शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाममध्ये दहशतवाद्यांना केली मदत, दिला आश्रय, दोघे अटकेत, तपासातून धक्कादायक माहिती समोर
2
बॉम्ब फोडूनही अमेरिका काही करू शकली नाही! ३७ तास हवेतच होते ६ बी२ बॉम्बर..., इराण म्हणतेय...
3
आतापर्यंत इस्रायली हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा जाणून थक्क व्हाल! खामेनेई सैनिकांकडूनही जोरदार प्रत्युत्तर
4
जगाचे 'लॉजिस्टिक्स' बदलणाऱ्या अवलियाचे निधन! मालवाहतुकीसाठी पहिल्यांदाच केला असा प्रयोग
5
पुढच्या ५ वर्षांत इराण अणुबॉम्ब बनवेल! अमेरिकेच्या हल्ल्यानंतर औवेसी म्हणाले, "तिथले कोट्यवधी भारतीय..."
6
"अमेरिकेच्या हल्ल्यानंतरही आमचे अणुऊर्जा प्रकल्प सुरक्षित"; इराणने दिली माहिती, ट्रम्प यांचा दावा फेटाळला
7
अमेरिकेने अणुकेंद्रांवर केलेल्या हल्ल्याचा इराण कसा घेणार बदला, केवळ इस्राइललाच लक्ष्य करणार की...
8
खोट्या बातम्यांवर बसणार आळा; कर्नाटक सरकारने आणला 'फेक न्यूज' कायदा, ७ वर्षांपर्यंतची शिक्षा
9
Iran Israel Conflict Explained: युद्धाच्या आगीत तेल पेटणार, भारतावर कसा परिणाम होणार?
10
भगवे झेंडे घेऊन रस्त्यावर उतरणे म्हणजे हिंदुत्व नव्हे; नितीन गडकरींची भूमिका
11
अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराण संतापला; इस्रायलवर डागली 30 क्षेपणास्त्रे, अनेक शहरांमध्ये भीतीचे वातावरण
12
VIDEO: इराणवर हल्ले सुरुच; अमेरिकेने दिलेली लढाऊ विमाने इस्रायलने केली नष्ट
13
"जंगल का कानून..."; अणुकेंद्रांवरीर हल्ल्यानंतर, इराणचा भारतमार्गे अमेरिकेला 'मेसेज'; घेतली मोठी शपथ!
14
NEET परीक्षा का बरे होत नसेल हो नीट?
15
इस्रायल सोडा अमेरिका-युरोपलाही घाबरत नाही; पण 'या' गटासमोर इराणला झुकावेच लागते!
16
‘त्या’ बेकायदा कृत्यांमध्ये कायद्याचे रक्षकच सहभागी; वसई-विरारमधील बांधकामप्रकरणी उच्च न्यायालयाने राज्य सरकारला झापले
17
इराणच्या अणुकेंद्रांवर अमेरिकेने टाकलेले बंकर बस्टर बॉम्ब एवढे आहेत विध्वंसक, अशी आहेत त्यांची वैशिष्ट्ये
18
तीन भाषा शिकण्यासाठी खेळाच्या तासात कपात; हिंदी शिकवण्यावरुन सुप्रिया सुळेंची CM फडणवीसांकडे मागणी
19
पुढच्या आठवड्यात बाजारात १२ कंपन्यांचे IPO, १५,८०० कोटींची उलाढाल! तुमच्यासाठी 'ही' सुवर्णसंधी!
20
Maharashtra Rainfall: पश्चिम महाराष्ट्रात जोरदार पाऊस, विदर्भात अजून प्रतीक्षा

पाऊस.... एक

By admin | Updated: February 11, 2015 23:19 IST

नांद

नांद
परिसरात बुधवारी पहाटे ४.३० वाजता प्रचंड विजेच्या कडकडाटासह वादळी पावसाला सुरुवात झाली. खरीप हंगाम बुडालेल्या शेतकऱ्यांची अचानक झालेल्या या अवकाळी पावसामुळे पुन्हा झोप उडाली आहे.
परिसरात शेतामध्ये गहू, हरभरा, तूर, हळद, लाख आदी पिके आहेत. परंतु या अवकाळी पावसामुळे पिकांचे प्रचंड नुकसान झाले. गव्हाचे पीक परिपक्व होऊन कापणीच्या अवस्थेत होते. मात्र, या अवकाळी पावसामुळे गहू पीक लोटल्या गेले. येथील शेतकरी पांडुरंग तिमांडे, श्यामराव खानोरकर, प्रभाकर दांडेकर यांच्या शेतीतील गहू, तूर या पिकांची प्रचंड नासाडी झाली. या वादळी पावसामुळे परिसरातील ४०० ते ५०० क्विंटल गव्हाचे व इतर मालाचे नुकसान होणार असल्याचा अंदाज काहींनी वर्तविला आहे. कृषी व महसूल विभागाने परिसरातील पिकांच्या नुकसानीबाबत सर्व्हेक्षण करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी व्यक्त होत आहे.
खरीप हंगामातील सोयाबीन, कपाशी व इतर पिके वाया गेली. त्यामुळे शेतकरी हतबल होता. त्यातच पुन्हा या वादळी पावसाने हजेरी लावल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.
खात
मौदा तालुक्यातील खात परिसरात बुधवारी पहाटे ४.३० वाजताच्या सुमारास प्रचंड मेघगर्जनेसह वादळी पाऊस बरसल्याने गहू, हरभरा या रबी पिकांचे मोठे नुकसान झाले. गव्हाच्या लोंब्या परिपक्व होत असतानाच पीक जमिनीवर लोटले. हरभऱ्याचीही हीच अवस्था झाली. याचा उत्पादन व गुणवत्तेवर विपरित परिणाम होणार असून शेतकऱ्यांना खरीपाप्रमाणेच रबीतही मोठी आर्थिक झळ बसणार आहे. या अवकाळी पावसामुळे भातगिरण्यांच्या आवारात ठेवलेली हजारो धानाची पोती ओली झाली. वीटभट्ट्यांचेही प्रचंड नुकसान झाले.
नागरिक पहाटेच्या साखरझोपेत असल्याने ते घराबाहेर असलेल्या वस्तंूचा पावसापासून बचाव करू शकले नाही. तोंडली येथे राजू शेंडे यांच्या शेतात वीज वाहक तारा तुटल्या. त्यामुळे काही काळ वीज पुरवठा बंद होता. अरोली वीज वितरण उपकेंद्राचे कनिष्ठ अभियंता मुत्तेपवार यांनी कर्मचाऱ्यांसह पहाटेपासून वीजपुरवठा सुरू करण्यासाठी परिश्रम घेतले. शासनाने या नुकसानीचे सर्व्हेक्षण करून भरपाई द्यावी, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.