शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

छतावरील प्रवासाची जबाबदारी रेल्वेची

By admin | Updated: July 7, 2016 04:01 IST

एक्स्प्रेस रेल्वेच्या छतावरून प्रवास करताना फूट ओव्हर ब्रीजला धडकून १९ तरुणांच्या मृत्यूला सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी रेल्वे प्रशासनाला जबाबदार धरले आहे. अपघात झाल्यानंतरही

नवी दिल्ली : एक्स्प्रेस रेल्वेच्या छतावरून प्रवास करताना फूट ओव्हर ब्रीजला धडकून १९ तरुणांच्या मृत्यूला सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी रेल्वे प्रशासनाला जबाबदार धरले आहे. अपघात झाल्यानंतरही ही रेल्वे थांबू शकली नाही. मुख्य न्यायमूर्ती टी. एस. ठाकूर आणि न्यायमूर्ती यू. यू. ललित यांच्या खंडपीठाने सरकारने प्रत्येक मृताच्या कुटुंबियांना पाच पाच लाख रुपये भरपाई देण्याचा आदेश दिला. भरपाई देण्यातून मुक्त करावे ही रेल्वेची याचिकाही खंडपीठाने फेटाळली. रेल्वेच्या छतावर मोठ्या संख्येने बसलेल्या लोकांना रेल्वे वेगात जाताना असा अपघात होऊ शकतो याची जाणीव असलीच पाहिजे. छतावर बसलेल्या लोकांनी अपघाताला हातभार लावला असला तरी रेल्वे प्रशासनाला दोषमुक्त करता येणार नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले. हा अपघात एक फेब्रुवारी २०११ रोजी बरेलीहून निघालेल्या जम्मू तावी-हावडा हिमगिरी एक्स्प्रेसला झाला. भारत- तिबेट सीमा पोलीस दलातील (आयटीबीपी) भरतीच्या निवडीसाठी लाखो तरुण आले होते. प्रचंड संख्येतील या जमावाला हाताळणे अवघड झाल्यानंतर आयटीबीपी अधिकाऱ्यांनी लाठीमार केला. पर्यायाने निवड रद्द करण्यात आली. हे तरुण मग घरी जाण्यासाठी त्या दुर्दैवी रेल्वेत चढले. अनेक जण छतावरही गेले. रेल्वे दर तासाला ६० किलोमीटर या वेगाने प्रवास करीत होती. अपघात शाहजहानपूर जिल्ह्यात झाला. तेथे रेल्वेचे छत आणि फूट ओव्हर ब्रीज यांच्यातील अंतर तीन मीटरपेक्षाही कमी होते. अपघात झाल्यानंतरही रेल्वे तीन किलोमीटर पुढे गेली व नंतर थांबली. तेथे मग रक्ताळलेल्या छतावरून मृत तरुणांचे मृतदेह खाली घेण्यात आले.