शहरं
Join us  
Trending Stories
1
"कतारवर हल्ला म्हणजे अमेरिकेवर हल्ला, पुन्हा असं घडलं तर..."; ट्रम्प यांचा इस्रायलला इशारा
2
महाराष्ट्रात 'जम्बो'भरती! ४ ऑक्टोबरला एकाचवेळी तब्बल १०,३०९ उमेदवार शासकीय सेवेत होणार दाखल
3
"माझ्या पतीची बिनशर्त सुटका करा..."; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे थेट राष्ट्रपतींना पत्र
4
भिवंडीतील मानकोली येथे वह्या बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही
5
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम
6
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
7
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख
8
मंत्रालयातील लूटीला चाप बसणार! सल्लागारांच्या नियुक्त्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी निर्णय
9
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
10
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
11
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
12
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...
13
“वाट कसली पाहता? शेतकरी भाजपात आल्यावर कर्जमुक्ती करणार का?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल
14
संविधान सत्याग्रह पदयात्रेदरम्यान पोलिसांकडून पाळत, काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचे सरकारला आव्हान, म्हणाले...
15
NHIDCL: एनएचआयडीसीएलमध्ये नोकरी, 'या' पदांसाठी भरती; १ लाख ५० हजारांपर्यंत पगार!
16
वय वर्ष ३१, संपत्ती ₹२१,१९० कोटी! कोण आहे भारतातील सर्वात तरुण अब्जाधीश? काय काम करतो?
17
लोकसंख्येतील बदल घुसखोरीपेक्षाही घातक...! असं का म्हणाले पंतप्रधान मोदी? देशाला दिला गंभीर इशारा
18
'ओला दुष्काळ जाहीर करा', उद्धव ठाकरेंनी दाखवले CM फडणवीसांचे पत्र, म्हणाले, "मलाही वेदना झाल्या.."
19
CM फडणवीसांचा ‘तो’ Video विरोधकांनी दाखवला; म्हणाले, “गांभीर्याने विचार करा, असले राजकारण...”
20
शौक बड़ी चीज है! १७ व्या वर्षी iPhone 4, iPad 2 साठी विकली किडनी, आता आयुष्यभराचं दुखणं

राहुल गांधींना धक्का, अमेठीतील पेपर मिल येणार 'रत्नागिरी'त

By admin | Updated: December 10, 2015 14:14 IST

काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांचा मतदारसंघ असलेल्या अमेठीतील प्रस्तावित पपरमिल आता महाराष्ट्रातील रत्नागिरीत येणार आहे.

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १० - केंद्रातून काँग्रेसचे सरकार गेल्याचा परिणाम आता काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांचा मतदारसंघ असलेल्या अमेठीतील विकास योजनांवरही झाल्याचे स्पष्ट दिसत असून फूडपार्क नंतर आता अमेठीने पेपर मिलही गमावली आहे. नॅशनल हेराल्ड प्रकरणी कायद्याच्या कचाट्यात अडकलेल्या गांधी कुटुंबाला सरकारकडून हा आणखी एक धक्का बसला आहे. अमेठीतील प्रस्तावित ३ हाजर ६५० कोटींची पेपर मिल आता महाराट्रातील रत्नागिरीमध्ये हलवण्यात येणार असून केंद्र सरकारच्या अवजड उद्योग खात्याने यासंदर्भात हालचाल सुरू केली आहे. केंद्रीय मंत्रीमंडळ लवकरच त्यावर शिक्कामोर्तब करेल. 
'आम्ही याप्रकरणी अर्थ मंत्रालय तसेच इतर मंत्रालयांनाही पत्रं लिहीली आहेत, त्या खात्यांच्या सल्ल्यानंतर संबंधित प्रस्ताव आम्ही कॅबिनेटसमोर मांडू', असे अवजड उद्योगमंत्री अनंत गीते यांनी सांगितले. 
यापूर्वी ही पेपर मिल काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांचा मतदारसंघ असलेल्या अमेठीमध्ये सुरू होणार होती, त्यासाठी अमेठीतील जगदीशपूरची निवडही करण्यात आली होती. मात्र ही मिल महाराष्ट्रात लावण्यात यावी अशी मागणी अनंत गीते यांनी केल्यानंतर अखेर हा कारखाना रत्नागिरीत उभा राहणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या कारखान्यामुळे सुमारे ९०० लोकांना रोजगार मिळणार आहे.
पेपर मिलपूर्वी अमेठीतील जगदीशपूरमध्ये फूड पार्कचा प्रस्ताव होता, मात्र अखेर तोही रद्द करण्यात आला होता. त्यावेळी राहुल गांधी यांनी लोकसभेत हा मुद्दा मांडून मोदी सरकार राजकीय बदला घेत असल्याचा आरोपही केला होता.