शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
3
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
4
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
5
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
6
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
7
दातांवर उपचार करताना महिलेचे कानही झाले बरे, २० वर्षांपासून येत नव्हतं ऐकू, असा घडला चमत्कार
8
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
9
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
10
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
11
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
13
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
14
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
15
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
16
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
17
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
18
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
19
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
20
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...

रजनीकांत करणार राजकारणात प्रवेश ? वक्तव्यामुळे तामिळनाडूत खळबळ

By admin | Updated: February 6, 2017 12:51 IST

रजनीकांत यांनी ताकद विषयावर केलेल्या वक्तव्यामुळे तामिळनाडूत खळबळ माजली आहे

ऑनलाइन लोकमत
चेन्नई, दि. 6 - दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांनी काहीही केलं की खळबळ माजतेच, पण सध्या त्यांनी 'ताकद' विषयावर केलेल्या वक्तव्यामुळे तामिळनाडूत खळबळ माजली आहे. यामुळे रजनीकांत राजकारणात प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. रजनीकांत यांनी मात्र स्पष्टीकरण देत आपण 'ताकद' शब्दाचा प्रयोग अध्यात्मावर बोलताना केला असल्याचं म्हटलं आहे. 
 
(सुपरस्टार रजनीकांतला भिकारी समजून दिली १० रुपयांची नोट)
(भेट दोन रजनीकांतची)
 
रजनींकात स्वत:चा राजकीय पक्ष निर्माण करतील असे अंदाज लावले जात आहेत. यासाठी दक्षिण भारतात पोहचण्याचा प्रयत्न करु पाहणा-या भाजपाची साथ त्यांना मिळू शकते. तामिळनाडूतील सध्याच्या राजकीय परिस्थितीवर रजनीकांत नाराज असल्याचं अनेक लोकांचं म्हणणं आहे. सोशल मीडियावरील अनेकांनी याचा संबंध जयललितांच्या निधनाशी जोडला असून त्यामुळेच ते नाराज असल्याचा दावा केला आहे. 
 
(अम्मांनंतर ‘चिनम्मा’)
 
तामिळनाडूत अम्मांनंतर आता चिनम्मा यांचे राज्य असणार असून त्यांना मुख्यमंत्री करण्यात आलं आहे. रजनीकांतच्या चाहत्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून या परिस्थितीतून राज्याला वाचवण्याचं आवाहन केलं आहे. 
 
रजनीकांतच्या एका वक्तव्यामुळे झाला होता जयललितांचा दारुण पराभव - 
रजनीकांत सध्या जयललितांचं गुणगाण गात असले तरी 1996 रोजी त्यांनीच केलेल्या एका वक्तव्यामुळे जयललितांचा दारुण पराभव झाला होता. 'जयललिता यांना जर सत्ता मिळाली, तर देवही तामिळनाडूला वाचवू शकणार नाही,' असं वक्तव्य रजनीकांत यांनी केलं होतं. या वक्तव्यानंतर 1996 ची निवडणूक जयललिता हारल्या होत्या. 
 
मात्र 10 वर्षानंतर रजनीकांत यांचं मत बददलं आणि जयललितांचं कौतुक करताना 'अष्टलक्ष्मीचा अवतार' असल्याचं त्यांनी म्हटलं होतं. मात्र यानंतरही दोघांचं घर जवळ असूनही रजनीकांत यांनी जयललितांपासून अंतरच ठेवलं. 
2014 रोजी लोकसभा निवडणुकीवेळी नरेंद्र मोदींसोबत झालेल्या भेटीनंतरही रजनीकांत राजकारणात सक्रीय होतील अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र रजनीकांत यांनी यासाठी नकार दिला. 
 
तामिळनाडूत प्रवेश करण्यासाठी भाजपा पुरेपूर प्रयत्न करत आहे. यासाठी रजनीकांत यांना मनवण्याचा प्रयत्न पक्षाकडून सुरु आहे. जयललिता यांच्या निधनानंतर या प्रयत्नांना जोर आला आहे असं सुत्रांकडून कळलं आहे. 
 
दुसरीकडे रजनीकांत यांनी मात्र आपण 'ताकद' शब्दप्रयोग अध्यात्मावर बोलताना केला असल्याचं स्पष्ट केलं आहे. 'जर प्रसिद्धी आणि पैशाला एकीकडे ठेवून, तुम्ही अध्यात्माशी जोडले जाणार का ? असा सवाल मला कोणी विचारला, तर मी अध्यात्म निवडेन. कारण अध्यात्मात ताकद आहे. चुकीचं समजू नका पण मला ताकद आवडते,' असं रजनीकांत बोलले आहेत.