शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताबद्दल लिहिली भलीमोठी पोस्ट; मग मोदी काय म्हणाले? वाचा
2
Balendra Shah: काठमांडूचे 'रॅपर', महापौर बालेंद्र शाह होणार नेपाळचे नवे पंतप्रधान?
3
नेपाळमध्ये लष्कराने सूत्र हातात घेतली, एअर इंडिया-इंडिगोच्या विमान उड्डाणे रद्द
4
आता टेन्शन फ्री होईल मध्यम वर्ग; या ५ सरकारी स्कीम करतील तुमची रिटायरमेंट आणि सेव्हिंग सुपर सेफ, पाहा कसं?
5
कोणत्या खासदारांनी क्रॉस व्होटिंग केली? सर्वत्र चर्चा; महाराष्ट्रासह 'या' राज्यातील खासदार संशयाच्या भोवऱ्यात
6
Stock Markets Today: शेअर बाजार सुस्साट, निफ्टी २५,००० च्या पार; IT-रियल्टी शेअर्समध्ये जोरदार तेजी
7
सी. पी. राधाकृष्णन : संघस्वयंसेवक ते उपराष्ट्रपतिपदापर्यंतचा चढता आलेख
8
जे कोणालाच जमलं नाही ते आर्यन खानने केलं, 'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मधून दिलं मोठं सरप्राईज
9
Asia Cup 2025: सूर्यकुमारने पाकिस्तानच्या कर्णधाराशी हात मिळवला की नाही? Video झाला व्हायरल
10
Crime: संतापजनक! चालत्या कॅबमध्ये विद्यार्थिनीसमोर हस्तमैथुन, चालकाला अटक!
11
Genz Protests Nepal: तरुणाईच्या आगीत नेपाळ स्वाहा! नेत्यांच्या भ्रष्टाचाराने जेरीस, सोशल मीडिया बंदीने ओतले तेल
12
हैदराबाद गॅझेटियरनंतर सरकारची नवी हालचाल; मराठा उपसमितीने उचलले महत्त्वाचे पाऊल 
13
"मी भाऊ कदमकडून खूप काही शिकलो", मनोज वाजपेयीकडून अभिनेत्याचं भरभरुन कौतुक, म्हणाला...
14
भारताच्या 'आयटी'वर नवे संकट! 'या' कंपन्यांवर २५ टक्के कर लावण्याचा अमेरिकी खासदाराचा प्रस्ताव
15
आजचे राशीभविष्य - ९ सप्टेंबर २०२५: जिभेवर ताबा ठेवावा लागेल, वरिष्ठांशी वाद होण्याची शक्यता
16
'भारत-अमेरिका पक्के मित्र, व्यापार करारावर चर्चा सुरू'; ट्रम्प यांच्या पोस्टला पंतप्रधान मोदींचे उत्तर
17
अग्रलेख: भडकलेली 'जेन-झी'! भारताला अधिक सजग राहावे लागणार
18
टोळीयुद्धाने हादरली नवी मुंबई; गुंड राजकुमार म्हात्रेला मारहाण, खुटारीमध्ये हवेत गोळीबार
19
धुमसते नेपाळ : संसद पेटविली; सर्वोच्च न्यायालय आणि अॅटर्नी जनरल कार्यालयात तोडफोड
20
मालेगाव २००८ बॉम्बस्फोट: प्रज्ञा ठाकूर, पुरोहितसह ६ जणांच्या मुक्ततेला उच्च न्यायालयात आव्हान

राहुल गांधींनी मंत्रीपद घ्यायला पाहिजे होते - पृथ्वीराज चव्हाण

By admin | Updated: September 1, 2014 12:16 IST

काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर दिग्विजय सिंह यांनी केलेली टीका ताजी असतानाच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांनीदेखील राहुल गांधी यांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली आहे.

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. १ - काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर दिग्विजय सिंह यांनी केलेली टीका ताजी असतानाच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनीदेखील राहुल गांधी यांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली आहे. २००९ च्या लोकसभा निवडणुकीनंतर राहुल गांधी यांनी केंद्रीय मंत्रिपद स्वीकारायला पाहिजे होते असे पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटले आहे. 
लोकसभा निवडणुकीतील काँग्रेसच्या दारुण पराभवानंतर राहुल गांधी यांच्या नेतृत्वक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते. काँग्रेसमधील नेतेच यात आघाडीवर होते. या रांगेत आता पृथ्वीराज चव्हाण यांचाही समावेश झाला आहे. एका इंग्रजी वृत्तपत्राशी बोलताना चव्हाण म्हणाले, यूपीए सरकारची पहिली टर्म (२००४ -२००९ ) चांगली होती. पण २००९ च्या निवडणुकीनंतर यूपीएची प्रतिमा डागाळली गेली. राहुल गांधी यांनीदेखील मंत्रिपद स्वीकारले नाही व यामुळे आम्हाला शेवटी पराभवाचा सामना करावा लागला. 
काँग्रेसच्या अल्पसंख्यांक धोरणावरही चव्हाण यांनी नाराजी व्यक्त केली. 'मराठा आणि मुस्लीम आरक्षणाचा विषय अनेकवर्ष प्रलंबित असल्याने त्याला मंजूरी दिली. पण लोकसभा निवडणुकीत मुस्लिमबहूल भागांमध्ये मुस्लिम नेत्यांनाच प्रचारासाठी पाठवणे हे धोरण चुकीचे ठरले. मुस्लिमबहुल भागामध्ये फक्त मुस्लिमच मतदार आहे असा संदेश गेल्याचे परखड मत त्यांनी मांडले.