शहरं
Join us  
Trending Stories
1
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
2
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
3
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
4
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या
5
KKR vs RR : मसल पॉवर रसेलनं दाखवली ताकद; फिफ्टीसह मारली गंभीरच्या खास क्बमध्ये एन्ट्री
6
House Arrest Controversy: FIR दाखल केल्यानंतर उल्लू अ‍ॅपकडून माफीनामा, म्हणाले- "आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की..."
7
वरातीहून परतत असलेली कार झाडावर आदळली, हवाई दलाच्या कर्मचाऱ्यासह चार जणांचा मृत्यू, एक जण जखमी
8
सलग १५ तास साधला प्रसारमाध्यमांशी संवाद, पत्रकार परिषदेत या देशाच्या राष्ट्रपतींनी बनवला रेकॉर्ड
9
कल्याणमध्ये ३५ वर्षीय महिलेची इमारतीच्या १७व्या मजल्यावरून उडी; थरारक घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
10
संजय राऊतांनी घेतली भेट; फोटो शेअर करत शरद पवारांनी दिली माहिती, नेमके कारण तरी काय?
11
Ram Naik Resigns: राम नाईक यांचा मत्स्योद्योग विकास धोरण समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा
12
"लोकांनाही तेच हवं असतं, म्हणूनच...", डान्स शोच्या रिएलिटीबाबत गीता माँने स्पष्टच सांगितलं, म्हणाली...
13
भारताचा पाकिस्तानला मोठा धक्का, चिनाब नदीवरील बगलिहार धरणाचे पाणी रोखले
14
'कसौटी जिंदगी की' फेम अभिनेत्रीचा घटस्फोट, लग्नानंतर ५ वर्षांनी मोडला संसार
15
"ईव्हीएम किंवा बॅलेट पेपरमधून नृसिंह अवताराप्रमाणे नवा अवतार समोर येऊन राक्षसरूपी भाजपाचे खलत्व नष्ट करेल’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास  
16
“भाजपा महायुती सरकारने १०० दिवसांत आका, खोके शब्द दिले, जनतेची फसवणूक केली”; कुणी केली टीका?
17
पुण्यात आयशरची स्कूटीला धडक, महिलेला फरफटत नेल्याने मृत्यू; वेळेत रुग्णवाहिका न आल्याने लोकांचा संताप
18
जम्मू-काश्मीरच्या रामबन जिल्ह्यात भीषण अपघात; सैन्याचे वाहन दरीत कोसळले, 3 जवान शहीद
19
“मला आता या देशाची भीती वाटते, युट्यूब चॅनल बंद करण्याला बदला घेणे म्हणतात का?”: संजय राऊत
20
सीरिजच्या शूटिंगवेळीच झालं वडिलांचं निधन; मराठी अभिनेत्री म्हणाली, "वडिलांनी येऊ नको असं..."

गुरमेहरसाठी दिल्लीत मोर्चा

By admin | Updated: March 1, 2017 04:21 IST

दिल्लीतील वातावरण भलतेच तापले असून, तिच्या समर्थनार्थ मंगळवारी डाव्या विद्यार्थी संघटनांनी मोर्चा काढला

नवी दिल्ली : दिल्ली विद्यापीठाची विद्यार्थिनी गुरमेहर कौरला बलात्काराच्या आणि जिवे मारण्याच्या धमक्या मिळाल्यानंतर विद्यापीठ आणि दिल्लीतील वातावरण भलतेच तापले असून, तिच्या समर्थनार्थ मंगळवारी डाव्या विद्यार्थी संघटनांनी मोर्चा काढला, तर नॅशनल स्टुडंट्स युनियन आॅफ इंडियातर्फे धरणे धरण्यात आले. काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी तिच्या अभिव्यक्तीस्वातंत्र्यावर गदा आणण्याच्या प्रकाराबद्दल आणि तिला अभाविपकडून दिल्या जाणाऱ्या धमक्यांबद्दल संताप व्यक्त केला आहे. तिच्या महाविद्यालयानेही गुरमेहरच्या कृतीचे समर्थन केले आहे. आपण कोणाला घाबरत नाही. मात्र अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्याविरोधातील (अभाविप) मोहीम थांबवत आहोत, असे गुरमेहरने म्हटले. ती आज आपल्या जालंधर या गावी गेली. तेथील माजी सैनिकांच्या संघटनेने गुरमेहरला दिल्या जाणाऱ्या धमक्या खपवून घेतल्या जाणार नाहीत आणि आम्ही तिच्यामागे उभे आहोत, असे म्हटले आहे. तिच्या आजोबांनीही आपण गुरमेहरच्या मागे ठामपणे उभे राहू, असे म्हटले. समाजमाध्यमांद्वारे तिने अभाविपवर केलेल्या टीकेमुळे आणि आपले वडील पाकिस्तानचे नव्हे, तर युद्धाचे बळी आहेत, असे म्हणत दोन्ही देशांत सलोखा असावा, असे म्हटल्यामुळे भाजपचे नेते दुखावले होते. तिचे वडील कॅप्टन होते आणि ते कारगिल युद्धात शहीद झाले होते. ती लेडी श्री राम महाविद्यालयात शिकत आहे. ‘मी मोहीम मागे घेत आहे. प्रत्येकाचे अभिनंदन. मला एकटीला राहू द्या, अशी विनंती. मला जे म्हणायचे होते तेच मी म्हटले.’, असे तिने टिष्ट्वटरद्वारे म्हटले आहे.।गुन्हा दाखलगुरमेहर कौरला बलात्काराच्या धमक्या आल्यानंतर दिल्ली पोलिसांनी अज्ञात व्यक्तींवर गुन्हा दाखल केला आहे. या धमक्या अभाविपच्या कार्यकर्त्यांनी दिल्याचा तिचा आरोप आहे. गुरमेहर (२०) हिला धमक्या देणाऱ्यांविरुद्ध ताबडतोब प्रथम माहिती अहवाल दाखल करा अशी मागणी करणारे पत्र दिल्ली महिला आयोगाकडून पोलिसांना मिळाले होते.।शेकडोंनी काढला मोर्चादिल्ली विद्यापीठाच्या शेकडो विद्यार्थी आणि शिक्षकांनी मंगळवारी गुरमेहर कौर हिला पाठिंबा दर्शवण्यासाठी मोर्चा काढला. गेल्या काही दिवसांत एवढा मोठा मोर्चा निघाला नव्हता. जवाहरलाल नेहरू विद्यापीठात विद्यार्थ्यांची आंदोलने जशी प्रक्षोभक होतात तसा दिल्ली विद्यापीठाचा अनुभव नाही. नेहरू विद्यापीठाचे विद्यार्थी, प्रसिद्ध शिक्षणतज्ज्ञ आणि इतर महाविद्यालयांतील विद्वान या मोर्चात सहभागी होते. दिल्ली विद्यापीठासह देशभर विद्यापीठ परिसरात आवाज दाबून टाकण्याच्या होत असलेल्या प्रयत्नांचा निषेध होणे आवश्यक आहे. चर्चा करणे आणि मतभेद व्यक्त करण्यासाठी आम्हाला जागा हवी आहे, असे दिल्ली विद्यापीठातील आॅल इंडिया स्टुडंट्स असोसिएशनचे नेते कंवलप्रीत कौर म्हणाले.