शहरं
Join us  
Trending Stories
1
'युद्धविरामासाठी भारताला विनंती केली', ऑपरेशन सिंदुरबाबत पाकिस्तानच्या उप-पंतप्रधानांची कबुली
2
वाहनधारकांसाठी खुशखबर! ‘एचएसआरपी’ नंबरप्लेटसाठी तिसऱ्यांदा मुदतवाढ
3
'परिवार का साथ, परिवार का विकास...', बिहारमधून पीएम मोदींची काँग्रेस-राजदवर खोचक टीका
4
हल्ल्यात २ एअरबेस उद्धवस्त, पाकची कबुली; युद्धविरामसाठी भारताला कुणी केला होता फोन?
5
Mumbai Local Fight : मुंबई लोकलमध्ये चढताना धक्का लागला अन् तरुणीचा पारा चढला; महिलेला रक्तबंबाळ होईपर्यंत मारलं
6
ENG vs IND, 1st Test: गिलनं IPL जोडीदार साई सुदर्शनला दिली पदार्पणाची संधी; करुण नायरसह शार्दुल ठाकूरवरही भरवसा
7
पुण्यावरून कोकणात जाताय, थांबा! वरंध घाट मार्ग तीन महिने राहणार बंद; आता कोणत्या मार्गाने प्रवास कराल?
8
Video - धक्कादायक वास्तव! छतावरुन टपकतंय पाणी, वर्गात छत्री घेऊन शिकताहेत ६८ मुलं
9
इस्रायलसोबत युद्ध सुरू असताना अचानक ३ इराणी विमाने ओमानमध्ये पोहोचली, नेमकं कारण काय?
10
पैसे कुठे खर्च होतात कळत नाही? 'या' ५ ॲप्समुळे खर्च ट्रॅक करणे होईल सोपे, आता तुम्हीही व्हा बजेट एक्सपर्ट!
11
सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; ३ दिवसांत ४ हजारांनी घसरली चांदीची किंमत; पाहा लेटेस्ट रेट
12
Two-Wheeler New Rules : नवीन सर्व दुचाकींना 'एबीएस आणि दोन हेल्मेट' सक्तीचे; केंद्रीय परिवहन मंत्रालयाचा मोठा निर्णय
13
कुणी फुकट खाऊ घालत नाही...! आसिम मुनीर-डोनाल्ड ट्रम्प 'लन्च पॉलिटिक्स'नं पाकिस्तानचंच टेन्शन वाढवलं
14
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेवेळी एका टिफिनवाल्याने वाचवला ८० डॉक्टरांचा जीव
15
पोरी हुश्शार! एकत्र बालपण अन् आता एकत्र झाल्या IAS; शिक्षकाच्या लेकींनी रचला इतिहास
16
Pandharpur Wari 2025: आता स्वस्तात करा विठ्ठलाचे दर्शन; एसटी महामंडळाची खास ऑफर!
17
१ जुलैपासून बदलणार बँकिंगचे नियम, क्रेडिट कार्ड बिल पेमेंटमध्येही होणार बदल; जाणून घ्या माहिती
18
क्रुझर प्रेमींची पहिली पसंत; नवीन अवतारात येणार Bajaj ची Avenger, किंमत फक्त...
19
Debt on US: ट्रम्प अडकले... संकटात अमेरिका; कर्ज ३७ ट्रिलियन डॉलर्सच्या पार, भारताचं किती देणं लागतो US
20
आधी स्वत:च पत्नीचं कुंकू पुसलं, नंतर बॉयफ्रेंडसोबत लग्न लावलं; पती म्हणतो, “मला विष देऊन...”

समुद्राची पातळी वाढल्याने भारतात चार कोटी लोकांना धोका

By admin | Updated: May 21, 2016 04:34 IST

वेगाने होणारे शहरीकरण आणि आर्थिक वृद्धीमुळे किनारपट्टीवर येणारे पूर यामुळे मुंबई व कोलकाता येथील लोकांना सर्वाधिक धोका आहे.

संयुक्त राष्ट्रे : वेगाने होणारे शहरीकरण आणि आर्थिक वृद्धीमुळे किनारपट्टीवर येणारे पूर यामुळे मुंबई व कोलकाता येथील लोकांना सर्वाधिक धोका आहे. त्याचवेळी समुद्राची पाणीपातळी वाढत चालल्याने २0५0पर्यंत भारतातील ४ कोटी लोकांना गंभीर धोका निर्माण होऊ शकतो, असे संयुक्त राष्ट्रांच्या पर्यावरणविषयक अहवालात म्हटले आहे. ह्यजागतिक पर्यावरणीय पूर्वानुमान : (जीईओ-६) क्षेत्रीय आकलनह्ण या शीर्षकाखाली अहवालात ही भीती व्यक्त करण्यात येत आहे. हवामानातील बदलाचा सर्वांत वाईट परिणाम पॅसिफिक आणि दक्षिण व दक्षिण-पूर्व आशियावर होण्याचा अंदाज आहे. २0५0पर्यंत समुद्राच्या पाणीपातळीत वाढ झाल्याने जगभरातील १0 देशांतील नागरी वस्त्यांवर परिणाम होणार आहे. त्यात सर्वाधिक परिणाम एशिया प्रशांत क्षेत्रातील सात देशांवर होईल, असे हा अहवाल म्हणतो. वेगाने होणारे शहरीकरण आणि आर्थिक वृद्धीमुळे चीन, भारत, थायलंड यांसारख्या देशांत आणि त्यातही खासकरून त्यांच्या अतिशहरीकृत भागांत भविष्यात विपरीत परिस्थितीला तोंड द्यावे लागण्याची शक्यता आहे. भारतातील मुंबई, कोलकाता; चीनमधील गुआंगझो आणि शांघाय; बांगलादेशातील ढाका; म्यानमारमधील यंगून; थायलंडमधील बँकॉक आणि व्हिएतनाममधील हो ची मिन्ह सिटी व हाईप्लेंग या शहरांना धोका आहे. या सर्व ठिकाणी २0७0मध्ये किनारपट्टीवर येणाऱ्या पुराचा मुकाबला करावा लागेल, असेही हा अहवाल म्हणतो. या शहरांपैकी अनेक शहरे किनारपट्टीवर येणाऱ्या पुराचा सामना पूर्वीपासूनच करीत आहेत; मात्र त्याची क्षमता आता मर्यादित होत आहे. संयुक्त राष्ट्रांचे पर्यावरणविषयक अधिवेशन पुढील आठवड्यात नैरोबीत होणार आहे. त्यापूर्वी हा अहवाल जारी करण्यात आला आहे. अहवालात पुढे म्हटले आहे की, नैसर्गिक आपत्ती, आर्थिक संकट आणि हवामानातील बदल यामुळे लोकांच्या जीवनावर नकारात्मक परिणाम होईल. २0५0पर्यंत भारत, बांगलादेश, चीन, इंडोनेशिया आणि फिलीपाईन्समधील ह्यवादळकेंद्रित प्रदेशह्ण होतील. त्यामुळे ५ कोटी ८0 लाख लोकांच्या जीविताला धोका निर्माण होईल. सर्वांत जास्त परिणाम होणाºया देशांत भारत प्रथम क्रमांकावर राहील. समुद्राची पाणीपातळी वाढत चालल्याने भारतातील ४ कोटी लोकांना धोका निर्माण होईल. त्यानंतर बांगलादेश अडीच कोटी, चीन दोन कोटी, फिलिपाईन्सच्या जवळपास दीड कोटी लोकांना धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. वाढत्या शहरीकरणामुळे किनारपट्टीतील वस्त्या वाढत चालल्या आहेत. त्यामुळे या किनारपट्टीवरील प्रदेशाची क्षमता कमालीची प्रभावित झाली आहे. तेथील धोका वाढला आहे, असेही अहवालात नमूद करण्यात आले आहे.