शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योती मल्होत्रानंतर ISI च्या आणखी एका एजंटला अटक, उत्तर प्रदेश एटीएसची कारवाई
2
IPL 2025 : गुजरात टायटन्ससह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु अन् पंजाब किंग्जला मिळालं प्लेऑफ्सचं तिकीट
3
ज्योती मल्होत्रा बनली होती पाकिस्तानसाठी 'अ‍ॅसेट', 'ऑपरेशन सिंदूर'च्या काळात होती शत्रूच्या संपर्कात
4
RSS मुख्यालयावरील हल्ल्याचा सूत्रधार सैफुल्लाचा १९ वर्षांनंतर खात्मा, संघ वर्तुळातून ‘अज्ञात’ व्यक्तीच्या कृतीचे स्वागत
5
IPL च्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं; शुबमन गिल-साई जोडीच्या जोरावर GT नं साधला विक्रमी डाव
6
मुंबईत तिहेरी हत्याकांड! दोन कुटुंबाचा वाद विकोपाला, कोयत्यानेच एकमेकांवर हल्ला; ४ जण जखमी
7
'गौरव गोगोई ट्रेनिंगसाठी पाकिस्तानला गेले होते', काँग्रेसच्या खासदारावर भाजपच्या मुख्यमंत्र्याचा गंभीर आरोप
8
Mumbai: ड्रग्ज तस्करांना दणका! १३ कोटींचे एमडी जप्त; मुंबई आणि नवी मुंबईतील पाच जणांना अटक
9
Solapur Fire: आगीत ८ जणांचा मृत्यू, PM मोदींनी व्यक्त केला शोक; CM फडणवीसांकडून पाच लाखांच्या मदतीची घोषणा
10
किंग कोहलीपेक्षा फास्टर निघाला KL राहुल! टी-२० त जलदगतीने गाठला ८००० धावांचा पल्ला
11
हल्दी घाटीमध्ये सराव, CDS ची रणनीती आणि..., अशी आहे ऑपरेशन सिंदूरच्या यशाची Inside Story  
12
गडचिरोली: यू-टर्न घेताना घात झाला अन् भरधाव ट्रक येऊन धडकला, कारमधील चौघे जागीच ठार
13
नाम तो सुना होगा! केएल राहुलनं शतकी खेळीसह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा एकमेव फलंदाज
14
कुख्यात दहशतवादी सैफुल्लाह खालिद ठार, भारतात झालेल्या तीन हल्ल्यांमागे होता हात, पाकिस्तानमध्ये अज्ञातांनी झाडल्या गोळ्या  
15
शिक्षण घोटाळ्यात नागपूर पोलिसांची एसआयटी स्थापन, अनेक मोठ्या अधिकाऱ्यांचा भांडाफोड होण्याची शक्यता
16
या महिलेवर लक्ष ठेवा, त्याने वर्षभरापूर्वीच दिला होता इशारा, आता त्या ट्विटची होतेय चर्चा
17
अभिनेत्री नुसरत फारियाला ढाका विमानतळावर अटक; कोणत्या प्रकरणात झाली कारवाई?
18
आणखी एका पाकिस्तानी हेराला ठोकल्या बेड्या, ISIला भारताची गोपनीय माहिती पुरवणारा अरमान अटकेत  
19
RR विरुद्धच्या विजयासह PBKS चा प्लेऑफ्सचा पेपर झाला सोपा! आता GT च्या निकालावर असतील नजरा, कारण...
20
भोकरदन तालुक्यात दोन वेगवेगळ्या ठिकाणी वीज कोसळून दोघांचा दुर्दैवी मृत्यू

रेल्वे प्रवाशांना मिळणार आता १० लाखांचा अपघात विमा!

By admin | Updated: July 25, 2016 04:15 IST

प्रवाशांकडून प्रत्येक तिकिटामागे दोन ते १० रुपये एवढा अल्प प्रीमियम घेऊन त्यांना १० लाख रुपयांपर्यंतचा अपघाती विमा देण्याची योजना भारतीय रेल्वे लवकरच सुरू करणार आहे.

सुरेश भटेवरा,  नवी दिल्लीप्रवाशांकडून प्रत्येक तिकिटामागे दोन ते १० रुपये एवढा अल्प प्रीमियम घेऊन त्यांना १० लाख रुपयांपर्यंतचा अपघाती विमा देण्याची योजना भारतीय रेल्वे लवकरच सुरू करणार आहे. हा विमा ऐच्छिक असेल व त्यात प्रवाशास अपघातात मृत्यू अथवा कायमचे अपंगत्व आल्यास १० लाख रुपयांपर्यंतची भरपाई देण्याची सोय असेल. हा विमा एका तिकिटावर केल्या जाणाऱ्या एका वेळच्या प्रवासासाठी लागू असेल. याचबरोबर सामानाचाही विमा उतरविण्याची सोय रेल्वे उपलब्ध करून देणार आहे.आॅनलाइन रेल्वे आरक्षणाची व्यवस्था पाहणाऱ्या ‘आयआरसीटीसी’ या रेल्वेच्या उपक्रमामार्फत ही विमा योजना राबविण्यात येईल. यासाठी रेल्वेने सर्वसाधारण विमा कंपन्यांकडून प्रस्ताव मागविले होते. त्यापैकी तीन कंपन्यांची निवड रीतसर टेंडर काढून करण्यात आली असून, त्यांच्याशी यासाठी करार करण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. शक्यतो आॅगस्ट महिन्यापासूनच ही योजना सुरू करण्याचे प्रयत्न असल्याचे रेल्वे मंत्रालयातील वरिष्ठ सूत्रांनी सांगितले.अशी विमा योजना सुरू करण्याची घोषणा रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी यंदाचा रेल्वे अर्थसंकल्प मांडताना केली होती.येत्या महिन्यापासून ऐच्छिक सुविधासुरुवातीस आॅनलाइन रेल्वे तिकिटे काढणाऱ्यांसाठी ही योजना प्रायोगिक तत्त्वावर सुरू करणार. नंतर ती तिकीट खिडक्यांवरून तिकिटे व मासिक पास खरेदी करणाऱ्या प्रवाशांनाही उपलब्ध करून देण्याची योजना आहे. हा विमा ऐच्छिक असल्याने आॅनलाइन तिकिटाचे बुकिंग करताना अगोदर विम्याच्या कॉलममध्ये प्रवाशाला आपली संमती नोंदवावी लागेल. विमा हवा असा पर्याय निवडल्यास तिकिटाच्या भाड्यासोबत विम्यासाठी द्यावी लागणारी रक्कमही त्यात आपोआप जोडली जाईल.प्रीमियम किती असेल?ई-तिकीट काढताना प्रवाशाला विमा हवा की नको, याचा पर्याय विचारला जाईल. विम्याच्या प्रीमियमची रक्कम प्रवासाचा वेळ व अंतर यावर अवलंबून असेल. विमा कंपनीची निवड केल्यावर तिच्याशी चर्चा करून विमा पॉलिसीचा तांत्रिक तपशील ठरविला जाईल.तर ५० लाखांपर्यंतचे कवचही मिळेल प्रवाशांना इच्छेनुसार विम्याची रक्कम वाढवून घेण्याचा पर्याय देण्याचाही विचार आहे. तूर्तास विम्याची कमाल रक्कम १० लाख ठरविली आहे. ही योजना कितपत यशस्वी होते हे पाहून प्रवाशांना हवा असल्यास त्यानुसार प्रीमियम घेऊन ५० लाखांचाही विमा दिला जाऊ शकेल. या खेरीज प्रवासात सामानाचाही विमा उतरविण्याची सोय उपलब्ध करून देण्याचा विचार आहे.रेल्वे कायद्यानुसार प्रवासात मृत्यू झाल्यास रेल्वे अपघात दावा न्यायाधिकरण यांच्याकडून चार लाखांची भरपाई मिळू शकते. रेल्वे अपघात २०१२-१३ १२३२०१३-१४ ११८ २०१४-१५ १३५ २०१५-१६ १०० अपघातग्रस्थांना मदत२०१२-१३ ३.१८ कोटी रु., २०१३-१४ १.४९ कोटी रु., २०१३-१४ १.२७ कोटी रु. २०१५-१६ १.१ कोटी रुपये