शहरं
Join us  
Trending Stories
1
‘लाडक्या बहिणीं’साठी अजित पवार यांनी आभाळातून पैसे आणायचे का? मंत्री मुश्रीफ यांचा टोला
2
पहलगाम हल्ल्यानंतर भारताला मिळाली जपानची साथ; संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी मानले आभार
3
लक्षात ठेवा, नापास झाल्याने आयुष्य संपत नाही ! सचिन तेंडुलकर, नागराज मंजुळे झाले होते नापास
4
Sensex २९५ आणि Nifty ११४ अंकांच्या तेजीसह बंद; 'या' शेअर्समध्ये मोठा चढ-उतार
5
रशियाचा भारताला पाठिंबा! 'पहलगामच्या गुन्हेगारांना सोडता कामा नये'; पुतिन यांचा पीएम मोदींना फोन
6
मोदी सरकार देतंय ₹५ लाख लिमिट असलेलं क्रेडिट कार्ड; कसा मिळेल फायदा, जाणून घ्या
7
"ऋषभ पंतला पुन्हा फॉर्मात यायचे असेल तर त्याने धोनीला फोन करावा"; दिग्गज फलंदाजाचा सल्ला
8
Nashik Crime: तिन्ही कोयत्यांवर जाधव बंधूंच्या रक्ताचे डाग आहेत तसेच; महाजनच्या घरात सापडली शस्त्रे
9
Ather Energy IPO चं अलॉटमेंट 'असं' करा चेक, ग्रे मार्केट प्रीमिअम काय देतोय संकेत?
10
POK नाही तर 'लाहोर'वरही भारताचा ताबा होता; UNSC च्या मध्यस्थीनं कसा वाचला पाकिस्तान?
11
आम्हाला वाचवा...भारताच्या मित्रराष्ट्रांसमोर पाकने पसरले हात; अमेरिका-रशियाने दिले 'हे' उत्तर
12
Mumbai: केतकीपाडा, फिल्मसिटी, दामूनगर येथील झोपड्यांवरील कारवाईला आठ दिवसांची मुदतवाढ
13
संतोष देशमुखांच्या कन्येचे 12वीत घवघवीत यश; वैभवीने मिळवले 85.33 टक्के गुण...
14
शाब्बास पोरी! ३ वेळा नापास होऊनही मानली नाही हार, मजुराची लेक झाली IAS अधिकारी
15
PF Account मधून किती रक्कम तुम्ही काढू शकता? काय आहेत नियम आणि अटी
16
परीक्षेत नापास, आयुष्यात पास! दहावीत मुलगा ६ विषयांत झाला फेल तरी पालकांनी कापला केक, कारण...
17
गायीच्या शेणापासून बनवलेल्या रंगानेच सरकारी कार्यालये रंगवा; CM योगी आदित्यनाथ यांचे आदेश 
18
खळबळजनक! मनाविरुद्ध लग्न होताच काढला पतीचा काटा; बॉयफ्रेंडसह ७ जणांना अटक
19
'गँग्ज ऑफ वासेपूर', 'दबंग' फेम प्रसिद्ध कलाकाराचं दुःखद निधन, बॉलिवूडवर पसरली शोककळा
20
"पाकिस्तानी आर्मी तिथल्या तरुणांना आवडत नाही", बॉलिवूड सिंगरचा दावा, म्हणाला- "ते म्हणाले की तुम्ही भाग्यवान..."

राजीव यांचे नाव हटविले

By admin | Updated: April 21, 2016 03:34 IST

‘राजीव गांधी खेल अभियान’मधील दिवंगत माजी पंतप्रधान राजीव गांधी यांचे नाव हटविण्यात आले असून आता त्याऐवजी ‘खेलो इंडिया’ असे नामकरण करण्यात आल्याची माहिती

नवी दिल्ली : ‘राजीव गांधी खेल अभियान’मधील दिवंगत माजी पंतप्रधान राजीव गांधी यांचे नाव हटविण्यात आले असून आता त्याऐवजी ‘खेलो इंडिया’ असे नामकरण करण्यात आल्याची माहिती केंद्रीय क्रीडामंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी बुधवारी दिली.गुजरातच्या ‘खेल महाकुंभ’मध्ये देशातील विविध शाळा आणि महाविद्यालयांमधील विद्यार्थी २७ क्रीडा प्रकारात सहभागी होतात. गुजरातचे क्रीडा प्राधिकरण दरवर्षी ग्रीष्मकालीन शिबिर आयोजित करीत असते. त्याच मॉडेलवर ‘खेलो इंडिया’ आधारित राहील, असे सोनोवाल म्हणाले. संपुआ सरकारने ही योजना सुरू केली होती. रालोआ सरकारने त्यातील राजीव गांधी यांचे नाव हटविण्याच्या हेतूने नवे नामकरण केल्याचे सांगत काँग्रेसने सरकारच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे. देशात स्पर्धात्मक वातावरण तयार करण्याचा त्यामागे उद्देश असून राजकारणाशी देणे-घेणे नसल्याचे सोनोवाल यांनी म्हटले. संपुआ सरकारने फेब्रुवारी २०१४ मध्ये पंचायत युवा क्रीडा व खेळ अभियानाऐवजी राजीव गांधी खेळ योजना सुरू केली होती. या योजनेनुसार ५ वर्षांत ६३४ जिल्ह्णांमध्ये ६५४५ गटांमध्ये क्रीडा संकुल तयार करण्यात येणार होते.अन्य दोन योजनांचे विलिनीकरणकाँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी आणि तत्कालीन क्रीडामंत्री जितेंद्रसिंग यांनी ही योजना सुरू केली होती, मात्र या फारसा प्रतिसाद मिळू शकला नाही. आता नावही बदलले गेले. यापूर्वीच्या सरकारने सुरू केलेल्या नागरी खेळ पायाभूत संरचना योजना, राष्ट्रीय खेळ प्रतिभा शोध या अन्य दोन योजनाही खेलो इंडियामध्ये विलीन करण्यात आल्या आहेत.(लोकमत न्यूज नेटवर्क)