शहरं
Join us  
Trending Stories
1
“उद्या दुपारी १२ वाजता या, अंतरवाली सराटीतील शेवटची बैठक”; जरांगेंचे मराठा समाजाला आवाहन
2
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशू शुक्लांशी संवाद
3
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
4
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
5
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
6
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
7
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
8
काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसण्याची चिन्हे
9
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
12
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
13
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
14
Gold price outlook: जागतिक तणाव झाला कमी, सोन्याच्या दरात होणार मोठी घसरण? एक्सपर्ट म्हणाले...
15
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ
16
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
17
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
18
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
19
अरे देवा! जीवघेण्या धबधब्याच्या काठावर 'ती' बनवत होती 'रील', थरकाप उडवणारा Video Viral
20
"मटण खाणारे पण वारीला आले" म्हणणाऱ्यांना DPने सुनावलं, म्हणाला- "हो मी मटण खातो पण..."

जोरदार वार्‍यासह शहरात पावसाच्या सरी

By admin | Updated: May 8, 2014 22:06 IST

विजांचा कडकडाट : अनेक भागातील वीजपुरवठा खंडित

विजांचा कडकडाट : अनेक भागातील वीजपुरवठा खंडित
नाशिक : कडाक्याच्या उन्हामुळे हैराण झालेल्या नाशिककरांना सायंकाळच्या सुमारास अर्धा तास झालेल्या पावसामुळे दिलासा मिळाला. वाढत्या तपमानामुळे नाशिकरांच्या अंगाची काहिली झालेली असतानाच सायंकाळी दाटून आलेले आभाळ आणि वाहणार्‍या वार्‍यामुळे आल्हाददायक वातावरण निर्माण झाले होते. त्यानंतर मात्र जोरदार वारे आणि विजांच्या कडकडाटासह शहरातील अनेक भागात पावसाच्या सरी कोसळल्या. या पावसामुळे शहरातील अनेक भागातील वीजपुरवठादेखील खंडित झाला होता.
आजचा पारा वाढलेला असतानाच सायंकाळच्या सुमारास आभाळ दाटून आल्याने वातावरणात अधिकच उकाडा निर्माण झाला होता. पावसाच्या थेंबांसह जोरदार वाराही वाहू लागल्याने शहरातील अनेक भागातील वीजपुरवठा विस्कळीत झाला होता. विशेषत: नाशिकरोड परिसरात विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला. वार्‍यासह कोसळणार्‍या पावसामुळे या भागातील अनेक ठिकाणचा वीजपुरवठा खंडित झाला होता. त्याचप्रमाणे पंचवटीतील काही भागात काहीकाळ पावसाने हजेरी लावली. सिडको, सातपूर येथेही आभाळ दाटून आले; मात्र या ठिकाणी तुरळक पाऊस झाला. नाशिकरोडसह शहरातील मध्यवर्ती भागात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला. त्यामुळे विक्रेत्यांची तारांबळ उडाली, तर बुधवार बाजारातही व्यापार्‍यांचे चांगलेच हाल झाले.
सायंकाळच्या सुमारास जोरदार वारे वाहू लागल्याने शहरातील बहुतांश भागातील वीजपुरवठा विस्कळीत झाला होता. यामुळे अगोदरच उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांच्या त्रासात अधिकच भर पडली. काही ठिकाणी खबरदारीचा उपाय म्हणून वीजपुरवठा तात्पुरता बंद करण्यात आला होता. पाऊस थांबल्यानंतर तेथील वीजपुरवठा पुन्हा सुरळीत करण्यात आला.
००००इन्फो----
तीन फिडर्स नादुरुस्त
जोरदार वार्‍यासह अवघ्या अर्धा ते पाऊण तास पडलेल्या पावसामुळे शहरातील वीजपुरवठा पूर्णपणे विस्कळीत झाला होता. सातपूर येथील ३३ केव्ही फिडरमध्ये बिघाड झाल्याने या फिडरवरील ग्राहकांना सुमारे तासभर वीजपुरवठा होऊ शकला नाही. त्यामुळे सातपूर, महात्मानगर, त्र्यंबकरोड, तसेच गंगापूर परिसरातील काही ठिकाणचा वीजपुरवठा खंडित झाला होता. तसेच ३३ केव्ही पंचक फिडरवरही स्ट्रिपिंग झाल्याने या फिडरवरील ग्राहकही हैराण झाले होते. टाकळी फिडर वाहिनीवर एकूण ११ ठिकाणी स्ट्रिपिंग झाल्यामुळे या वाहिन्यांवरील हजारो ग्राहकांना वीजपुरवठा होऊ शकला नाही. वार्‍यासह पाऊस सुरू झाल्याने काही ठिकाणी वीज कंपनीनेच वीजपुरवठा तात्पुरता बंद केला होता. काही वेळातच वीजपुरवठा सुरळीत होईल, असा दावा वीज कंपनीच्या अधिकार्‍यांनी करूनही सुमारे तीन तासांपेक्षा अधिक वेळ अनेक भागातील वीजपुरवठा खंडितच होता.