शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

पाऊस.. दोन

By admin | Updated: February 11, 2015 23:19 IST

कान्होलीबारा

कान्होलीबारा
परिसरात बुधवारी पहाटेच्या सुमारास झालेल्या वादळी पावसामुळे गव्हाचे अतोनात नुकसान झाले आहे. कपाशी पिकापासून निराशा झाल्यानंतर शेतकऱ्यांनी रबी हंगामातील पिकांकडे लक्ष केंद्रीत केले. त्यातच अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने त्यांच्या मेहनतीवर पुन्हा एकदा निसर्गाने पाणी फेरले आहे.
परिसरात रबी पिके चांगलीच बहरली होती. बुधवारी पहाटेच्या सुमारास अचानक सोसाट्याच्या वादळासह पावसाला सुरुवात झाली. यात गव्हासह अन्य रबी पिकांची नासाडी झाली. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. शासनाने तातडीने पिकांच्या नुकसानीचे सर्व्हेक्षण करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी, अशी मागणी शेतकऱ्यांची आहे.
तारसा
तारसा परिसरात पहाटे २ वाजताच्या सुमारास जोरदार वादळासह पावसाने हजेरी लावली. या वादळी पावसामुळे शेतातील गहू, हरभरा, तूर या पिकांचे अतोनात नुकसान झाले. शेतात लावलेल्या धानाच्या गंज्या भिजल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.
परिसरातील तारसा, इसापूर, कुंभारी, नवेगाव, आष्टी, बारसी, सालवा, यसंभा, मांगली, सावरगाव, चाचेर, नेरला, नंदापुरी, दुधाळा, बानोर, निमखेडा, पारडी, कलापार्डी, धनी, विरसी, गांगनेर, खंडाळा आदी गावात जोरदार वादळी पावसाच्या सरी कोसळल्या. त्यामुळे शेतातील गव्हाला पूर्णपणे वारा लागल्याने गव्हाचे उत्पादन काळवंडण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. आधीच नैसर्गिक संकटाच्या कचाट्यात सापडलेल्या शेतकऱ्यांसमोर या अवकाळी पावसामुळे नवे संकट उभे ठाकले आहे. शासनाने पिकांचे सर्व्हेक्षण करून नुकसानभरपाई द्यावी, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.
धामणा
बुधवारी पहाटे ३ वाजेपासून या परिसरात जोरदार वादळी पावसाने हजेरी लावल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
मध्यरात्रीनंतर अचानक वादळास सुरुवात झाली. काही वेळानंतर पावसाच्या सरी कोसळल्या. त्यामुळे गहू, हरभरा, टमाटर, संत्रा आदी पिकांसह भाजीपाल्याची नासाडी झाली. धामणा, शिरपूर (भुयारी), पेठ, सातनवरी, बाजारगाव, व्याहाड, नेरी आदी गावातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या वादळी पावसाचा गव्हाला सर्वाधिक फटका बसला असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. धामणा येथील शेतकरी धनराज टोंगे यांच्या शेतातील संपूर्ण गहू जमीनदोस्त झाला. पंचायत समिती कृषी विभागाचे विष्णू आदमने, कृषी पर्यवेक्षक कानगो, कृषी सहायक श्रीप्रकाश टोंगसे व तलाठी नारायणे आदीनी शेतकऱ्यांच्या पिकांची पाहणी केली. यात ५० टक्के पिकांचे नुकसान झाले असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. शासनाने शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी आहे.