शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
4
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
5
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
6
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
7
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
8
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
9
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
10
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
11
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
12
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
13
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
14
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
15
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
16
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
17
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
18
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
19
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
20
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!

परवानगी नाकारल्यानंतरही राहुल गांधी सहारनपूरसाठी रवाना

By admin | Updated: May 27, 2017 11:03 IST

जिल्हा प्रशासनाने परवानगी नाकारल्यानंतरही काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी सहारनपूर येथील दंगल पीडितांची भेट घेण्यासाठी रवाना झाले आहेत.

 ऑनलाइन लोकमत 

सहारनपूर, दि. 27 - जिल्हा प्रशासनाने परवानगी नाकारल्यानंतरही काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी सहारनपूर येथील दंगल पीडितांची भेट घेण्यासाठी रवाना झाले आहेत. राहुल गांधींची दंगल पीडितांबरोबर भेट होईल कि, नाही ते सांगत येत नाही. त्यांना प्रशासकीय अडथळयांचा सामना करावा लागेल. तरी काय होते ते पाहूया असे राहुल गांधींच्या कार्यालयाकडून सांगण्यात आले. 
सहारनपूरमध्ये सध्या इंटरनेट आणि मोबाईल मेसेंजिग अॅप बंद करण्यात आले आहेत. अफवां पसरुन हिंसाचार होऊ नये यासाठी इंटरनेट बंद करण्यात आले आहे.
 
सहारनपूरमध्ये सध्या दोन समुदायांमध्ये संघर्ष सुरु आहे. 40 दिवसापूर्वीच या वादाची ठिणगी पडली होती. काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांना उत्तर प्रदेशच्या सहारनपूर जिल्ह्यात जाण्यास शुक्रवारी मज्जाव करण्यात आला. सहारनपूरमध्ये जातीय हिंसाचारात दोन जणांचा बळी गेल्याच्या पार्श्वभूमीवर पीडितांना भेटण्यासाठी राहुल सहारनपूरला जाऊ इच्छित होते. 
 
राहुल यांना सहारनपूरला येण्याची परवानगी देण्यात आली नाही, असे पोलीस अधीक्षक बबलू कुमार यांनी सांगितले. कुमार हे येथील नवे पोलीस अधीक्षक असून, सुभाष चंद्र दुबे यांच्या ठिकाणी ते आले आहेत. सहारनपूर येथील जातीय हिंसाचार आणि संघर्षाच्या दृष्टिकोनातून दुबे यांना २४ मे रोजी निलंबित करण्यात आले होते.
 
राहुल यांचा शनिवारी शब्बीरपूर गावाला भेटीचा कार्यक्रम होता. या गावात ५ मे रोजी दलितांची घरे पेटविण्यात आली होती. बसपाप्रमुख मायावती यांनी सहारनपूरला भेट देऊन पीडितांची विचारपूस केली. त्यांनी राज्यातील योगी आदित्यनाथ सरकार कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहण्यात अयशस्वी ठरल्याचा आरोप केला आहे. सहारनपूरमध्ये या महिन्यात अनेकदा जातीय संघर्ष पाहावयास मिळाला. 
४० दिवसांपूर्वी आंबेडकर जयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीदरम्यान दोन समुदायात संघर्षाची ठिणगी पडली होती. तेव्हापासून सतत हिंसक घटना घडत आहेत. पाच मे रोजी दोन समुदायातील संघर्षात एक ठार, तर अन्य १५ जखमी झाले. नऊ मे रोजी संतप्त जमावाने डझनभर पोलीस वाहने पेटवून देऊन १२ पोलिसांना जखमी केले. २३ मे रोजी आणखी एकाची गोळी घालून हत्या करण्यात आली, तर अन्य दोघांना जखमी करण्यात आले. यानंतर पोलीस अधीक्षक आणि जिल्हाधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले. संघर्षाच्या पार्श्वभूमीवर केंद्राने राज्य सरकारकडून अहवाल मागवून सहारनपूरला केंद्रीय शीघ्र कृती दलाच्या चार तुकड्या पाठविल्या आहेत.
सहारनपूर येथील जातीय हिंसाचाराच्या घटनांची विशेष तपास पथकाकडून (एसआयटी) चौकशी करण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर तातडीने सुनावणी करण्यास सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी नकार दिला. या याचिकेवर न्यायालयाच्या उन्हाळी सुटीनंतर सुनावणी करता येऊ शकते.
तातडीने सुनावणी घेण्याची आवश्यकता नाही, असे एल. नागेश्वर राव आणि नवीन सिन्हा यांच्या सुटीकालीन पीठाने सांगितले. गौरव यादव यांनी ही याचिका दाखल केली आहे. या प्रकरणात न्यायिक हस्तक्षेपाची गरज आहे. न्यायालयाने तातडीने सुनावणी घ्यावी, असे यादव यांनी म्हटले होते. यादव यांच्या याचिकेवर सुनावणी करताना सुटीकालीन पीठाने या याचिकेवर तत्काळ सुनावणीची गरज नसल्याचे म्हटले.