शहरं
Join us  
Trending Stories
1
शशी थरूर भाजपात जाणार? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
2
Tejasvi Ghosalkar: "उद्धव ठाकरे माझे कुटुंबप्रमुख, मी अजूनही...", बँकेचं संचालकपद मिळाल्यानंतर तेजस्वी घोसाळकरांचं स्पष्टीकरण
3
ICICI ला HDFC चं अधिग्रहण करायचं होतं, चंदा कोचर यांच्यासमोर दीपक पारेखांनी उघडलं गुपित
4
विमान अपघातानंतर ९ दिवसांनी दीपक पठक यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार
5
तेरी दिवानी...! शुबमन गिलच्या सेंच्युरीनंतर फॅन गर्लचा तो खास व्हिडिओ व्हायरल
6
पत्नीची हत्या करून मृतदेह घराबाहेर पुरला, पोलीस आणि नातेवाईकांना असा दिला चकवा, दोन महिने सांगायचा...  
7
Air India Plane Crash: नव्या पाहुण्याचं स्वागत करण्याआधीच सगळं संपलं; ७ महिन्याची गर्भवती होती जिनल
8
Iran Israel युद्घात अजब चोरी; इस्रायली हॅकर्सनं ८०० कोटींची क्रिप्टोकरन्सी केली नष्ट, प्रकरण काय?
9
Yogini Ekadashi 2025: एखाद्या व्यक्तीने दिलेला शाप योगिनी एकादशी व्रताचरणामुळे होतो दूर!
10
खळबळ उडाली! जीन्स अन् टॉपमध्ये दिसू लागल्या हायफाय भिकारी, लोक १००-२०० रुपये देऊ लागले... 
11
Beed Crime News : बीडमध्ये पैशांसाठी अपहरण, मुलासाठी ५० हजार रुपयांची मागणी; नेमकं प्रकरण काय?
12
चीन-पाकिस्तानचं वाढणार टेन्शन; भारताला लवकरच मिळणार हायटेक्निक मिसाईल, कसं करणार काम?
13
हास्यास्पद! पाऊस पडतोय म्हणून नाही आणले...; एअर इंडियाची दोन विमाने लगेज न घेताच आली
14
"इराण भारताचा जुना मित्र, दुसरीकडे इस्त्रायल..."; मध्य पूर्वेतील युद्धावर सोनिया गांधी स्पष्ट बोलल्या
15
Air India :'या' तीन कर्मचाऱ्यांना तात्काळ बडतर्फ करा'; अहमदाबाद विमान अपघातानंतर एअर इंडियाला डीजीसीएचे आदेश
16
"संपूर्ण युक्रेन आमचा..."; पुतिन यांनी झेलेन्स्की यांच्या संपूर्ण देशावरच ठोकला दावा! मिळालं असं उत्तर
17
ऑफिसला न जाताच कर्मचाऱ्याला मिळाले २६ लाख रुपये; कोर्टाने दिला मोठा निर्णय
18
"मी इनसाइडर असते तर बरं झालं असतं", इंडस्ट्रीतील स्ट्रगलवर लोकप्रिय अभिनेत्रीची क्रिप्टिक पोस्ट
19
"गोयंकाजी पाहताय ना?’’, इंग्लंडमध्ये पंतच्या फटकेबाजीनंतर फॅन्सनी घेतली लखनौच्या मालकांची शाळा  
20
हनीमुनचा प्लॅन, रसगुल्लामध्ये विष भरले अन्...; बेवफा सोनमपेक्षाही खतरनाक आहे खूनी 'मुस्कान'

रेवणसिद्धेश्वरांच्या पालखी सोहळ्यास प्रारंभ दर्शनासाठी गर्दी : शेवटच्या रविवारी रथोत्सव

By admin | Updated: August 16, 2015 23:44 IST

सोलापूर : ग्रामदैवत शिवयोगी श्री सिद्धरामेश्वरांचे गुरुवर्य असलेले जगद्गुरु श्री रेवणसिद्धेश्वरांच्या पालखी सोहळ्यास रविवारपासून उत्साहाने आणि भक्तिमय वातावरणात प्रारंभ झाला. कंबर तलावासमोरील श्री रेवणसिद्धेश्वर मंदिरात भाविकांनी रविवारी दिवसभर गर्दी केली होती. पालखी सोहळ्याला सुमारे १२५ वर्षांची परंपरा आहे.

सोलापूर : ग्रामदैवत शिवयोगी श्री सिद्धरामेश्वरांचे गुरुवर्य असलेले जगद्गुरु श्री रेवणसिद्धेश्वरांच्या पालखी सोहळ्यास रविवारपासून उत्साहाने आणि भक्तिमय वातावरणात प्रारंभ झाला. कंबर तलावासमोरील श्री रेवणसिद्धेश्वर मंदिरात भाविकांनी रविवारी दिवसभर गर्दी केली होती. पालखी सोहळ्याला सुमारे १२५ वर्षांची परंपरा आहे.
यंदाच्या श्रावण महिन्यात पाच रविवार आले असून, पहिल्या चार रविवारी पालखी सोहळ्याचे आयोजन केले जाते. शेवटच्या पाचव्या रविवारी रथोत्सव साजरा केला जातो. आज (रविवारी) भवानी पेठेतील श्री रेवणसिद्धेश्वर मंगल कार्यालयात मान्यवरांच्या हस्ते पालखीचे पूजन करण्यात आले. तेथून चिद्रे वाड्यात पालखीचे आगमन होते. सुशोभित आणि फुलांची सजवलेल्या चांदीच्या पालखीत श्री रेवणसिद्धेश्वरांची मूर्ती ठेवून विधिवत पूजा केली जाते. सकाळी साडेनऊ वाजता चिद्रे वाड्यातून पालखीचे प्रस्थान झाले. तेथून पालखी मिरवणूक जुना अडत बाजार, माणिक चौक, विजापूरवेस, जिल्हाधिकारी कार्यालयमार्गे गुरुभेट येथे आली. तेथे विसावा घेऊन पालखी पुन्हा रेवणसिद्धेश्वर मंदिराकडे मार्गस्थ झाली. मंदिरात विधिवत पूजा आणि महाप्रसादानंतर पालखी सोहळा चिद्रे वाड्याकडे प्रस्थान झाला. पालखी मिरवणुकीत चंद्रकांत हिंगमिरे, अशोक चाकोते, राजेंद्र इंडे, बसवराज हिंगमिरे, अजित यादवाड, नगरसेवक उदयशंकर चाकोते, युवराज चाकोते, मल्लिनाथ सोलापुरे, सागर अतनुरे, कलशे˜ी आदी सामील झाले होते.
इन्फो बॉक्स
पालखी सोहळ्यापासून समाज दूर
गेल्या अनेक वर्षांपासून पालखी सोहळा पार पडत असताना लिंगायत समाजातील मंडळी मात्र यापासून दूर असतात. २०-२५ वर्षांपूर्वी हजारो भाविकांच्या उपस्थितीत पालखी सोहळा साजरा व्हायचा. मात्र अलीकडे बोटावर मोजण्याइतपत मंडळींवर पालखी सोहळ्याची जबाबदारी आहे. ती जबाबदारी पार पाडत असताना समाजातील इतर मंडळी केवळ बघ्याची भूमिका घेत असतात. यंदाच्या पालखी सोहळ्यात आणि रथोत्सवात हजारोंच्या संख्येने समाजातील स्त्री-पुरुष भाविकांनी सामील व्हावे, असे आवाहन चंद्रकांत हिंगमिरे, युवराज चाकोते, सागर अतनुरे, राजेंद्र इंडे आदींनी केले आहे.