शहरं
Join us  
Trending Stories
1
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
2
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
3
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
4
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
5
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
6
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
7
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
8
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
9
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
10
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
11
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
12
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
13
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
14
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
15
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
16
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
17
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
18
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
19
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
20
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील

वंचितांच्या जीवनात आनंद वाटण्याचा उत्सव रमजान ईद :

By admin | Updated: July 15, 2015 00:15 IST

अहमदनगर : रमजानच्या महिन्यात महिनाभर उपवास करुन घरातील प्रत्येक व्यक्तीच्या मोबदल्यात अडीच किलो धान्य किंवा त्याची रक्कम गरजवंतांच्या घरी नेऊन दिली जाते़ तसेच जकात आकारुन मुस्लीम समाजातील वंचितांसाठी विविध खर्च करण्याची परंपरा गेल्या अनेक वर्षांपासून सुरु आहे़ ईदच्या नमाजानंतर मोठ्या व्यक्तींकडून लहानांना ईदी दिली जाते़ तसेच वंचितांसाठी विविध वस्तू भेट देऊन त्यांच्या जीवनात आनंद फुलविण्याची परंपरा मुस्लीम बांधवांनी गेल्या अनेक वर्षांपासून जपली आहे़

अहमदनगर : रमजानच्या महिन्यात महिनाभर उपवास करुन घरातील प्रत्येक व्यक्तीच्या मोबदल्यात अडीच किलो धान्य किंवा त्याची रक्कम गरजवंतांच्या घरी नेऊन दिली जाते़ तसेच जकात आकारुन मुस्लीम समाजातील वंचितांसाठी विविध खर्च करण्याची परंपरा गेल्या अनेक वर्षांपासून सुरु आहे़ ईदच्या नमाजानंतर मोठ्या व्यक्तींकडून लहानांना ईदी दिली जाते़ तसेच वंचितांसाठी विविध वस्तू भेट देऊन त्यांच्या जीवनात आनंद फुलविण्याची परंपरा मुस्लीम बांधवांनी गेल्या अनेक वर्षांपासून जपली आहे़
याबाबत माहिती देताना डॉ़ इक्राम खान म्हणाले की, रमजान ईदचे मूळ नाव ईद-उल-फित्र हे आहे़ सदका-ए- फित्र या दानापासून हे नाव तयार झाले आहे़ सदका-ए- फित्र म्हणजे ईदच्या नमाजापूर्वी घरातील प्रत्येक व्यक्तीच्या मोबदल्यात अडीच किलो धान्य किंवा त्या धान्याची रक्कम गरजवंतांना त्यांच्या घरी नेऊन द्यावी़ रमजान महिन्यात महिनाभर उपवास (रोजे) केले जातात़ या महिन्यात जकात कर आकारला जातो़ एकूण उत्पन्नाच्या रकमेतून ५२़५ तोळे चांदी किंवा ७़५ तोळे सोन्याचे दागिने यापेक्षा जास्त असणार्‍या रकमेवर २़५ टक्के रक्कम वंचितासाठी खर्च करणे आवश्यक असते़ यालाच जकात असे संबोधले जाते़ गेल्या वर्षी नगरमध्ये २२ कोटीपेक्षा जास्त जकात जमा झाली होती़ ही रक्कम समाजातील वंचित घटकांसाठी खर्च केली जाते़ कुणी भुकेला राहू नये, कुणी असंतुष्ट असू नये यासाठी या रकमेतून विविध वस्तू खरेदी करुन दिल्या जातात़ वंचितांच्या जीवनात आनंद यावा, यासाठी त्यांना त्यांच्या घरी नेऊन दान द्यायचे असते़ वंचितांना आपल्या आनंदात सामावून घेण्याचा हा सण आहे़
रमजाननंतर येणार्‍या ईदला मोबदल्याचा दिवस म्हणतात़ महिनाभरातील उपवास, काम, दान पाहून प्रत्येकाला मोबदला दिला जातो़ रमजान महिन्यात दिवसभरात पाच नमाज केल्या जातात़ तर ईदच्या दिवशी सहा नमाज करण्याची प्रथा आहे़ नमाज झाल्यानंतर एकमेकांच्या गळाभेटी घेऊन ज्यांच्या घरी कुणी मयत झाले असेल त्यांच्या घरी जाऊन सांत्वन केले जाते़ त्यांना खाऊ घातले जाते आणि मग स्वत:च्या घरी जाण्याची परंपरा ईदच्या दिवशी आहे़ रमजान हा निव्वळ आनंद साजरा करण्याचा महिना नाही, तर तो इतरांचे दु:ख हलके करण्याचाही महिना आहे़
ईद साजरी करण्याच्या प्रथा जगभर वेगवेगळ्या आहेत़ भारतात दुधाचे पदार्थ मोठ्या प्रमाणात केले जातात़
(जोड आहे)