शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

मध्य प्रदेश पोलिसांकडून राहुल गांधींना अटक

By admin | Updated: June 8, 2017 17:17 IST

राहुल गांधी मंदसौर येथे गोळीबारात मृत्यूमुखी पडलेल्या शेतक-यांच्या कुटुंबियांची भेट घेण्यासाठी जात असताना पोलिसांनी अटक केलं आहे

ऑनलाइन लोकमत
भोपाळ, दि. 8 - काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांना पोलिसांनी अटक केली आहे. राहुल गांधी मंदसौर येथे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात मृत्यूमुखी पडलेल्या शेतक-यांच्या कुटुंबियांची भेट घेण्यासाठी जात असताना पोलिसांनी त्यांना अटक केलं. राहुल गांधी पोलिसांना चकवा देत बाईकवरुन जाण्याचा प्रयत्न करत असतानाच पोलिसांनी त्यांना अटक केलं. सुरुवातीला राहुल गांधींनी जामीन घेण्यास नकार दिला होता. मात्र सध्या त्यांची जामीनावर सुटका करण्यात आली आहे.
 
मंदसौर येथे वातावरण चिघळलं असल्याने पोलिसांनी काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या दौ-याला परवानगी नाकारली होती. पोलिस अधीक्षकांनी राहुल गांधींना तणावग्रस्त मंदसौर जिल्ह्यात प्रवेशबंदी केली आहे. मात्र तरीही राहुल गांधी यांनी मंदसौरला जाण्याचा निर्णय घेतला होता. पोलिसांनी राजस्थान सीमेवरच राहुल गांधींना अडवलं होतं. यानंतर राहुल गांधी यांनी ट्विटरच्या माध्यमातून राजस्थान आणि मध्य प्रदेश सरकार मी मंदसौर येथील मृत शेतक-यांच्या कुटुंबियांची भेट घेऊ नये यासाठी पुरेपूर प्रयत्न करत असल्याचा आरोप केला होता.
 
राहुल गांधी मृत शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी घटनास्थळी जात होते. पण पोलिसांनी घटनास्थळी जाण्यापासून रोखल्याने राहुल गांधी आमदार जीतू पटवारी यांच्या बाईकवर बसून निघून गेले. त्यांच्यासोबत कमलनाथ, सचिन पायलही बाईकवरुन मध्य प्रदेशकडे रवाना झाले. मध्य प्रदेश पोलिसांना चकवा देत, त्यांनी अखेरच्या क्षण प्लॅन बदलून, कारमधून उतरुन बाईकने छोट्या रस्त्याने निघून गेले होते. मात्र पोलिसांनी त्यांना अडवून अटक केलं. सध्या त्यांची जामीनावर सुटका करण्यात आली असून मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान यांनी लोकांना शांतता राखण्याचं आवाहन केलं आहे. 
 
पोलिसांनी मात्र ना आम्ही गोळी चालवली, ना चालवण्याचा आदेश दिला अशी माहिती दिल्याचं स्वतंत्र सिंह यांनी सांगितलं आहे. मृत्यूमुखी पडलेल्यांच्या पोस्टमॉर्टमचा व्हिडीओ शूट करण्यात आला आहे. रिपोर्ट आल्यानंतरच मृत्यूचं खरं कारण समजू शकेल. 
 
दरम्यान, मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी मंदसौरचे जिल्हाधिकारी स्वतंत्र सिंह आणि पोलिस अधीक्षक ओपी त्रिपाठी यांची बदली केली आहे. स्वतंत्र कुमार सिंह यांची बदली मंत्रालयात उपसचिवपदी केली आहे. तर सिंह यांच्या जागी ओपी श्रीवास्तव यांची जिल्हाधिकारी म्हणून नेमणूक झाली आहे. तसंच सरकारने मंदसौरचे पोलिस अधीक्षक ओपी त्रिपाठी यांचीही बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी मनोज कुमार सिंह यांची नियुक्ती करण्यात आली आहे.