शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धात उतरली महासत्ता! ऑपरेशन मिडनाइट हॅमर, इराणच्या ३ अणुतळांवर अमेरिकेचे १४ बॉम्ब
2
निम्म्या जगावर इंधनाचे संकट? इराण बंद करणार होर्मुझची सामुद्रधुनी; प्रस्ताव मंजूर
3
Pahalgam Attack: पर्यटकांवर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना आश्रय देणारे दोघे अटकेत
4
शरीरात लपविलेले २३ कोटींचे अमली पदार्थ जप्त; मुंबई विमानतळावर पाच जणांना अटक 
5
बघ्यांसमोर प्राण सोडला, मृतदेह २ तास रस्त्यावर; पोलिसांची विनंतीही धुडकावली
6
कोकणात आणखी सहा ग्रोथ सेंटर्स; १०६ गावांत विकास केंद्रे, पर्यटन, कृषी व्यवसायाला चालना   
7
ENG vs IND : आता अनुभवी KL राहुलसह कॅप्टन शुबमन गिलवर मोठी जबाबदारी
8
भाजपामध्ये जाणार का? एकनाथ खडसे म्हणाले, “मी आजही RSSचा स्वयंसेवक आहे, गिरीश महाजन...”
9
अमेरिकेच्या हल्ल्याला इराण कसे देणार प्रत्युत्तर? आताच्या घडीला खामेनी यांच्याकडे ३ पर्याय
10
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
11
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
12
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना सर्वोत्तम, पदोन्नती योग; बंपर लाभास अनुकूल काळ, शुभ तेच घडेल!
13
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
14
अमेरिकेनं इराणवर ज्या B-२ स्टिल्थ बॉम्बर्सनं हल्ला केला त्याची किंमत माहित्येय? तासाला किती खर्च येतो? जाणून थक्क व्हाल
15
Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला
16
CM देवेंद्र फडणवीसांना पाठवली कायदेशीर नोटीस, असीम सरोदे यांनी दिली माहिती; नेमके प्रकरण काय?
17
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक
18
अमेरिकेनं इराणवर चालवलं 'मिडनाइट हॅमर', केला ऑपरेशनच्या नावाचा खुलास; म्हणाले, ट्रम्प बोलें तो...!
19
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
20
ENG vs IND : कायद्यात राहून फायद्यात! जड्डू-साई सुदर्शन जोडीनं रिले कॅचसह लुटली मैफिल (VIDEO)

पाऊस.. दोन

By admin | Updated: February 11, 2015 23:19 IST

कान्होलीबारा

कान्होलीबारा
परिसरात बुधवारी पहाटेच्या सुमारास झालेल्या वादळी पावसामुळे गव्हाचे अतोनात नुकसान झाले आहे. कपाशी पिकापासून निराशा झाल्यानंतर शेतकऱ्यांनी रबी हंगामातील पिकांकडे लक्ष केंद्रीत केले. त्यातच अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने त्यांच्या मेहनतीवर पुन्हा एकदा निसर्गाने पाणी फेरले आहे.
परिसरात रबी पिके चांगलीच बहरली होती. बुधवारी पहाटेच्या सुमारास अचानक सोसाट्याच्या वादळासह पावसाला सुरुवात झाली. यात गव्हासह अन्य रबी पिकांची नासाडी झाली. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. शासनाने तातडीने पिकांच्या नुकसानीचे सर्व्हेक्षण करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी, अशी मागणी शेतकऱ्यांची आहे.
तारसा
तारसा परिसरात पहाटे २ वाजताच्या सुमारास जोरदार वादळासह पावसाने हजेरी लावली. या वादळी पावसामुळे शेतातील गहू, हरभरा, तूर या पिकांचे अतोनात नुकसान झाले. शेतात लावलेल्या धानाच्या गंज्या भिजल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.
परिसरातील तारसा, इसापूर, कुंभारी, नवेगाव, आष्टी, बारसी, सालवा, यसंभा, मांगली, सावरगाव, चाचेर, नेरला, नंदापुरी, दुधाळा, बानोर, निमखेडा, पारडी, कलापार्डी, धनी, विरसी, गांगनेर, खंडाळा आदी गावात जोरदार वादळी पावसाच्या सरी कोसळल्या. त्यामुळे शेतातील गव्हाला पूर्णपणे वारा लागल्याने गव्हाचे उत्पादन काळवंडण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. आधीच नैसर्गिक संकटाच्या कचाट्यात सापडलेल्या शेतकऱ्यांसमोर या अवकाळी पावसामुळे नवे संकट उभे ठाकले आहे. शासनाने पिकांचे सर्व्हेक्षण करून नुकसानभरपाई द्यावी, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.
धामणा
बुधवारी पहाटे ३ वाजेपासून या परिसरात जोरदार वादळी पावसाने हजेरी लावल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
मध्यरात्रीनंतर अचानक वादळास सुरुवात झाली. काही वेळानंतर पावसाच्या सरी कोसळल्या. त्यामुळे गहू, हरभरा, टमाटर, संत्रा आदी पिकांसह भाजीपाल्याची नासाडी झाली. धामणा, शिरपूर (भुयारी), पेठ, सातनवरी, बाजारगाव, व्याहाड, नेरी आदी गावातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या वादळी पावसाचा गव्हाला सर्वाधिक फटका बसला असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. धामणा येथील शेतकरी धनराज टोंगे यांच्या शेतातील संपूर्ण गहू जमीनदोस्त झाला. पंचायत समिती कृषी विभागाचे विष्णू आदमने, कृषी पर्यवेक्षक कानगो, कृषी सहायक श्रीप्रकाश टोंगसे व तलाठी नारायणे आदीनी शेतकऱ्यांच्या पिकांची पाहणी केली. यात ५० टक्के पिकांचे नुकसान झाले असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. शासनाने शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी आहे.