शहरं
Join us  
Trending Stories
1
पर्यावरणप्रेमींच्या तीव्र विरोधासमोर केंद्र सरकार झुकलं, ‘अरवली’ला वाचवण्यासाठी घेतला मोठा निर्णय   
2
बीडच्या ‘सह्याद्री देवराई’ला भीषण आग; अभिनेते सयाजी शिंदे यांनी जोपासलेली हजारो झाडे संकटात
3
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
4
IPL 2026 आधीच RCBच्या स्टार खेळाडूला होणार अटक? तब्बल ५ कोटी मोजून घेतलंय संघात
5
पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी सक्षम ताटेची आई व प्रेयसीचा आत्मदहनाचा प्रयत्न, दिला निर्वाणीचा इशारा...
6
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
7
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
8
VIDEO: धावत्या ट्रेनमध्ये WWE स्टाईल राडा! 'इंटरसिटी'मध्ये प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी
9
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
10
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
11
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
12
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
13
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
14
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
15
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
16
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
17
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
18
"आम्ही इंग्रजी आहोत का? इथे लंडनमधून राहायला आलोय का?" बावनकुळेंनी ठाकरे बंधूंना सुनावलं
19
IPL लिलावात अनसोल्डचा टॅग; त्याच पठ्ठ्यानं विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत विक्रमी द्विशतकासह रचला इतिहास
20
"भजन करायला थोडीच बसलोय, मठ पुरेसे आहेत...!"; हा श्लोक म्हणत CM योगी भरविधानसभेत कडाडले
Daily Top 2Weekly Top 5

रजनीकांत करणार राजकारणात प्रवेश ? वक्तव्यामुळे तामिळनाडूत खळबळ

By admin | Updated: February 6, 2017 12:51 IST

रजनीकांत यांनी ताकद विषयावर केलेल्या वक्तव्यामुळे तामिळनाडूत खळबळ माजली आहे

ऑनलाइन लोकमत
चेन्नई, दि. 6 - दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांनी काहीही केलं की खळबळ माजतेच, पण सध्या त्यांनी 'ताकद' विषयावर केलेल्या वक्तव्यामुळे तामिळनाडूत खळबळ माजली आहे. यामुळे रजनीकांत राजकारणात प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. रजनीकांत यांनी मात्र स्पष्टीकरण देत आपण 'ताकद' शब्दाचा प्रयोग अध्यात्मावर बोलताना केला असल्याचं म्हटलं आहे. 
 
(सुपरस्टार रजनीकांतला भिकारी समजून दिली १० रुपयांची नोट)
(भेट दोन रजनीकांतची)
 
रजनींकात स्वत:चा राजकीय पक्ष निर्माण करतील असे अंदाज लावले जात आहेत. यासाठी दक्षिण भारतात पोहचण्याचा प्रयत्न करु पाहणा-या भाजपाची साथ त्यांना मिळू शकते. तामिळनाडूतील सध्याच्या राजकीय परिस्थितीवर रजनीकांत नाराज असल्याचं अनेक लोकांचं म्हणणं आहे. सोशल मीडियावरील अनेकांनी याचा संबंध जयललितांच्या निधनाशी जोडला असून त्यामुळेच ते नाराज असल्याचा दावा केला आहे. 
 
(अम्मांनंतर ‘चिनम्मा’)
 
तामिळनाडूत अम्मांनंतर आता चिनम्मा यांचे राज्य असणार असून त्यांना मुख्यमंत्री करण्यात आलं आहे. रजनीकांतच्या चाहत्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून या परिस्थितीतून राज्याला वाचवण्याचं आवाहन केलं आहे. 
 
रजनीकांतच्या एका वक्तव्यामुळे झाला होता जयललितांचा दारुण पराभव - 
रजनीकांत सध्या जयललितांचं गुणगाण गात असले तरी 1996 रोजी त्यांनीच केलेल्या एका वक्तव्यामुळे जयललितांचा दारुण पराभव झाला होता. 'जयललिता यांना जर सत्ता मिळाली, तर देवही तामिळनाडूला वाचवू शकणार नाही,' असं वक्तव्य रजनीकांत यांनी केलं होतं. या वक्तव्यानंतर 1996 ची निवडणूक जयललिता हारल्या होत्या. 
 
मात्र 10 वर्षानंतर रजनीकांत यांचं मत बददलं आणि जयललितांचं कौतुक करताना 'अष्टलक्ष्मीचा अवतार' असल्याचं त्यांनी म्हटलं होतं. मात्र यानंतरही दोघांचं घर जवळ असूनही रजनीकांत यांनी जयललितांपासून अंतरच ठेवलं. 
2014 रोजी लोकसभा निवडणुकीवेळी नरेंद्र मोदींसोबत झालेल्या भेटीनंतरही रजनीकांत राजकारणात सक्रीय होतील अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र रजनीकांत यांनी यासाठी नकार दिला. 
 
तामिळनाडूत प्रवेश करण्यासाठी भाजपा पुरेपूर प्रयत्न करत आहे. यासाठी रजनीकांत यांना मनवण्याचा प्रयत्न पक्षाकडून सुरु आहे. जयललिता यांच्या निधनानंतर या प्रयत्नांना जोर आला आहे असं सुत्रांकडून कळलं आहे. 
 
दुसरीकडे रजनीकांत यांनी मात्र आपण 'ताकद' शब्दप्रयोग अध्यात्मावर बोलताना केला असल्याचं स्पष्ट केलं आहे. 'जर प्रसिद्धी आणि पैशाला एकीकडे ठेवून, तुम्ही अध्यात्माशी जोडले जाणार का ? असा सवाल मला कोणी विचारला, तर मी अध्यात्म निवडेन. कारण अध्यात्मात ताकद आहे. चुकीचं समजू नका पण मला ताकद आवडते,' असं रजनीकांत बोलले आहेत.