शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
6
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
7
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
8
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
9
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
10
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
11
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
12
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
13
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
14
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
15
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
16
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
17
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
18
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
19
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
20
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

आठवणींतला रेडिओ! रेडिओ दिन जगभरात केला जातो साजरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2018 00:05 IST

13 फेब्रुवारी हा जगभर रेडिओ दिन म्हणून साजरा केला जातो. तो कसा साजरा करतात, कोणास ठाऊक, पण त्या निमित्ताने रेडिओच्या दिवसांतील अनेक आठवणी मात्र जाग्या होतात. त्या काळात टीव्ही नावाचा प्रकार नव्हताच.

13 फेब्रुवारी हा जगभर रेडिओ दिन म्हणून साजरा केला जातो. तो कसा साजरा करतात, कोणास ठाऊ क, पण त्या निमित्ताने रेडिओच्या दिवसांतील अनेक आठवणी मात्र जाग्या होतात. त्या काळात टीव्ही नावाचा प्रकार नव्हताच. नाही म्हणायला भारतात टीव्ही आला १९५९ साली. पण तो कोणाकडे नसायचा आणि त्यावर काही कार्यक्रमही नसायचे. लोकांच्या दृष्टीने माहिती मिळवण्याचं, करमणुकीचं एकमेव साधन होतं, ते म्हणजे रेडिओ.आकाशवाणीची केंद्रंही फारशी नव्हती. त्यामुळे दिल्ली मुंबई व पुणे केंद्रावरल्या बातम्या ऐकल्या जायच्या. कुसुम रानडे, ललिता नेने, शरद चव्हाण, दत्ता कुलकर्णी, अनुराधा देशमुख, प्रकाश पायगुडे, माधुरी लिमये असे काही जण बातम्या वाचायचे.आपली आवड, कामगार सभा, प्रपंच, गंमत जंमत, युववाणी, वनिता मंडळ, आपले माजघर, माझं गाव-माझं शिवार, शेतीचे बाजारभाव हे कार्यक्रम ऐकले जायचे. कोकणीतून विश्वंभर उजगांवकर बातम्या सांगायचे. त्यानंतर आकाबायल्या चौकेर कार्यक्रम असायचा. हिंदीत हवा महल, फौजी भाईयों के लिये, संगीत सरिता, भुले बिसरे गीत या कार्यक्रमांमुळे देशातल्या लोकांना झुमरीतलय्या या गावाचं नाव माहीत झालं.गाण्यांची सर्वाधिक फर्माइश तेथूनच यायची. फिल्मी मुकद्दमा, गीत गुंजन, क्रिकेट वुइथ बिजय मर्चंट तसंच क्रिकेटच्या सामन्यांचं धावतं वर्णन कार्यक्रम हमखास ऐकले जायचे. कमर्शिअल ब्रॉडकास्टिंग म्हणजे प्रायोजित कार्यक्रम व जाहिराती हे आॅल इंडिया रेडिओवर खूप उशिरा सुरू झालं. अगरबत्ती व एका साबणाच्या जाहिराती हिंदीत सुरुवातीला आल्या.सिलोनरेडिओवरील अमित सयानी यांचा बिनाका गीतमाला जवळपास प्रत्येक घरात ऐकला जायचा. बिनाका टूथपेस्टही बंद पडली आता. रेडिओ सिलोन पटकन मिळायचं नाही. ते मिळावं, यासाठी कार्यक्रमाच्या दहा मिनिटं खटपट सुरू व्हायची. काही जणांचे रेडिओ खूप चांगले असायचे. त्यावर बीबीसी व व्हॉइस आॅफ अमेरिका ही स्टेशन्सही मिळायची. अशांचा हेवा वाटायचा.ही खासगी कंपनी तीन वर्षांत बंद पडली. आता रेडिओवरील कार्यक्रम शहरांपेक्षा ग्रामीण भागांत हमखास ऐकले जातात. देशातील99%भागांत पोहोचलेलं हे करमणूक व प्रसाराचं एकमेव साधन आहे.तेव्हाचे रेडिओ म्हणे मोठे डबेच असायचे. अनेक बँड असलेले. कार्यक्रमानुसार बँड बदलायचा. काही जणांकडे छोटे ट्रान्झिस्टर. ते बॅटरीवर चालायचे. वीज गेली तरी ते सुरूच. ट्रान्झिस्टरला इबबिल्ट अँटेना असायचा. रेडिओ असेल, तर एरियल बाहेर लावावी लागायची. शिवाय रेडिओचं लायसन्स असायचं. दरवर्षी पोस्टात जाऊ न पैसे भरून ते रीन्यू करावं लागायचं. त्यासाठी रांगा लागायच्या. लायसन्सशिवाय रेडिओ बाळगणं गुन्हाच होता. आता मोठ्या आकाराचे रेडिओ गेलेच. छोटे स्लीक ट्रान्झिस्टर आलेत. त्याला ट्यूनर म्हणतात. असंख्य एफएम स्टेशन्स आहेत. अगदी आॅल इंडिया रेडिओचीही. आॅल इंडिया रेडिओची स्थापना झाली १९३0 साली. पण त्याआधी २३ जुलै १९२७ रोजी इंडियन ब्रॉडकास्टिंग कंपनीला मुंबईसाठी व नंतर कोलकात्यासाठी परवानगी देण्यात आली.मुंबईतील पहिलं रेडिओचं प्रक्षेपण कुलाब्याच्या बॉम्बे प्रेसिडेन्सी क्लबमधून झालं. त्यामुळे तो रेडिओ क्लब म्हणून आजही ओळखला जातो.