शहरं
Join us  
Trending Stories
1
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
2
Glenn Maxwell Video: याला म्हणतात 'कमबॅक'... ग्लेन मॅक्सेवलने मारले तब्बल १३ षटकार, ४८ चेंडूत केलं शतक
3
Nashik: शिंदेंचा घाव, ठाकरेंच्या शिवसेनेला पडलं भगदाड! उरले फक्त नऊ माजी नगरसेवक
4
एक्स्प्रेस हायवे असुदे की नॅशनल... कोणताही टोल १५ रुपयांत पार करा; पण नियम आधी जाणून घ्या...
5
सोन्याचे दर घसरले, पण चांदीचा विक्रम; किंमत १ लाख १२ हजारांवर; खरेदीपूर्वी पाहा लेटेस्ट रेट
6
"आता वेळ आलीय..."; लोकप्रिय अभिनेत्रीसोबत मोठा स्कॅम, स्टायलिस्ट सांगून फसवलं
7
हनीमूनला जाताना किती सोनं आणि कॅश घेऊन गेली होती सोनम रघुवंशी? भावानं केला मोठा दावा
8
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
9
जिवंत रुग्णाला मृत घोषित केले; डॉक्टरांकडे महापालिकेने मागितला खुलासा
10
Israel Iran War : इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे संरक्षण यंत्रणेवर तणाव; फक्त १० दिवसांचा साठा शिल्लक
11
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
12
सोने सोडा चांदीमध्येही बंपर कमाईची संधी! पुढील ६ महिन्यांत किंमत दुप्पट होणार? कोणी केला दावा?
13
केदारनाथ यात्रेला निघालेले भाविक दरीत कोसळले; दोघांचा मृत्यू, तीन जखमी
14
...तर पाकिस्तानातील अण्वस्त्र ठिकाणे उद्ध्वस्त झाली असती; इस्त्रायलची ऑफर भारताने का नाकारली?
15
पुणे, चंद्रपूर, नंदूरबार, धाराशिव; शरद पवार गट, उद्धवसेनेला खिंडार, माजी नगरसेवक शिंदे गटात
16
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
17
Mukesh Ambani : मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
18
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
19
खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...
20
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर

बहुचर्चित सुटी संपवून राहुल गांधी परतले

By admin | Updated: April 16, 2015 23:52 IST

संपूर्ण देशाचे डोळे ज्यांच्या परतीकडे लागले ते काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी अखेर ५६ दिवसांची ‘आत्मचिंतन’ सुटी संपवून गुरुवारी मायदेशी परतले आहेत.

तर्कवितर्कांना पूर्णविराम : ‘किसान रॅली’ला संबोधण्याची शक्यता; ५६ दिवसांचे ‘आत्मचिंतन’नवी दिल्ली : संपूर्ण देशाचे डोळे ज्यांच्या परतीकडे लागले ते काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी अखेर ५६ दिवसांची ‘आत्मचिंतन’ सुटी संपवून गुरुवारी मायदेशी परतले आहेत. संसद अधिवेशन सुरू होत असतानाच त्यांनी सुटी घेतल्याने तर्कवितर्क सुरू झाले होते. काँग्रेसला लागोपाठ पराभवाचे धक्के पचवावे लागल्याने त्यांच्या नेतृत्वाबाबत प्रश्नचिन्हही उपस्थित होऊ लागले होते. राहुल यांच्या ठावठिकाण्याबाबत कमालीचे मौन बाळगले जात असतानाच परतण्याबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली होती.४४ वर्षीय राहुल गांधी सकाळी ११.१५ वाजता बँकॉकहून थाई एअरवेजच्या विमानाने दिल्लीला परतताच गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या अटकळबाजीला पूर्णविराम मिळाला आहे. काँग्रेस कार्यकर्त्यांनी त्यांच्या निवासस्थानाबाहेर फटाके फोडून जल्लोष केला. गडद रंगाचा शर्ट परिधान केलेले राहुल गांधी गाडीच्या मागच्या सीटवर बसले तेव्हा सुरक्षा रक्षकांनी त्यांना गराडा घातला होता. त्यांच्या प्रतीक्षेत असलेल्या माध्यम कर्मचाऱ्यांना ते प्रतिक्रिया देतील अशी अपेक्षा होती; मात्र ते काहीही न बोलताच थेट निवासस्थानी पोहोचले.लवकरच अमेठीला भेटयेत्या दोन दिवसांत राहुल अमेठी या आपल्या मतदारसंघाला भेट देतील अशी शक्यता आहे. ते बेपत्ता असल्याचे पोस्टर्स अमेठीत लागल्यानंतर सोनिया यांनी २८ मार्च रोजी तेथे भेट देऊन राहुल गांधी लवकरच परतणार असल्याचे आश्वासन दिले होते.(लोकमत न्यूज नेटवर्क)काँग्रेसने १९ एप्रिल रोजी रामलीला मैदानावर शेतकऱ्यांची रॅली आयोजित केली असून त्या मुहूर्तावर त्यांचे आगमन झाल्यामुळे ते जाहीर सभेला संबोधित करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ते आज शुक्रवारी शेतकऱ्यांच्या एका शिष्टमंडळाशी चर्चा करतील, त्यावेळी १९ एप्रिलच्या रॅलीची योजना ठरेल.राहुल गांधी यांचे विमान सकाळी १०.३५ वाजता लँड होणार अशी ब्रेकिंग न्यूज झळकत होती. त्यांचे विमान किमान ४० मिनिटे उशिरा उतरले. ११.१५ वाजता आगमन होताच ते थेट आपल्या वाहनाकडे गेले. त्यांची कार १२, तुघलक लेन येथील निवासस्थानी पोहोचली तेव्हा माता सोनिया गांधी आणि बहीण प्रियंका तेथे त्यांच्या प्रतीक्षेत होत्या. राहुल गांधी यांनी दोन तास आपल्या निवासस्थानी घालविल्यानंतर १०, जनपथ या सोनिया गांधी यांच्या निवासस्थानी गेले. ते लवकरच आपले कामकाज नेहमीप्रमाणे सुरू करतील. काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना भेटण्याची शक्यताही असल्याचे सूत्रांनी सांगितले.राहुल गांधी पूर्ण जोमाने व कटिबद्धतेने नेतृत्व देतील. पक्षाच्या वाटचालीसाठी ठोस पावले उचलतील, असा विश्वास काँग्रेसचे आनंद शर्मा यांनी व्यक्त केला. भाजपची टीकास्वत: राहुल व काँग्रेसही भविष्याबाबत संभ्रमित आहेत. ते नेहमीच चुकीच्या कारणांनी चर्चेत आहेत. राजकारणात राहायचे की नाही ते जनतेला सांगावे, असे भाजप प्रवक्ते संबित पात्रा यांनी म्हटले.