शहरं
Join us  
Trending Stories
1
हायवे होणार रनवे...! गंगा एक्सप्रेसवर लढाऊ विमानं उतरणार; भारतीय हवाई दल ताकद दाखवणार
2
मराठमोळ्या शेतकऱ्याची कमाल, १ आंबा अन् वजन तब्बल ३ किलो; दिले चक्क शरद पवारांचे नाव!
3
भारताकडून हल्ल्याची पाकिस्तानला धास्ती; पेशावर, एबाटाबादसह २९ जिल्ह्यात एअर सायरन लावले
4
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यानंतर भारतात १० लाख सायबर हल्ले; पाकिस्तानसह अनेक देशांकडून हॅकिंगचा प्रयत्न
5
जबरदस्त तिमाही निकालानंतर Adani Enterprises चे शेअर्स सुस्साट.., चौथ्या तिमाहीत नफा ७५२% वाढला
6
एचडीएफसी बँकेकडून केवायसी अपडेट, APK चा मेसेज आला, पाठविणाऱ्याला ब्लॉक करताच ठेवली स्माईली...
7
अमेरिकेचे नौदल भारताच्या साथीला! 12 कोटी डॉलर्सचे तंत्रज्ञान देणार, नौदल समुद्रात आरपार लक्ष ठेवू शकणार...
8
वर्षभरात होणार तब्बल ८०० टन सोन्याची खरेदी; ‘वर्ल्ड गोल्ड कौन्सिल’ने अहवालात व्यक्त केला अंदाज
9
आधी ओरडण्याचा आवाज, नंतर मिळाला मृतदेह; बॉयफ्रेंडच्या घरात तरुणीसोबत काय घडलं?
10
मनोज जरांगे पाटील यांची तब्येत बिघडली, बीड दौरा अर्धवट सोडला; उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
11
बॉलिवूड गायकाने चाहत्यांना दिला सुखद धक्का, खरी वेडिंग डेट समोर; पत्नीने केला होता खास लूक
12
मे महिन्यात ६ ग्रहांचे गोचर: ६ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; भरघोस नफा, लक्ष्मी कृपा-भरभराट!
13
वर्षाला ८४ लाख पगार, 'या' एजन्सीनं काढली 'हाऊसमेड'ची नोकरी; काय काम करावं लागणार?
14
दहशतवाद विरोधी लढाईत भारताला पूर्ण पाठिंबा; अमेरिकेची घोषणा, ट्रम्प-मोदींमध्ये चर्चा
15
पाकिस्तानचं जितकं आहे संरक्षण बजेट, त्यापेक्षा तिप्पट आहे भारताचं एप्रिलचं GST कलेक्शन; जाणून घ्या
16
जुई गडकरीने केलंय बोटॉक्स? चाहतीच्या प्रश्नावर अभिनेत्रीने दिलं उत्तर; म्हणाली, "रोज त्वचेला..."
17
...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ
18
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?
19
जातनिहाय जनगणनेसाठी कालमर्यादा हवी; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची केंद्राकडे मागणी
20
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यावर सुनील शेट्टी म्हणाला, "क्रिकेट..."

राहुल गांधी स्वगृही परतले

By admin | Updated: April 16, 2015 12:55 IST

अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु होण्यापूर्वी सुट्टीवर गेलेले राहुल गांधी गुरुवारी दुपारी दिल्लीत परतले आहे.

ऑनलाइन लोकमत 

नवी दिल्ली, दि. १६ - अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु होण्यापूर्वी सुट्टीवर गेलेले राहुल गांधी गुरुवारी दुपारी दिल्लीत परतले आहे. राहुल गांधी गेेले ५६ दिवस अज्ञातवासात होते. आज दुपारी थाई एअरवेजच्या विमानाने ते दिल्लीत परतले आहेत. 

२३ फेब्रुवारीरोजी संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु होण्याच्या एक दिवसापूर्वी राहुल गांधी सुट्टीवर गेले होते. सुट्टी घेऊन राहुल गांधी नेमके कुठे गेले याविषयी कमालीची गुप्तता पाळण्यात आली होती.तसेच सुट्टीचे कारणही उघड झालेले नाही. राहुल गांधींचे नाव काँग्रेस अध्यक्षपदासाठी चर्चेत होते व यावरुन काही नेत्यांचे राहुल गांधींसोबत मतभेद असल्याची चर्चा रंगली होती. अशा स्थितीत राहुल गांधी विचारमंथनासाठी सुट्टीवर गेल्याने राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लढवले जात होते. मात्र अर्थसंकल्पीय अधिवेशनात काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यानेच दांडी मारल्याने विरोधकांनी काँग्रेसवर टीका केली होती. 

तब्बल ५६ दिवस अज्ञातवासात काढल्यावर राहुल गांधी आज सकाळी साडे अकराच्या सुमारास दिल्ली विमानतळावर आले. थाई एअरवेजच्या बँकॉक - दिल्ली विमानाने त्यांनी दिल्ली गाठले. दुपारी सव्वा बाराच्या सुमारास राहुल गांधी तुघलक रोड येथील निवासस्थानी पोहोचले. काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी व प्रियंका गांधी या त्यांच्या निवासस्थानी उपस्थित होत्या. राहुल गांधी परतल्याचे वृत्त समजताच काँग्रेस कार्यकर्त्यांनी दिल्लीत फटाके फोडून जल्लोष केला. आज संध्याकाळी काँग्रेसचे काही नेते राहुल गांधींची भेट घेतील अशी शक्यता आहे. 

१९ एप्रिल रोजी दिल्लीत रामलीला मैदानात भूसंपादन कायद्याविरोधात आयोजित मोर्चात राहुल गांधी शेतक-यांना संबोधित करणार आहेत. त्यामुळे विचारमंथन करुन आल्यावर राहुल गांधी लगेचच राजकारणा सक्रीय होतील असे दिसते.