शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
6
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
7
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
8
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
9
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
10
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
11
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
12
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
13
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
14
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
15
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
16
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
17
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
18
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
19
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
20
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
Daily Top 2Weekly Top 5

राहुल गांधी यंदाच बनणार पक्षाध्यक्ष

By admin | Updated: May 21, 2015 00:44 IST

काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या खांद्यावर याच वर्षात पक्षाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली जाऊ शकते. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी बुधवारी याबाबतचे संकेत दिले.

जयराम रमेश यांचे संकेत : काँग्रेसला गतवैभव प्राप्त होईल; पक्षाला राज्यस्तरीय नेतृत्वाची गरजहैदराबाद : काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या खांद्यावर याच वर्षात पक्षाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली जाऊ शकते. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी बुधवारी याबाबतचे संकेत दिले. राहुल गांधी याचवर्षी पक्षाध्यक्ष होतील आणि राज्यात सक्षम नेतृत्व तयार करून काँग्रेसचे गतवैभव परत मिळवतील, अशी अपेक्षा रमेश यांनी बोलून दाखवली.वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. काँग्रेसला राज्यस्तरावर नेतृत्वाची गरज आहे, असे राहुल यांचे मत आहे. जवाहरलाल नेहरू यांच्या कार्यकाळातील वैभव परत मिळावे, असे त्यांना वाटते. तेव्हा पक्षाकडे कामराज, प्रतापसिंह कैरों, यशवंतराव चव्हाण, बी.सी. राय, जी.बी. पंत यासारखे दिग्गज नेते होते. आजघडीला काँगे्रसला अशाच उमद्या नेतृत्वाची गरज आहे. कारण पक्ष केवळ राष्ट्रीय निवडणुका नाही तर राज्यातील निवडणुकाही लढत आहे. सर्वसामान्य लोकांमधून नेते घडावेत, असे त्यांना वाटते, असे त्यांनी सांगितले.पक्षात ज्येष्ठांचा गट वा युवांचा गट असे काहीही नाही. काँग्रेस हा केवळ एक समूह आहे. प्रत्येक संस्थेला दर २०-२५ वर्षांनी बदलाच्या प्रक्रियेतून जावे लागले. काँग्रेसमध्येही या प्रक्रियेचे पालन होते. नव्या चेहऱ्यांना संधी देणे, त्यांना अधिकार देणे, त्यांच्याकडे नेतृत्व सोपवणे, हा याच प्रक्रियेचा भाग आहे, असे ते म्हणाले. (वृत्तसंस्था)राहुल यांनी अलीकडे घेतलेली दीर्घरजा व राजकारणातील त्यांचा सक्रिय सहभाग यावरही जयराम रमेश यांनी भाष्य केले. राहुल गांधी आक्रमक आहेत. संसदेत त्यांनी आपल्या सक्रिय भूमिकेचे दर्शन घडविले. शेतकऱ्यांच्या मुद्यावर विविध राज्यांत ते पदयात्रा करीत आहेत. माझ्या मते, आता एक नवीन राहुल गांधी देश बघत आहेत. राहुल यांचे हे नवे रूप आहे. आपल्याकडून देशाला काय अपेक्षित आहे आणि आपल्यापुढे काय आव्हाने आहेत, हे त्यांना कळले आहे. त्यामुळे रजेवर जाण्याचा त्यांचा निर्णय योग्य होता आणि ते सिद्ध झाले, असेच मी म्हणेल, असे रमेश म्हणाले.