शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
2
मोदी सरकार नववर्षाला गोड भेट देणार! १ जानेवारीपासून सीएनजी आणि पीएनजी स्वस्त होणार
3
कुठल्याही क्षणी अटकेची शक्यता असताना माणिकराव कोकाटे पडले आजारी; लीलावती रुग्णालयात दाखल
4
वाल्मीक कराडला जामीन नाकारला; संतोष देशमुख हत्या प्रकरणात खंडपीठाचा मोठा निकाल
5
भयंकर! लग्नात वाजत होता DJ; १५ वर्षांच्या मुलीला सहन झाला नाही आवाज, हार्ट अटॅकने मृत्यू
6
“किडनी विकावी लागणे शेतकऱ्यांच्या अडचणींची परीसीमा, अतिशय दुर्दैवी”; सुप्रिया सुळेंची टीका
7
'आता निष्पक्ष निवडणुका राहिलेल्या नाहीत', राजदचे खासदार मनोज कुमार झा स्पष्टच बोलले
8
बाजारात सलग तिसऱ्या दिवशी घसरण! टाटा समुहाच्या 'या' कंपनीला सर्वाधिक फटका, IT सेक्टरचा आधार
9
ICC T20 Rankings : तिलक वर्माची उंच उडी! बटलरसह पाकिस्तानच्या साहिबजादा फरहानला फटका
10
घाई करू नका! नवीन स्मार्टफोन खरेदी करण्यासाठी 'ही' आहे सर्वोत्तम वेळ; हमखास वाचतात तुमचे हजारो रुपये..
11
Secret Santa : अरे व्वा! ऑफिसमध्ये 'सीक्रेट सँटा'साठी गिफ्ट द्यायचंय? ५०० रुपयांपर्यंतचे झक्कास पर्याय
12
IPL 2026: "मला नवं आयुष्य दिल्याबद्दल धन्यवाद" पिवळी जर्सी मिळताच मुंबईच्या पोराची इमोशनल पोस्ट!
13
वंदे भारत की राजधानी, कोणत्या ट्रेनच्या लोको पायलटला सर्वाधिक पगार मिळतो? आकडा पाहून व्हाल थक्क
14
कर्जदारांना 'अच्छे दिन'! भारतीय अर्थव्यवस्था 'गोल्डीलॉक्स' स्थितीत; गव्हर्नर मल्होत्रा म्हणाले...
15
पहिल्याच बैठकीत जागावाटपावरून 'मविआ'त काडीमोड, पवारांच्या नेत्यांचा बैठकीतून वॉक आऊट
16
रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! वेटिंग-RAC तिकिटाची स्थिती आता १० तास आधी कळणार
17
काँग्रेसची कार्यकर्ती, वरपर्यंत ओळख असल्याचं सांगून आणायची प्रेमासाठी दबाव, त्रस्त पोलीस इन्स्पेक्टरची महिलेविरोधात तक्रार
18
मुंबई इंडियन्सची 'ती गोष्ट 'जितेंद्र भाटवडेकर'च्या मनाला लागली? रोहितसोबतचा फोटो शेअर करत म्हणाला...
19
‘टॅरिफला आता हत्यार बनवले जातेय’, निर्मला सीतारमण यांनी सांगितला 'ट्रम्प टॅरिफ'मागील खेळ...
20
ICICI Prudential AMC IPO Allotment: कसं चेक कराल अलॉटमेंट स्टेटस? जीएमपीमध्येही जोरदार तेजी
Daily Top 2Weekly Top 5

रेवणसिद्धेश्वरांच्या पालखी सोहळ्यास प्रारंभ दर्शनासाठी गर्दी : शेवटच्या रविवारी रथोत्सव

By admin | Updated: August 16, 2015 23:44 IST

सोलापूर : ग्रामदैवत शिवयोगी श्री सिद्धरामेश्वरांचे गुरुवर्य असलेले जगद्गुरु श्री रेवणसिद्धेश्वरांच्या पालखी सोहळ्यास रविवारपासून उत्साहाने आणि भक्तिमय वातावरणात प्रारंभ झाला. कंबर तलावासमोरील श्री रेवणसिद्धेश्वर मंदिरात भाविकांनी रविवारी दिवसभर गर्दी केली होती. पालखी सोहळ्याला सुमारे १२५ वर्षांची परंपरा आहे.

सोलापूर : ग्रामदैवत शिवयोगी श्री सिद्धरामेश्वरांचे गुरुवर्य असलेले जगद्गुरु श्री रेवणसिद्धेश्वरांच्या पालखी सोहळ्यास रविवारपासून उत्साहाने आणि भक्तिमय वातावरणात प्रारंभ झाला. कंबर तलावासमोरील श्री रेवणसिद्धेश्वर मंदिरात भाविकांनी रविवारी दिवसभर गर्दी केली होती. पालखी सोहळ्याला सुमारे १२५ वर्षांची परंपरा आहे.
यंदाच्या श्रावण महिन्यात पाच रविवार आले असून, पहिल्या चार रविवारी पालखी सोहळ्याचे आयोजन केले जाते. शेवटच्या पाचव्या रविवारी रथोत्सव साजरा केला जातो. आज (रविवारी) भवानी पेठेतील श्री रेवणसिद्धेश्वर मंगल कार्यालयात मान्यवरांच्या हस्ते पालखीचे पूजन करण्यात आले. तेथून चिद्रे वाड्यात पालखीचे आगमन होते. सुशोभित आणि फुलांची सजवलेल्या चांदीच्या पालखीत श्री रेवणसिद्धेश्वरांची मूर्ती ठेवून विधिवत पूजा केली जाते. सकाळी साडेनऊ वाजता चिद्रे वाड्यातून पालखीचे प्रस्थान झाले. तेथून पालखी मिरवणूक जुना अडत बाजार, माणिक चौक, विजापूरवेस, जिल्हाधिकारी कार्यालयमार्गे गुरुभेट येथे आली. तेथे विसावा घेऊन पालखी पुन्हा रेवणसिद्धेश्वर मंदिराकडे मार्गस्थ झाली. मंदिरात विधिवत पूजा आणि महाप्रसादानंतर पालखी सोहळा चिद्रे वाड्याकडे प्रस्थान झाला. पालखी मिरवणुकीत चंद्रकांत हिंगमिरे, अशोक चाकोते, राजेंद्र इंडे, बसवराज हिंगमिरे, अजित यादवाड, नगरसेवक उदयशंकर चाकोते, युवराज चाकोते, मल्लिनाथ सोलापुरे, सागर अतनुरे, कलशे˜ी आदी सामील झाले होते.
इन्फो बॉक्स
पालखी सोहळ्यापासून समाज दूर
गेल्या अनेक वर्षांपासून पालखी सोहळा पार पडत असताना लिंगायत समाजातील मंडळी मात्र यापासून दूर असतात. २०-२५ वर्षांपूर्वी हजारो भाविकांच्या उपस्थितीत पालखी सोहळा साजरा व्हायचा. मात्र अलीकडे बोटावर मोजण्याइतपत मंडळींवर पालखी सोहळ्याची जबाबदारी आहे. ती जबाबदारी पार पाडत असताना समाजातील इतर मंडळी केवळ बघ्याची भूमिका घेत असतात. यंदाच्या पालखी सोहळ्यात आणि रथोत्सवात हजारोंच्या संख्येने समाजातील स्त्री-पुरुष भाविकांनी सामील व्हावे, असे आवाहन चंद्रकांत हिंगमिरे, युवराज चाकोते, सागर अतनुरे, राजेंद्र इंडे आदींनी केले आहे.