शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

राजस्थानमध्ये स्वाईन फ्लूचे आणखी ११ बळी, मृत्यूसंख्या १५३ वर

By admin | Updated: February 15, 2015 22:36 IST

जयपूर : राजस्थानच्या विविध भागांमध्ये स्वाईन फ्लूने आणखी ११ जणांचा बळी घेतला आहे. या ११ जणांच्या मृत्यूमुळे राज्यात गेल्या जानेवारीपासून स्वाईन फ्लूने दगावलेल्यांची संख्या वाढून १५३ वर पोहोचली आहे.

जयपूर : राजस्थानच्या विविध भागांमध्ये स्वाईन फ्लूने आणखी ११ जणांचा बळी घेतला आहे. या ११ जणांच्या मृत्यूमुळे राज्यात गेल्या जानेवारीपासून स्वाईन फ्लूने दगावलेल्यांची संख्या वाढून १५३ वर पोहोचली आहे.
जयपूर आणि जोधपूर येथे रविवारी प्रत्येकी तीन रुग्णांचा मृत्यू झाला. तर अजमेर येथे दोन जण आणि नागौर, भरतपूर व कोटा येथे प्रत्येकी एका रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. राज्यातील ३३ जिल्ह्यांमध्ये स्वाईन फ्लूची साथ पसरली आहे. राज्यातील विविध रुग्णालयांत स्वाईन फ्लूची लागण झालेले २१६७ रुग्ण उपचार घेत आहेत. आतापर्यंत जयपूर जिल्ह्यात सर्वाधिक २६ जणांचा स्वाईन फ्लूने मृत्यू झाला आहे.
लखनौमध्ये आढळले सात नवे रुग्ण
उत्तर प्रदेशची राजधानी लखनौ येथे शनिवारी आणखी सात जणांना स्वाईन फ्लूची लागण झाल्याचे तपासणीत आढळून आले. सध्या लखनौमधील विविध रुग्णालयांत स्वाईन फ्लूचे ६९ रुग्ण उपचार घेत आहेत. शहरात आतापर्यंत तिघांचा स्वाईन फ्लूने मृत्यू झाला आहे.
५५०० कोटींचे नुकसान
महाराष्ट्र, राजस्थान आणि देशाच्या अन्य काही भागांत पसरलेल्या स्वाईन फ्लूमुळे पर्यटन आणि नागरी उड्डयण क्षेत्राचे किमान ५,५०० कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. राजस्थानमध्ये स्वाईन फ्लू पसरल्याने विदेशी पर्यटकांच्या संख्येत मोठी घट झाली आहे. हिवाळ्यात सर्वाधिक विदेशी पर्यटक महाराष्ट्र आणि राजस्थानमध्ये येत असत. परंतु आता या दोन्ही राज्यांमध्ये येणाऱ्या विदेशी पर्यटकांच्या संख्येत घट झाली आहे. (वृत्तसंस्था)