते म्हणाले. (लोकमत न्यूज नेटवर्क)