शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपामध्ये जाणार का? एकनाथ खडसे म्हणाले, “मी आजही RSSचा स्वयंसेवक आहे, गिरीश महाजन...”
2
ENG vs IND : आता अनुभवी KL राहुलसह कॅप्टन शुबमन गिलवर मोठी जबाबदारी
3
अमेरिकेच्या हल्ल्याला इराण कसे देणार प्रत्युत्तर? आताच्या घडीला खामेनी यांच्याकडे ३ पर्याय
4
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
5
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
6
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना सर्वोत्तम, पदोन्नती योग; बंपर लाभास अनुकूल काळ, शुभ तेच घडेल!
7
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
8
अमेरिकेनं इराणवर ज्या B-२ स्टिल्थ बॉम्बर्सनं हल्ला केला त्याची किंमत माहित्येय? तासाला किती खर्च येतो? जाणून थक्क व्हाल
9
Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला
10
CM देवेंद्र फडणवीसांना पाठवली कायदेशीर नोटीस, असीम सरोदे यांनी दिली माहिती; नेमके प्रकरण काय?
11
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक
12
अमेरिकेनं इराणवर चालवलं 'मिडनाइट हॅमर', केला ऑपरेशनच्या नावाचा खुलास; म्हणाले, ट्रम्प बोलें तो...!
13
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
14
ENG vs IND : कायद्यात राहून फायद्यात! जड्डू-साई सुदर्शन जोडीनं रिले कॅचसह लुटली मैफिल (VIDEO)
15
“८ वेळा निवडणुका जिंकलो, आता थांबण्याचा विचार करावासा वाटतो”; भास्कर जाधवांचे सूचक विधान
16
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
17
“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर
18
रोहित-विराट वनडे वर्ल्ड कप खेळणं 'मुश्किल'; गांगुलीनं बोलून दाखवली मनातली गोष्ट
19
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
20
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र

मच्छीमारांच्या प्रश्नावरून राहुल यांची मोदींवर टीका

By admin | Updated: May 27, 2015 23:52 IST

काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी बुधवारी मासेमारीवरील बंदीला मुदतवाढ देण्याच्या मोदी सरकारच्या निर्णयावर जोरदार हल्ला चढविला.

वक्कड (केरळ) : मच्छीमारांपासून ‘सागर माते’ला कुणीही हिरावून घेऊ शकत नाही, अशी घोषणा करीत काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी बुधवारी मासेमारीवरील बंदीला मुदतवाढ देण्याच्या मोदी सरकारच्या निर्णयावर जोरदार हल्ला चढविला.‘जमीन ही शेतकऱ्यांची माता आहे, तर सागर ही तुमची माता आणि तुमची माता हिसकावून ती दुसऱ्या कुणाच्या तरी ताब्यात देण्याचा त्यांचा (मोदी सरकार) प्रयत्न आहे’, असे राहुल गांधी म्हणाले. केरळच्या चावक्कड येथे आयोजित मच्छीमारांच्या संमेलनात ते बोलत होते.मासेमारीवरील ४५ दिवसांची बंदीची मुदत वाढवून ६१ दिवस करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय आणि मीनाकुमारी अहवालातील काही तरतुदींच्या विरोधात केरळमधील मासेमारी करणाऱ्यांनी आंदोलन छेडलेले आहे. संसदेत वादग्रस्त भूसंपादन विधेयकावरून मोदी सरकारविरुद्ध हल्लाबोल करणारे राहुल गांधी म्हणाले की, शेतकरी, कोळी आणि आदिवासी हे राष्ट्राचा आत्मा आहेत आणि त्यांच्या अधिकारांचे रक्षण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. रालोआ सरकार परीब कोळी, शेतकरी आणि आदिवासींसोबत लढत नसून देशाच्या आत्म्याशी लढत आहेत. (वृत्तसंस्था)सागरही हिसकावून घेण्याचा प्रयत्नमोदी सरकार ज्याप्रमाणे शेतकऱ्यांची मौल्यवान जमीन हिसकावून घेत आहे, त्याचप्रमाणे मच्छीमारांचा सागरही हिसकावण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. भारतात जमिनीला सोन्याची किंमत आली आहे. त्यांना हे सोने शेतकऱ्यांना नव्हे तर आपल्या मित्रांना द्यावयाचे आहे. तसेच हा सागरही मच्छीमारांना नव्हे तर मित्रांना द्यावयाचा आहे, असा आरोप राहुल गांधी यांनी केला.