शहरं
Join us  
Trending Stories
1
लईराई जत्रोत्सवात चेंगराचेंगरी, CM प्रमोद सावंतांची प्रतिक्रिया; म्हणाले, “५० हजार लोक...”
2
Charanjit Singh Channi : "सर्जिकल स्ट्राईक कुठेही दिसला नाही, जर बॉम्ब पडला तर…"; काँग्रेस नेत्याने मागितले पुरावे
3
लईराई देवी यात्रा चेंगराचेंगरी: यात्रेला आले अन् काकू-पुतण्याने गमावला जीव, मृतांची नावे आली समोर
4
Pune Crime: 'कोयता काढला अन्...'; पुण्यातील बिबवेवाडीत भररस्त्यात थरकाप उडवणारी घटना, व्हिडीओ व्हायरल
5
IPO आणण्याची तयारी करतेय कंपनी; बुमराह, रोहित शर्मा, आमिर खान यांनीही केली गुंतवणूक; जाणून घ्या 
6
लईराई देवीच्या जत्रोत्सवात चेंगराचेंगरी; ६ भाविकांचा मृत्यू, ४० जण जखमी, उत्सवाला गालबोट
7
अक्षय्य तृतीयेला येणार होते, पण अजून ‘लाडकी बहीण’चे पैसे आले नाहीत; नेमका का होतोय उशीर?
8
"हेच कारण आहे पहलगाममध्ये जे झालं ते..," असं काय म्हणाला सोनू निगम; दाखल झाला FIR
9
५०० वर्षांनी गुरु अतिचारी गोचर: ६ राशींना लाभ, गुरु करेल मालामाल; अच्छे दिन येणार, शुभ घडणार!
10
मस्क यांच्या स्टारलिंक कंपनीचं पाकिस्तान-बांगलादेश कनेक्शन; भारतानं मागवली कामकाजाची माहिती, प्रकरण काय?
11
दहशतवाद्यांना पोसल्याचा पाकला त्रास; माझ्या आईला त्यांनीच गोळ्या घातल्या
12
पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या यु ट्यूब चॅनलवर भारतात बंदी, मंत्र्याचे X अकाऊंटही ब्लॉक
13
Home Loan: १५ लाखही वाचतील आणि ६० महिने आधीच होम लोनचं टेन्शन संपेल, कसं? जाणून घ्या
14
पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड पाकच; लष्कर, आयएसआय व आर्मीने रचला कट; एनआयएच्या अहवालात दावा
15
भारतीय सैन्यदलामध्ये व्यापक फेरबदल; पाकिस्तानला धडकी
16
Today Horoscope: आजचे राशीभविष्य, ३ मे २०२५: धनलाभ होऊन उत्पन्नात होईल वाढ
17
पाकला उत्तर देण्यासाठी गंगा एक्स्प्रेस-वेवरून झेपावतील लढाऊ विमाने; लँडिंग ड्रिल यशस्वी : देशाच्या संरक्षण तयारीत ऐतिहासिक टप्पा
18
विझिनजम बंदरामुळे आर्थिक प्रगती; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले उद्घाटन
19
चोंडीत ६०० व्हीव्हीआयपी, दोन हजार पाहुण्यांचा खास पाहुणचार; ६ मे रोजी मंत्रिमंडळाची पहिल्यांदा हाेणार बैठक
20
भारताविरुद्ध पाकिस्तानचे सायबर युद्ध, आठवडाभरात १० लाख हल्ले

पाऊस.... एक

By admin | Updated: February 11, 2015 23:19 IST

नांद

नांद
परिसरात बुधवारी पहाटे ४.३० वाजता प्रचंड विजेच्या कडकडाटासह वादळी पावसाला सुरुवात झाली. खरीप हंगाम बुडालेल्या शेतकऱ्यांची अचानक झालेल्या या अवकाळी पावसामुळे पुन्हा झोप उडाली आहे.
परिसरात शेतामध्ये गहू, हरभरा, तूर, हळद, लाख आदी पिके आहेत. परंतु या अवकाळी पावसामुळे पिकांचे प्रचंड नुकसान झाले. गव्हाचे पीक परिपक्व होऊन कापणीच्या अवस्थेत होते. मात्र, या अवकाळी पावसामुळे गहू पीक लोटल्या गेले. येथील शेतकरी पांडुरंग तिमांडे, श्यामराव खानोरकर, प्रभाकर दांडेकर यांच्या शेतीतील गहू, तूर या पिकांची प्रचंड नासाडी झाली. या वादळी पावसामुळे परिसरातील ४०० ते ५०० क्विंटल गव्हाचे व इतर मालाचे नुकसान होणार असल्याचा अंदाज काहींनी वर्तविला आहे. कृषी व महसूल विभागाने परिसरातील पिकांच्या नुकसानीबाबत सर्व्हेक्षण करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी व्यक्त होत आहे.
खरीप हंगामातील सोयाबीन, कपाशी व इतर पिके वाया गेली. त्यामुळे शेतकरी हतबल होता. त्यातच पुन्हा या वादळी पावसाने हजेरी लावल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.
खात
मौदा तालुक्यातील खात परिसरात बुधवारी पहाटे ४.३० वाजताच्या सुमारास प्रचंड मेघगर्जनेसह वादळी पाऊस बरसल्याने गहू, हरभरा या रबी पिकांचे मोठे नुकसान झाले. गव्हाच्या लोंब्या परिपक्व होत असतानाच पीक जमिनीवर लोटले. हरभऱ्याचीही हीच अवस्था झाली. याचा उत्पादन व गुणवत्तेवर विपरित परिणाम होणार असून शेतकऱ्यांना खरीपाप्रमाणेच रबीतही मोठी आर्थिक झळ बसणार आहे. या अवकाळी पावसामुळे भातगिरण्यांच्या आवारात ठेवलेली हजारो धानाची पोती ओली झाली. वीटभट्ट्यांचेही प्रचंड नुकसान झाले.
नागरिक पहाटेच्या साखरझोपेत असल्याने ते घराबाहेर असलेल्या वस्तंूचा पावसापासून बचाव करू शकले नाही. तोंडली येथे राजू शेंडे यांच्या शेतात वीज वाहक तारा तुटल्या. त्यामुळे काही काळ वीज पुरवठा बंद होता. अरोली वीज वितरण उपकेंद्राचे कनिष्ठ अभियंता मुत्तेपवार यांनी कर्मचाऱ्यांसह पहाटेपासून वीजपुरवठा सुरू करण्यासाठी परिश्रम घेतले. शासनाने या नुकसानीचे सर्व्हेक्षण करून भरपाई द्यावी, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.