शहरं
Join us  
Trending Stories
1
यावेळी मोठा धमाका करायचा... PM मोदींनी पहलगाम हल्ल्याची बातमी मिळताच मनात आखलेला 'प्लॅन'
2
राजस्थानात पाकिस्तान सीमेपासून १५ किमी दूर कोसळलेला ड्रोन सापडला; बीएसएफकडून चौकशी सुरु
3
Sensex मध्ये १३०० तर Nifty मध्ये ४०० अंकांपेक्षा अधिक तेजी, काय आहे तेजीमागचं कारण?
4
समुद्राचे खारट पाणी गोड करता येणार; तटरक्षक दल, डीआरडीओच्या संशोधकांना मोठे यश
5
'पाकिस्तानची अवस्था घाबरलेल्या कुत्र्यासारखी', अमेरिकेतील माजी अधिकाऱ्याने पार इज्ज काढली
6
अवघ्या २३ वर्षांच्या मुलीने लावली पाकिस्तान-बांगलादेशच्या नात्यात आग! राजदूतांना काढावा लागला पळ
7
संकष्ट चतुर्थी २०२५: एकदंत संकष्ट चतुर्थी असणार खास, 'या' राशींची पूर्ण होणार धन-संपत्तीची आस!
8
अ‍ॅमेझॉन-फ्लिपकार्टवरही पाकिस्तान बॅन? भारताचे ई-कॉमर्स कंपन्यांना स्पष्ट आदेश, यापुढे..
9
"मित्रा, भारतात ॲपलचं उत्पादन करू नकोस"; डोनाल्ड ट्रम्प यांचा टीम कूकना सल्ला... काय आहे नेमका मुद्दा?
10
Mumbai: "युवराज आदित्य ठाकरे या टोलधाडीचे म्होरके होऊन..."; आशिष शेलार ठाकरेंवर भडकले, सगळा घटनाक्रम सांगितला
11
"अफगाणिस्तानचे लोक मनापासून भारतासोबत..." ; मरियम सोलेमानाखिल यांनी पाकिस्तासोबतच्या संबंधावर भाष्य केले
12
Purnam Kumar Shaw : "डोळ्यावर पट्टी बांधून नेलं, टॉर्चर केलं..."; पाकिस्तानातून परतलेल्या BSF जवानाची आपबीती
13
३५ चेंडूत शतक झळकवणारा वैभव सूर्यवंशी दहावीत नापास झाला?; व्हायरल दाव्याचं सत्य जाणून घ्या
14
'पाकिस्तानचा अणुबॉम्ब IAEA च्या देखरेखीखाली आणावा', संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची मागणी
15
तुर्कीनं फक्त मैत्रीसाठी केली नाही भारताविरोधात पाकिस्तानची मदत; खरा हेतू तर भलताच...
16
Gold Rate Today 15 May: एका झटक्यात सोनं २ हजार रुपयांपेक्षा अधिक झालं स्वस्त, चांदीतही मोठी घसरण; काय आहेत नवे दर?
17
पिता न तू वैरी! किन्नर म्हणत पोटच्या मुलीचा जीव घेतला, नंतर पत्नीच्या पायावर डोकं ठेवत म्हणाला...
18
पाकिस्तानशी यारी, तुर्की-अझरबैजानला पडणार भारी; भारतीयांनी अख्खा बाजार उठवला
19
ना गिल, ना पंत... सुनील गावसकर म्हणतात- 'हा' अनुभवी खेळाडू टीम इंडियाचा कसोटी कर्णधार हवा!
20
"आमचा पुरुषांवरचा विश्वास उडाला"; नवऱ्यांनी फसवलं, दोन मैत्रिणींनी एकमेकींशी लग्न केलं

पदयात्रेतून राहुल गांधी काँग्रेसला देणार नवसंजीवनी ?

By admin | Updated: April 27, 2015 10:11 IST

लोकसभेत आक्रमक पवित्रा घेत सर्वांना धक्का देणारे राहुल गांधी आता पदयात्रेच्या माध्यमातून काँग्रेसला नवसंजीवनी देण्याचा प्रयत्न करणार आहे.

ऑनलाइन लोकमत 

नवी दिल्ली, दि. २७ - ५६ दिवसांच्या प्रदीर्घ रजेनंतर राजकारणात परतलेल्या राहुल गांधींनी आक्रमक पवित्रा घेत टीकाकारांना चोख प्रत्युत्तर दिले असतानाच आता पदयात्रेच्या माध्यमातून राहुल गांधी काँग्रेसला नवसंजीवनी देण्याचा प्रयत्न करणार आहे. भूसंपादन विधेयकाविरोधात राहुल गांधी देशाच्या विविध भागांमध्ये पदयात्रा काढणार असून या माध्यमातून काँग्रेसचा जनाधार वाढवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. 
भूसंपादन विधेयकावरुन काँग्रेस चांगलीच आक्रमक झाली असून प्रदीर्घ रजेवरुन परत आलेल्या राहुल गांधींनी लोकसभेत फटकेबाजी करत सत्ताधा-यांना दणका दिला आहे. काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी आगामी काळात पदयात्रा काढणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या पदयात्रेत राहुल गांधी प्रामुख्याने भूसंपादन विधेयकावर भर देतील. ग्रामीण भागात काँग्रेसचा जनाधार घटला असून भूसंपादन विधेयकाच्या माध्यमातून ग्रामीण मतदारांचा विश्वास संपादन करण्याचा प्रयत्न राहुल गांधी करणार आहेत. याशिवाय शहरीभागातील कामगार व तरुण वर्गांशीही राहुल गांधी संवाद साधतील. मोदी सरकार सत्तेत आल्यावरही रोजगाराच्या अपेक्षीत संधी निर्माण होत नसल्याने तरुण वर्ग निराश झाला आहे. तर कामगार कायद्यातील बदलांमुळे हा वर्गही दुखावला आहे. राहुल गांधी पदयात्रेतून या वर्गाशीही संवाद साधतील. 
इंदिरा गांधी यांनी १९७७ मध्ये लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर तर राजीव गांधी यांनी १९८९ मधील लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर पदयात्रा काढून काँग्रेसला पुन्हा विजय मिळवून दिला होता. राहुल गांधी या इतिहासाची पुनरावृत्ती करु शकतील का याकडे काँग्रेस कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.