शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
3
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
4
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
5
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
6
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
7
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
8
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
9
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
10
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
11
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
12
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
13
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
14
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
15
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
16
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
17
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
18
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण
19
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
20
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...

कोर्टात माघार घेण्यास राहुल गांधी यांचा नकार

By admin | Updated: September 2, 2016 06:28 IST

महात्मा गांधी यांच्या हत्येशी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा काहीही संबंध नाही, असे लिहून देण्यास काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी गुरुवारी सर्वोच्च न्यायालयात नकार दिल्याने

नवी दिल्ली : महात्मा गांधी यांच्या हत्येशी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा काहीही संबंध नाही, असे लिहून देण्यास काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी गुरुवारी सर्वोच्च न्यायालयात नकार दिल्याने संघवाल्यांनी गांधीजींची हत्या केली या विधानाबद्दल त्यांना भिवंडीच्या न्यायालयात बदनामी खटल्यास सामोरे जावे लागणार आहे.सन २०१४च्या लोकसभा निवडणुकीत भिवंडी तालुक्यातील एका प्रचारसभेत केलेल्या भाषणाबद्दल रा. स्व. संघाचे भिवंडी शहर कार्यवाह राजेश महादेव कुंटे यांनी राहुल गांधींविरुद्ध बदनामीचा खटला गुदरला आहे. तो रद्द करण्यास मुंबई उच्च न्यायालयाने गेल्या वर्षी १० मार्च रोजी नकार दिल्यानंतर राहुल गांधी यांनी सर्वोच्च न्यायालयात विशेष अनुमती याचिका केली.न्या. दीपक मिश्रा आणि न्या. रोहिंग्टन नरिमन यांच्या खंडपीठापुढे आधी झालेल्या सुनावणीत न्यायालयाने उभयपक्षी समेटाने हे प्रकरण मिटविता येईल का, हे आजमावून पाहण्याची सूचना केली होती. गेल्या तारखेला (२४ आॅगस्ट) राहुल गांधी यांच्या वतीने ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी स्पष्ट केले होते की, संघाने महात्मा गांधींची हत्या केली असे राहुल गांधींनी कधीही म्हटले नव्हते. गांधींची हत्या करणारे संघाशी संबंधित होते, असे त्यांनी म्हटले होते. त्यांनी आपली भूमिका उच्च न्यायालयात दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात स्पष्ट केली होती. आजही त्यांची तिच भूमिका ठाम आहे व ते त्यातील कोणतेही विधान मागे घेणार नाहीत.त्यावेळी न्यायालयाने यावर कुंटे यांचे काय म्हणणे आहे ते कळविण्यास त्यांच्या वकिलांना सांगितले होते. गुरुवारी कुंटे यांची भूमिका मांडताना त्यांचे ज्येष्ठ वकील उमेश लळित यांनी सांगितले की, महात्मा गांधी यांच्या हत्येशी रा. स्व. संघाशी कोणताही संबंध नाही, असे राहुल गांधी लिहून देणार असतील तर बदनामीची ही फिर्याद मागे घेण्यावर विचार केला जाऊ शकेल.गांधीजींच्या हत्येच्या संदर्भात संघाला एक संस्था म्हणून आपण कधीच जबाबदार धरलेले नाही, या राहुल गांधींच्या तोंडी सांगण्यावर आपला विश्वास नाही. त्यांचा खरा रोख (नथुुराम) गोडसेवर नव्हे तर संघावर आहे. जेव्हा जेव्हा निवडणूक येते, जेव्हा अल्पसंख्यांची मते हवी असतात तेव्हा ते वारंवार संघाची बदनामी करत असतात. आसामच्या निवडणुकीतही त्यांनी तेच केले. त्यामुळे गांधी हत्येशी संघाचा संबंध नाही, असे त्यांनी लेखी द्यावे, असे म्हणणे कुंटे यांच्यावतीने लळित यांनी मांडले.राहुल गांधी यांच्यावतीने सिब्बल यांनी असे करण्यास नकार दिला व राहुल गांधी यांनी उच्च न्यायालयात जी भूमिका घेतली होती त्यावरच ते ठाम असल्याचे सांगितले.आपल्या छोटेखानी आदेशात दोन्ही पक्षांच्या भूमिका संक्षेपाने नोंदवून खंडपीठाने असे नमूद केले की, खटला रद्द न करण्याच्या उच्च न्यायावलयाच्या निकालात हस्तक्षेप न करण्याचे मत आम्ही व्यक्त केले तेव्हा सिब्बल यांनी राहुल गांधी यांच्यावतीने विशेष अनुमती याचिका मागे घेऊ देण्याची विनंती केली. त्यामुळे ही याचिका मागे घेतल्याने फेटाळण्यात येत आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)गैरहजेरीची सूट नाही- या बदनामी खटल्याच्या तारखांना भिवंडी येथील प्रथमवर्ग न्याय दंडाधिकाऱ्यांपुढे जातीने हजर राहण्यातून राहुल गांधी यांना सूट द्यावी, अशी तोंडी विनंती सिब्बल यांनी केली. ती खंडपीठाने अमान्य केली व त्यासाठी गांधी यांनी भिवंडी न्यायालयात अर्ज करावा, असे सांगितले. प्रकरण सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असतानाही अशी सूट मिळाली नव्हती तेव्हा राहुल गांधी एका तारखेला भिवंडी न्यायालयात हजर राहिले होते.- हा खटला दाखल झाल्यानंतर राहुल गांधींनी दंड विधानातील बदनामीसंबंधीच्या कलम ४९९ व ५००च्या घटनात्मक वैधतेस आव्हान देणारी याचिकाही केली होती. तीही सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली होती.आम्हाला लेखी द्यावे... गांधीजींच्या हत्येच्या संदर्भात संघाला एक संस्था म्हणून आपण कधीच जबाबदार धरलेले नाही, या राहुल गांधींच्या तोंडी सांगण्यावर आपला विश्वास नाही. त्यांचा खरा रोख (नथुुराम) गोडसेवर नव्हे, तर संघावर आहे. जेव्हा जेव्हा निवडणूक येते, जेव्हा जेव्हा अल्पसंख्यकांची मते हवी असतात तेव्हा तेव्हा ते वारंवार संघाची बदनामी करत असतात. आसामच्या निवडणुकीतही त्यांनी तेच केले. त्यामुळे गांधी हत्येशी संघाचा संबंध नाही, असे त्यांनी लेखी द्यावे, असे म्हणणे कुंटे यांच्या वतीने लळित यांनी मांडले. मात्र असे करण्यास राहुल गांधी यांच्या वतीने सिब्बल यांनी नकार दिलाखटल्याची सुनावणी का टाळली?राहुल गांधी सातत्याने ‘यू टर्न’ घेत असून, ते सत्याला सामोरे जाण्यास घाबरत आहेत का? जर राहुल गांधी आपल्या वक्तव्यावर ठाम होते तर त्यांनी दोन वर्षे खटल्याची सुनावणी विविध कारणांमुळे का टाळली, असा प्रश्न संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख डॉ. मनमोहन वैद्य यांनी उपस्थित केला आहे.कोणत्याच हिंंदूने महात्मा गांधी यांची हत्या केली नसती. खरेतर, आता रा. स्व. संघाने गोडसे हा खरा हिंदू होता की नव्हता हेच स्पष्ट करून सांगावे. - कपिल सिब्बल, काँग्रेस