शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

समुद्राची पातळी वाढल्याने भारतात चार कोटी लोकांना धोका

By admin | Updated: May 21, 2016 04:34 IST

वेगाने होणारे शहरीकरण आणि आर्थिक वृद्धीमुळे किनारपट्टीवर येणारे पूर यामुळे मुंबई व कोलकाता येथील लोकांना सर्वाधिक धोका आहे.

संयुक्त राष्ट्रे : वेगाने होणारे शहरीकरण आणि आर्थिक वृद्धीमुळे किनारपट्टीवर येणारे पूर यामुळे मुंबई व कोलकाता येथील लोकांना सर्वाधिक धोका आहे. त्याचवेळी समुद्राची पाणीपातळी वाढत चालल्याने २0५0पर्यंत भारतातील ४ कोटी लोकांना गंभीर धोका निर्माण होऊ शकतो, असे संयुक्त राष्ट्रांच्या पर्यावरणविषयक अहवालात म्हटले आहे. ह्यजागतिक पर्यावरणीय पूर्वानुमान : (जीईओ-६) क्षेत्रीय आकलनह्ण या शीर्षकाखाली अहवालात ही भीती व्यक्त करण्यात येत आहे. हवामानातील बदलाचा सर्वांत वाईट परिणाम पॅसिफिक आणि दक्षिण व दक्षिण-पूर्व आशियावर होण्याचा अंदाज आहे. २0५0पर्यंत समुद्राच्या पाणीपातळीत वाढ झाल्याने जगभरातील १0 देशांतील नागरी वस्त्यांवर परिणाम होणार आहे. त्यात सर्वाधिक परिणाम एशिया प्रशांत क्षेत्रातील सात देशांवर होईल, असे हा अहवाल म्हणतो. वेगाने होणारे शहरीकरण आणि आर्थिक वृद्धीमुळे चीन, भारत, थायलंड यांसारख्या देशांत आणि त्यातही खासकरून त्यांच्या अतिशहरीकृत भागांत भविष्यात विपरीत परिस्थितीला तोंड द्यावे लागण्याची शक्यता आहे. भारतातील मुंबई, कोलकाता; चीनमधील गुआंगझो आणि शांघाय; बांगलादेशातील ढाका; म्यानमारमधील यंगून; थायलंडमधील बँकॉक आणि व्हिएतनाममधील हो ची मिन्ह सिटी व हाईप्लेंग या शहरांना धोका आहे. या सर्व ठिकाणी २0७0मध्ये किनारपट्टीवर येणाऱ्या पुराचा मुकाबला करावा लागेल, असेही हा अहवाल म्हणतो. या शहरांपैकी अनेक शहरे किनारपट्टीवर येणाऱ्या पुराचा सामना पूर्वीपासूनच करीत आहेत; मात्र त्याची क्षमता आता मर्यादित होत आहे. संयुक्त राष्ट्रांचे पर्यावरणविषयक अधिवेशन पुढील आठवड्यात नैरोबीत होणार आहे. त्यापूर्वी हा अहवाल जारी करण्यात आला आहे. अहवालात पुढे म्हटले आहे की, नैसर्गिक आपत्ती, आर्थिक संकट आणि हवामानातील बदल यामुळे लोकांच्या जीवनावर नकारात्मक परिणाम होईल. २0५0पर्यंत भारत, बांगलादेश, चीन, इंडोनेशिया आणि फिलीपाईन्समधील ह्यवादळकेंद्रित प्रदेशह्ण होतील. त्यामुळे ५ कोटी ८0 लाख लोकांच्या जीविताला धोका निर्माण होईल. सर्वांत जास्त परिणाम होणाºया देशांत भारत प्रथम क्रमांकावर राहील. समुद्राची पाणीपातळी वाढत चालल्याने भारतातील ४ कोटी लोकांना धोका निर्माण होईल. त्यानंतर बांगलादेश अडीच कोटी, चीन दोन कोटी, फिलिपाईन्सच्या जवळपास दीड कोटी लोकांना धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. वाढत्या शहरीकरणामुळे किनारपट्टीतील वस्त्या वाढत चालल्या आहेत. त्यामुळे या किनारपट्टीवरील प्रदेशाची क्षमता कमालीची प्रभावित झाली आहे. तेथील धोका वाढला आहे, असेही अहवालात नमूद करण्यात आले आहे.