शहरं
Join us  
Trending Stories
1
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
2
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
3
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
4
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
5
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
6
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
7
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
8
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
9
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
10
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
11
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
12
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
13
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
14
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
15
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
16
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
17
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
18
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
19
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
20
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?

देशात यंदा जोरदार पाऊस, सरासरी ११० टक्के बरसणार

By admin | Updated: June 3, 2016 03:41 IST

देशभरात जून ते सप्टेंबर दरम्यान १०४ ते ११० टक्के पाऊस होणार असल्याचा दुसरा दीर्घकालीन अंदाज हवामान विभागाने गुरुवारी जाहीर केला. यात सर्वाधिक पाऊस मध्य भारतात ११३ टक्के होण्याची

पुणे : देशभरात जून ते सप्टेंबर दरम्यान १०४ ते ११० टक्के पाऊस होणार असल्याचा दुसरा दीर्घकालीन अंदाज हवामान विभागाने गुरुवारी जाहीर केला. यात सर्वाधिक पाऊस मध्य भारतात ११३ टक्के होण्याची शक्यता वर्तवली आहे़ त्यामध्ये ८ टक्के फरक पडू शकतो़ हवामान विभागाने १२ एप्रिलला पहिला अंदाज जाहीर केला होता़ त्यात देशभरात १०६ टक्के पावसाचे संकेत दिले होते़ या दुसऱ्या अंदाजानुसार, उत्तर पश्चिम भारतात १०८ टक्के, मध्य भारत ११३ टक्के, दक्षिण व द्वीपसमूहात ११३ टक्के आणि पूर्वात्तर भारत ९४ टक्के पावसाची शक्यता आहे़ जुलैत संपूर्ण देशभरात १०७ टक्के आणि आॅगस्टमध्ये १०४ टक्के पाऊस होण्याची शक्यता असून, त्यात ९ टक्के इतका कमी-जास्त फरक पडू शकतो. पुण्यातील भारतीय उष्णदेशीय हवामान शास्त्र विभाग (आयआयटीएम), भूविज्ञानशास्त्र मंत्रालयातील शास्त्रज्ञ आणि तज्ज्ञांनी मॉन्सून मिशन प्रकल्पांतर्गत विकसित केलेल्या कपल्ड डायनॅमिक मॉडेलच्या साहाय्याने यंदाचा मॉन्सून अंदाज जाहीर केला आहे.