शहरं
Join us  
Trending Stories
1
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
2
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
3
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
4
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
5
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
6
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
7
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
8
अयोध्या राम मंदिरात ७० नवे पुजारी घेतले जाणार, ट्रस्टचा निर्णय; परिसरातील मंदिरात सेवा करणार
9
२१ डिसेंबर रोजी सुरु होणार पौष मास 'भाकड मास' का म्हटला जातो? शुभ कार्यालाही लागतो विराम!
10
पतीनं पत्नीकडून घरखर्चाचा हिशोब मागणं क्रूरता?; सुप्रीम कोर्टाने सुनावला महत्त्वाचा निकाल
11
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
12
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
13
Tarot Card: 'ऐकावे जनाचे, करावे मनाचे' याची प्रचिती देणारा आठवडा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य 
14
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
15
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
16
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
17
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
18
अकोला महापालिका: भाजप-शिंदेंच्या शिवसेनेचं युतीबाबत निर्णय कधी? ठाकरेंची शिवसेना-मनसेची बोलणी सुरू
19
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
20
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

मोदींच्या ‘त्या’ वक्तव्यावरून राज्यसभेत गोंधळ

By admin | Updated: April 29, 2015 00:01 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आंतरराष्ट्रीय व्यासपीठावरून केलेल्या वक्तव्यामुळे भारताची प्रतिमा मलिन झाल्याचा आरोप करीत, विरोधकांनी मंगळवारी राज्यसभेत जोरदार गोंधळ घातला.

जयशंकर गुप्त - नवी दिल्लीचालू महिन्यातील विदेश दौऱ्यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आंतरराष्ट्रीय व्यासपीठावरून केलेल्या वक्तव्यामुळे भारताची प्रतिमा मलिन झाल्याचा आरोप करीत, विरोधकांनी मंगळवारी राज्यसभेत जोरदार गोंधळ घातला. या मुद्यावर चर्चेची मागणी काँग्रेससह विरोधकांनी लावून धरली. उपसभापतींनी ही मागणी फेटाळल्यामुळे आक्रमक काँग्रेस सदस्यांनी नारेबाजी केली. नारेबाजी करणाऱ्या या सदस्यांमध्ये राज्यसभा सदस्य विजय दर्डा आघाडीवर होते.विरोधकांच्या गोंधळामुळे सभागृहाचे कामकाज दोनच्या स्थगितीनंतर दुपारी २ वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले. कॅनडाच्या दौऱ्यावर असताना मोदींनी भारतीय समुदायासमोर केलेल्या भाषणात काही लोक घाण सोडून गेलेत, मी ती साफ करणार आहे. घोटाळ्यांचा देश ही ‘स्कॅम इंडिया’बदलून ‘स्किल इंडिया’ अशी देशाची नवी प्रतिमा घडवणार आहे. मंगळवारी काँग्रेसचे आनंद शर्मा यांनी राज्यसभेत हा मुद्दा उपस्थित केला. पंतप्रधानांच्या या वक्तव्यांवर नियम २६७ अंतर्गत कार्यस्थगन प्रस्तावाअंतर्गत चर्चा करण्याची मागणी केली. अर्थात या मुद्यावर विविध पक्षांची बाजू ऐकल्यानंतर उपसभापती पी.जे. कुरियन यांनी शर्मा यांची कार्यस्थगन प्रस्तावाची नोटीस खारीज केली. सभागृहाचे कामकाज सुरू होताच, शर्मा यांनी मोदींच्या आंतरराष्ट्रीय व्यासपीठावरील वक्तव्ये देशाची प्रतिमा मलिन करणारी असल्याचा आरोप केला. अन्य विरोधकांनीही त्यांना पाठिंबा दिला. परदेशात जाऊन आपल्या देशातील विरोधकांवर टीका करणे भारताची संस्कृती नाही. यापूर्वी कुठल्याही पंतप्रधानाने अशी वक्तव्ये केलेली नाहीत, असे शर्मा म्हणाले. यावरून विरोधक व सत्ताधाऱ्यांमध्ये चांगलेच वाक्युद्ध रंगले.जेटलींनी केला सरकारचा बचाव४६० वर्षांत झालेल्या भ्रष्टाचारापासून स्वत:ला वेगळे करण्याचा व आम्ही एक स्वच्छ व प्रामाणिक शासन देऊ हे म्हणण्याचा पंतप्रधानांना पूर्ण अधिकार असल्याचे अर्थमंत्री अरुण जेटली म्हणाले. पंतप्रधानांनी आपल्या विदेश दौऱ्यात भारतीय वंशाच्या लोकांसमक्ष बोलताना निर्णय प्रक्रिया स्वच्छ करण्याचे म्हटले होते. या मुद्यावर सभागृहात चर्चा होत असेल तर गत ६० वर्षांतील भ्रष्टाचारही चव्हाट्यावर येईल, असे जेटली म्हणाले.