शहरं
Join us  
Trending Stories
1
गोव्यावरून कोल्हापुरात आली आणि रंकाळा तलावात...; गर्भवती नेहा पवार यांच्यासोबत काय घडलं?
2
'मोदी तेरी कब्र...' काँग्रेसच्या रॅलीतून पीएम मोदींवर वादग्रस्त टीका; भाजपचा पलटवार...
3
IND vs SA Live Streaming 3rd T20I : सूर्या-गिलवर असतील नजरा! कुठं पाहता येईल तिसरा टी-२० सामना?
4
₹1000 कोटींच्या सायबर फ्रॉड रॅकेटचा भांडाफोड; 58 कंपन्यांविरुद्ध CBI ने दाखल केले आरोपपत्र
5
'ममता बॅनर्जींना अटक करा'; मेस्सी स्टेडिअम गोंधळावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांची थेट मागणी
6
Palghar Crime: वसईत पाच वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून हत्या; १८ वर्षांनंतर आरोपी सापडला उत्तर प्रदेशात
7
'मंत्री झाला म्हणजे जास्त कळते, असा गैरसमज करून घेऊ नये', जयंत पाटील मंत्री सावकारेंवर भडकले, 'हजामती' शब्दावरून चकमक
8
आता '४ दिवसीय आठवडा' शक्य! कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा; नवीन कामगार कायद्यात '३ दिवस सुट्टी'ची तरतूद
9
नाईट क्लबमध्ये आग, दिल्लीत मेसेज पोहोचला अन् लुथरा ब्रदर्स थांयलंडमध्ये; पडद्यामागे काय घडलं? Inside Story
10
'डिजिटल अरेस्ट' च्या जाळ्यात अडकली, ३३ लाखांची आरटीजीएसही करायला बँकेती गेली; मॅनेजरच्या लक्षात आले...
Daily Top 2Weekly Top 5

Lokmat Parliamentary Awards: राहुल गांधी कधीच माफी मागणार नाहीत : सुप्रिया श्रीनेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2023 10:39 IST

वरिष्ठ पत्रकार अर्चना सिंह यांनी श्रीनेत यांच्याशी संवाद साधला.

राहुल गांधी यांच्या इंग्लंडमधील वक्तव्यावरून भाजपने जाणीवपूर्वक वादळ उठविले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीदेखील विदेशात भारताबाबत अनेकदा वादग्रस्त वक्तव्ये केली आहेत. माेदी बाेलतात ती लाेकशाही असेल, तर मग राहुल बाेलतात ती बदनामी कशी, असा सवाल करीत भारतीय राष्ट्रीय काॅंग्रेसच्या साेशल मीडिया डिजिटल प्लॅटफॉर्मच्या प्रमुख सुप्रिया श्रीनेत यांनी सांगितले की, राहुल गांधी कधीच माफी मागणार नाहीत. 

वरिष्ठ पत्रकार अर्चना सिंह यांनी श्रीनेत यांच्याशी संवाद साधला. त्यांनी पंतप्रधानांच्या संबंधित वक्तव्यांची क्लिपच ऐकविली. राहुल गांधी कॅम्ब्रिज किंवा इंग्लंडमध्ये काहीही चुकीचे बोललेले नाहीत. जागतिक मंचावर भारतीय लाेकशाहीचे माहात्म्य वर्णन करणाऱ्या व्यक्तीने माफी का मागावी, असा सवाल करत राहुल कधीच माफी मागणार नाहीत, असे श्रीनेत यांनी स्पष्ट केले. देशात सत्य मांडणाऱ्या पत्रकारांवर हल्ले हाेतात, कारागृहात टाकले जाते, पर्यावरणावर बाेलणाऱ्यांवर कारवाई होते, तेव्हा भारताची लाेकशाही जिवंत राहते काय, असा सवाल श्रीनेत यांनी उपस्थित केला. लाेकसभेत सत्तापक्षच संसदेचे कामकाज रोखत असल्याचे याआधी पाहिले का? ‘गोली मारो...’सारखे प्रक्षाेभक विधान करणाऱ्या अनुराग ठाकूर यांना मंत्रिपदाची भेट दिली जाते, याकडे त्यांनी लक्ष वेधले. 

राहुल यांनी द्वेषाच्या बाजारात प्रेमाचे दुकान उघडले आहे. द्वेषाचा चष्मा लावलेल्यांना ते दिसत नाही. भारत जाेडाे यात्रा ही तपस्या आहे. राजकीय लाभापेक्षा प्रेम, बंधुभाव वाढविण्यासाठी निघालेल्या या यात्रेचे दृश्य अद्भुत हाेते, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :lokmat parliamentary awardsलोकमत पार्लिमेंट्री अवॉर्ड