शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
3
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
4
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
5
सैराटची पुनरावृत्ती! आंतरजातीय विवाहामुळे बदल्याची आग; बापानेच केली गर्भवती लेकीची हत्या
6
रस्त्यांवर झाडू मारतोय भारतीय 'सॉफ्टवेअर डेव्हलपर'! महिना सव्वा लाखाची कमाई; कंपनी का देते इतके पैसे?
7
विधवा वहिनीचं दीरासोबतच सुरू झालं अफेअर अन् अचानक घरातून झाली गायब! एक महिन्यानंतर जे समोर आलं... 
8
तुम्ही वापरत असलेला चार्जर FAKE तर नाहीये ना? कसा ओळखायचा ओरिजनल चार्जर, टाळू शकता मोबाइलचं होणारं नुकसान
9
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
10
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
11
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
12
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
13
Budh Gochar 2025: २०२५ ला निरोप देताना 'या' ७ राशींचे नशीब चमकणार, आयुष्यात येणार सुवर्णकाळ
14
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
15
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
16
KVP Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
17
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
18
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
19
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
20
शरीफ उस्मान हादीचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
Daily Top 2Weekly Top 5

परवानगी नाकारल्यानंतरही राहुल गांधी सहारनपूरसाठी रवाना

By admin | Updated: May 27, 2017 11:03 IST

जिल्हा प्रशासनाने परवानगी नाकारल्यानंतरही काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी सहारनपूर येथील दंगल पीडितांची भेट घेण्यासाठी रवाना झाले आहेत.

 ऑनलाइन लोकमत 

सहारनपूर, दि. 27 - जिल्हा प्रशासनाने परवानगी नाकारल्यानंतरही काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी सहारनपूर येथील दंगल पीडितांची भेट घेण्यासाठी रवाना झाले आहेत. राहुल गांधींची दंगल पीडितांबरोबर भेट होईल कि, नाही ते सांगत येत नाही. त्यांना प्रशासकीय अडथळयांचा सामना करावा लागेल. तरी काय होते ते पाहूया असे राहुल गांधींच्या कार्यालयाकडून सांगण्यात आले. 
सहारनपूरमध्ये सध्या इंटरनेट आणि मोबाईल मेसेंजिग अॅप बंद करण्यात आले आहेत. अफवां पसरुन हिंसाचार होऊ नये यासाठी इंटरनेट बंद करण्यात आले आहे.
 
सहारनपूरमध्ये सध्या दोन समुदायांमध्ये संघर्ष सुरु आहे. 40 दिवसापूर्वीच या वादाची ठिणगी पडली होती. काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांना उत्तर प्रदेशच्या सहारनपूर जिल्ह्यात जाण्यास शुक्रवारी मज्जाव करण्यात आला. सहारनपूरमध्ये जातीय हिंसाचारात दोन जणांचा बळी गेल्याच्या पार्श्वभूमीवर पीडितांना भेटण्यासाठी राहुल सहारनपूरला जाऊ इच्छित होते. 
 
राहुल यांना सहारनपूरला येण्याची परवानगी देण्यात आली नाही, असे पोलीस अधीक्षक बबलू कुमार यांनी सांगितले. कुमार हे येथील नवे पोलीस अधीक्षक असून, सुभाष चंद्र दुबे यांच्या ठिकाणी ते आले आहेत. सहारनपूर येथील जातीय हिंसाचार आणि संघर्षाच्या दृष्टिकोनातून दुबे यांना २४ मे रोजी निलंबित करण्यात आले होते.
 
राहुल यांचा शनिवारी शब्बीरपूर गावाला भेटीचा कार्यक्रम होता. या गावात ५ मे रोजी दलितांची घरे पेटविण्यात आली होती. बसपाप्रमुख मायावती यांनी सहारनपूरला भेट देऊन पीडितांची विचारपूस केली. त्यांनी राज्यातील योगी आदित्यनाथ सरकार कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहण्यात अयशस्वी ठरल्याचा आरोप केला आहे. सहारनपूरमध्ये या महिन्यात अनेकदा जातीय संघर्ष पाहावयास मिळाला. 
४० दिवसांपूर्वी आंबेडकर जयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीदरम्यान दोन समुदायात संघर्षाची ठिणगी पडली होती. तेव्हापासून सतत हिंसक घटना घडत आहेत. पाच मे रोजी दोन समुदायातील संघर्षात एक ठार, तर अन्य १५ जखमी झाले. नऊ मे रोजी संतप्त जमावाने डझनभर पोलीस वाहने पेटवून देऊन १२ पोलिसांना जखमी केले. २३ मे रोजी आणखी एकाची गोळी घालून हत्या करण्यात आली, तर अन्य दोघांना जखमी करण्यात आले. यानंतर पोलीस अधीक्षक आणि जिल्हाधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले. संघर्षाच्या पार्श्वभूमीवर केंद्राने राज्य सरकारकडून अहवाल मागवून सहारनपूरला केंद्रीय शीघ्र कृती दलाच्या चार तुकड्या पाठविल्या आहेत.
सहारनपूर येथील जातीय हिंसाचाराच्या घटनांची विशेष तपास पथकाकडून (एसआयटी) चौकशी करण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर तातडीने सुनावणी करण्यास सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी नकार दिला. या याचिकेवर न्यायालयाच्या उन्हाळी सुटीनंतर सुनावणी करता येऊ शकते.
तातडीने सुनावणी घेण्याची आवश्यकता नाही, असे एल. नागेश्वर राव आणि नवीन सिन्हा यांच्या सुटीकालीन पीठाने सांगितले. गौरव यादव यांनी ही याचिका दाखल केली आहे. या प्रकरणात न्यायिक हस्तक्षेपाची गरज आहे. न्यायालयाने तातडीने सुनावणी घ्यावी, असे यादव यांनी म्हटले होते. यादव यांच्या याचिकेवर सुनावणी करताना सुटीकालीन पीठाने या याचिकेवर तत्काळ सुनावणीची गरज नसल्याचे म्हटले.