शहरं
Join us  
Trending Stories
1
अहिल्यानगर येथे रांगोळीवरून तणाव, CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “जाणीवपूर्वक...”
2
बैलाला साखळी घालतात तसे दिसते; अजित पवार ज्वेलरी शॉपच्या उद्घाटनाला गेले, गोल्डमॅन म्हणून वावरणाऱ्यांना फटकारले
3
एका सल्ल्यासाठी ₹११ कोटी! पीकेंच्या कमाईचे आकडे पाहून चक्रावून जाल; ₹९८ कोटी दान केले...
4
'त्या नारी शक्तीचे एक उदाहरण...', पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जॉर्जिया मेलोनी यांच्या आत्मचरित्राला प्रस्तावना लिहिली
5
प्रशांत किशोर यांची 3 वर्षांची कमाई बघून थक्क व्हाल, जन सूरज पक्षाला डोनेट केले तब्बल 98 कोटी!
6
अरेरे! लहान वयात केस पिकले, नारळाच्या तेलात 'हे' मिसळा; चिंता सोडा, पांढऱ्या केसांना टाटा करा
7
'तुला तुरुंगामध्ये टाकेन हा, मी तुला सांगतोय'; अजित पवारांच्या संतापाचा कडेलोट, दीड कोटींच्या उधारीचं प्रकरण काय?
8
'हे' मेड इन इंडिया मॅसेजिंग अ‍ॅप घेणार WhatsApp ची जागा? दुर्गम भागातील लोकांना होणार फायदा?
9
एशिया कप 2025 चा हिरो: विजयाचा तिलक लावला खरा, पण कुटुंबाचे २०२२ पर्यंत स्वत:चे घर नव्हते...; वडील इलेक्ट्रीशिअन...
10
ऑटो कंपन्यांचे पाकिस्तानातून पलायन! सरकारकडून सेकंड हॅन्ड गाड्यांना आयात करण्यासाठी परवानगी
11
PM मोदींच्या 'X' पोस्टने पाकिस्तानचे मंत्री मोहसिन नकवी अन् ख्वाजा आसिफचा 'थयथयाट', म्हणाले...
12
वनप्लस १३ नंतर १४ नाही, थेट १५ सिरीज बाजारात आणणार; भारतात कधी लाँच होणार... 
13
Ahilyanagar: मुस्लीम धर्मगुरूंच्या नावाची रस्त्यावर रांगोळी; अहिल्यानगरमध्ये तणाव, 'रास्ता रोको'नंतर लाठीचार्ज
14
सणासुदीच्या काळात सावध राहा! सायबर गुन्हेगार AI वापरुन करतायेत फसवणूक; कसं राहाल सुरक्षित?
15
IND vs PAK : क्रिकेटमध्ये राजकारण आणणारा तू पहिला कॅप्टन! सूर्यानं पाक पत्रकाराला असा दिला रिप्लाय (VIDEO)
16
'अगदी बरोबर केलं...!'; पहलगाम दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झालेल्या विनय नरवाल यांचे वडील टीम इंडियावर खुश!
17
आता टीम इंडियाला मिळणार नाही आशिया चषकाची ट्रॉफी? काय आहे ICCचा नियम, जाणून घ्या
18
जन्मदातीने सोडलं, परदेशी जोडप्यानं सांभाळलं; ३८ वर्षांनी स्वित्झर्लंडची नताशा मुंबईत, खऱ्या आईला भेटली
19
भारताविरोधात लढत होता पाकिस्तानी नेव्हीचा अधिकारी, खेळलाही...; पण गुडघे टेकत पराभूत झाला...
20
ज्यांनी भावाची चौकशी केली नाही, ते गावाची काय करणार; शिवाजी सावंतांचा तानाजी सावंतांवर आरोप

कृषी कर्जमाफी योजनेवर रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरांचे प्रश्नचिन्ह

By admin | Updated: December 27, 2014 23:38 IST

उदयपूर - सरकारच्या कृषी कर्जमाफी योजनांवर प्रश्नचिन्ह उभे करताना रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांनी अशाप्रकारच्या योजनांनी शेतकऱ्यांना मिळणारा कर्जपुरवठा प्रभावित केल्याचे म्हटले आहे. भारतीय आर्थिक संघाच्या वार्षिक संमेलनात बोलताना त्यांनी काही राज्यांमध्ये अनेक प्रसंगी कर्जमाफी दिली गेली. या माफी योजना कितपत यशस्वी झाल्या. आपल्यासमोर यासंदर्भात जे अध्ययन आले त्यात या योजना निकामी ठरल्याचेच दिसले. खरे तर या योजनांमुळेच शेतकऱ्यांना दिला जाणारा कर्ज पुरवठा खंडित झाला आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्यांवर बोलताना राजन यांनी हा अत्यंत महत्त्वपूर्ण व संवेदनशील मुद्दा असून, त्याची सखोल तपासणी केली जाण्याची गरज व्यक्त केली. कृषी क्षेत्र हे कर्जाच्या ओझ्यातून कसे मुक्त होऊ शकते, हा एक प्रश्न आहे व त्यासाठी आपल्यासमोर काय पर्याय असू शकतात, याचसोब

उदयपूर - सरकारच्या कृषी कर्जमाफी योजनांवर प्रश्नचिन्ह उभे करताना रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांनी अशाप्रकारच्या योजनांनी शेतकऱ्यांना मिळणारा कर्जपुरवठा प्रभावित केल्याचे म्हटले आहे. भारतीय आर्थिक संघाच्या वार्षिक संमेलनात बोलताना त्यांनी काही राज्यांमध्ये अनेक प्रसंगी कर्जमाफी दिली गेली. या माफी योजना कितपत यशस्वी झाल्या. आपल्यासमोर यासंदर्भात जे अध्ययन आले त्यात या योजना निकामी ठरल्याचेच दिसले. खरे तर या योजनांमुळेच शेतकऱ्यांना दिला जाणारा कर्ज पुरवठा खंडित झाला आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्यांवर बोलताना राजन यांनी हा अत्यंत महत्त्वपूर्ण व संवेदनशील मुद्दा असून, त्याची सखोल तपासणी केली जाण्याची गरज व्यक्त केली. कृषी क्षेत्र हे कर्जाच्या ओझ्यातून कसे मुक्त होऊ शकते, हा एक प्रश्न आहे व त्यासाठी आपल्यासमोर काय पर्याय असू शकतात, याचसोबत शेतकऱ्यांच्या आत्महत्यांच्या मुद्यावरही विचार केला गेला पाहिजे. आत्महत्यांमागे कर्जबाजारी होण्याचे कारण कितपत आहे; तसेच त्यांच्यावरील हे ओझे किती कमी झाले आहे हे तपासले पाहिजे, असे मत राजन यांनी पुढे व्यक्त केले.
आंध्र व तेलंगणाच्या सरकारांनी मागील वर्षी राज्यात आलेल्या फॅलिन चक्रीवादळापायी शेतीची नासाडी झाल्याने शेतकऱ्यांकरिता कर्जमाफीची घोषणा केली होती.
तेलंगणाने माफ केलेल्या कर्जाचा २५ टक्के हिस्सा बँकांना दिला असून, आंध्र प्रदेशाने अद्यापही तो तसा दिलेला नाही. या दोन्ही राज्यांमध्ये कृषी क्षेत्राकरिता बँकांनी १.३ लाख कोटींचे कर्ज दिले होते.
कृषी क्षेत्राला जे अनुदान दिले जाते ते खऱ्या अर्थाने कृषी क्षेत्रासाठी उपयुक्त ठरते अथवा नाही, हे पाहावे लागेल. कृषी क्षेत्राला कमी दरात कर्ज दिले जात आहे व सरकार कर्जमाफी देते आहे. त्यामुळे या कर्जाचा योग्य उपयोग होतो आहे का की त्याचा गैरवापर होतो आहे आणि कर्जबाजारीपणा वाढतो आहे का हेही तपासले जावे, असेही प्रतिपादन राजन यांनी पुढे केले.