शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

कोर्टात माघार घेण्यास राहुल गांधी यांचा नकार

By admin | Updated: September 2, 2016 06:28 IST

महात्मा गांधी यांच्या हत्येशी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा काहीही संबंध नाही, असे लिहून देण्यास काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी गुरुवारी सर्वोच्च न्यायालयात नकार दिल्याने

नवी दिल्ली : महात्मा गांधी यांच्या हत्येशी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा काहीही संबंध नाही, असे लिहून देण्यास काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी गुरुवारी सर्वोच्च न्यायालयात नकार दिल्याने संघवाल्यांनी गांधीजींची हत्या केली या विधानाबद्दल त्यांना भिवंडीच्या न्यायालयात बदनामी खटल्यास सामोरे जावे लागणार आहे.सन २०१४च्या लोकसभा निवडणुकीत भिवंडी तालुक्यातील एका प्रचारसभेत केलेल्या भाषणाबद्दल रा. स्व. संघाचे भिवंडी शहर कार्यवाह राजेश महादेव कुंटे यांनी राहुल गांधींविरुद्ध बदनामीचा खटला गुदरला आहे. तो रद्द करण्यास मुंबई उच्च न्यायालयाने गेल्या वर्षी १० मार्च रोजी नकार दिल्यानंतर राहुल गांधी यांनी सर्वोच्च न्यायालयात विशेष अनुमती याचिका केली.न्या. दीपक मिश्रा आणि न्या. रोहिंग्टन नरिमन यांच्या खंडपीठापुढे आधी झालेल्या सुनावणीत न्यायालयाने उभयपक्षी समेटाने हे प्रकरण मिटविता येईल का, हे आजमावून पाहण्याची सूचना केली होती. गेल्या तारखेला (२४ आॅगस्ट) राहुल गांधी यांच्या वतीने ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी स्पष्ट केले होते की, संघाने महात्मा गांधींची हत्या केली असे राहुल गांधींनी कधीही म्हटले नव्हते. गांधींची हत्या करणारे संघाशी संबंधित होते, असे त्यांनी म्हटले होते. त्यांनी आपली भूमिका उच्च न्यायालयात दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात स्पष्ट केली होती. आजही त्यांची तिच भूमिका ठाम आहे व ते त्यातील कोणतेही विधान मागे घेणार नाहीत.त्यावेळी न्यायालयाने यावर कुंटे यांचे काय म्हणणे आहे ते कळविण्यास त्यांच्या वकिलांना सांगितले होते. गुरुवारी कुंटे यांची भूमिका मांडताना त्यांचे ज्येष्ठ वकील उमेश लळित यांनी सांगितले की, महात्मा गांधी यांच्या हत्येशी रा. स्व. संघाशी कोणताही संबंध नाही, असे राहुल गांधी लिहून देणार असतील तर बदनामीची ही फिर्याद मागे घेण्यावर विचार केला जाऊ शकेल.गांधीजींच्या हत्येच्या संदर्भात संघाला एक संस्था म्हणून आपण कधीच जबाबदार धरलेले नाही, या राहुल गांधींच्या तोंडी सांगण्यावर आपला विश्वास नाही. त्यांचा खरा रोख (नथुुराम) गोडसेवर नव्हे तर संघावर आहे. जेव्हा जेव्हा निवडणूक येते, जेव्हा अल्पसंख्यांची मते हवी असतात तेव्हा ते वारंवार संघाची बदनामी करत असतात. आसामच्या निवडणुकीतही त्यांनी तेच केले. त्यामुळे गांधी हत्येशी संघाचा संबंध नाही, असे त्यांनी लेखी द्यावे, असे म्हणणे कुंटे यांच्यावतीने लळित यांनी मांडले.राहुल गांधी यांच्यावतीने सिब्बल यांनी असे करण्यास नकार दिला व राहुल गांधी यांनी उच्च न्यायालयात जी भूमिका घेतली होती त्यावरच ते ठाम असल्याचे सांगितले.आपल्या छोटेखानी आदेशात दोन्ही पक्षांच्या भूमिका संक्षेपाने नोंदवून खंडपीठाने असे नमूद केले की, खटला रद्द न करण्याच्या उच्च न्यायावलयाच्या निकालात हस्तक्षेप न करण्याचे मत आम्ही व्यक्त केले तेव्हा सिब्बल यांनी राहुल गांधी यांच्यावतीने विशेष अनुमती याचिका मागे घेऊ देण्याची विनंती केली. त्यामुळे ही याचिका मागे घेतल्याने फेटाळण्यात येत आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)गैरहजेरीची सूट नाही- या बदनामी खटल्याच्या तारखांना भिवंडी येथील प्रथमवर्ग न्याय दंडाधिकाऱ्यांपुढे जातीने हजर राहण्यातून राहुल गांधी यांना सूट द्यावी, अशी तोंडी विनंती सिब्बल यांनी केली. ती खंडपीठाने अमान्य केली व त्यासाठी गांधी यांनी भिवंडी न्यायालयात अर्ज करावा, असे सांगितले. प्रकरण सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असतानाही अशी सूट मिळाली नव्हती तेव्हा राहुल गांधी एका तारखेला भिवंडी न्यायालयात हजर राहिले होते.- हा खटला दाखल झाल्यानंतर राहुल गांधींनी दंड विधानातील बदनामीसंबंधीच्या कलम ४९९ व ५००च्या घटनात्मक वैधतेस आव्हान देणारी याचिकाही केली होती. तीही सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली होती.आम्हाला लेखी द्यावे... गांधीजींच्या हत्येच्या संदर्भात संघाला एक संस्था म्हणून आपण कधीच जबाबदार धरलेले नाही, या राहुल गांधींच्या तोंडी सांगण्यावर आपला विश्वास नाही. त्यांचा खरा रोख (नथुुराम) गोडसेवर नव्हे, तर संघावर आहे. जेव्हा जेव्हा निवडणूक येते, जेव्हा जेव्हा अल्पसंख्यकांची मते हवी असतात तेव्हा तेव्हा ते वारंवार संघाची बदनामी करत असतात. आसामच्या निवडणुकीतही त्यांनी तेच केले. त्यामुळे गांधी हत्येशी संघाचा संबंध नाही, असे त्यांनी लेखी द्यावे, असे म्हणणे कुंटे यांच्या वतीने लळित यांनी मांडले. मात्र असे करण्यास राहुल गांधी यांच्या वतीने सिब्बल यांनी नकार दिलाखटल्याची सुनावणी का टाळली?राहुल गांधी सातत्याने ‘यू टर्न’ घेत असून, ते सत्याला सामोरे जाण्यास घाबरत आहेत का? जर राहुल गांधी आपल्या वक्तव्यावर ठाम होते तर त्यांनी दोन वर्षे खटल्याची सुनावणी विविध कारणांमुळे का टाळली, असा प्रश्न संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख डॉ. मनमोहन वैद्य यांनी उपस्थित केला आहे.कोणत्याच हिंंदूने महात्मा गांधी यांची हत्या केली नसती. खरेतर, आता रा. स्व. संघाने गोडसे हा खरा हिंदू होता की नव्हता हेच स्पष्ट करून सांगावे. - कपिल सिब्बल, काँग्रेस