शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
2
मोठी बातमी! भारत-ओमानमध्ये मुक्त व्यापार करार; देशातील 'या' उद्योगांना थेट फायदा
3
हरियाणामधील भाजपा सरकार संकटात, काँग्रेसने आणला अविश्वास प्रस्ताव, उद्या होणार चर्चा, असं आहे बहुमताचं गणित
4
Ishant Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
5
एक योजना महात्मा गांधी के नाम...! मनरेगाचं नाव बदलण्याच्या धामधुमीतच ममता बॅनर्जींची मोठी घोषणा
6
"अजूनही अश्लील प्रश्न विचारतात, घाणेरड्या नावाने हाक मारतात..."; MMS कांडवर स्पष्टच बोलली अंजली
7
अमेरिकेकडून आणखी एक जहाजावर हल्ला, ४ जणांचा मृत्यू, व्हेनेझुएलाने घेतला मोठा निर्णय  
8
"प्रज्ञा सातव यांच्या राजीनाम्याची घटना दुर्दैवी, सत्तेच्या आणि पैशाच्या जोरावर भाजपा…’’ नाना पटोले यांची टीका   
9
हा घ्या पुरावा! पाकिस्तान पुसतोय 'ऑपरेशन सिंदूर'च्या खुणा; एअर बेसवरील बिल्डिंग लाल ताडपत्रीने झाकली
10
SMAT Final 2025 : पुण्याच्या मैदानात ईशान किशनचा शानदार शो! BCCI निवडकर्त्यांसोर षटकार चौकारांचा पाऊस
11
भारताकडे BRICS चे अध्यक्षपद; जागतिक भू-राजकीय तणावात महत्वाची भूमिका बजावणार
12
३१ डिसेंबरसाठी गोव्यात जाताय? कोकण रेल्वेवर विशेष सेवा; पाहा, वेळा, थांबे अन् वेळापत्रक
13
जबरदस्त फिचर्ससह OnePlus 15R भारतात लॉन्च, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स!
14
रुपया ९१ च्या पार! स्वयंपाकघर ते परदेशी शिक्षणासह 'या' गोष्टी महाग होणार; 'हे' कधी थांबणार?
15
Wang Kun: दारू नाही, पार्टी नाही, आहारही साधा...; तरीही प्रसिद्ध बॉडीबिल्डरचा वयाच्या ३० व्या वर्षी मृत्यू!
16
प्रज्ञा सातव यांच्या भाजपा प्रवेशावरून काँग्रेसची टीका; नेते म्हणाले, “हे स्वार्थी लोक...”
17
कार घेण्याचं स्वप्न आता होणार पूर्ण! पाहा कोणत्या बँकेत मिळतंय सर्वात स्वस्त 'कार लोन'
18
Vijay Hazare Trophy : IPL मधील 'अनसोल्ड' खेळाडूच्या कॅप्टन्सीत खेळणार KL राहुल! करुण नायरलाही 'प्रमोशन'
19
Video - लेकीच्या जन्मानंतर बाबांचा आनंद गगनात मावेना; ‘धुरंधर’ स्टाईलमध्ये केला भन्नाट डान्स
20
पळपुट्या विजय माल्याच्या वाढदिवसानिमित्त ललित मोदीने दिली जंगी पार्टी, सोशल मीडियावर झाले ट्रोल
Daily Top 2Weekly Top 5

भारताच्या वाघ यशकथेवर ‘आॅक्सफर्ड’चे प्रश्नचिन्ह

By admin | Updated: February 24, 2015 23:17 IST

भारतातील वाघांच्या संख्येत वाढ झाल्याचे सरकारने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीतून दिसून येते. मात्र, ही आकडेवारी अकाली आणि चुकीच्या संशोधन पद्धतीवर आधारित असल्याचा दावा आॅक्सफर्डमधील शास्त्रज्ञांच्या

लंडन : भारतातील वाघांच्या संख्येत वाढ झाल्याचे सरकारने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीतून दिसून येते. मात्र, ही आकडेवारी अकाली आणि चुकीच्या संशोधन पद्धतीवर आधारित असल्याचा दावा आॅक्सफर्डमधील शास्त्रज्ञांच्या एका गटाने केला आहे. या गटाने चुकीची संशोधन पद्धती अवलंबल्याने भारत सरकारच्या आकडेवारीच्या विश्वसनीयतेवरच प्रश्न उपस्थित केले आहेत.वाघ आणि इतर दुर्मिळ वन्य प्राण्यांच्या गणनेसाठी वापरात असलेल्या सर्वसाधारण पद्धतीत अचूकतेच्या दृष्टीने अनेक कमतरता आहेत. यामुळे अशा सर्वेक्षणांची अचूकता संशयाच्या भोवऱ्यात सापडते, असे या संशोधकांचे म्हणणे आहे. आॅक्सफर्ड विद्यापीठ, भारतीय सांख्यिकी संस्था आणि वन्यजीव संवर्धन संस्था यांच्या शास्त्रज्ञांचा समावेश असलेल्या एका गटाने प्रथमच वाघांच्या गणनेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. सध्या वापरात असलेल्या ‘अंश शोधन निर्देशांक’ पद्धतीत अंगभूत कमतरता आहेत. यामुळे अचूक निष्कर्ष निघणे अडचणीचे ठरते असा दावा या गटाने केला आहे. भारतीय राष्ट्रीय वाघ सर्वेक्षण संस्थेने जानेवारी २०१५ च्या अहवालात वाघांच्या संख्येत ३० टक्के वाढ झाल्याचे म्हटले आहे. गेल्या चार वर्षांत ही वाढ झाली आहे. सर्वेक्षणानुसार २०१४ मध्ये २,२२६ वाघ होते. २०१० मधील वाघांच्या तुलनेत यात ३० टक्के वाढ नोंदली गेली आहे.‘आमच्या अभ्यासातून अंश शोधन निर्देशांक अर्थात इंडेक्स कॅलिब्रेशन पद्धती संशोधनासाठी कुचकामी असल्याचे दिसून येते. भारतीय वाघ सर्वेक्षण अहवालात सादर करण्यात आलेल्या आकडेवारीचा अनुभवाधिष्ठित पद्धतीने अभ्यास केला. यात अंश शोधन पुनरुत्पादनीय आणि चुकीचे असल्याचे स्पष्ट होते,’ असा दावा या अभ्यास गटाचे प्रमुख अर्जुन गोपालस्वामी यांनी केला आहे. (वृत्तसंस्था)