शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाने भारताला SU-57 लढाऊ विमानांची ऑफर दिली, त्याचे फिचर अन् महत्त्व जाणून घ्या
2
Ladki Bahin Yojana: २६ लाख लाडक्या बहिणींची नावे गायब, ४९०० कोटींचा महाघोटाळा; अजित पवारांच्या बहिणीचा गंभीर आरोप 
3
३५० सीसीवरील मोटरसायकलचा जीएसटी वाढला; KTM, Triumph अन् Aprilia ने मोठा निर्णय घेतला...
4
घराशेजारच्या किराणा दुकानांमध्ये ‘GST बचत उत्सवा’चा लाभ नाहीच; ग्राहकांचा झाला अपेक्षाभंग
5
"महाराष्ट्रात ओला दुष्काळ जाहीर करा, आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घ्या’ काँग्रेसची मागणी  
6
Ghaziabad Encounter: गाझियाबाद एन्काउंटरची इतिहासात नोंद, असं वेगळं काय घडलं? 
7
VIRAL : एका झटक्यात महिला झाली कोट्यधीश; ChatGPTने पालटलं नशीब! वाचून व्हाल हैराण
8
अर्जुन तेंडुलकर राहुल द्रविडच्या मुलाला भिडला; समित द्रविड पहिल्यांदाच खेळला, पण... 
9
मराठी माणसाचं दुकान हडपल्याचा गुन्हा; 'त्या' परप्रांतीयाला शिंदेसेनेकडून जबाबदारी, पक्षात नाराजी
10
"गरबा कार्यक्रमांच्या प्रवेशद्वारावर गोमूत्र ठेवावं, गैर-हिंदूंना..."; धीरेंद्र शास्त्रींचं मोठं विधान
11
मनसेची मान्यता रद्द करण्याची मागणी, राज ठाकरेंविरोधातील याचिकेवर उच्च न्यायालयाचे प्रश्नचिन्ह
12
दिल्लीतील रस्त्यावर मध्यरात्री चकमकीचा थरार, माया गँगच्या म्होरक्याविरोधात STF ची मोठी कारवाई
13
जीएसटीच्या पहिल्याच दिवशी मारुतीने २५,००० गाड्या विकल्या; ८० हजार लोकांची इन्क्वायरी...
14
वयाच्या २९व्या वर्षी वेगवान गोलंदाज निवृत्त; वकील बनण्यासाठी क्रिकेटशी तोडलं नातं!
15
Muhurat Trading 2025 Date and Time: वेळ लिहून ठेवा! या मुहूर्तावर शेअर बाजारात होणार धनवर्षा; १ तासासाठी उघडणार मार्केट
16
मुसळधार पावसाने कोलकात्याला झोडपले, अनेक भागात पाणी साचले, मेट्रो विस्कळीत, ५ जणांचा मृत्यू
17
निमिषा प्रियासारखंच प्रकरण; १९ वर्षांपासून सौदी अरेबियाच्या तुरुंगात असलेला अब्दुल रहीम सुटणार!
18
"मी तुमचा मोठा चाहता...", रितेश देशमुखने प्रसाद ओकचं केलं कौतुक; गंमतीत म्हणाला...
19
"बिग बॉसचं मला काही विचारू नका", भाऊ अमालबद्दल विचारताच अरमान मलिक भडकला, व्हिडीओ व्हायरल
20
महिला पोलीस अधिकाऱ्याने वर्दीवरील बॅज फेकून मारला; Video व्हायरल, घटनेची दुसरी बाजू आली समोर

पाऊस गायब; डोळे आभाळाकडे

By admin | Updated: July 10, 2015 01:44 IST

वायव्य भारत वगळता जुलै महिन्यातील अपुऱ्या पावसाचे नकारात्मक परिणाम देशाच्या कानाकोपऱ्यात दिसू लागले आहेत. अनेक भागांत दुबार पेरणीच्या संकटामुळे

नवी दिल्ली : वायव्य भारत वगळता जुलै महिन्यातील अपुऱ्या पावसाचे नकारात्मक परिणाम देशाच्या कानाकोपऱ्यात दिसू लागले आहेत. अनेक भागांत दुबार पेरणीच्या संकटामुळे हवालदिल झालेला शेतकरी आभाळाकडे डोळे लावून बसला आहे. या महिन्याच्या प्रारंभी जवळपास सर्वच भागात पावसाने ओढ दिली असून १ जून ते ८ जुलै या काळात देशात ४ टक्के कमी पाऊस झाला आहे. कालपर्यंत हे प्रमाण उणे २ टक्के राहिले असल्याचे भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या (आयएमडी) सूत्रांनी म्हटले आहे. मध्य भारतात जूनमध्ये बऱ्यापैकी पाऊस पडला असला तरी जुलै महिन्यात उणे ८ टक्के, दक्षिण भागात उणे ७ टक्के तर ईशान्य भारतात उणे ४ टक्के पावसाची नोंद झाली आहे. वायव्य भारतात जुलैच्या प्रारंभी बरा पाऊस झाला पण अलीकडे तेथेही पावसाने दडी मारल्याचे चित्र दिसून आले.हवामान विभागाने यापूर्वीच देशात सामान्यापेक्षा कमी म्हणजे ८८ टक्के पावसाचा अंदाज वर्तवला आहे. यावर्षी जूनमध्ये सामान्यापेक्षा १६ टक्के जास्त पावसाची नोंद झाली; मात्र तरी जुलै आणि आॅगस्टमध्ये अनुक्रमे ८ आणि १० टक्के कमी पाऊस पडण्याची शक्यता पाहता एकूणच सरासरी कमी होणार आहे. स्कायमेट या खासगी हवामान संस्थेने जुलैमध्ये सामान्यापेक्षा जास्त(१०४ टक्के), आॅगस्टमध्ये सामान्य(९९ टक्के) तर सप्टेंबरमध्ये (९६ टक्के) पावसाचा अंदाज वर्तवला आहे. केरळमध्ये ३० टक्के, कर्नाटक किनारपट्टी ३२ टक्के तर कोकण आणि गोव्यात १५ टक्के कमी पाऊस असण्याची शक्यताही या संस्थेने वर्तवली. (लोकमत न्यूज नेटवर्क)