शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगामसारखा आणखी एक दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता; गुप्तचर विभागाची माहिती, यंत्रणा अलर्ट
2
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
3
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
4
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
5
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
6
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
7
May Born Astro: राजसी, आकर्षक पण तापट स्वभाव, वाचा मे महिन्यात जन्मलेल्या लोकांचे गुण दोष!
8
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकवा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
9
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
10
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
11
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
12
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू
13
Stock Market Today: पळून थकला का शेअर बाजार? ८२ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; ऑटो-PSU Bank मध्ये विक्री
14
आता अमेरिकेतील दीड लाख भारतीय ट्रकचालक संकटात; अस्खलित इंग्रजीतच बोलण्याचा ट्रम्प यांनी काढला नवा आदेश
15
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
16
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
17
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
18
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
19
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
20
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू

राज्यसभेसाठी ८ राज्यांत झाली बिनविरोध निवड, काँग्रेसचे संख्याबळ घटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2018 01:49 IST

महाराष्ट्रासह ८ राज्यांमध्ये राज्यसभेच्या निवडणुका बिनविरोध झाल्या आहेत. उत्तर प्रदेशात मात्र १0 जागांसाठी ११ उमेदवार उभे असल्याने तेथे निवडणूक होणे अपरिहार्य आहे.

नवी दिल्ली : महाराष्ट्रासह ८ राज्यांमध्ये राज्यसभेच्या निवडणुका बिनविरोध झाल्या आहेत. उत्तर प्रदेशात मात्र १0 जागांसाठी ११ उमेदवार उभे असल्याने तेथे निवडणूक होणे अपरिहार्य आहे. बिहारमधून भाजपातर्फे रवीशंकर प्रसाद, जनता दल (संयुक्त) चे प्रदेशाध्यक्ष वशिष्ठ नारायण सिंग, व महेंद्र प्रसाद सिंग, राजदचे मनोज सिन्हा व अश्फाक करीम आणि काँग्रेसचे अखिलेश प्रसाद सिंग बिनविरोध निवडून आले.मध्य प्रदेशच्या पाच जागांसाठी थावरचंद गहलोत, धर्मेंद्र प्रधान या दोन मंत्र्यांसह अजय प्रताप सोनी व कैलाश सोनी हे भाजपाचे चार व काँग्रेसचे राजमणी पटेल हे बिनविरोध निवडून आले. गुजरातच्या चार जागांवर भाजपातर्फे पुरुषोत्तम पुपाला व मनसुख मांडविया हे केंद्रीय मंत्री तर काँग्रेसतर्फे नारण राठवा व अमी याज्ञिक बिनविरोधी विजयी झाले आहेत. या खेपेस सर्वच पक्षांनी निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी प्रयत्न केल्याचे दिसले. राजस्थानातून किरोरी मीना, भूपेंद्र यादव व मदनलाल सैनी हे तिघे भाजपाचे उमेदवार विजयी झाले. मीना हे रविवारी भाजपामध्ये आले होते. राजस्थानात काँग्रेसने उमेदवार उभा केला नव्हता. राजस्थानातील एका जागेवर केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा यांचीही बिनविरोध निवड झाली. आंध्र प्रदेशातील तीन जागांवर तेलगू देसमचे सी. एम. रमेश व के. रवींद्र कुमार आणि वायएसआर काँग्रेसचे व्ही. प्रभाकर रेड्डी विजयी झाले. हरयाणातील एका जागेवर भाजपाचे डी. पी. वत्स बिनविरोध निवडून आले आहेत. उत्तर प्रदेशात राज्यसभेच्या १0 जागांसाठी ११ उमेदवार रिंगणात आहेत. तिथे भाजपाने अधिक उमेदवार उभा केला आहे. त्यामुळे तिथे निवडणूक होईल.

टॅग्स :Rajya Sabhaराज्यसभा