शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
2
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
3
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
4
मोहम्मद युनूस यांचा मोठा निर्णय; शेख हसीन यांच्या ‘अवामी लीग’वर आणली बंदी
5
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
6
"पाकिस्तानी लोक 'ऑफिशियल भिकमंगे'..."; असदुद्दीन ओवेसींनी पाकड्यांची पार लक्तरं काढली!
7
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
8
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
9
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
10
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
11
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
12
पाकिस्तानसोबतच्या युद्धविरामावर असदुद्दीन ओवेसींनी उपस्थित केलं प्रश्नचिन्ह, सरकारला विचारले चार सवाल  
13
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
14
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
15
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
16
पुढे धोका आहे! रात्री मोबाईलचा जास्त वापर करणं 'डेंजर'; शरीरातील 'हा' हार्मोन होतो कमी अन्...
17
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
18
Operation Sindoor Live Updates: दिल्ली विमानतळाकडून प्रवाशांना मार्गदर्शक सूचना जारी
19
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
20
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video

अ‍ॅक्सिस, कोटकवर छापे

By admin | Updated: December 24, 2016 01:28 IST

अ‍ॅक्सिस बँकेच्या येथील शाखेवर ८९ कोटी रुपयांच्या कथित व्यवहारांबद्दल सक्त वसुली संचालनालयाने (ईडी) छापा टाकला

अहमदाबाद : अ‍ॅक्सिस बँकेच्या येथील शाखेवर ८९ कोटी रुपयांच्या कथित व्यवहारांबद्दल सक्त वसुली संचालनालयाने (ईडी) छापा टाकला असून, त्या व्यवहारांची चौकशी होणार आहे. ईडीने अहमदाबादच्या मायामनगर शाखेवर छापा टाकून १९ खात्यांची छाननी केली. या खात्यांनी केवायसीची (नो युवर कस्टमर) पूर्तता केलेली नसल्याचे आढळले आणि त्यात ५०० आणि १ हजार रुपयांच्या नोटा बाद करण्यात आल्यानंतर ८९ कोटी रुपये भरण्यात आले. त्यानंतर ही रक्कम लाभार्थींच्या खात्यात पाठवण्यात आली. या प्रकरणी बँकेच्या चार अधिकाऱ्यांची चौकशी होत आहे. नोटाबंदीनंतर अ‍ॅक्सिस बँकेच्या दिल्ली, नॉयडा येथील शाखांवरही छापे घालण्यात आले आहेत. आतापर्यंत त्या बँकेचे जवळपास ३0 कर्मचारी निलंबित असून, काहींना अटकही करण्यात आली आहे. ठरावीक मंडळींना जुन्या नोटांच्या बदल्यात मोठ्या प्रमाणात नव्या नोटा देणे, मनी लाँड्रिंग, हवाला आणि बोगस लॉकर्समध्ये सापडलेल्या कोट्यवधी रुपयांच्या जुन्या व नव्या नोटा यामुळे अ‍ॅक्सिस बँक वादात सापडली आहे. मात्र तपास यंत्रणांना बँक पूर्ण सहकार्य करीत असल्याचा दावा बँकेच्या व्यवस्थापनाने केला आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)कोटक महिंद्रवरही छापानवी दिल्ली : प्राप्तिकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी शुक्रवारी कोटक महिंद्र बँकेच्या येथील दिल्लीच्या कस्तुरबा गांधी मार्गावरील शाखेवर तिच्या दोन खात्यांसंदर्भात छापा घातला. अ‍ॅक्सिस बँकेतील घोटाळ्यातून मिळालेल्या माहितीच्या आधारे कोटक महिंद्र बँकेवर ही कारवाई करण्यात आल्याचे सांगण्यात आले.मात्र आमच्याकडे कोणतीही बनावट खाती नाहीत, असा दावा बँकेने केला आहे. कोटक महिंद्र बँकेचे प्रवक्ते रोहित राव म्हणाले की, केवायसीच्या पूर्ततेमध्ये कोणतीही उणीव राहिलेली नाही. यासंदर्भात प्राप्तिकर विभागाने बँकेच्या व्यवस्थापकांनाही प्रश्न विचारले आहेत. बँकेच्या विरोधात कोणताही अहवाल दिला गेलेला नाही व बँकेत कोणतीही बनावट खाती नाहीत, असे राव म्हणाले. तरीही बँक चौकशीला पूर्ण सहकार्य करीत असल्याचे ते म्हणाले.दोघांना अटक : मात्र कोटक महिंद्र बँकेतील काही व्यवहार संशयास्पद असल्याचे तपास यंत्रणांचे म्हणणे आहे. तेथील बोगस खात्यांबाबत दिल्ली पोलिसांनी दोन जणांना अटक केली आहे. त्यांच्या खात्यात ३४ कोटी रुपये असल्याचे शुक्रवारी उघड झाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. या दोघांनी ५७ लाख रुपयांची फसवणूक केल्याचे आढळून आले असून, त्यासाठी कस्तुरबा गांधी मार्गावरील कॉर्पोरेशन बँकेतील खात्यांचा उपयोग केला, असे सांगण्यात येत आहे.