शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रभर पारा आणखी घसरणार! नवीन वर्षाचे स्वागत थंडीच्या कडाक्यानेच, तयार रहा...
2
अमेरिका नाही, या मुस्लिम देशाने २०२५ मध्ये सर्वाधिक भारतीयांना बाहेर काढले; रशियाचाही समावेश
3
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २७ डिसेंबर २०२५: अविवाहितांना योग्य जोडीदार मिळू शकेल, प्राप्तीत वाढ होईल
4
संपादकीय: कुऱ्हाड - झाडांवर, निष्ठेवरही! महाजनांची मुजोरी आता कार्यकर्त्यांवरही...
5
मुंबई निवडणुकीत डॅडी...! अरुण गवळीच्या कन्या रिंगणात; भावजईचा शिंदेसेनेत प्रवेश
6
महापालिका रणधुमाळी : सत्तेत सोबत असलेले अजित पवार निवडणुकीत राज्यभर विरोधात
7
कबुतरांना खाद्य दिल्याने दंड; दादरचा व्यावसायिक दाेषी; दंडाचे पहिलेच प्रकरण 
8
नवनिर्वाचित शिंदेसेना नगरसेविकेच्या पतीची निर्घृण हत्या; घराजवळच पाच जणांकडून धारदार शस्त्रांनी वार 
9
उद्धव-राज एकत्र आल्याने ६७ प्रभागांत फरक पडणार; २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत पडलेल्या मतांवरून चित्र स्पष्ट
10
युतीच्या चर्चा फिसकटल्या? आता बंडखोरी टाळण्यासाठी विलंब
11
तुम्ही लावता त्या अगरबत्तीतून आता येणार नाही ‘विषारी’ धूर! केंद्र सरकारने कठोर पाऊल, घातक रसायनांवर बंदी  
12
खातेदाराची गोपनीय केवायसी वापरून बँक कर्मचाऱ्याने दोन कोटींना फसवले; सात बँकांना २.५ कोटी रुपयांचा दंड
13
अतुलनीय धाडस अन् जिद्द; २० बाल‘भारत’वीरांचा सन्मान
14
नोकरी सोडताय? थांबा, आलिशान फ्लॅट घ्या! कंपन्यांना चांगले कर्मचारीच मिळत नाहीत...
15
३६ कोटींहून अधिक किमतीचे हेरॉइन जप्त; तीन महिलांसह ९ आरोपींना घेतले ताब्यात
16
सीईटी परीक्षांच्या नोंदणीला आठवडाभरात सुरुवात होणार
17
‘निवडणूकपूर्व’साठी राष्ट्रवादी काॅंग्रेस (शरद पवार) अनुत्सुक; निवडणुकीनंतर युती करण्याला मात्र पसंती
18
४८ हजार जणांनी म्हटले, दुबार मतदान करणार नाही
19
‘अमेरिकन ड्रीम’ला H-1B व्हिसाचे नख लागते, तेव्हा...
Daily Top 2Weekly Top 5

बहुचर्चित सुटी संपवून राहुल गांधी परतले

By admin | Updated: April 16, 2015 23:52 IST

संपूर्ण देशाचे डोळे ज्यांच्या परतीकडे लागले ते काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी अखेर ५६ दिवसांची ‘आत्मचिंतन’ सुटी संपवून गुरुवारी मायदेशी परतले आहेत.

तर्कवितर्कांना पूर्णविराम : ‘किसान रॅली’ला संबोधण्याची शक्यता; ५६ दिवसांचे ‘आत्मचिंतन’नवी दिल्ली : संपूर्ण देशाचे डोळे ज्यांच्या परतीकडे लागले ते काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी अखेर ५६ दिवसांची ‘आत्मचिंतन’ सुटी संपवून गुरुवारी मायदेशी परतले आहेत. संसद अधिवेशन सुरू होत असतानाच त्यांनी सुटी घेतल्याने तर्कवितर्क सुरू झाले होते. काँग्रेसला लागोपाठ पराभवाचे धक्के पचवावे लागल्याने त्यांच्या नेतृत्वाबाबत प्रश्नचिन्हही उपस्थित होऊ लागले होते. राहुल यांच्या ठावठिकाण्याबाबत कमालीचे मौन बाळगले जात असतानाच परतण्याबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली होती.४४ वर्षीय राहुल गांधी सकाळी ११.१५ वाजता बँकॉकहून थाई एअरवेजच्या विमानाने दिल्लीला परतताच गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या अटकळबाजीला पूर्णविराम मिळाला आहे. काँग्रेस कार्यकर्त्यांनी त्यांच्या निवासस्थानाबाहेर फटाके फोडून जल्लोष केला. गडद रंगाचा शर्ट परिधान केलेले राहुल गांधी गाडीच्या मागच्या सीटवर बसले तेव्हा सुरक्षा रक्षकांनी त्यांना गराडा घातला होता. त्यांच्या प्रतीक्षेत असलेल्या माध्यम कर्मचाऱ्यांना ते प्रतिक्रिया देतील अशी अपेक्षा होती; मात्र ते काहीही न बोलताच थेट निवासस्थानी पोहोचले.लवकरच अमेठीला भेटयेत्या दोन दिवसांत राहुल अमेठी या आपल्या मतदारसंघाला भेट देतील अशी शक्यता आहे. ते बेपत्ता असल्याचे पोस्टर्स अमेठीत लागल्यानंतर सोनिया यांनी २८ मार्च रोजी तेथे भेट देऊन राहुल गांधी लवकरच परतणार असल्याचे आश्वासन दिले होते.(लोकमत न्यूज नेटवर्क)काँग्रेसने १९ एप्रिल रोजी रामलीला मैदानावर शेतकऱ्यांची रॅली आयोजित केली असून त्या मुहूर्तावर त्यांचे आगमन झाल्यामुळे ते जाहीर सभेला संबोधित करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ते आज शुक्रवारी शेतकऱ्यांच्या एका शिष्टमंडळाशी चर्चा करतील, त्यावेळी १९ एप्रिलच्या रॅलीची योजना ठरेल.राहुल गांधी यांचे विमान सकाळी १०.३५ वाजता लँड होणार अशी ब्रेकिंग न्यूज झळकत होती. त्यांचे विमान किमान ४० मिनिटे उशिरा उतरले. ११.१५ वाजता आगमन होताच ते थेट आपल्या वाहनाकडे गेले. त्यांची कार १२, तुघलक लेन येथील निवासस्थानी पोहोचली तेव्हा माता सोनिया गांधी आणि बहीण प्रियंका तेथे त्यांच्या प्रतीक्षेत होत्या. राहुल गांधी यांनी दोन तास आपल्या निवासस्थानी घालविल्यानंतर १०, जनपथ या सोनिया गांधी यांच्या निवासस्थानी गेले. ते लवकरच आपले कामकाज नेहमीप्रमाणे सुरू करतील. काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना भेटण्याची शक्यताही असल्याचे सूत्रांनी सांगितले.राहुल गांधी पूर्ण जोमाने व कटिबद्धतेने नेतृत्व देतील. पक्षाच्या वाटचालीसाठी ठोस पावले उचलतील, असा विश्वास काँग्रेसचे आनंद शर्मा यांनी व्यक्त केला. भाजपची टीकास्वत: राहुल व काँग्रेसही भविष्याबाबत संभ्रमित आहेत. ते नेहमीच चुकीच्या कारणांनी चर्चेत आहेत. राजकारणात राहायचे की नाही ते जनतेला सांगावे, असे भाजप प्रवक्ते संबित पात्रा यांनी म्हटले.