शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
2
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?
3
महात्मा गांधींना शरण जाणे हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा वैचारिक पराभव; काँग्रेसचा खोचक टोला
4
गावात वास्तव्य, सायकलवरून प्रवास आणि..., असं आहे Arattaiचे संस्थापक श्रीधर वेंबू यांचं साधं राहणीमान
5
मोठी बातमी! दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत पोहचणार; पुढच्या आठवड्यात घोषणा करू - CM देवेंद्र फडणवीस
6
Colab Platforms Stock Price: ७३ दिवसांपासून शेअरला लागतंय अपर सर्किट, वर्षभरात ८४२% ची वाढ; गुंतवणूकदार मालामाल
7
चौकट मोडली, भरारी घेतली! २१ व्या वर्षी लग्न, पतीचा मृत्यू... सिंगल मदर झाली राजस्थानची DSP
8
Amravati: गर्लफ्रेंड पोलीस ठाण्यात जाताच ६व्या मजल्या गेला अन् व्हिडीओ कॉल केला; नंतर बॉयफ्रेंडने सगळ्यांनाच फोडला घाम
9
"तरुणांच्या मनातील शंका..."; थेट आंदोलक तरुणांना भेटण्यासाठी पोहोचले CM धामी, परीक्षा प्रकरणात CBI चौकशीला सहमती 
10
गुंतवणूकदारांची चिंता वाढवणारी बातमी! सलग आठव्या दिवशी बाजार कोसळला; 'ही' आहेत ४ कारणे
11
कुणी कर्ज देता का कर्ज?... पाकिस्तानने पुन्हा IMF पुढे पसरले हात, महापुराचं कारण देत मागितला मोठा निधी
12
Rule Change: उद्यापासून बदलणार 'हे' महत्त्वाचे आर्थिक नियम; सामान्यांवर होणार परिणाम, पटापट चेक करा लिस्ट
13
भारतीय शास्त्रज्ञ डॉ. संध्या यांचा जागतिक स्तरावर डंका, अव्वल २ टक्के शास्त्रज्ञांमध्ये स्थान
14
दिवाळीची भेट! सरकारच्या लाखो कर्मचाऱ्यांसाठी मोठा बोनस जाहीर; दसऱ्यापूर्वीच रक्कम हातात येणार
15
चमत्कार दाखवा आणि २१ लाख जिंका! अंनिसचे बुवा-बाबांना आव्हान; ३६ वर्षांत कोणीच पुढे आले नाही
16
Man-Animal Conflict: "आमचं सरकार तुमच्या प्रत्येक दुःखात सोबत", मुख्यमंत्री योगींचे पीडितांना आश्वासन
17
नमाज पढत होते विद्यार्थी, तेवढ्यात झाला मोठा आवाज, शाळेची इमारत कोसळून ६५ विद्यार्थी अडकले 
18
"शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून लक्ष हटवण्यासाठी अहिल्यानगरमध्ये सरकार पुरस्कृत दंगल झाली’’ काँग्रेसचा गंभीर आरोप
19
बाबाचे 'चाळे'! इन्स्टिट्यूटमधील महिलांसोबतच स्वामी चैतन्यानंदचे संबंध; मोबाईलमध्ये मिळाले फोटो
20
खून करुन आलोय, मुलींकडे लक्ष द्या; पत्नीच्या डोळ्यात चटणी टाकून केले वार, कोल्हापुरात हत्येचा थरार

मच्छीमारांच्या प्रश्नावरून राहुल यांची मोदींवर टीका

By admin | Updated: May 27, 2015 23:52 IST

काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी बुधवारी मासेमारीवरील बंदीला मुदतवाढ देण्याच्या मोदी सरकारच्या निर्णयावर जोरदार हल्ला चढविला.

वक्कड (केरळ) : मच्छीमारांपासून ‘सागर माते’ला कुणीही हिरावून घेऊ शकत नाही, अशी घोषणा करीत काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी बुधवारी मासेमारीवरील बंदीला मुदतवाढ देण्याच्या मोदी सरकारच्या निर्णयावर जोरदार हल्ला चढविला.‘जमीन ही शेतकऱ्यांची माता आहे, तर सागर ही तुमची माता आणि तुमची माता हिसकावून ती दुसऱ्या कुणाच्या तरी ताब्यात देण्याचा त्यांचा (मोदी सरकार) प्रयत्न आहे’, असे राहुल गांधी म्हणाले. केरळच्या चावक्कड येथे आयोजित मच्छीमारांच्या संमेलनात ते बोलत होते.मासेमारीवरील ४५ दिवसांची बंदीची मुदत वाढवून ६१ दिवस करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय आणि मीनाकुमारी अहवालातील काही तरतुदींच्या विरोधात केरळमधील मासेमारी करणाऱ्यांनी आंदोलन छेडलेले आहे. संसदेत वादग्रस्त भूसंपादन विधेयकावरून मोदी सरकारविरुद्ध हल्लाबोल करणारे राहुल गांधी म्हणाले की, शेतकरी, कोळी आणि आदिवासी हे राष्ट्राचा आत्मा आहेत आणि त्यांच्या अधिकारांचे रक्षण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. रालोआ सरकार परीब कोळी, शेतकरी आणि आदिवासींसोबत लढत नसून देशाच्या आत्म्याशी लढत आहेत. (वृत्तसंस्था)सागरही हिसकावून घेण्याचा प्रयत्नमोदी सरकार ज्याप्रमाणे शेतकऱ्यांची मौल्यवान जमीन हिसकावून घेत आहे, त्याचप्रमाणे मच्छीमारांचा सागरही हिसकावण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. भारतात जमिनीला सोन्याची किंमत आली आहे. त्यांना हे सोने शेतकऱ्यांना नव्हे तर आपल्या मित्रांना द्यावयाचे आहे. तसेच हा सागरही मच्छीमारांना नव्हे तर मित्रांना द्यावयाचा आहे, असा आरोप राहुल गांधी यांनी केला.