शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
4
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
5
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
6
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
7
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
8
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
9
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
10
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
11
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
12
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
13
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
14
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
15
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
16
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
17
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
18
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
19
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
20
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
Daily Top 2Weekly Top 5

आसाममध्ये सत्ता आल्यास नागपूर किंवा पीएमओ सरकार चालवणार - राहुल गांधी

By admin | Updated: March 29, 2016 15:40 IST

भाजपा निवडणूक जिंकल्यास आसाम सरकारचा कारभार नागपूर, पंतप्रधान कार्यालय येथून चालवला जाईल असं वक्तव्य काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केलं आहे

ऑनलाइन लोकमत - 
आसाम, दि. २९ - भाजपा निवडणूक जिंकल्यास आसाम सरकारचा कारभार नागपूर, पंतप्रधान कार्यालय येथून चालवला जाईल, आम्हाला आसामचा कारभार आसाममधूनच चालवायचा आहे असं वक्तव्य काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केलं आहे. आसासमध्ये प्रचारसभेदरम्यान बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. आम्ही आसाममध्ये कोणत्या धर्माचं, व्यक्तीचं सरकार बनवणार नाही तर प्रत्येकाचं सरकार बनवणार असल्याचं आश्वासन राहुल गांधींनी यावेळी दिलं. 
 
भाजपा सर्व देशावर एकच विचासरणी थोपण्याचा प्रयत्न करत आहे, देश एका विचारसणीवर चालत नाही. मोदी येऊन फक्त वचन देतात आणि निघून जातात. मोदींनी दिलेल्या आश्वासनांपैकी किती आश्वासने त्यांनी पुर्ण केली. आसामला मिळणारा विशेष दर्जा मोदींना काढून घेतला ज्यामुळे काँग्रेस सरकारच्या राज्यात मिळणारी करोडोंची मदत थांबली असल्याचा आरोप राहुल गांधींनी केला. 
 
काँग्रेसने गेल्या 15 वर्षात आसाममध्ये शांतता आणली, ही आपली खुप मोठी कामगिरी आहे. हरियाणामध्ये 10 वर्ष काँग्रेसचं सरकार होतं, कोणतीही दंगल, हिंसा झाली नव्हती. भाजपा सरकार आल्यानंतर हरियाणामध्ये महिन्याभरात हिंसा सुरु होते, जाट आणि इतर लोकांमध्ये भाडणं लावली जात आहेत. भाजपा जिथे जाते तिथे लोकांमध्ये हिंसा भडकवते असं वक्तव्य राहुल गांधी यांनी केलं आहे.
 
विजय मल्ल्या, ललित मोदी सहजपणे देशातून पळून गेले, त्यांना परत आणण्याचा काहीच प्रयत्न केला गेला नाही. विजय मल्ल्याची संसदेत एका मंत्र्याशी भेट झाली आणि त्यानंतर तो सहज पळून गेल्याचा आरोप करत राहुल गांधींनी पुन्हा एकदा भाजपावर निशाणा साधला.