शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
5
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
6
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
7
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
8
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
9
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
10
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
11
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
12
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
13
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
14
विशेष लेख: बाय बाय अमेरिका, आम्ही चाललो!
15
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
16
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
17
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
18
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
19
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
20
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 

आगामी निवडणूक राहुलजी जिंकून देतील

By admin | Updated: July 10, 2017 00:24 IST

२०१९ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत राहुलजी हेच विरोधी पक्षांचा चेहरा असतील, असा विश्वास काँग्रेसचे तरुण नेते ज्योतिरादित्य शिंदे यांनी व्यक्त केला.

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : पक्षांतर्गत निवडणुकीची प्रक्रिया आॅक्टोबरमध्ये पूर्ण झाल्यावर काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्याकडे पक्षाची धुरा येईल व सन २०१९ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत राहुलजी हेच विरोधी पक्षांचा चेहरा असतील, असा विश्वास काँग्रेसचे तरुण नेते ज्योतिरादित्य शिंदे यांनी व्यक्त केला.सलग चार वेळा गुणा येथून निवडून आलेले व लोकसभेत काँग्रेसचे मुख्य प्रतोत असलेले शिंदे एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत असेही म्हणाले की, काँग्रेसच्या दृष्टीने आता आत्मचिंतनाचा काळ संपला असून पक्षाने आता २०१९ ची निवडणूक डोळ््यापुढे ठेवून निश्चित असा कार्यक्रम आखायला हवा.एका प्रश्नाच्या उत्तरात ते म्हणाले की, राहुल गांधी सध्याही काँग्रेसचे नेतृत्व करीत आहेत व भविष्यातही नेतृत्व करत राहतील. राहुल गांधी यांना समर्थन देण्यावर विरोधी पक्षांमध्ये एकवाक्यता असल्याने तेच आगामी निवडणुकीत विरोधकांचा चेहरा म्हणून लोकांपुढे जातील.शिंदे असेही म्हणाले की, सन २००३-०४ मध्ये अटल बिहारी वाजपेयी यांच्या ‘रालोआ’ सरकारने ‘इंडिया शायनिंग’चा खूप गवगवा केला. पण लोकांनी त्यांना नाकारले. अब्राहम लिंकन यांनी म्हटल्याप्रमाणे सर्वच लोकांना सदा सर्वकाळ फसविता येत नाही. त्यामुळे पायाखालची वाळू सरकू लागलेले आताचे मोदी सरकारही केवळ प्रसिद्धीतंत्राने टिकू शकणार नाही.पण त्याचबरोबर काँग्रेसलाही नवा कार्यक्रम घेऊन लोकांपुढे जावे लागेल व लोकांचा विश्वास पुन्हा जिंकावा लागेल, असे सांगून ते म्हणाले की, २०१४ नंतर आता तीन वर्षे उलटली. त्यामुळे आत्मचिंतन करून त्या पराभवाची कारणे शोधण्याचा काळ आता संपला आहे. आता काँग्रेसला निश्चित ध्येयधोरणे व कार्यक्रम घेऊन प्रत्येक निवडणुकीत उतरावे लागेल.>केवळ मोदीकेंद्रित टीका करून भागणार नाही. काँग्रेसला स्वत:ची धोरणे, विचार व कार्यक्रम घेऊन लोकांपुढे जाऊन जबाबदार विरोधी पक्षाची भूमिका बजावावी लागेल. यासाठी पक्षात गुणवत्ता व क्षमता याला प्राधान्य द्यावे लागेल.- ज्योतिरादित्य शिंदे, ज्येष्ठ काँग्रेस नेते