शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
4
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
5
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
6
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
7
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
8
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
9
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
10
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
11
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
12
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
13
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
14
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
15
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
16
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
17
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
18
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
19
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
20
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."

परवानगी नाकारल्यानंतरही राहुल गांधी सहारनपूरसाठी रवाना

By admin | Updated: May 27, 2017 11:03 IST

जिल्हा प्रशासनाने परवानगी नाकारल्यानंतरही काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी सहारनपूर येथील दंगल पीडितांची भेट घेण्यासाठी रवाना झाले आहेत.

 ऑनलाइन लोकमत 

सहारनपूर, दि. 27 - जिल्हा प्रशासनाने परवानगी नाकारल्यानंतरही काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी सहारनपूर येथील दंगल पीडितांची भेट घेण्यासाठी रवाना झाले आहेत. राहुल गांधींची दंगल पीडितांबरोबर भेट होईल कि, नाही ते सांगत येत नाही. त्यांना प्रशासकीय अडथळयांचा सामना करावा लागेल. तरी काय होते ते पाहूया असे राहुल गांधींच्या कार्यालयाकडून सांगण्यात आले. 
सहारनपूरमध्ये सध्या इंटरनेट आणि मोबाईल मेसेंजिग अॅप बंद करण्यात आले आहेत. अफवां पसरुन हिंसाचार होऊ नये यासाठी इंटरनेट बंद करण्यात आले आहे.
 
सहारनपूरमध्ये सध्या दोन समुदायांमध्ये संघर्ष सुरु आहे. 40 दिवसापूर्वीच या वादाची ठिणगी पडली होती. काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांना उत्तर प्रदेशच्या सहारनपूर जिल्ह्यात जाण्यास शुक्रवारी मज्जाव करण्यात आला. सहारनपूरमध्ये जातीय हिंसाचारात दोन जणांचा बळी गेल्याच्या पार्श्वभूमीवर पीडितांना भेटण्यासाठी राहुल सहारनपूरला जाऊ इच्छित होते. 
 
राहुल यांना सहारनपूरला येण्याची परवानगी देण्यात आली नाही, असे पोलीस अधीक्षक बबलू कुमार यांनी सांगितले. कुमार हे येथील नवे पोलीस अधीक्षक असून, सुभाष चंद्र दुबे यांच्या ठिकाणी ते आले आहेत. सहारनपूर येथील जातीय हिंसाचार आणि संघर्षाच्या दृष्टिकोनातून दुबे यांना २४ मे रोजी निलंबित करण्यात आले होते.
 
राहुल यांचा शनिवारी शब्बीरपूर गावाला भेटीचा कार्यक्रम होता. या गावात ५ मे रोजी दलितांची घरे पेटविण्यात आली होती. बसपाप्रमुख मायावती यांनी सहारनपूरला भेट देऊन पीडितांची विचारपूस केली. त्यांनी राज्यातील योगी आदित्यनाथ सरकार कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहण्यात अयशस्वी ठरल्याचा आरोप केला आहे. सहारनपूरमध्ये या महिन्यात अनेकदा जातीय संघर्ष पाहावयास मिळाला. 
४० दिवसांपूर्वी आंबेडकर जयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीदरम्यान दोन समुदायात संघर्षाची ठिणगी पडली होती. तेव्हापासून सतत हिंसक घटना घडत आहेत. पाच मे रोजी दोन समुदायातील संघर्षात एक ठार, तर अन्य १५ जखमी झाले. नऊ मे रोजी संतप्त जमावाने डझनभर पोलीस वाहने पेटवून देऊन १२ पोलिसांना जखमी केले. २३ मे रोजी आणखी एकाची गोळी घालून हत्या करण्यात आली, तर अन्य दोघांना जखमी करण्यात आले. यानंतर पोलीस अधीक्षक आणि जिल्हाधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले. संघर्षाच्या पार्श्वभूमीवर केंद्राने राज्य सरकारकडून अहवाल मागवून सहारनपूरला केंद्रीय शीघ्र कृती दलाच्या चार तुकड्या पाठविल्या आहेत.
सहारनपूर येथील जातीय हिंसाचाराच्या घटनांची विशेष तपास पथकाकडून (एसआयटी) चौकशी करण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर तातडीने सुनावणी करण्यास सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी नकार दिला. या याचिकेवर न्यायालयाच्या उन्हाळी सुटीनंतर सुनावणी करता येऊ शकते.
तातडीने सुनावणी घेण्याची आवश्यकता नाही, असे एल. नागेश्वर राव आणि नवीन सिन्हा यांच्या सुटीकालीन पीठाने सांगितले. गौरव यादव यांनी ही याचिका दाखल केली आहे. या प्रकरणात न्यायिक हस्तक्षेपाची गरज आहे. न्यायालयाने तातडीने सुनावणी घ्यावी, असे यादव यांनी म्हटले होते. यादव यांच्या याचिकेवर सुनावणी करताना सुटीकालीन पीठाने या याचिकेवर तत्काळ सुनावणीची गरज नसल्याचे म्हटले.