शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
3
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
4
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
5
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
6
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!
7
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
8
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
9
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
10
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
11
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
12
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
13
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
14
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
15
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
16
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
17
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
18
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
19
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
20
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले

समुद्राची पातळी वाढल्याने भारतात चार कोटी लोकांना धोका

By admin | Updated: May 21, 2016 04:34 IST

वेगाने होणारे शहरीकरण आणि आर्थिक वृद्धीमुळे किनारपट्टीवर येणारे पूर यामुळे मुंबई व कोलकाता येथील लोकांना सर्वाधिक धोका आहे.

संयुक्त राष्ट्रे : वेगाने होणारे शहरीकरण आणि आर्थिक वृद्धीमुळे किनारपट्टीवर येणारे पूर यामुळे मुंबई व कोलकाता येथील लोकांना सर्वाधिक धोका आहे. त्याचवेळी समुद्राची पाणीपातळी वाढत चालल्याने २0५0पर्यंत भारतातील ४ कोटी लोकांना गंभीर धोका निर्माण होऊ शकतो, असे संयुक्त राष्ट्रांच्या पर्यावरणविषयक अहवालात म्हटले आहे. ह्यजागतिक पर्यावरणीय पूर्वानुमान : (जीईओ-६) क्षेत्रीय आकलनह्ण या शीर्षकाखाली अहवालात ही भीती व्यक्त करण्यात येत आहे. हवामानातील बदलाचा सर्वांत वाईट परिणाम पॅसिफिक आणि दक्षिण व दक्षिण-पूर्व आशियावर होण्याचा अंदाज आहे. २0५0पर्यंत समुद्राच्या पाणीपातळीत वाढ झाल्याने जगभरातील १0 देशांतील नागरी वस्त्यांवर परिणाम होणार आहे. त्यात सर्वाधिक परिणाम एशिया प्रशांत क्षेत्रातील सात देशांवर होईल, असे हा अहवाल म्हणतो. वेगाने होणारे शहरीकरण आणि आर्थिक वृद्धीमुळे चीन, भारत, थायलंड यांसारख्या देशांत आणि त्यातही खासकरून त्यांच्या अतिशहरीकृत भागांत भविष्यात विपरीत परिस्थितीला तोंड द्यावे लागण्याची शक्यता आहे. भारतातील मुंबई, कोलकाता; चीनमधील गुआंगझो आणि शांघाय; बांगलादेशातील ढाका; म्यानमारमधील यंगून; थायलंडमधील बँकॉक आणि व्हिएतनाममधील हो ची मिन्ह सिटी व हाईप्लेंग या शहरांना धोका आहे. या सर्व ठिकाणी २0७0मध्ये किनारपट्टीवर येणाऱ्या पुराचा मुकाबला करावा लागेल, असेही हा अहवाल म्हणतो. या शहरांपैकी अनेक शहरे किनारपट्टीवर येणाऱ्या पुराचा सामना पूर्वीपासूनच करीत आहेत; मात्र त्याची क्षमता आता मर्यादित होत आहे. संयुक्त राष्ट्रांचे पर्यावरणविषयक अधिवेशन पुढील आठवड्यात नैरोबीत होणार आहे. त्यापूर्वी हा अहवाल जारी करण्यात आला आहे. अहवालात पुढे म्हटले आहे की, नैसर्गिक आपत्ती, आर्थिक संकट आणि हवामानातील बदल यामुळे लोकांच्या जीवनावर नकारात्मक परिणाम होईल. २0५0पर्यंत भारत, बांगलादेश, चीन, इंडोनेशिया आणि फिलीपाईन्समधील ह्यवादळकेंद्रित प्रदेशह्ण होतील. त्यामुळे ५ कोटी ८0 लाख लोकांच्या जीविताला धोका निर्माण होईल. सर्वांत जास्त परिणाम होणाºया देशांत भारत प्रथम क्रमांकावर राहील. समुद्राची पाणीपातळी वाढत चालल्याने भारतातील ४ कोटी लोकांना धोका निर्माण होईल. त्यानंतर बांगलादेश अडीच कोटी, चीन दोन कोटी, फिलिपाईन्सच्या जवळपास दीड कोटी लोकांना धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. वाढत्या शहरीकरणामुळे किनारपट्टीतील वस्त्या वाढत चालल्या आहेत. त्यामुळे या किनारपट्टीवरील प्रदेशाची क्षमता कमालीची प्रभावित झाली आहे. तेथील धोका वाढला आहे, असेही अहवालात नमूद करण्यात आले आहे.