शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

रेवणसिद्धेश्वरांच्या पालखी सोहळ्यास प्रारंभ दर्शनासाठी गर्दी : शेवटच्या रविवारी रथोत्सव

By admin | Updated: August 16, 2015 23:44 IST

सोलापूर : ग्रामदैवत शिवयोगी श्री सिद्धरामेश्वरांचे गुरुवर्य असलेले जगद्गुरु श्री रेवणसिद्धेश्वरांच्या पालखी सोहळ्यास रविवारपासून उत्साहाने आणि भक्तिमय वातावरणात प्रारंभ झाला. कंबर तलावासमोरील श्री रेवणसिद्धेश्वर मंदिरात भाविकांनी रविवारी दिवसभर गर्दी केली होती. पालखी सोहळ्याला सुमारे १२५ वर्षांची परंपरा आहे.

सोलापूर : ग्रामदैवत शिवयोगी श्री सिद्धरामेश्वरांचे गुरुवर्य असलेले जगद्गुरु श्री रेवणसिद्धेश्वरांच्या पालखी सोहळ्यास रविवारपासून उत्साहाने आणि भक्तिमय वातावरणात प्रारंभ झाला. कंबर तलावासमोरील श्री रेवणसिद्धेश्वर मंदिरात भाविकांनी रविवारी दिवसभर गर्दी केली होती. पालखी सोहळ्याला सुमारे १२५ वर्षांची परंपरा आहे.
यंदाच्या श्रावण महिन्यात पाच रविवार आले असून, पहिल्या चार रविवारी पालखी सोहळ्याचे आयोजन केले जाते. शेवटच्या पाचव्या रविवारी रथोत्सव साजरा केला जातो. आज (रविवारी) भवानी पेठेतील श्री रेवणसिद्धेश्वर मंगल कार्यालयात मान्यवरांच्या हस्ते पालखीचे पूजन करण्यात आले. तेथून चिद्रे वाड्यात पालखीचे आगमन होते. सुशोभित आणि फुलांची सजवलेल्या चांदीच्या पालखीत श्री रेवणसिद्धेश्वरांची मूर्ती ठेवून विधिवत पूजा केली जाते. सकाळी साडेनऊ वाजता चिद्रे वाड्यातून पालखीचे प्रस्थान झाले. तेथून पालखी मिरवणूक जुना अडत बाजार, माणिक चौक, विजापूरवेस, जिल्हाधिकारी कार्यालयमार्गे गुरुभेट येथे आली. तेथे विसावा घेऊन पालखी पुन्हा रेवणसिद्धेश्वर मंदिराकडे मार्गस्थ झाली. मंदिरात विधिवत पूजा आणि महाप्रसादानंतर पालखी सोहळा चिद्रे वाड्याकडे प्रस्थान झाला. पालखी मिरवणुकीत चंद्रकांत हिंगमिरे, अशोक चाकोते, राजेंद्र इंडे, बसवराज हिंगमिरे, अजित यादवाड, नगरसेवक उदयशंकर चाकोते, युवराज चाकोते, मल्लिनाथ सोलापुरे, सागर अतनुरे, कलशे˜ी आदी सामील झाले होते.
इन्फो बॉक्स
पालखी सोहळ्यापासून समाज दूर
गेल्या अनेक वर्षांपासून पालखी सोहळा पार पडत असताना लिंगायत समाजातील मंडळी मात्र यापासून दूर असतात. २०-२५ वर्षांपूर्वी हजारो भाविकांच्या उपस्थितीत पालखी सोहळा साजरा व्हायचा. मात्र अलीकडे बोटावर मोजण्याइतपत मंडळींवर पालखी सोहळ्याची जबाबदारी आहे. ती जबाबदारी पार पाडत असताना समाजातील इतर मंडळी केवळ बघ्याची भूमिका घेत असतात. यंदाच्या पालखी सोहळ्यात आणि रथोत्सवात हजारोंच्या संख्येने समाजातील स्त्री-पुरुष भाविकांनी सामील व्हावे, असे आवाहन चंद्रकांत हिंगमिरे, युवराज चाकोते, सागर अतनुरे, राजेंद्र इंडे आदींनी केले आहे.