शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हल्ल्याचा मास्टरमाईंड हाफीज सईदला पाकिस्तान भारताला सोपवणार?; मुलगा तल्हा सईदचा खुलासा
2
रशियानं बदला घेतला, युक्रेन जबरदस्त हादरला! ४०० हून अधिक ड्रोन अन् ४० बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांचा कहर, झेलेन्स्की संतापले
3
Uddhav Thackeray : "महाराष्ट्राच्या मनात जे आहे ते होईल, लवकरच..."; 'मनसे'सोबतच्या युतीवर उद्धव ठाकरेंचं मोठं विधान
4
मस्क-ट्रम्प वादात स्टारलिंकसाठी मोठी बातमी! भारताने लायसन दिले...
5
रशियाच्या बदल्यानं युक्रेन हादरलं! ४०० ड्रोन अन् ४० हून अधिक मिसाईल हल्ल्यानं सगळीकडे विनाश
6
IND vs ENG : पतौडी ट्रॉफी आता तेंडुलकर-अँडरसन नावाने ओळखली जाणार! गावसकर नाराज, कारण...
7
पाण्यासाठी पाकिस्तानकडून विनवण्या, एक-दोन नव्हे चारवेळा पाठवलं पत्र! पण... 
8
तिसऱ्या मुलासाठी प्रसूती रजा नाकारली पण सर्वोच्च न्यायालयाने दिला महत्त्वाचा निर्णय
9
एकीकडे युतीची चर्चा, पण दुसरीकडे मनसेचा बडा नेता मातोश्रीवर; उद्धव ठाकरेंनी बांधले शिवबंधन
10
'मी हा अध्याय संपवत आहे' टीम इंडियाचा आणखी एक खेळाडू तडकाफडकी निवृत्त!
11
Makarand Anaspure : ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावर मकरंद अनासपुरेंनीही केलं होतं भाष्य, म्हणालेले की, "मराठी माणूस..."
12
Narendra Modi : "तो कुटुंबासाठी कष्ट करत होता, दहशतवाद्यांनी त्याला मारलं"; आदिलच्या आठवणीत मोदी भावुक
13
आजीच्याच शाळेत जातोय नातू...! पृथ्वी अंबानीच्या शाळेचे नाव काय, फी किती? डोळेच विस्फारतील...
14
'मला अशा मुली आवडत नाहीत, ज्या...'; भाजप नेत्याचे कपड्यांबद्दल वादग्रस्त विधान
15
Lord Hanuman : हनुमंताला पाच भाऊ होते, तेही विवाहित; काय होती त्यांची नावे? जाणून घ्या!
16
iPhone युजर्ससाठी खूशखबर! ट्रम्प यांच्या धमकीनंतरही Apple नं टाटांना सोपावलं दुरुस्तीचं काम
17
छत्रपती शिवरायांच्या राज्याभिषेकाला विरोध करणाऱ्या प्रवृत्तींचा कडेलोट करा: हर्षवर्धन सपकाळ
18
Gold Price Today: सोनं झालं स्वस्त, खरेदीपूर्वी जाणून घ्या काय आहेत नवे दर?
19
पाकिस्तानने हेरगिरीसाठी महिलांचीच निवड का केली? गद्दार तुफैल-हारूनने चौकशीत सांगून टाकलं!
20
आधी आईनं गळा आवळला, त्यानंतर मामानं...; बारावीत शिकणाऱ्या मुलीसोबत घडलं भयंकर!

आसाममध्ये सत्ता आल्यास नागपूर किंवा पीएमओ सरकार चालवणार - राहुल गांधी

By admin | Updated: March 29, 2016 15:40 IST

भाजपा निवडणूक जिंकल्यास आसाम सरकारचा कारभार नागपूर, पंतप्रधान कार्यालय येथून चालवला जाईल असं वक्तव्य काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केलं आहे

ऑनलाइन लोकमत - 
आसाम, दि. २९ - भाजपा निवडणूक जिंकल्यास आसाम सरकारचा कारभार नागपूर, पंतप्रधान कार्यालय येथून चालवला जाईल, आम्हाला आसामचा कारभार आसाममधूनच चालवायचा आहे असं वक्तव्य काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केलं आहे. आसासमध्ये प्रचारसभेदरम्यान बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. आम्ही आसाममध्ये कोणत्या धर्माचं, व्यक्तीचं सरकार बनवणार नाही तर प्रत्येकाचं सरकार बनवणार असल्याचं आश्वासन राहुल गांधींनी यावेळी दिलं. 
 
भाजपा सर्व देशावर एकच विचासरणी थोपण्याचा प्रयत्न करत आहे, देश एका विचारसणीवर चालत नाही. मोदी येऊन फक्त वचन देतात आणि निघून जातात. मोदींनी दिलेल्या आश्वासनांपैकी किती आश्वासने त्यांनी पुर्ण केली. आसामला मिळणारा विशेष दर्जा मोदींना काढून घेतला ज्यामुळे काँग्रेस सरकारच्या राज्यात मिळणारी करोडोंची मदत थांबली असल्याचा आरोप राहुल गांधींनी केला. 
 
काँग्रेसने गेल्या 15 वर्षात आसाममध्ये शांतता आणली, ही आपली खुप मोठी कामगिरी आहे. हरियाणामध्ये 10 वर्ष काँग्रेसचं सरकार होतं, कोणतीही दंगल, हिंसा झाली नव्हती. भाजपा सरकार आल्यानंतर हरियाणामध्ये महिन्याभरात हिंसा सुरु होते, जाट आणि इतर लोकांमध्ये भाडणं लावली जात आहेत. भाजपा जिथे जाते तिथे लोकांमध्ये हिंसा भडकवते असं वक्तव्य राहुल गांधी यांनी केलं आहे.
 
विजय मल्ल्या, ललित मोदी सहजपणे देशातून पळून गेले, त्यांना परत आणण्याचा काहीच प्रयत्न केला गेला नाही. विजय मल्ल्याची संसदेत एका मंत्र्याशी भेट झाली आणि त्यानंतर तो सहज पळून गेल्याचा आरोप करत राहुल गांधींनी पुन्हा एकदा भाजपावर निशाणा साधला.