ठेवींच्या आकड्यापेक्षाकिती जणांना स्वावलंबी केले हे महत्वाचे राम नाईक : जळगाव जनता बँकेला दिली भेट
By admin | Updated: November 1, 2015 20:49 IST
फोटो-०२ सीटीआर ६९
ठेवींच्या आकड्यापेक्षाकिती जणांना स्वावलंबी केले हे महत्वाचे राम नाईक : जळगाव जनता बँकेला दिली भेट
फोटो-०२ सीटीआर ६९जळगाव : सहकारी क्षेत्रातील बँकांनी आपल्या मूळ कार्यक्षेत्रातील भागाच्या विकासासाठी मदत करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तसे झाले तर सहकाराचे नववैभव उभे राहील. बँकेतील ठेवींच्या आकड्यापेक्षाही किती लोकांना स्वत:च्या पायावर उभे केले हे महत्वाचे आहे, असे प्रतिपादन उत्तर प्रदेशचे राज्यपाल राम नाईक यांनी जळगाव जनता बँकेच्या मुख्य शाखेतील भेटी प्रसंगी केले. बँकेच्या कार्याचेही त्यांनी कौतुक केले.जळगाव जनता बँकेचे संस्थापक अध्यक्ष स्व. डॉ.अविनाश आचार्य यांच्याशी नाईक यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते. त्यामुळेच जळगाव दौर्यावर असलेल्या नाईक यांनी शिवतीर्थ मैदानावरील कार्यक्रम आटोपल्यावर दुपारी सव्वा दोन वाजेच्या सुमारास बँकेच्या मुख्य कार्यालयास भेट दिली. यावेळी बँकेचे अध्यक्ष प्राचार्य अनिल राव, केशव स्मृती प्रतिष्ठानचे प्रकल्प प्रमुख भरत अमळकर, माजी अध्यक्ष संजय बिर्ला यांच्यासह संचालकांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी माजी खासदार गुणवंतराव सरोदे, बँकेच्या माजी संचालक व सरोदे यांच्या पत्नी श्यामल सरोदे हे देखील उपस्थित होते. राज्यपालांनी बँकेच्या मुख्य कार्यालयातील दुसर्या मजल्यावरील हॉलमध्ये संचालक मंडळाशी संवाद साधला. त्यांच्या मतदार संघातील बोरीवली स्टेशनवरील हमालांसाठी २७ वर्षांपूर्वी सुरू केलेल्या व आजही सुरळीत सुरू असलेल्या पतपेढीचा किस्साही त्यांनी ऐकविला.ते म्हणाले की, सहकारी बँकांसमोर अनेक अडचणी आहेत. मात्र सध्या राज्यात व देशातही एकाच पक्षाची सत्ता आहे. त्यामुळे हे प्रश्न सोडविता येऊ शकतील. नियमानुसार काम करतानाच संघाची ओळख असलेल्या प्रामाणीकपणा, पारदर्शकता या गुणांचा विसर पडू देऊ नका. अन्य प्रदेशांमध्ये विस्तार करण्याचे प्रयत्न कौतुकास्पद असले तरीही आपल्या मूळ कार्यक्षेत्राच्या विकासाला हातभार लावा, असा सल्लाही त्यांनी दिला. सरोदे दाम्पत्याचा बँकेतर्फे सत्कारयावेळी बँकेतर्फे माजी खासदार गुणवंतराव सरोदे यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. गुणवंतराव सरोदे यांचा भरत अमळकर व बँकेचे उपाध्यक्ष डॉ.प्रताप जाधव यांच्या हस्ते तर संचालिका आरती हुजूरबाजार यांच्या हस्ते माजी संचालिका श्यामल सरोदे यांचा सत्कार करण्यात आला. आठवणींना उजाळाराज्यपाल राम नाईक यांनी या भेटीत स्व.डॉ.अविनाश आचार्य यांच्या आठवणींना उजाळा दिला. सामाजिक, सहकार क्षेत्रात काम करतानाच डॉ.आचार्य यांच्याशी परिचय झाला होता, असेही त्यांनी आवर्जून सांगितले.