शहरं
Join us  
Trending Stories
1
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
2
Rahul Gandhi's Allegations Against Election Commission : 'मी सही करणार नाही, हा निवडणूक आयोगाचा डेटा..', राहुल गांधींचे प्रत्युत्तर, म्हणाले- निवडणूक आयोग दिशाभूल करतेय
3
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
4
शेकडो वाहनांचा ताफा, फुलांचा वर्षाव, इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या आकाश दीपचं घरी जंगी स्वागत
5
लंडन: शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची ऐतिहासिक तलवार महाराष्ट्र सरकारच्या ताब्यात
6
भाजपच्या उपमुख्यमंत्र्यांकडेच दोन मतदान ओळखपत्र; निवडणूक आयोगाची नोटीस, बिहारमध्ये काय घडलं?
7
"माझं घर वाचवा...", कवी सौमित्र यांची मुख्यमंत्र्यांना कळकळीची विनंती, बिल्डरकडून फसवणुकीचा आरोप
8
Uddhav Thackeray: निवडणूक आयोग हे राष्ट्रपतींपेक्षाही मोठे झाले का? उद्धव ठाकरेंचा कडवट सवाल!
9
दिवसाढवळ्या बँकेवर दरोडा, बंदुकीच्या धाकावर हिसकावू लागला पैसे, पण कर्मचाऱ्यांनी हिंमत दाखवली आणि...  
10
राहुल गांधींविरोधात वक्तव्य भोवले; काँग्रेसच्या मंत्र्याला द्यावा लागला राजीनामा, नेमकं काय म्हणाले?
11
अमानुष! "आजीला सोडून दे", सुनेची वृद्ध सासूला बेदम मारहाण; वाचवण्यासाठी चिमुकल्याची धडपड
12
एअर इंडियाने मोठा निर्णय घेतला! वॉशिंग्टन डीसीला जाणारी सर्व विमान उड्डाणे रद्द केली; १ सप्टेंबरपासून...
13
'एका व्यक्तीच्या मूर्खपणामुळे देशाचे नुकसान..; केंद्रीय मंत्री किरेन रिजिजूंचा काँग्रेसवर घणाघात
14
मुंबई: दहीहंडीचा सराव करताना दहिसरमध्ये चिमुरड्या बालगोविंदाचा मृत्यू; कुटुंबावर शोककळा
15
अंगारक संकष्ट चतुर्थीच्या मराठी शुभेच्छा: Messages, WhatsApp Status शेअर करा; गणेशभक्तांना द्या शुभेच्छा!
16
बँका मिनिमम बॅलन्स का ठेवतात? 'या' कारणामुळे तुमच्या खात्यातून कापले जातात पैसे!
17
Bigg Boss 19: सलमानच्या शोची उपेंद्र लिमयेंना ऑफर? अभिनेता म्हणाला- "मला अनेकांनी विचारलं..."
18
'भारतात शिक्षण, आरोग्य सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेर गेलंय'; सरसंघचालक भागवतांनी व्यक्त केली चिंता
19
एअर इंडियामागची पीडा काही संपेना! आता लँडिंगनंतर दरवाजेच उघडले नाही; तासभर अडकून राहिले प्रवासी
20
भाजपाकडून विधानसभा निवडणूक लढवलेला नेता चकमकीत ठार, अनेक गुन्ह्यांत होता वाँटेड

राहुल गांधींना धक्का, अमेठीतील पेपर मिल येणार 'रत्नागिरी'त

By admin | Updated: December 10, 2015 14:14 IST

काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांचा मतदारसंघ असलेल्या अमेठीतील प्रस्तावित पपरमिल आता महाराष्ट्रातील रत्नागिरीत येणार आहे.

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १० - केंद्रातून काँग्रेसचे सरकार गेल्याचा परिणाम आता काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांचा मतदारसंघ असलेल्या अमेठीतील विकास योजनांवरही झाल्याचे स्पष्ट दिसत असून फूडपार्क नंतर आता अमेठीने पेपर मिलही गमावली आहे. नॅशनल हेराल्ड प्रकरणी कायद्याच्या कचाट्यात अडकलेल्या गांधी कुटुंबाला सरकारकडून हा आणखी एक धक्का बसला आहे. अमेठीतील प्रस्तावित ३ हाजर ६५० कोटींची पेपर मिल आता महाराट्रातील रत्नागिरीमध्ये हलवण्यात येणार असून केंद्र सरकारच्या अवजड उद्योग खात्याने यासंदर्भात हालचाल सुरू केली आहे. केंद्रीय मंत्रीमंडळ लवकरच त्यावर शिक्कामोर्तब करेल. 
'आम्ही याप्रकरणी अर्थ मंत्रालय तसेच इतर मंत्रालयांनाही पत्रं लिहीली आहेत, त्या खात्यांच्या सल्ल्यानंतर संबंधित प्रस्ताव आम्ही कॅबिनेटसमोर मांडू', असे अवजड उद्योगमंत्री अनंत गीते यांनी सांगितले. 
यापूर्वी ही पेपर मिल काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांचा मतदारसंघ असलेल्या अमेठीमध्ये सुरू होणार होती, त्यासाठी अमेठीतील जगदीशपूरची निवडही करण्यात आली होती. मात्र ही मिल महाराष्ट्रात लावण्यात यावी अशी मागणी अनंत गीते यांनी केल्यानंतर अखेर हा कारखाना रत्नागिरीत उभा राहणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या कारखान्यामुळे सुमारे ९०० लोकांना रोजगार मिळणार आहे.
पेपर मिलपूर्वी अमेठीतील जगदीशपूरमध्ये फूड पार्कचा प्रस्ताव होता, मात्र अखेर तोही रद्द करण्यात आला होता. त्यावेळी राहुल गांधी यांनी लोकसभेत हा मुद्दा मांडून मोदी सरकार राजकीय बदला घेत असल्याचा आरोपही केला होता.