शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
2
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
3
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
4
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
5
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
6
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
7
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
8
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
9
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
10
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
11
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
12
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
13
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
14
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
15
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
16
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
17
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
18
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
19
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
20
'वन नाइट स्टॅण्ड'मधून पैसे कमावतेय ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, डिटेक्टिव्हचा खुलासा, म्हणाली-"तासानुसार..."

थलायवा रजनीकांत लवकरच राजकारणात, युद्धासाठी तयार राहण्याचं आवाहन

By admin | Updated: May 20, 2017 12:09 IST

धीर धरा, आपल्या कामावर लक्ष द्या, पण युद्धासाठी तयार राहा अशी साद रजनीकांत यांनी चाहत्यांना घातली आहे

ऑनलाइन लोकमत
चेन्नई, दि. 20 - दाक्षिणात्य सुपरस्टार थलायवा रजनीकांत यांनी राजकारणात प्रवेश करण्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. यावेळी रजनीकांत यांनी तामिळनाडूतील प्रमुख राजकीय पक्ष द्रमुक किंवा अण्णाद्रमुकसोबत न जाता दुस-या एखाद्या पक्षाला साथ देत गरिब आणि गरजूंसाठी लढत लोकांना दुसरा पर्याय देणार असल्याचंही स्पष्ट केलं. "धीर धरा, आपल्या कामावर लक्ष द्या, पण युद्धासाठी तयार राहा", अशी सादच त्यांनी आपल्या चाहत्यांना घातली. राजकारणाच्या प्रश्नांना दुर्लक्षित करणा-या रजनीकांत यांनी यावेळी मात्र आपलं म्हणणं स्पष्टपणे मांडलं. 
 
रजनीकांत यांनी पाच दिवस आपल्या चाहत्यांच्या भेटीगाठी घेत त्यांच्यासोबत फोटो काढत मनमुराद आनंद लुटला. रजनीकांत राजकारणात प्रवेश करण्याच्या बातम्या येत असतानाच त्यांनी हा दौरा सुरु केला होता. सुरुवातीला मात्र त्यांनी यावर काहीही बोलण्यास नकार दिला. मात्र शुक्रवारी शेवटच्या दिवशी त्यांनी मोकळेपणाने प्रश्नांची उत्तर देत आपलं मत मांडलं. 
 
"जेव्हा युद्ध होईल तेव्हा पाहता येईल. तोपर्यंत धीर ठेवला पाहिजे", असं रजनीकांत यावेळी बोलले. रजनीकांत यांनी केलेल्या युद्धाचा उल्लेख म्हणजे निवडणूक असल्याचं बोललं जात आहे. कारण तामिळनाडूत 2019 मध्ये लोकसभा निवडणूक होणार असून या निवडणुकीच्या निमित्ताने रजनीकांत राजकारणात प्रवेश करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 
 
तामिळी लोकांनीच मला हे आयुष्य दिलं आहे सांगत त्यांनी त्यांचे आभार मानले. "व्यवस्था भ्रष्ट झालीय. आपण सगळ्यांनी मिळून ती बदलायला हवी. ज्या लोकांनी मला यशाच्या शिखरावर नेलं त्यांची सेवा करण्यात गैर काय आहे?, असा सूचक प्रश्नही त्यांनी केला.
 
याआधी जेव्हा रजनीकांत यांना राजकारण प्रवेशावर विचारण्यात आलं होतं तेव्हा ते बोलले होते की, "मी राजकारणात पडणार नाही, असे मी आत्ता सांगून टाकले तर ज्यांचे स्वत:चे आर्थिक भले करून घेण्याचे मनसुबे आहेत असा माझ्या चाहत्यांचा एक वर्ग नाराज होईल. मी राजकारणात उतरलोच तर अशा चाहत्यांना मी माझ्याजवळ फिरकूही देणार नाही. त्यामुळे त्यांनी अशी आशा सोडून द्यावी, असे मी त्यांना सांगेन.
 
"मी सच्चा तामिळी आहे. गेली ४४ वर्षं मी तुमच्यासोबत आहे. तुम्हीच मला मोठं केलंत. उद्या जर तुम्ही मला तामिळनाडूच्या बाहेर काढलंत, तर मी अन्य कुठल्याही राज्यात जाणार नाही. थेट हिमालयात जाईन", असा भावनिक सूर रजनीकांत यांनी लावला.
 
सुपरस्टार रजनीकांत असेही म्हणाले होते, "की इतरांची उदाहरणे देऊन चाहते मला पत्र पाठवून विचारतात की त्यांच्याप्रमाणे तुम्ही कधी पुढे जाणार, प्रगती करणार? मागून आलेले अनेक जण पुढे गेले व कोणी नगरसेवक तर कोणी मंत्री झाले, असे ते कळवितात. काही चाहत्यांनाही अशी पदे मिळावीत असे वाटते. त्यांच्यादृष्टीने अशी इच्छा बाळगणे बरोबरही असेल, मी त्यांना चूक म्हणणार नाही. पण असे पैशासाठी राजकारणात पडून इच्छिणाऱ्यांना रागवावे की हसावे, हे मला कळत नाही. रजनीकांत म्हणाले की, यापूर्वी अनेकदा सांगितले तेच मी पुन्हा सांगेन. मी परमेश्वराच्या हातचे बाहुले आहे. तो सध्या माझ्याकडून अभिमय करून घेत आहे म्हणून मी अभिनेता आहे. उद्या परमेश्वरी इच्छेने जी काही भूमिका बजावावी लागेल ती मी मनापासून पार पाडेन".