शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
3
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
4
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
5
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
6
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
7
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
8
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
9
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
10
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
11
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
12
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
13
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
14
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
15
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
16
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
17
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
18
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
19
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
20
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?

छतावरील प्रवासाची जबाबदारी रेल्वेची

By admin | Updated: July 7, 2016 04:01 IST

एक्स्प्रेस रेल्वेच्या छतावरून प्रवास करताना फूट ओव्हर ब्रीजला धडकून १९ तरुणांच्या मृत्यूला सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी रेल्वे प्रशासनाला जबाबदार धरले आहे. अपघात झाल्यानंतरही

नवी दिल्ली : एक्स्प्रेस रेल्वेच्या छतावरून प्रवास करताना फूट ओव्हर ब्रीजला धडकून १९ तरुणांच्या मृत्यूला सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी रेल्वे प्रशासनाला जबाबदार धरले आहे. अपघात झाल्यानंतरही ही रेल्वे थांबू शकली नाही. मुख्य न्यायमूर्ती टी. एस. ठाकूर आणि न्यायमूर्ती यू. यू. ललित यांच्या खंडपीठाने सरकारने प्रत्येक मृताच्या कुटुंबियांना पाच पाच लाख रुपये भरपाई देण्याचा आदेश दिला. भरपाई देण्यातून मुक्त करावे ही रेल्वेची याचिकाही खंडपीठाने फेटाळली. रेल्वेच्या छतावर मोठ्या संख्येने बसलेल्या लोकांना रेल्वे वेगात जाताना असा अपघात होऊ शकतो याची जाणीव असलीच पाहिजे. छतावर बसलेल्या लोकांनी अपघाताला हातभार लावला असला तरी रेल्वे प्रशासनाला दोषमुक्त करता येणार नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले. हा अपघात एक फेब्रुवारी २०११ रोजी बरेलीहून निघालेल्या जम्मू तावी-हावडा हिमगिरी एक्स्प्रेसला झाला. भारत- तिबेट सीमा पोलीस दलातील (आयटीबीपी) भरतीच्या निवडीसाठी लाखो तरुण आले होते. प्रचंड संख्येतील या जमावाला हाताळणे अवघड झाल्यानंतर आयटीबीपी अधिकाऱ्यांनी लाठीमार केला. पर्यायाने निवड रद्द करण्यात आली. हे तरुण मग घरी जाण्यासाठी त्या दुर्दैवी रेल्वेत चढले. अनेक जण छतावरही गेले. रेल्वे दर तासाला ६० किलोमीटर या वेगाने प्रवास करीत होती. अपघात शाहजहानपूर जिल्ह्यात झाला. तेथे रेल्वेचे छत आणि फूट ओव्हर ब्रीज यांच्यातील अंतर तीन मीटरपेक्षाही कमी होते. अपघात झाल्यानंतरही रेल्वे तीन किलोमीटर पुढे गेली व नंतर थांबली. तेथे मग रक्ताळलेल्या छतावरून मृत तरुणांचे मृतदेह खाली घेण्यात आले.