शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

Lokmat Parliamentary Awards: राहुल गांधी कधीच माफी मागणार नाहीत : सुप्रिया श्रीनेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2023 10:39 IST

वरिष्ठ पत्रकार अर्चना सिंह यांनी श्रीनेत यांच्याशी संवाद साधला.

राहुल गांधी यांच्या इंग्लंडमधील वक्तव्यावरून भाजपने जाणीवपूर्वक वादळ उठविले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीदेखील विदेशात भारताबाबत अनेकदा वादग्रस्त वक्तव्ये केली आहेत. माेदी बाेलतात ती लाेकशाही असेल, तर मग राहुल बाेलतात ती बदनामी कशी, असा सवाल करीत भारतीय राष्ट्रीय काॅंग्रेसच्या साेशल मीडिया डिजिटल प्लॅटफॉर्मच्या प्रमुख सुप्रिया श्रीनेत यांनी सांगितले की, राहुल गांधी कधीच माफी मागणार नाहीत. 

वरिष्ठ पत्रकार अर्चना सिंह यांनी श्रीनेत यांच्याशी संवाद साधला. त्यांनी पंतप्रधानांच्या संबंधित वक्तव्यांची क्लिपच ऐकविली. राहुल गांधी कॅम्ब्रिज किंवा इंग्लंडमध्ये काहीही चुकीचे बोललेले नाहीत. जागतिक मंचावर भारतीय लाेकशाहीचे माहात्म्य वर्णन करणाऱ्या व्यक्तीने माफी का मागावी, असा सवाल करत राहुल कधीच माफी मागणार नाहीत, असे श्रीनेत यांनी स्पष्ट केले. देशात सत्य मांडणाऱ्या पत्रकारांवर हल्ले हाेतात, कारागृहात टाकले जाते, पर्यावरणावर बाेलणाऱ्यांवर कारवाई होते, तेव्हा भारताची लाेकशाही जिवंत राहते काय, असा सवाल श्रीनेत यांनी उपस्थित केला. लाेकसभेत सत्तापक्षच संसदेचे कामकाज रोखत असल्याचे याआधी पाहिले का? ‘गोली मारो...’सारखे प्रक्षाेभक विधान करणाऱ्या अनुराग ठाकूर यांना मंत्रिपदाची भेट दिली जाते, याकडे त्यांनी लक्ष वेधले. 

राहुल यांनी द्वेषाच्या बाजारात प्रेमाचे दुकान उघडले आहे. द्वेषाचा चष्मा लावलेल्यांना ते दिसत नाही. भारत जाेडाे यात्रा ही तपस्या आहे. राजकीय लाभापेक्षा प्रेम, बंधुभाव वाढविण्यासाठी निघालेल्या या यात्रेचे दृश्य अद्भुत हाेते, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :lokmat parliamentary awardsलोकमत पार्लिमेंट्री अवॉर्ड