शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास
2
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
3
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
4
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
5
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
6
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
7
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
8
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
9
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
10
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
11
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
12
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
13
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
14
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
15
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
16
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
17
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
18
स्टायलिश लूकसह रॉयल एनफील्ड हंटर ३५० बाजारात; बघताच प्रेमात पडाल!
19
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
20
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार

हैदराबाद विमानतळाच्या नावावरून राज्यसभेत गदारोळ

By admin | Updated: November 27, 2014 23:48 IST

हैदराबादच्या विमानतळावरील देशी टर्मिनलचे नाव बदलण्याच्या मुद्यावर राज्यसभेत काँग्रेसच्या सदस्यांनी लागोपाठ दुस:या दिवशी गुरुवारी जोरदार नारेबाजी करीत संतप्त भावना व्यक्त केल्या.

नारेबाजी : विजय दर्डा यांच्यासह काँग्रेस सदस्यांच्या संतप्त भावना
जयशंकर गुप्त - नवी दिल्ली
हैदराबादच्या विमानतळावरील देशी टर्मिनलचे नाव बदलण्याच्या मुद्यावर राज्यसभेत काँग्रेसच्या सदस्यांनी लागोपाठ दुस:या दिवशी गुरुवारी जोरदार नारेबाजी करीत संतप्त भावना व्यक्त केल्या. दोनदा कामकाज तहकूब झाल्यानंतर दुपारी 2 वाजता भोजन अवकाशासाठी तिस:यांदा कामकाज थांबविण्यात आले. यात प्रश्नोत्तराचा तास वाया गेला. हैदराबाद विमानतळाच्या देशी टर्मिनलला आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री एन. टी. रामाराव यांचे नाव देण्याच्या निर्णयावर फेरविचार करावा अशी मागणी काँग्रेसच्या सदस्यांनी बुधवारी केली होती. त्यावर आंतरराष्ट्रीय टर्मिनलला राजीव गांधी यांचेच नाव असल्याचे कारण देत सरकारने फेरविचार होणार नसल्याचे स्पष्ट केले होते.
सभागृहाचे कामकाज सुरू होताच काँग्रेसचे व्ही. हनुमंत राव यांनी हा मुद्दा उपस्थित केला. हैदराबाद विमानतळाच्या काही भागाला एन.टी. रामाराव टर्मिनल असे नाव देण्यात आले असून राजकीय लाभ मिळविला जात आहे, असे ते म्हणाले. त्यानंतर काँग्रेसच्या सदस्यांनी हाती फलक व घोषणा देत सभापतींच्या आसनासमोर धाव घेतली.  त्यावर उपसभापती पी. जे. कुरियन म्हणाले की, दिवंगत राजीव गांधी यांच्यावर प्रेम करणारे तुम्ही एकमेव व्यक्ती नाहीत. राजीव गांधी हयात असते तर त्यांनीही असा गदारोळ खपवून घेतला नसता. याआधी काँग्रेसच्याच आनंद शर्मा यांनी हा मुद्दा उपस्थित केल्यानंतर अर्थमंत्री अरुण जेटली यांनी त्याला उत्तर दिले आहे. शमसाबाद विमानतळाच्या आंतरराष्ट्रीय टर्मिनलला राजीव गांधी यांचे नाव आहे. ते बदलण्यात आले नसून देशी टर्मिनलला एन. टी. रामाराव यांचे नाव होते आणि त्यातही बदल केला जाणार नाही, असे उत्तर जेटलींनी बुधवारी दिले होते. 
कुरियन यांनी सदस्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला. काँग्रेसच्या सदस्यांचे त्यावर समाधान झाले नाही. विजय दर्डा, शांताराम नाईक, रजनी पाटील, राजीव गौडा, आनंद भास्कर रापोलू यांनी सभापतींच्या आसनासमोर जात राजीव गांधी अमर रहे, जब तक सूरज चांद रहेगा, राजीव तेरा नाम रहेगा, असे नारे दिले. या गदारोळात कामकाज तहकूब झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन यांनी आरटीआयअंतर्गत सुरक्षेचा तपशील मागितल्याचा मुद्दा काँग्रेसचे मधुसूदन मिस्त्री यांनी उपस्थित करण्याचा प्रयत्न केला मात्र त्यात त्यांना यश आले नाही.
 
4अदानी समूहाला ऑस्ट्रेलियातील एका कोळसा प्रकल्पासाठी भारतीय स्टेट बँकेने एक अब्ज डॉलरचे कर्ज दिल्याचा मुद्दा राज्यसभेत तृणमूल काँग्रेसच्या सदस्यांनी उपस्थित  केला.
 
4 अदानींना एवढे मोठे कर्ज देण्यामागे साटेलोटे असलेला भांडवलवाद असल्याचा आरोप तृणमूल काँग्रेसचे डेरेक ओ ब्रायन यांनी शून्य तासाला केला. स्टेट बँकेने सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली असून त्यात एका उद्योग समूहाला सर्वात मोठे एकल कर्ज देण्याचा उल्लेख आहे. जगातील पाच आंतरराष्ट्रीय बँकांनी या उद्योग समूहाला कर्ज देण्यास नकार दिला आहे, असे ते म्हणाले.