शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीकडून खेळताना किंग कोहलीची ‘विराट’ कामगिरी! नव्या विश्वविक्रमासह ऑस्ट्रेलियन दिग्गजाला धोबीपछाड
2
"धर्म आणि विज्ञान यांच्यात कुठलाही संघर्ष नाही; दोघांचेही ध्येय एकच...!" नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
पुतण्यानेच रचला चुलत्याच्या हत्येचा कट; पराभवाचा बदला घेण्यासाठी मंगेश काळोखेंची हत्या, तटकरेंच्या निकटवर्तीयावरही गुन्हा दाखल
4
"लोकं अडकून पडलेत, मुलांचं शिक्षण रखडलंय"; H1B व्हिसा मुद्द्यावर भारताची अमेरिकेशी चर्चा
5
जावळ काढण्याच्या प्रथेत आईचेही बळजबरीने मुंडन; दौंडमधील महिलांची राज्य महिला आयोगाकडे तक्रार
6
Viral Video: "ही कार आहे... बाईक नाही!" नको त्या कारणावरून जोडप्यामध्ये पेटला वाद, व्हिडीओ व्हायरल
7
पदकं फेकली, प्रमाणपत्रं फाडली, भाजपा खासदारांच्या क्रीडा महोत्सवात खेळाडूंचा संताप, कारण काय?
8
"दोषींना शिक्षा झालीच पाहिजे..."; बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येवरून भारताने सुनावलं
9
थरकाप उडवणारा VIDEO! चिनी शस्त्रांची पुन्हा पोलखोल, थायलंड विरोधात वापरताना रॉकेट सिस्टिमचाच स्फोट; कंबोडियाच्या 8 जवानांचा मृत्यू
10
GenZ पिढीच्या मुलांवर माझा विश्वास, हीच मुलं भारताला 'विकसित राष्ट्र' बनवतील- पंतप्रधान मोदी
11
४५ वर्षाचा गड कोसळला, भाजपानं रचला इतिहास; १ मत फिरवलं अन् 'या' महापालिकेत बसवला महापौर
12
भाजपा आमदारांच्या ‘ब्राह्मण भोजना’मुळे उत्तर प्रदेशच्या राजकारणात खळबळ, भाजपामध्ये चाललंय काय? 
13
काही केलं तरी रात्री झोपच येत नाही? मग करा 'हे' एक छोटसं काम; १० मिनिटांत व्हाल डाराडूर
14
Shehnaaz Gill : "इथे सगळे राक्षस, मी खूप स्ट्रगल...", शहनाज गिलची झाली फसवणूक, इंडस्ट्रीबद्दल मोठा खुलासा
15
उद्धव ठाकरेंच्या भेटीत काय ठरले? जागावाटपाबाबत बैठकीत चर्चा झाली का?; जयंत पाटील म्हणाले...
16
अडीच वर्षातील काम जनता विसरणार नाही; शिवसेनेत येताच प्रकाश महाजनांचे शिंदेंबाबत कौतुकोद्गार
17
रिपल इफेक्ट : ग्राहकांच्या सवयी बाजाराच्या हालचालींवर कशा परिणाम करतात?
18
"राजकारण बंद करेन, पण आता..."; काँग्रेसमध्ये प्रवेश करताच प्रशांत जगतापांनी मांडली भूमिका
19
पाकिस्तानला अजूनही 'ऑपरेशन सिंदूर'ची भीती! सीमेवर अँटी-ड्रोन सिस्टीम बसवले
Daily Top 2Weekly Top 5

पाऊस गायब; डोळे आभाळाकडे

By admin | Updated: July 10, 2015 01:44 IST

वायव्य भारत वगळता जुलै महिन्यातील अपुऱ्या पावसाचे नकारात्मक परिणाम देशाच्या कानाकोपऱ्यात दिसू लागले आहेत. अनेक भागांत दुबार पेरणीच्या संकटामुळे

नवी दिल्ली : वायव्य भारत वगळता जुलै महिन्यातील अपुऱ्या पावसाचे नकारात्मक परिणाम देशाच्या कानाकोपऱ्यात दिसू लागले आहेत. अनेक भागांत दुबार पेरणीच्या संकटामुळे हवालदिल झालेला शेतकरी आभाळाकडे डोळे लावून बसला आहे. या महिन्याच्या प्रारंभी जवळपास सर्वच भागात पावसाने ओढ दिली असून १ जून ते ८ जुलै या काळात देशात ४ टक्के कमी पाऊस झाला आहे. कालपर्यंत हे प्रमाण उणे २ टक्के राहिले असल्याचे भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या (आयएमडी) सूत्रांनी म्हटले आहे. मध्य भारतात जूनमध्ये बऱ्यापैकी पाऊस पडला असला तरी जुलै महिन्यात उणे ८ टक्के, दक्षिण भागात उणे ७ टक्के तर ईशान्य भारतात उणे ४ टक्के पावसाची नोंद झाली आहे. वायव्य भारतात जुलैच्या प्रारंभी बरा पाऊस झाला पण अलीकडे तेथेही पावसाने दडी मारल्याचे चित्र दिसून आले.हवामान विभागाने यापूर्वीच देशात सामान्यापेक्षा कमी म्हणजे ८८ टक्के पावसाचा अंदाज वर्तवला आहे. यावर्षी जूनमध्ये सामान्यापेक्षा १६ टक्के जास्त पावसाची नोंद झाली; मात्र तरी जुलै आणि आॅगस्टमध्ये अनुक्रमे ८ आणि १० टक्के कमी पाऊस पडण्याची शक्यता पाहता एकूणच सरासरी कमी होणार आहे. स्कायमेट या खासगी हवामान संस्थेने जुलैमध्ये सामान्यापेक्षा जास्त(१०४ टक्के), आॅगस्टमध्ये सामान्य(९९ टक्के) तर सप्टेंबरमध्ये (९६ टक्के) पावसाचा अंदाज वर्तवला आहे. केरळमध्ये ३० टक्के, कर्नाटक किनारपट्टी ३२ टक्के तर कोकण आणि गोव्यात १५ टक्के कमी पाऊस असण्याची शक्यताही या संस्थेने वर्तवली. (लोकमत न्यूज नेटवर्क)