शहरं
Join us  
Trending Stories
1
"चिंदबरम यांनी जो कायदा आणला, त्याला मी विरोध केला, मात्र..."; शरद पवारांनी सांगितली आठवण
2
व्हाईट हाऊसचे सल्लागार बनले २ जिहादी; एक लश्कर ए तोयबा तर दुसरा अल कायदाशी लिंक
3
आणखी एका पाकिस्तानी हेराला ठोकल्या बेड्या, ISIला भारताची गोपनीय माहिती पुरवणारा अरमान अटकेत  
4
रशियाचा युक्रेनवर सर्वात मोठा ड्रोन हल्ला! एकाच वेळी २७३ ड्रोन्स सोडले अन्...
5
Nehal Wadhera नं फिफ्टीसह सावरला डाव; मग प्रीती झिंटानं संघाच्या हिरोला अशी दिली दाद
6
“ज्योतीला फसवले जातेय, सामान्य व्यक्तीप्रमाणे महिन्याला १५-२०-२५ हजार कमावते”; वडिलांचा दावा
7
ही गुंडगिरी संपुष्टात आणण्यासाठी मीच पुढाकार घेणार; मनोज जरांगेंनी घेतली शिवराज दिवटेची भेट
8
मुकेश अंबानींचा नवा डाव! आता ऑनलाइन मार्केटमध्ये घालणार धुमाकूळ, झेप्टो-ब्लिंकिटला थेट टक्कर
9
धक्कादायक खुलासा! ISI अधिकाऱ्यांच्या संपर्कात होती ज्योती, गुप्तचर नेटवर्क चालवतोय पाकिस्तान
10
पाकिस्तानच्या अडचणी वाढणार! कर्ज दिल्यानंतर IMFने दिला इशारा; ११ अटींचे पालनही बंधनकारक
11
भाजपाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी आता केवळ या दोन नावांची चर्चा, तर्कवितर्कांना उधाण, कधी होणार घोषणा  
12
केवळ ठाकरे गटाला नाही, मनसेलाही धक्का; दादरा नगर हवेलीसह ७ ठिकाणचे पदाधिकारी शिंदेसेनेत
13
“‘नरकातला स्वर्ग’चे श्रेय स्वप्ना पाटकरांना, संजय राऊत देशसेवेसाठी तुरुंगात गेले नव्हते”
14
ऑटो जगतात खळबळ! निस्सान भारतासह जगभरातील प्रकल्प बंद करण्याच्या तयारीत; पैकी जपानमधील दोन... 
15
भारतीय सैन्याच्या शौर्याला, धाडसाला कांदिवलीच्या नागरिकांचा सलाम; काढली 'तिरंगा पदयात्रा'
16
PM मोदींचा एअरबेस दौरा, डेलीगेशन अन् चॅनेल बॅन...शहबाज शरीफ करताहेत भारताची नक्कल
17
Ayodhya Temple : राम मंदिराच्या सुरक्षेत मोठा बदल, २५० सुरक्षा रक्षकांना कामावरून कमी केले! करण काय?
18
“मोदी २०० देश फिरले, पण एकही पाठिशी नाही; शिष्टमंडळाच्या वऱ्हाडावर बहिष्कार टाकला पाहिजे”
19
संपूर्ण यादीच आली, सर्वपक्षीय शिष्टमंडळाचे सदस्य ठरले, प्रत्येक टीममध्ये किती अन् कोण नेते?
20
ज्या गर्लफ्रेंडशी गुलूगुलू बोलायचा ती निघाली त्याचीच पत्नी, रंगेल पतीची झाली अशी फजिती, त्यानंतर...

छतावरील प्रवासाची जबाबदारी रेल्वेची

By admin | Updated: July 7, 2016 04:01 IST

एक्स्प्रेस रेल्वेच्या छतावरून प्रवास करताना फूट ओव्हर ब्रीजला धडकून १९ तरुणांच्या मृत्यूला सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी रेल्वे प्रशासनाला जबाबदार धरले आहे. अपघात झाल्यानंतरही

नवी दिल्ली : एक्स्प्रेस रेल्वेच्या छतावरून प्रवास करताना फूट ओव्हर ब्रीजला धडकून १९ तरुणांच्या मृत्यूला सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी रेल्वे प्रशासनाला जबाबदार धरले आहे. अपघात झाल्यानंतरही ही रेल्वे थांबू शकली नाही. मुख्य न्यायमूर्ती टी. एस. ठाकूर आणि न्यायमूर्ती यू. यू. ललित यांच्या खंडपीठाने सरकारने प्रत्येक मृताच्या कुटुंबियांना पाच पाच लाख रुपये भरपाई देण्याचा आदेश दिला. भरपाई देण्यातून मुक्त करावे ही रेल्वेची याचिकाही खंडपीठाने फेटाळली. रेल्वेच्या छतावर मोठ्या संख्येने बसलेल्या लोकांना रेल्वे वेगात जाताना असा अपघात होऊ शकतो याची जाणीव असलीच पाहिजे. छतावर बसलेल्या लोकांनी अपघाताला हातभार लावला असला तरी रेल्वे प्रशासनाला दोषमुक्त करता येणार नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले. हा अपघात एक फेब्रुवारी २०११ रोजी बरेलीहून निघालेल्या जम्मू तावी-हावडा हिमगिरी एक्स्प्रेसला झाला. भारत- तिबेट सीमा पोलीस दलातील (आयटीबीपी) भरतीच्या निवडीसाठी लाखो तरुण आले होते. प्रचंड संख्येतील या जमावाला हाताळणे अवघड झाल्यानंतर आयटीबीपी अधिकाऱ्यांनी लाठीमार केला. पर्यायाने निवड रद्द करण्यात आली. हे तरुण मग घरी जाण्यासाठी त्या दुर्दैवी रेल्वेत चढले. अनेक जण छतावरही गेले. रेल्वे दर तासाला ६० किलोमीटर या वेगाने प्रवास करीत होती. अपघात शाहजहानपूर जिल्ह्यात झाला. तेथे रेल्वेचे छत आणि फूट ओव्हर ब्रीज यांच्यातील अंतर तीन मीटरपेक्षाही कमी होते. अपघात झाल्यानंतरही रेल्वे तीन किलोमीटर पुढे गेली व नंतर थांबली. तेथे मग रक्ताळलेल्या छतावरून मृत तरुणांचे मृतदेह खाली घेण्यात आले.