शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदार यादी कायमसाठी एकसारखीच राहू शकत नाही, पुनरीक्षण आवश्यक; सर्वोच्च न्यायालयाचे निरीक्षण
2
आजचे राशीभविष्य : गुरुवार १४ ऑगस्ट २०२५; या ४ राशीच्या लोकांना अचानक धनलाभ संभवतो, काहींना मित्रांकडूनही लाभ होतील
3
लंडनच्या भूमीत १८ ऑगस्टला होणार ऐतिहासिक 'लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन'
4
मंत्रालयामधील मोकळ्या जागेवर मंत्र्यांचेच अतिक्रमण; सामान्यांना बसण्यासाठीच्या जागा व्यापल्या
5
वसई-विरारचे माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांना अटक; ४१ अवैध इमारती भोवल्या, ईडीची कारवाई
6
कबुतरांना खाद्यबंदी कायम; 'तुम्ही एकांगी निर्णय घेऊ शकत नाही', हायकोर्टाने मुंबई महापालिकेला फटकारले
7
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
8
Arjun Tendulkar Engagement :अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको, साराची खास मैत्रिण; सानिया चांडोकचे फोटो पाहा
9
Arjun Tendulkar Engagement : चांडोकांची लेक होणार सचिन तेंडुलकरची सून; मुंबईत पार पडला अर्जुन सानियाचा साखरपुडा
10
एरोड्रोम परवान्याने अडविले नवी मुंबईतील विमानोड्डाण; सप्टेंबरचा मुहूर्तही हुकणार?
11
पुण्यात वाहतूक पोलीस आणि कॅब चालक यांच्यात वाद; शिवीगाळ करत मारहाण केली; व्हिडीओ व्हायरल
12
अरे व्वा...! काही तासांत क्लिअर होणार चेक; ४ ऑक्टोबरपासून दोन टप्प्यांत अंमलबजावणी
13
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
14
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
15
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
16
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
17
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
18
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
19
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
20
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...

राजस्थानमध्ये स्वाईन फ्लूचे आणखी ११ बळी, मृत्यूसंख्या १५३ वर

By admin | Updated: February 15, 2015 22:36 IST

जयपूर : राजस्थानच्या विविध भागांमध्ये स्वाईन फ्लूने आणखी ११ जणांचा बळी घेतला आहे. या ११ जणांच्या मृत्यूमुळे राज्यात गेल्या जानेवारीपासून स्वाईन फ्लूने दगावलेल्यांची संख्या वाढून १५३ वर पोहोचली आहे.

जयपूर : राजस्थानच्या विविध भागांमध्ये स्वाईन फ्लूने आणखी ११ जणांचा बळी घेतला आहे. या ११ जणांच्या मृत्यूमुळे राज्यात गेल्या जानेवारीपासून स्वाईन फ्लूने दगावलेल्यांची संख्या वाढून १५३ वर पोहोचली आहे.
जयपूर आणि जोधपूर येथे रविवारी प्रत्येकी तीन रुग्णांचा मृत्यू झाला. तर अजमेर येथे दोन जण आणि नागौर, भरतपूर व कोटा येथे प्रत्येकी एका रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. राज्यातील ३३ जिल्ह्यांमध्ये स्वाईन फ्लूची साथ पसरली आहे. राज्यातील विविध रुग्णालयांत स्वाईन फ्लूची लागण झालेले २१६७ रुग्ण उपचार घेत आहेत. आतापर्यंत जयपूर जिल्ह्यात सर्वाधिक २६ जणांचा स्वाईन फ्लूने मृत्यू झाला आहे.
लखनौमध्ये आढळले सात नवे रुग्ण
उत्तर प्रदेशची राजधानी लखनौ येथे शनिवारी आणखी सात जणांना स्वाईन फ्लूची लागण झाल्याचे तपासणीत आढळून आले. सध्या लखनौमधील विविध रुग्णालयांत स्वाईन फ्लूचे ६९ रुग्ण उपचार घेत आहेत. शहरात आतापर्यंत तिघांचा स्वाईन फ्लूने मृत्यू झाला आहे.
५५०० कोटींचे नुकसान
महाराष्ट्र, राजस्थान आणि देशाच्या अन्य काही भागांत पसरलेल्या स्वाईन फ्लूमुळे पर्यटन आणि नागरी उड्डयण क्षेत्राचे किमान ५,५०० कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. राजस्थानमध्ये स्वाईन फ्लू पसरल्याने विदेशी पर्यटकांच्या संख्येत मोठी घट झाली आहे. हिवाळ्यात सर्वाधिक विदेशी पर्यटक महाराष्ट्र आणि राजस्थानमध्ये येत असत. परंतु आता या दोन्ही राज्यांमध्ये येणाऱ्या विदेशी पर्यटकांच्या संख्येत घट झाली आहे. (वृत्तसंस्था)