शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधूंची युती होईल का, किती टिकेल? स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वतींची मोठी भविष्यवाणी
2
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
3
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
4
कोट्यवधी लोकांना खूशखबर, पीएफच्या खात्यात जमा झाले व्याजाचे पैसे, असा तपासा बॅलन्स
5
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
6
१४ वर्षांच्या पोराचा आणखी एक पराक्रम! आता वैभव सूर्यंवशीनं मोडला शुबमन गिलचा विक्रम
7
गोपाल खेमका हत्याकांडात मोठा गौप्यस्फोट, एका व्यावसायिकानेच दिली होती सुपारी, समोर आलं असं कारण
8
“राज ठाकरेंच्या मविआतील सहभागावर अद्याप चर्चा नाही”; रमेश चेन्नीथला यांनी केले स्पष्ट
9
पोलीस अधिकाऱ्यानं चोरला ट्रेनमध्ये झोपलेल्या प्रवाशाचा मोबाईल, जवळ उभे असलेले फक्त बघतच राहिले; VIDEO व्हायरल
10
योगी सरकारमधील महिला मंत्र्यांच्या ताफ्याला मोठा अपघात, झाल्या गंभीर जखमी  
11
भारतीय क्रिकेटर स्मृती मन्धानाला इंग्लंडमध्ये मिळाला 'लाल गुलाब'; फोटो व्हायरल, रंगली चर्चा
12
विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद रिक्त, विरोधकांची सरकारवर टीका; विधिमंडळात पायऱ्यांवर आंदोलन
13
बाबर आझम, मोहम्मद रिझवानचं T20 करियर संपलं? नव्या पाकिस्तानी कोचने संघातून काढलं बाहेर
14
अंधश्रद्धेचा कळस! ११ वर्षे मूल नाही, मांत्रिकाची महिलेला मारहाण; पाजलं घाणेरडं पाणी, झाला मृत्यू
15
नाशिकच्या सिडकोत भर रस्त्यात वृद्धाचा खुन; दहा दिवसांत दुसरी घटना 
16
Sonu Sood : बैल पाठवतो म्हटला होता, मदत केली का? नेटकऱ्याच्या प्रश्नावर सोनू सूदनं बँक स्टेटमेंट केलं शेअर
17
अहमदाबाद विमान अपघात, एअर इंडियाचा संसदीय समितीसमोर जबाब, ड्रिमलायनरबाबत दिली अशी माहिती
18
'पंचायत'च्या प्रधानजींचे होते विवाहबाह्य संबंध, 'या' अभिनेत्याच्या पत्नीसोबत चाललं अफेअर
19
'मुख्यमंत्री फडणवीस सुद्धा वैतागले'; प्रताप सरनाईकांनी सांगितलं 'मराठी मोर्चा'चा मुद्दा का चिघळला?
20
“हिंदी सक्तीच्या मुद्द्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका दुटप्पी”: हर्षवर्धन सपकाळ

गुरमेहरसाठी दिल्लीत मोर्चा

By admin | Updated: March 1, 2017 04:21 IST

दिल्लीतील वातावरण भलतेच तापले असून, तिच्या समर्थनार्थ मंगळवारी डाव्या विद्यार्थी संघटनांनी मोर्चा काढला

नवी दिल्ली : दिल्ली विद्यापीठाची विद्यार्थिनी गुरमेहर कौरला बलात्काराच्या आणि जिवे मारण्याच्या धमक्या मिळाल्यानंतर विद्यापीठ आणि दिल्लीतील वातावरण भलतेच तापले असून, तिच्या समर्थनार्थ मंगळवारी डाव्या विद्यार्थी संघटनांनी मोर्चा काढला, तर नॅशनल स्टुडंट्स युनियन आॅफ इंडियातर्फे धरणे धरण्यात आले. काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी तिच्या अभिव्यक्तीस्वातंत्र्यावर गदा आणण्याच्या प्रकाराबद्दल आणि तिला अभाविपकडून दिल्या जाणाऱ्या धमक्यांबद्दल संताप व्यक्त केला आहे. तिच्या महाविद्यालयानेही गुरमेहरच्या कृतीचे समर्थन केले आहे. आपण कोणाला घाबरत नाही. मात्र अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्याविरोधातील (अभाविप) मोहीम थांबवत आहोत, असे गुरमेहरने म्हटले. ती आज आपल्या जालंधर या गावी गेली. तेथील माजी सैनिकांच्या संघटनेने गुरमेहरला दिल्या जाणाऱ्या धमक्या खपवून घेतल्या जाणार नाहीत आणि आम्ही तिच्यामागे उभे आहोत, असे म्हटले आहे. तिच्या आजोबांनीही आपण गुरमेहरच्या मागे ठामपणे उभे राहू, असे म्हटले. समाजमाध्यमांद्वारे तिने अभाविपवर केलेल्या टीकेमुळे आणि आपले वडील पाकिस्तानचे नव्हे, तर युद्धाचे बळी आहेत, असे म्हणत दोन्ही देशांत सलोखा असावा, असे म्हटल्यामुळे भाजपचे नेते दुखावले होते. तिचे वडील कॅप्टन होते आणि ते कारगिल युद्धात शहीद झाले होते. ती लेडी श्री राम महाविद्यालयात शिकत आहे. ‘मी मोहीम मागे घेत आहे. प्रत्येकाचे अभिनंदन. मला एकटीला राहू द्या, अशी विनंती. मला जे म्हणायचे होते तेच मी म्हटले.’, असे तिने टिष्ट्वटरद्वारे म्हटले आहे.।गुन्हा दाखलगुरमेहर कौरला बलात्काराच्या धमक्या आल्यानंतर दिल्ली पोलिसांनी अज्ञात व्यक्तींवर गुन्हा दाखल केला आहे. या धमक्या अभाविपच्या कार्यकर्त्यांनी दिल्याचा तिचा आरोप आहे. गुरमेहर (२०) हिला धमक्या देणाऱ्यांविरुद्ध ताबडतोब प्रथम माहिती अहवाल दाखल करा अशी मागणी करणारे पत्र दिल्ली महिला आयोगाकडून पोलिसांना मिळाले होते.।शेकडोंनी काढला मोर्चादिल्ली विद्यापीठाच्या शेकडो विद्यार्थी आणि शिक्षकांनी मंगळवारी गुरमेहर कौर हिला पाठिंबा दर्शवण्यासाठी मोर्चा काढला. गेल्या काही दिवसांत एवढा मोठा मोर्चा निघाला नव्हता. जवाहरलाल नेहरू विद्यापीठात विद्यार्थ्यांची आंदोलने जशी प्रक्षोभक होतात तसा दिल्ली विद्यापीठाचा अनुभव नाही. नेहरू विद्यापीठाचे विद्यार्थी, प्रसिद्ध शिक्षणतज्ज्ञ आणि इतर महाविद्यालयांतील विद्वान या मोर्चात सहभागी होते. दिल्ली विद्यापीठासह देशभर विद्यापीठ परिसरात आवाज दाबून टाकण्याच्या होत असलेल्या प्रयत्नांचा निषेध होणे आवश्यक आहे. चर्चा करणे आणि मतभेद व्यक्त करण्यासाठी आम्हाला जागा हवी आहे, असे दिल्ली विद्यापीठातील आॅल इंडिया स्टुडंट्स असोसिएशनचे नेते कंवलप्रीत कौर म्हणाले.