शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
3
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
4
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
5
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
6
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
7
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
8
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
9
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
10
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
11
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
12
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
13
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
14
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
15
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
16
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
17
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
18
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
19
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
20
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी

राष्ट्रपती कोविंद यांच्या पहिल्याच भाषणावर काँग्रेसचा जोरदार आक्षेप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2017 21:51 IST

संसदेच्या सेंट्रल हॉलमधे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी शपथ ग्रहणानंतर केलेले पहिलेच भाषण वादग्रस्त ठरले

सुरेश भटेवरा

नवी दिल्ली, दि. 26 - संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी शपथ ग्रहणानंतर केलेले पहिलेच भाषण वादग्रस्त ठरले आहे. आपल्या भाषणात राष्ट्रपतींनी महात्मा गांधींबरोबर दीनदयाल उपाध्याय यांच्या नावाचा उल्लेख करून दोघांच्या कार्याची तुलना केली. त्याचबरोबर पंडित जवाहरलाल नेहरू आणि इंदिरा गांधींचा नामोल्लेख करणे कटाक्षाने टाळले. राज्यसभेत काँग्रेसचे उपनेते आनंद शर्मा यांनी त्यावर अत्यंत त्वेषाने गंभीर आक्षेप नोंदवला. सभागृहाचे नेते अर्थमंत्री जेटली आनंद शर्मांच्या आक्षेपावर प्रचंड भडकले आणि म्हणाले, सभागृहात राष्ट्रपतींच्या भाषणावर चर्चा कशी होऊ शकते, त्यावर आक्षेप नोंदवण्याचे औचित्य काय ? जेटलींच्या विधानावर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये तुफान खडाजंगी झाली.शपथ ग्रहण सोहळ्यानंतर राष्ट्राला संबोधित करताना रामनाथ कोविंद म्हणाले, ‘हमें तेजीसे विकसित होनेवाली एक मजबूत अर्थव्यवस्था, एक शिक्षित, नैतिक और साझा समुदाय, समान मूल्योंवाले और समान अवसर देनेवाले समाज का निर्माण करना होगा... एक ऐसा समाज, जिसकी कल्पना महात्मा गांधी और दीनदयाल उपाध्यायजी ने की थी... ये हमारे मानवीय मूल्योंके लिए भी महत्वपूर्ण है... ये हमारे सपनों का भारत होगा... इक्किसवी सदी में ऐसाही भारत हम सब चाहते है, जो सभी को समान अवसर सुनिश्चित करेगा’।निवडक उल्लेखांचे राष्ट्रपतींचे हे भाषण म्हणजे महात्मा गांधी आणि पंडित नेहरूंचा सरळ सरळ अपमान आहे, असा आरोप करीत आनंद शर्मा म्हणाले, महात्मा गांधींबरोबर दीनदयाल उपाध्याय यांचे नाव जोडून दोघांची तुलना घडवणे, सर्वथा आक्षेपार्ह आहे. भाषणाच्या सुरुवातीला कोविंद यांनी केवळ सरदार वल्लभभाई पटेलांचा उल्लेख केला. जवाहरलाल नेहरू आणि इंदिरा गांधींचे नामोल्लेख कटाक्षाने टाळला त्याबद्दलही आनंद शर्मांनी कडक शब्दात नाराजी व्यक्त केली.