शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

राममंदिर महत्त्वाचे; मात्र विकासावर लक्ष

By admin | Updated: May 30, 2015 00:08 IST

अयोध्येत राममंदिर उभारणे हा महत्त्वाचा मुद्दा आहे. न्यायालयाच्या तोडग्याचे सरकार स्वागतच करेल, तथापि सरकारने विकासाच्या मुद्यावर लक्ष केंद्रित केले

नवी दिल्ली : अयोध्येत राममंदिर उभारणे हा महत्त्वाचा मुद्दा आहे. न्यायालयाच्या तोडग्याचे सरकार स्वागतच करेल, तथापि सरकारने विकासाच्या मुद्यावर लक्ष केंद्रित केले असल्याचे केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंग यांनी येथे पत्रपरिषदेत सांगितले.रालोआ सरकारच्या कामगिरीकडे लक्ष वेधण्यासाठी त्यांनी येथे पत्रपरिषद बोलावली होती. सिंग हे रा. स्व. संघाचे सदस्य असल्यामुळे त्यांच्या विधानाला महत्त्व प्राप्त झाले आहे. आम्हाला आता प्राधान्यक्रम निश्चित करावा लागेल. राममंदिर हा न्यायालयाच्या अखत्यारीतील मुद्दा आहे. आपल्याला न्यायालयाच्या निर्णयाची प्रतीक्षा करावी लागेल. दोन समुदाय या मुद्यावर चर्चा करून तोडगा काढू शकतात, असे सिंग यांनी म्हटले.राममंदिर आणि कलम ३७० (जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे) थंडबस्त्यात ठेवण्यात आले काय? असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला होता. गेल्या काही दशकांपासून तोडगा निघू न शकलेल्या या वादावर सध्या हिंदू आणि मुस्लिम समुदायात कोणतीही चर्चा सुरू नाही. मधला मार्गही दृष्टिपथात नाही. हे प्रकरण सध्या न्यायप्रविष्ट आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी कलम ३७० सारख्या मुद्यावर सरकारकडे बहुमत नसल्याचा दावा केल्याबद्दल विचारण्यात आले असता राजनाथसिंग यांनी मुद्याला बगल दिली. ‘अभी अभी तो सरकार बनी है’ एवढेच उत्तर त्यांनी दिले.