शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

उत्तराखंडातील वणवा पावसाने विझतोय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2016 03:05 IST

उत्तराखंडमध्ये मंगळवारी रात्री सर्वदूर झालेल्या पावसाने राज्याच्या जंगलांतील अग्नितांडव आटोक्यात आणण्याच्या मोहिमेला मोठा हातभार लागला आहे.

देहरादून : उत्तराखंडमध्ये मंगळवारी रात्री सर्वदूर झालेल्या पावसाने राज्याच्या जंगलांतील अग्नितांडव आटोक्यात आणण्याच्या मोहिमेला मोठा हातभार लागला आहे. गेल्या तीन महिन्यांपासून राज्यात भडकलेल्या वणव्याने आतापर्यंत अडीच हजार हेक्टर क्षेत्रातील बहमूल्य वनसंपदा भस्मसात करण्यासह सात जणांचा बळीही घेतला आहे. वणवा नियंत्रणात आणण्यास लष्करालाही पाचारण करण्यात आले होते. रात्रीच्या पावसाने ही परिस्थिती सुधारण्याची आशा निर्माण झाली. हवामान केंद्राचे संचालक विक्रम सिंह यांनी वृत्तसंस्थेला सांगितले की, डोंगराळ भागासह इतरत्र काल रात्रभर पाऊस झाला. पिठोरागड जिल्ह्यातील मुनस्यारी येथे ११ मि.मी., तर देहरादूनमध्ये सात मि.मी. पावसाची नोंद झाली. राज्यात सर्वदूर पाऊस झाला. तथापि, सर्व ठिकाणच्या नोंदी मिळण्यास थोडा अवधी लागेल. राज्यातील वणवा नियंत्रणात आणण्यासाठी सुरू असलेल्या मोहिमेला या पावसाने मोठा हातभार लागला आहे. उत्तर काशी जिल्ह्यात दोन फेब्रुवारी रोजी जंगलात आग लागण्याच्या यावर्षीच्या पहिल्या घटनेत दोन महिलांचा मृत्यू झाला होता, तर गेल्या महिन्यात नैनिताल जिल्ह्यात वणव्याने वसाहतीला कवेत घेतल्यामुळे झारखंडची महिला आणि तिच्या सहावर्षीय मुलाचा मृत्यू झाला होता. याशिवाय चमोली जिल्ह्यात दोन मे रोजी आग आटोक्यात आणण्याच्या मोहिमेवरील पोलीस शिपायाचा डोंगरावरून अंगावर दगड पडून मृत्यू झाला होता. हिमाचल प्रदेशातील किमान सहा जिल्ह्यांच्या अंतर्गत येणाऱ्या जंगलांमधील वणवा अद्याप पूर्णत: विझलेला नाही. या जिल्ह्यांत सिमला, कुल्लू यांचाही समावेश आहे. तसेच काश्मीरच्या राजौरी भागातील जंगलातही आग धुमसत असून, ती विझवण्याचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत.मुख्य वनरक्षक बी.पी. गुप्ता यांनी जारी केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, गेल्या फेब्रुवारीत भडकलेल्या वणव्याने राज्यातील 3465.94हेक्टर वनक्षेत्राची राख झाली आहे. जंगलातून निघणाऱ्या धुरामुळे गुदमरून एका फायर वॉचरचा मृत्यू झाला. पौडी जिल्ह्यातील मटियाली क्षेत्रात घडलेल्या या घटनेने वणव्यामुळे मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या वाढून सात झाली आहे.