शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा पलटवार...! कतारमधील अमेरिकेच्या सर्वात मोठ्या एअरबेसवर डागली 6 क्षेपणास्त्रे
2
आखाती देशांत तणाव वाढण्याची चिन्हे, अनेक ठिकाणी एअरस्पेस बंद; एअर इंडिया, इंडिगोकडून सूचना जारी
3
“त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय घेणार”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
4
“स्वसंरक्षणाचा इराणला पूर्ण अधिकार”; रशियाने स्पष्टच सांगितले, तणाव वाढण्याची चिन्हे
5
ठरले! महादेव बाबर NCPमध्ये करणार प्रवेश; DCM अजित पवार राहणार उपस्थित, पुण्यात ताकद वाढणार
6
कुर्ला-सायनदरम्यान ओव्हरहेड वायर तुटली; मध्य रेल्वेच्या जलद फेऱ्या ठप्प, प्रवाशांचे हाल
7
"...तेलाच्या किमती कमी ठेवा, मी बघतोय!" इराण-इस्रायल युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान
8
ENG vs IND: KL राहुल-पंतच्या सेंच्युरीनंतर जड्डूची उपयुक्त खेळी! इंग्लंडसमोर ३७१ धावांचे टार्गेट
9
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, ५० हून अधिक लढाऊ विमानांचा कहर; महत्त्वाच्या लष्करी तळांवर तुफान बॉम्बिंग
10
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
11
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
12
२८ जुलैचा दावा खरा होणार? तिसरे महायुद्ध अटळ? बाबा वेंगा-नास्त्रेदमस यांची मोठी भविष्यवाणी
13
"तमीज से खेलने के चक्कर में..." कडक खेळी शिवाय पंतची 'मन की बात' चर्चेत (VIDEO)
14
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
15
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
16
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
17
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार
18
“विकासासाठीचा प्रत्येक रुपया सर्वसामान्यांपर्यंत पोहोचला पाहिजे”: DCM एकनाथ शिंदे
19
"वाटलं भारताने अण्वस्त्र हल्लाच केला, पाकिस्तानकडे फक्त...', नेमकं काय म्हणाले बिलावल भुट्टो
20
KL राहुलनं शतकी खेळीसह साधला विक्रमी डाव! लिटल मास्टर गावसकरांसह द्रविडलाही टाकले मागे

वंचितांच्या जीवनात आनंद वाटण्याचा उत्सव रमजान ईद :

By admin | Updated: July 15, 2015 00:15 IST

अहमदनगर : रमजानच्या महिन्यात महिनाभर उपवास करुन घरातील प्रत्येक व्यक्तीच्या मोबदल्यात अडीच किलो धान्य किंवा त्याची रक्कम गरजवंतांच्या घरी नेऊन दिली जाते़ तसेच जकात आकारुन मुस्लीम समाजातील वंचितांसाठी विविध खर्च करण्याची परंपरा गेल्या अनेक वर्षांपासून सुरु आहे़ ईदच्या नमाजानंतर मोठ्या व्यक्तींकडून लहानांना ईदी दिली जाते़ तसेच वंचितांसाठी विविध वस्तू भेट देऊन त्यांच्या जीवनात आनंद फुलविण्याची परंपरा मुस्लीम बांधवांनी गेल्या अनेक वर्षांपासून जपली आहे़

अहमदनगर : रमजानच्या महिन्यात महिनाभर उपवास करुन घरातील प्रत्येक व्यक्तीच्या मोबदल्यात अडीच किलो धान्य किंवा त्याची रक्कम गरजवंतांच्या घरी नेऊन दिली जाते़ तसेच जकात आकारुन मुस्लीम समाजातील वंचितांसाठी विविध खर्च करण्याची परंपरा गेल्या अनेक वर्षांपासून सुरु आहे़ ईदच्या नमाजानंतर मोठ्या व्यक्तींकडून लहानांना ईदी दिली जाते़ तसेच वंचितांसाठी विविध वस्तू भेट देऊन त्यांच्या जीवनात आनंद फुलविण्याची परंपरा मुस्लीम बांधवांनी गेल्या अनेक वर्षांपासून जपली आहे़
याबाबत माहिती देताना डॉ़ इक्राम खान म्हणाले की, रमजान ईदचे मूळ नाव ईद-उल-फित्र हे आहे़ सदका-ए- फित्र या दानापासून हे नाव तयार झाले आहे़ सदका-ए- फित्र म्हणजे ईदच्या नमाजापूर्वी घरातील प्रत्येक व्यक्तीच्या मोबदल्यात अडीच किलो धान्य किंवा त्या धान्याची रक्कम गरजवंतांना त्यांच्या घरी नेऊन द्यावी़ रमजान महिन्यात महिनाभर उपवास (रोजे) केले जातात़ या महिन्यात जकात कर आकारला जातो़ एकूण उत्पन्नाच्या रकमेतून ५२़५ तोळे चांदी किंवा ७़५ तोळे सोन्याचे दागिने यापेक्षा जास्त असणार्‍या रकमेवर २़५ टक्के रक्कम वंचितासाठी खर्च करणे आवश्यक असते़ यालाच जकात असे संबोधले जाते़ गेल्या वर्षी नगरमध्ये २२ कोटीपेक्षा जास्त जकात जमा झाली होती़ ही रक्कम समाजातील वंचित घटकांसाठी खर्च केली जाते़ कुणी भुकेला राहू नये, कुणी असंतुष्ट असू नये यासाठी या रकमेतून विविध वस्तू खरेदी करुन दिल्या जातात़ वंचितांच्या जीवनात आनंद यावा, यासाठी त्यांना त्यांच्या घरी नेऊन दान द्यायचे असते़ वंचितांना आपल्या आनंदात सामावून घेण्याचा हा सण आहे़
रमजाननंतर येणार्‍या ईदला मोबदल्याचा दिवस म्हणतात़ महिनाभरातील उपवास, काम, दान पाहून प्रत्येकाला मोबदला दिला जातो़ रमजान महिन्यात दिवसभरात पाच नमाज केल्या जातात़ तर ईदच्या दिवशी सहा नमाज करण्याची प्रथा आहे़ नमाज झाल्यानंतर एकमेकांच्या गळाभेटी घेऊन ज्यांच्या घरी कुणी मयत झाले असेल त्यांच्या घरी जाऊन सांत्वन केले जाते़ त्यांना खाऊ घातले जाते आणि मग स्वत:च्या घरी जाण्याची परंपरा ईदच्या दिवशी आहे़ रमजान हा निव्वळ आनंद साजरा करण्याचा महिना नाही, तर तो इतरांचे दु:ख हलके करण्याचाही महिना आहे़
ईद साजरी करण्याच्या प्रथा जगभर वेगवेगळ्या आहेत़ भारतात दुधाचे पदार्थ मोठ्या प्रमाणात केले जातात़
(जोड आहे)