शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
4
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
5
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
6
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
7
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
8
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
9
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
10
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
11
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
12
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
13
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
14
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
15
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
16
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
17
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
18
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
19
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
20
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
Daily Top 2Weekly Top 5

राजीव गांधी यांची जयंती देशभर साजरी

By admin | Updated: August 21, 2016 03:43 IST

देशातील माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रात क्रांती घडवून आणणारे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या ७२व्या जयंतीनिमित्त शनिवारी देशभर विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.

नवी दिल्ली : देशातील माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रात क्रांती घडवून आणणारे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या ७२व्या जयंतीनिमित्त शनिवारी देशभर विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.त्यांच्या वीरभूमी या समाधीस्थळी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्यासह विविध नेत्यांनी पुष्पांजली वाहिली. काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी प्रकृती अस्वास्थ्यामुळे उपस्थित राहू शकल्या नाहीत. तथापि, कॉंग्रेस उपाध्यक्ष राजीव गांधी यांनी पुष्पांजली वाहिली. राष्ट्रपतींबरोबरच उपराष्ट्रपती हमीद अन्सारी, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, दिल्ली प्रदेश काँग्रेस अध्यक्ष अजय माकन, ज्येष्ठ नेते आनंद शर्मा, मोतीलाल व्होरा, भूपेंद्रसिंग हुड्डा यांनी समाधीस्थळी आदरांजली वाहिली. शारीरिकदृष्ट्या अक्षम असणाऱ्या १०० जणांना राहुल गांधी यांनी वाहनांचे वाटप कले. यातील बहुतांश जण २० ते ३० वयोगटातील आहेत. त्यांच्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छाही दिल्या. राजीव गांधी फाउंडेशनतर्फे दरवर्षी अशा प्रकारे मदतीचे वाटप केले जाते. राहुल गांधी या फाउंडेशनचे विश्वस्त आहेत.राजीव गांधी यांनी १९८१ पासून १९९१पर्यंत संसदेत प्रतिनिधित्व केलेल्या अमेठी मतदारसंघात काँग्रेस कार्यकर्त्यांनी आदरांजली वाहिली. पश्चिम बंगालमध्ये मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी राजीव गांधी यांच्याबाबतच्या अनेक आठवणींना उजाळा देत आदरांजली वाहिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या ७२ व्या जयंतीनिमित्त त्यांच्या पावन स्मृतींना वंदन केले. (लोकमत न्यूज नेटवर्क)टिष्ट्वटमुळे वाद कोलकाता : राजीव गांधी जयंतीनिमित्त पश्चिम बंगाल काँग्रेसच्या टिष्ट्वटर अकाउंटवर जारी केलेल्या एका वादग्रस्त टिष्ट्वटने वादाला तोंड फुटले. जेव्हा मोठा वृक्ष पडतो, तेव्हा धरणी हादरते- राजीव गांधी, अशा आशयाचे हे टिष्ट्वट होते. १९८४ मध्ये इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर शीखविरोधी दंगल उसळली होती. त्या वेळी ही टिप्पणी करण्यात आली होती. त्या वेळीही यामुळे वाद उद्भवला होता. शनिवारी या टिष्ट्वटबाबत तीव्र प्रतिक्रिया आल्यानंतर ते हटवण्यात आले. दरम्यान, हे टिष्ट्वट आमच्याकडून नव्हे, तर कोणीतरी हॅक करून ते पोस्ट केले आहे, असे प्रदेशाध्यक्ष अधीर चौधरी यांनी सांगितले.