शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

राहुल गांधी यांनी देशाची माफी मागावी, अन्यथा... अनुरागसिंह ठाकूर यांचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2023 10:11 IST

‘लोकमत नॅशनल कॉन्क्लेव्ह’मध्ये वरिष्ठ पत्रकार मारिया शकील यांनी घेतलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.

काँग्रेस नेते राहुल गांधी विदेशात जाऊन देशाची बदनामी करत आहेत. त्यांचे सर्व आरोप बिनबुडाचे असून ते देशाचा अपमान करत आहेत. लंडनमध्ये देशाची बदनामी केल्यामुळे राहुल गांधी जाहीर माफी मागत नाहीत तोवर भारतीय जनता पक्ष स्वस्थ बसणार नाही, असा इशारा केंद्रीय माहिती व प्रसारण आणि युवा व क्रीडा मंत्री अनुरागसिंह ठाकूर यांनी दिला. 

मंगळवारी येथे आयोजित ‘लोकमत नॅशनल कॉन्क्लेव्ह’मध्ये वरिष्ठ पत्रकार मारिया शकील यांनी घेतलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. यावेळी त्यांनी काँग्रेस, आम आदमी पक्ष तसेच राहुल गांधींवर सडकून टीका केली. भारताची अर्थव्यवस्था वेगात पुढे जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जगामध्ये विश्वासार्हता वाढली आहे. नवा भारत सशक्त बनला आहे. परंतु, दुसरीकडे राहुल गांधी व त्यांचे सहकारी देशाच्या सैनिकांचे मनोबल कमी करीत आहेत. देशाला अपमानित करीत आहेत. अल्पसंख्याक सुरक्षित नाहीत, असा आरोप करीत आहेत. परंतु, ते विसरतात  की, यूपीए सरकारच्या काळात सर्वाधिक हिंसाचार होत होता. काश्मीरमध्ये दगडफेक होत होती. राष्ट्रध्वज जाळला जात होता. आज तसे काहीच होत नाही. 

आणीबाणीचा सर्वांत मोठा दुरुपयोग इंदिरा गांधी यांनीच केला होता. देशातील अल्पसंख्याक भाजपसाेबत आहेत. हे 'सबका साथ, सबका विकास' तत्त्वावर चालणारे सरकार आहे. सरकारची धोरणे सर्वांसाठी समान आहेत. आम्ही कोणाचेही लांगूलचालन करीत नाही. काँग्रेसकरिता गांधी परिवाराशिवाय काहीच महत्त्वाचे नाही. त्यांच्यासाठी देशही कवडीमोल आहे. इंदिरा इज इंडिया, ही घोषणा काँग्रेसनेच दिली होती. गांधी कुटुंबीयांनी मनमोहन सिंग यांचाही सतत अपमान केला, असा आरोप अनुरागसिंह ठाकूर यांनी केला. काँग्रेस व आप हे दोन्ही पक्ष भ्रष्टाचाराची खाण आहेत. ते पैशांसाठी देशही विकून खातील. सत्येंद्र जैन व मनीष सिसोदिया अपराधी नाहीत तर मग त्यांना जामीन का मिळत नाही, असा सवाल त्यांनी केला. जमीन घोटाळ्यात राहुल गांधीही जामिनावर आहेत. प्रियंका गांधी यांनीदेखील भ्रष्टाचार केला आहे. लालू यादव यांनी तर जनावरांचा चारा सोडला नाही. त्यांनी नोकरीच्या बदल्यात जमीन घेण्याचा भ्रष्ट उपक्रमही राबविला. यूपीए सरकारने देशाची अर्थव्यवस्था लंगडी केली होती. भाजप सरकारने ती अर्थव्यवस्था उभी केली. यावेळी ठाकूर यांनी पद्म पुरस्कारांबाबत मोठा आरोप केला. पद्म पुरस्कारांबाबत काँग्रेस व ‘आप’चे विचार सारखे आहेत. काँग्रेसच्या काळात पेंटिंग व पैशांच्या बदल्यात पद्म पुरस्कार देण्यात यायचे, तर ‘आप’ भ्रष्टाचाऱ्यांना पुरस्कार देण्याची मागणी करत आहे, असे ते म्हणाले.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Anurag Thakurअनुराग ठाकुरlokmat parliamentary awardsलोकमत पार्लिमेंट्री अवॉर्ड