शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
2
IND vs PAK: गंभीरनं टीम इंडियातील खेळाडूंना स्पष्ट सांगितलंय की...; सहाय्यक कोच नेमकं काय म्हणाले?
3
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
4
Asia Cup 2025 Points Table : भारत-पाक लढतीआधी लंकेची विजयी सलामी! तरीही अफगाणिस्तान ठरले भारी!
5
नेपाळ हिंसाचारासंदर्भात CM योगी आदित्यनाथ यांचं मोठं विधान; म्हणाले - "छोट्या-छोट्या गोष्टींकडे..."
6
BAN vs SL : श्रीलंकेचा डंका! एका पराभवासह बांगलादेश संघ स्पर्धेतून OUT होण्याच्या उंबरठ्यावर
7
चार दिवसांत थंड व्हाल, हिंम्मत असेल तर कारागृहात पाठवून दाखवा; प्रशांत किशोर यांचं संजय जायसवाल यांना आव्हान
8
२०७ खुनाचा आरोप, तिला पकडण्यासाठी होते २ कोटींचे इनाम ! पण तिच्या 'या' निर्णयाने तिलाच मिळतील २५ लाख
9
कमाल झाली! हसरंगाचा बॉल स्टंपला लागला, पण नशिबाच्या जोरावर बॅटर Not Out राहून चमकला (VIDEO)
10
शेअर असावा तर असा...! 5 वर्षांत लखपतींना केलं करोडपती; TV-AC अन् वॉशिंग मशीन तयार करते कंपनी
11
"होय, मतचोरी झाली !" मत चोरीतूनच भाजप सत्तेत; काँग्रेसच्या आरोपाला नक्षल्यांचे समर्थन
12
Women's Asia Cup 2025 Final : भारताची फायनलमध्ये धडक! चीनचा हिशोब चुकता करुन इतिहास रचण्याची संधी
13
IND vs PAK Head To Head Record : पाकचा नवा डाव; पण टीम इंडियाविरुद्ध फिकी ठरेल त्यांची ही चाल, कारण...
14
लाईफबॉय साबण ८, डव शाम्पू ५५, टूथपेस्ट १६ रुपयांनी स्वस्त झाली; हिंदुस्तान युनिलिव्हरची यादी आली...   
15
आता पश्चाताप करून काय उपयोग? रोखण्याचा प्रयत्न करूनही तरुणीनं खोल पाण्यात उडी घेतली; थरकाप उडवणारा VIDEO
16
सासऱ्यावर गोळी झाडली, स्वतःला वाचवण्यासाठी पळत सुटला अन् पुराच्या पाण्यात पडला जावई! पुढे जे झालं...
17
असुरक्षित! पहाटे पुणे स्टेशनला उतरलेल्या तरुणाने पैसे न दिल्याने पोटात चाकूने वार
18
उल्हासनगरातील हॅन्ड्रेड बारमध्ये महिला वेटर्सचे अश्लील चाळे, महिला वेटर्ससह ९ जणांवर गुन्हा 
19
घरात ‘टॉप टू बॉटम’ डॉक्टर ; पण आयएएस झाले आणि लोकसेवेत आले...
20
योगेश आळेकरी यांना मिळाली नवीकोरी दुचाकी; पुढच्या प्रवासाला सुरुवात करणार पण...

मोठी बातमी! भारत आणि चीनमध्ये सीमेवरून समेट; राजनाथ सिंह यांची राज्यसभेत घोषणा

By देवेश फडके | Updated: February 11, 2021 11:03 IST

भारत आणि चीन सीमेवरील सद्यस्थितीबाबत राज्यसभेत सरकारने निवेदन द्यावे, अशी मागणी केली गेली होती. त्यानुसार संरक्षण मंत्री राजनाथ सिंह (rajnath singh) यांनी भारत आणि चीन सीमेवर तोडगा निघाला असून, दोन्ही देशांचे सैन्य मागे घेण्यास सुरुवात झाली आहे, अशी घोषणा यावेळी बोलताना केली. (india china lac dispute)

ठळक मुद्देभारत आणि चीन सीमेच्या सद्यस्थितीबाबत राजनाथ सिंह यांचे राज्यसभेत निवेदनदोन्ही देशांतील चर्चेच्या नवव्या फेरीत सैन्य मागे घेण्यावर एकमतएप्रिल २०२० पूर्वीची परिस्थिती ठेवण्यावर दोन्ही देशांत सहमती

नवी दिल्ली : लडाखच्या पूर्व भागात असलेल्या पँगॉंग लेक परिसरावरून भारत आणि चीन या दोन्ही देशांमध्ये समेट झाली असून, परस्पर सहमतीने सैन्य मागे घेतले जात आहे, अशी महत्त्वपूर्ण माहिती संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी दिली. ते राज्यसभेत बोलत होते. (rajnath singh statement in rajya sabha on india china lac dispute)

भारत आणि चीन सीमेवरील सद्यस्थितीबाबत राज्यसभेत सरकारने निवेदन द्यावे, अशी मागणी केली गेली होती. त्यानुसार संरक्षण मंत्री राजनाथ सिंह (rajnath singh) यांनी भारत आणि चीन सीमेवर तोडगा निघाला असून, दोन्ही देशांचे सैन्य मागे घेण्यास सुरुवात झाली आहे, अशी घोषणा यावेळी बोलताना केली. (india china lac dispute) सन १९६२ च्या पूर्वीपासून भारताच्या मोठ्या भागावर ताबा मिळवला आहे. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील तणावाचा भारत आणि चीन या दोन्ही देशांच्या संबंधावर प्रभाव पडल्याचे राजनाथ सिंह यांनी सांगितले. 

पँगाँग सीमेवरून सहमती

भारत आणि चीन या दोन्ही देशांमध्ये पँगाँग सीमेवरून सहमती झाली आहे. एप्रिल २०२० च्या पूर्वीची स्थिती कायम ठेवली जाणार आहे. चीनने आतापर्यंत या भागात केलेले बांधकाम जमीनदोस्त केले जाणार आहे, अशी माहिती राजनाथ सिंह यांनी दिली. भारत-चीन तणावादरम्यान ज्या जवानांनी हौतात्म्य पत्करले, त्यांना देश सलाम करेल. देशाच्या अखंडतेसाठी संपूर्ण संसद एकसंध असल्याचेही राजनाथ सिंह यांनी नमूद केले. 

चिनी सैन्याच्या माघारीला लडाखमधून सुरुवात

सीमेवर शांतता नांदण्याला प्राधान्य

भारत आणि चीनमधील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील तणाव कमी करून सीमेवर शांतता नांदावी, याला प्राधान्य देण्यात आले आहे. आम्ही एकही इंच जमीन कोणालाही देणार नाही. चीनकडून गतवर्षी मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रांचा साठा या भागात करण्यात आला होता. त्यावरून भारतीय सैन्याने चीनविरोधात पुरेशी कारवाई केली आहे. सप्टेंबर महिन्यापासून दोन्ही देशांमध्ये चर्चा सुरू आहे. परिस्थिती पूर्वीसारखी असावी, हे आमचे ध्येय आहे, असेही राजनाथ सिंह म्हणाले. 

चर्चेच्या नवव्या टप्प्यात सहमती

भारत आणि चीनच्या कमांडर स्तरावर झालेल्या नवव्या टप्प्यातील चर्चेत दोन्ही पक्षांमध्ये झालेल्या सहमतीनुसार दोन्ही देशांचे सैन्य पँगाँग लेकच्या उत्तर आणि दक्षिण भागातून मागे हटण्यास सुरूवात केली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पँगाँग लेकच्या फिंगर ४ येथे दोन्ही देशांकडून पेट्रोलिंग केली जाणार नाही. या भागाला 'नो पेट्रोलिंक झोन' म्हणून घोषित करण्यात आले आहे. चिनी सैन्य फिंगर ८ आणि भारतीय सैन्य धन सिंह थापा पोस्ट म्हणजेच फिंगर २ वरून फिंगर ३ वर मागे येणार आहे.

दरम्यान, सीमेवरील परिस्थितीबाबत २४ जानेवारी रोजी भारत आणि चीनमध्ये नवव्या टप्प्यातील चर्चा पार पडली. यावेळी दोन्ही देशांच्या सीमा परिसरातून सैनिकांची माघार घेण्याची प्रक्रिया अधिक जलद करण्यावर आणि पूर्व लडाख क्षेत्रात परिस्थिती नियंत्रणात आणि स्थिर करण्यावर एकमत झाले. भारतीय लष्कराने ही बाब सकारात्मक असल्याचे सांगितले होते. याव्यतिरिक्त दोन्ही बाजूंनी चर्चा सुरूच राहतील. तसेच तणाव कमी करण्यासाठी दहाव्या टप्प्याची चर्चाही करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.  

टॅग्स :india china faceoffभारत-चीन तणावborder disputeसीमा वादRajnath Singhराजनाथ सिंहRajya Sabhaराज्यसभा