शहरं
Join us  
Trending Stories
1
सीरियावरील हल्ल्यांमुळे इराण संतापला; इस्रायलला जन्माची अद्दल घडवण्यासाठी आखला प्लॅन
2
ना कॉल ना गिफ्ट...! शमीची पोस्ट बघून हसीन जहाँच्या मनात आली ही गोष्ट, म्हणाली...
3
STनेच होणार विदर्भातील नागरिकांची नागद्वार यात्रा, दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची फोनवर चर्चा
4
उद्योगपती कल्याणींच्या कन्येची वडिलोपार्जित मालमत्तेवरील मालकी हक्कासाठी कराड न्यायालयात धाव
5
"आम्ही युद्धाला घाबरत नाही, आमचं संपूर्ण आयुष्य..."; सीरियाच्या राष्ट्राध्यक्षांचा इस्रायलला इशारा
6
IND vs ENG : नो रिस्क; बुमराह चौथा कसोटी सामना खेळणार हे जवळपास फिक्स! प्रशिक्षकांनीच दिली हिंट
7
VIDEO: अंबरनाथ पालिकेत दोन ठेकेदारांमध्ये पोलिसांसमोरच सुरू झाली फ्री-स्टाइल हाणामारी
8
टाटा समूहाच्या हॉटेल कंपनीला २९६ कोटींचा नफा, ५ वर्षांत गुंतवणूकदारांना केलं मालामाल; दिला बंपर परतावा!
9
"महाराष्ट्र झाले २० टक्के कमिशनचे राज्य, राज्यात सत्ताधारी टॉवेल बनियन गँगचा धुमाकूळ’’, विजय वडेट्टीवार यांची टीका  
10
"राज्यात पाच महिन्यात १ लाख ६० हजार गुन्हे, ९२४ हत्या", अंबादास दानवे यांनी मांडली धक्कादायक आकडेवारी
11
विधिमंडळात पडळकर आणि आव्हाडांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी; CM फडणवीस म्हणाले, 'हे योग्य नाही'
12
अहमदाबादमधील विमान अपघात वैमानिकांच्या चुकीमुळे? AAIBने स्पष्टच सांगितलं, ते दावे फेटाळले
13
काल पडळकर आणि आव्हाडांमध्ये वाद, आज दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते भिडले, विधानभवन परिसरात पुन्हा राडा, पाहा VIdeo
14
"भगवद्गीता वाचून हिंदू झालो, पण हिंदू होण्यासाठी...?" बाबा बागेश्वर आणि पाकिस्तानचे आरिफ अजाकिया यांच्यातील प्रश्नोत्तर व्हायरल
15
CM फडणवीस म्हणाले त्रिभाषा सूत्र लागू करणार; उद्धव ठाकरेंनी हिंदीला विरोध करणारे पुस्तकच भेट दिलं
16
Ghatkopar Wall Collapse: घराच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळल्याने कामगाराचा मृत्यू, घाटकोपर येथील घटना!
17
दिसला गं बाई दिसला... अखेर सारा तेंडुलकर अन् शुबमन गिलचा 'तो' VIDEO सापडलाच..!!
18
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   
19
यूपी पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये २३८ गुन्हेगार ठार, तर ९ हजारांहून अधिक गोळीबारात जखमी
20
IND W vs ENG W : वनडेत एक नंबर कामगिरी! स्मृती-प्रतिका सलामी जोडीनं सेट केला वर्ल्ड रेकॉर्ड

राजनाथसिंह मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीतून बाहेर

By admin | Updated: March 16, 2017 03:46 IST

गृहमंत्री राजनाथसिंह यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री बनण्याची शक्यता फेटाळल्यामुळे ही धुरा दूरसंचार आणि रेल्वे राज्यमंत्री मनोज सिन्हा यांना सोपविली जाण्याच्या

हरीश गुप्ता, नवी दिल्लीगृहमंत्री राजनाथसिंह यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री बनण्याची शक्यता फेटाळल्यामुळे ही धुरा दूरसंचार आणि रेल्वे राज्यमंत्री मनोज सिन्हा यांना सोपविली जाण्याच्या अनुमानाला बळकटी मिळाली आहे. पक्षश्रेष्ठींनी जर या पदासाठी विद्यमान आमदारांपैकी एखाद्याला निवडण्याचे ठरविले तर सात वेळा विधानसभेवर निवडून गेलेले सतीश महाना हे प्रमुख दावेदार ठरतात. योगी आदित्यनाथ, भाजपचे प्रदेशाध्यक्ष केशव प्रसाद मौर्य आणि स्वतंत्र देव सिंग आदी नावेही चर्चेत आहेत. तथापि, सिन्हा आणि महाना हे प्रमुख दावेदार म्हणून पुढे आले आहेत. या दोघांकडेही उत्तर प्रदेशचा मुख्यमंत्री बनण्याचे सर्व कौशल्य असून, दोघेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे निकटवर्तीय मानले जातात. सिन्हा पंतप्रधानांच्या वाराणसी मतदारसंघाची काळजी वाहत असून, त्यांना महत्त्वपूर्ण दूरसंचार मंत्रालयाचा स्वतंत्र प्रभार देण्यात आला आहे. हरियाणाच्या मनोहरलाल खट्टर यांच्याप्रमाणे महाना हे मोदींचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघातील जुने सोबती आहेत. खट्टर पहिल्यांदा निवडून आले असूनही त्यांना मुख्यमंत्री करण्यात आले. मात्र, महाना हे भाजपचे सर्वात ज्येष्ठ आमदार असून, ते आतापर्यंत एकदाही निवडणूक हरलेले नाहीत. त्यामुळे त्यांचा मुख्यमंत्रिपदावरील दावा अधिक भक्कम आहे. दोन दिवसांपूर्वी मोदी यांनी विशेष विमानाने महाना यांना दिल्लीला बोलविल्यामुळे त्यांचे नाव चर्चेत आले आहे. राजनाथसिंह यांनी त्यांच्याकडे मुख्यमंत्रिपदाची सूत्रे देण्यात येणार असल्याचे अंदाज अनावश्यक आणि निष्फळ असल्याचे सांगून याबाबतच्या चर्चांना पूर्णविराम लावण्याचा प्रयत्न केला. राजनाथसिंह यांनी एकदा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्रिपद सांभाळले असून, दोनदा प्रदेशाध्यक्षपद भूषविले आहे. सिंह यांचा अनुभव पाहता ते एकटेच पक्षाला राज्यात एकसंघ ठेवू शकतात, असे त्यांचे समर्थक म्हणतात; परंतु विरोधकांचे म्हणणे काही वेगळेच आहे. सिंह यांनी प्रचार मोहिमेची धुरा स्वीकारण्यास नकार दिल्यामुळेच मौर्य यांना प्रदेशाध्यक्ष करण्यात आले होते. त्यामुळेच सिंह यांना हक्क पोहोचत नाही, असे त्यांच्या विरोधकांचे मत आहे. दरम्यान, उत्तराखंडमध्ये निवडून आलेल्या आमदारांमधूनच मुख्यमंत्र्याची निवड करण्यात येणार असून, तेथे दिल्लीतून कोणाला पाठवायचे नाही, असा निर्णय झाला आहे. आता या पदासाठी देवेंद्रसिंह रावत आणि प्रकाश पंत यांच्यात रस्सीखेच सुरू असून, रावत यांचे पारडे जड असल्याचे सूत्रांनी सांगितले.