शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

बहुचर्चित सुटी संपवून राहुल गांधी परतले

By admin | Updated: April 16, 2015 23:52 IST

संपूर्ण देशाचे डोळे ज्यांच्या परतीकडे लागले ते काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी अखेर ५६ दिवसांची ‘आत्मचिंतन’ सुटी संपवून गुरुवारी मायदेशी परतले आहेत.

तर्कवितर्कांना पूर्णविराम : ‘किसान रॅली’ला संबोधण्याची शक्यता; ५६ दिवसांचे ‘आत्मचिंतन’नवी दिल्ली : संपूर्ण देशाचे डोळे ज्यांच्या परतीकडे लागले ते काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी अखेर ५६ दिवसांची ‘आत्मचिंतन’ सुटी संपवून गुरुवारी मायदेशी परतले आहेत. संसद अधिवेशन सुरू होत असतानाच त्यांनी सुटी घेतल्याने तर्कवितर्क सुरू झाले होते. काँग्रेसला लागोपाठ पराभवाचे धक्के पचवावे लागल्याने त्यांच्या नेतृत्वाबाबत प्रश्नचिन्हही उपस्थित होऊ लागले होते. राहुल यांच्या ठावठिकाण्याबाबत कमालीचे मौन बाळगले जात असतानाच परतण्याबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली होती.४४ वर्षीय राहुल गांधी सकाळी ११.१५ वाजता बँकॉकहून थाई एअरवेजच्या विमानाने दिल्लीला परतताच गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या अटकळबाजीला पूर्णविराम मिळाला आहे. काँग्रेस कार्यकर्त्यांनी त्यांच्या निवासस्थानाबाहेर फटाके फोडून जल्लोष केला. गडद रंगाचा शर्ट परिधान केलेले राहुल गांधी गाडीच्या मागच्या सीटवर बसले तेव्हा सुरक्षा रक्षकांनी त्यांना गराडा घातला होता. त्यांच्या प्रतीक्षेत असलेल्या माध्यम कर्मचाऱ्यांना ते प्रतिक्रिया देतील अशी अपेक्षा होती; मात्र ते काहीही न बोलताच थेट निवासस्थानी पोहोचले.लवकरच अमेठीला भेटयेत्या दोन दिवसांत राहुल अमेठी या आपल्या मतदारसंघाला भेट देतील अशी शक्यता आहे. ते बेपत्ता असल्याचे पोस्टर्स अमेठीत लागल्यानंतर सोनिया यांनी २८ मार्च रोजी तेथे भेट देऊन राहुल गांधी लवकरच परतणार असल्याचे आश्वासन दिले होते.(लोकमत न्यूज नेटवर्क)काँग्रेसने १९ एप्रिल रोजी रामलीला मैदानावर शेतकऱ्यांची रॅली आयोजित केली असून त्या मुहूर्तावर त्यांचे आगमन झाल्यामुळे ते जाहीर सभेला संबोधित करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ते आज शुक्रवारी शेतकऱ्यांच्या एका शिष्टमंडळाशी चर्चा करतील, त्यावेळी १९ एप्रिलच्या रॅलीची योजना ठरेल.राहुल गांधी यांचे विमान सकाळी १०.३५ वाजता लँड होणार अशी ब्रेकिंग न्यूज झळकत होती. त्यांचे विमान किमान ४० मिनिटे उशिरा उतरले. ११.१५ वाजता आगमन होताच ते थेट आपल्या वाहनाकडे गेले. त्यांची कार १२, तुघलक लेन येथील निवासस्थानी पोहोचली तेव्हा माता सोनिया गांधी आणि बहीण प्रियंका तेथे त्यांच्या प्रतीक्षेत होत्या. राहुल गांधी यांनी दोन तास आपल्या निवासस्थानी घालविल्यानंतर १०, जनपथ या सोनिया गांधी यांच्या निवासस्थानी गेले. ते लवकरच आपले कामकाज नेहमीप्रमाणे सुरू करतील. काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना भेटण्याची शक्यताही असल्याचे सूत्रांनी सांगितले.राहुल गांधी पूर्ण जोमाने व कटिबद्धतेने नेतृत्व देतील. पक्षाच्या वाटचालीसाठी ठोस पावले उचलतील, असा विश्वास काँग्रेसचे आनंद शर्मा यांनी व्यक्त केला. भाजपची टीकास्वत: राहुल व काँग्रेसही भविष्याबाबत संभ्रमित आहेत. ते नेहमीच चुकीच्या कारणांनी चर्चेत आहेत. राजकारणात राहायचे की नाही ते जनतेला सांगावे, असे भाजप प्रवक्ते संबित पात्रा यांनी म्हटले.