शहरं
Join us  
Trending Stories
1
जयंत पाटलांची प्रदेशाध्यपद सोडण्याची इच्छा, म्हणाले, "शरद पवार यांना विनंती करतो, त्यांनी..."
2
सोनम रघुवंशीनं किती रुपयांत केली होती पती राजाच्या जीवाची 'डील'? कुणाला किती रुपये दिले अ‍ॅडव्हॉन्स? जाणून थक्क व्हाल!
3
अजित पवारांसोबत जाण्याबाबत सुप्रिया सुळेंचे मोठे विधान; पक्षाच्या वर्धापनदिनी म्हणाल्या...
4
२४ तास उलटूनही आग शमेना, अजूनही येतायत स्फोटांचे आवाज! केरळच्या समुद्रात सुरू आहे मोठं रेस्क्यू ऑपरेशन
5
Raj Kushwaha : "माझा मुलगा २० वर्षांचा, पोलीस खोटं बोलताहेत"; सोनमचा बॉयफ्रेंड राज कुशवाहच्या आईचा दावा
6
आर्थिक अडचणींना वैतागून एमबीबीएस विद्यार्थ्याची आत्महत्या; जेजे रुग्णालयाच्या वसतिगृहातील घटना!
7
'मी विधवा होऊन...', सोनम रघुवंशीनं दिलं होतं आश्वासन; ओरडून म्हणाली, 'मार दो इसे...!' 'खतरनाक' होतं संपूर्ण प्लॅनिंग
8
Vat Purnima Vrat 2025: वट पौर्णिमेची पूजा झाली, पण घाईघाईत कथा वाचायची राहून गेली? वाचा 'ही' कथा!
9
फक्त या कारणामुळे आशुतोष राणाने रेणुका शहाणेसोबत केलं लग्न, २४ वर्षांनंतर अभिनेत्रीचा खुलासा
10
"मला लग्नच करायचं नव्हतं...", उषा नाडकर्णींनी पहिल्यांदाच लग्नावर केलेलं भाष्य
11
भरमैदानात महिला अंपायरवर भडकला, आर अश्विनला चुकवावी लागली किंमत, ठोठवला मोठा दंड
12
चांदीने मोडले सर्व रेकॉर्ड! 'रिच डॅड पुअर डॅड' पुस्तकाच्या लेखकाचं भाकीत खरं ठरतंय! अजूनही आहे संधी?
13
Sonam Raghuvanshi : "राजा जवळ येतो, जे मला अजिबात आवडत नाही"; सोनमच्या चॅटमधून खळबळजनक खुलासा
14
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईनवर वाहतूक विस्कळीत; प्रवाशांचे प्रचंड हाल, रेल्वेने दिलं स्पष्टीकरण
15
Video: हातात बेड्या, जमिनीवर फेकले अन्...अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्यासोबत अमानुष वागणूक
16
Uber Bike: उबेर बाईक चालकाचे महिला प्रवाशाशी गैरवर्तन; गोरेगाव येथील संतापजनक प्रकार!
17
Lenskart आणणार ८५०० कोटी रूपयांचा IPO; कधी करू शकता गुंतवणूक, काय आहेत डिटेल्स?
18
५०० कर्मचाऱ्यांना फर्स्ट क्लास विमान तिकिट, खर्चासाठी ८.५ लाख अन्.. नक्की कोण आहे ही 'दिलदार' महिला?
19
७ वर्षांनी मोठ्या कोंकणा सेनसोबत डेटिंगच्या चर्चांवर अभिनेत्याने सोडलं मौन, म्हणाला- "विकी-कतरिना..."
20
सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये १४,५८२ पदांवर मेगाभरती...

राहुल गांधी यांनी देशाची माफी मागावी, अन्यथा... अनुरागसिंह ठाकूर यांचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2023 10:11 IST

‘लोकमत नॅशनल कॉन्क्लेव्ह’मध्ये वरिष्ठ पत्रकार मारिया शकील यांनी घेतलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.

काँग्रेस नेते राहुल गांधी विदेशात जाऊन देशाची बदनामी करत आहेत. त्यांचे सर्व आरोप बिनबुडाचे असून ते देशाचा अपमान करत आहेत. लंडनमध्ये देशाची बदनामी केल्यामुळे राहुल गांधी जाहीर माफी मागत नाहीत तोवर भारतीय जनता पक्ष स्वस्थ बसणार नाही, असा इशारा केंद्रीय माहिती व प्रसारण आणि युवा व क्रीडा मंत्री अनुरागसिंह ठाकूर यांनी दिला. 

मंगळवारी येथे आयोजित ‘लोकमत नॅशनल कॉन्क्लेव्ह’मध्ये वरिष्ठ पत्रकार मारिया शकील यांनी घेतलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. यावेळी त्यांनी काँग्रेस, आम आदमी पक्ष तसेच राहुल गांधींवर सडकून टीका केली. भारताची अर्थव्यवस्था वेगात पुढे जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जगामध्ये विश्वासार्हता वाढली आहे. नवा भारत सशक्त बनला आहे. परंतु, दुसरीकडे राहुल गांधी व त्यांचे सहकारी देशाच्या सैनिकांचे मनोबल कमी करीत आहेत. देशाला अपमानित करीत आहेत. अल्पसंख्याक सुरक्षित नाहीत, असा आरोप करीत आहेत. परंतु, ते विसरतात  की, यूपीए सरकारच्या काळात सर्वाधिक हिंसाचार होत होता. काश्मीरमध्ये दगडफेक होत होती. राष्ट्रध्वज जाळला जात होता. आज तसे काहीच होत नाही. 

आणीबाणीचा सर्वांत मोठा दुरुपयोग इंदिरा गांधी यांनीच केला होता. देशातील अल्पसंख्याक भाजपसाेबत आहेत. हे 'सबका साथ, सबका विकास' तत्त्वावर चालणारे सरकार आहे. सरकारची धोरणे सर्वांसाठी समान आहेत. आम्ही कोणाचेही लांगूलचालन करीत नाही. काँग्रेसकरिता गांधी परिवाराशिवाय काहीच महत्त्वाचे नाही. त्यांच्यासाठी देशही कवडीमोल आहे. इंदिरा इज इंडिया, ही घोषणा काँग्रेसनेच दिली होती. गांधी कुटुंबीयांनी मनमोहन सिंग यांचाही सतत अपमान केला, असा आरोप अनुरागसिंह ठाकूर यांनी केला. काँग्रेस व आप हे दोन्ही पक्ष भ्रष्टाचाराची खाण आहेत. ते पैशांसाठी देशही विकून खातील. सत्येंद्र जैन व मनीष सिसोदिया अपराधी नाहीत तर मग त्यांना जामीन का मिळत नाही, असा सवाल त्यांनी केला. जमीन घोटाळ्यात राहुल गांधीही जामिनावर आहेत. प्रियंका गांधी यांनीदेखील भ्रष्टाचार केला आहे. लालू यादव यांनी तर जनावरांचा चारा सोडला नाही. त्यांनी नोकरीच्या बदल्यात जमीन घेण्याचा भ्रष्ट उपक्रमही राबविला. यूपीए सरकारने देशाची अर्थव्यवस्था लंगडी केली होती. भाजप सरकारने ती अर्थव्यवस्था उभी केली. यावेळी ठाकूर यांनी पद्म पुरस्कारांबाबत मोठा आरोप केला. पद्म पुरस्कारांबाबत काँग्रेस व ‘आप’चे विचार सारखे आहेत. काँग्रेसच्या काळात पेंटिंग व पैशांच्या बदल्यात पद्म पुरस्कार देण्यात यायचे, तर ‘आप’ भ्रष्टाचाऱ्यांना पुरस्कार देण्याची मागणी करत आहे, असे ते म्हणाले.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Anurag Thakurअनुराग ठाकुरlokmat parliamentary awardsलोकमत पार्लिमेंट्री अवॉर्ड