शहरं
Join us  
Trending Stories
1
Kamchatka Krai earthquake Russia: समुद्राच्या खाली एकामागोमाग एक ३० धक्के! अमेरिकेच्या समुद्र किनाऱ्यावर सहा फूट लाटा उसळल्या, जगभरात हाहाकार... 
2
१९५२ नंतरचा सर्वात शक्तिशाली भूकंप, रिंग्ज ऑफ फायर'ला बोलतात खरा खलनायक'
3
कृषिमंत्री कोकाटे किती मिनिटे रमी खेळत होते?, विधिमंडळ चौकशी अहवालात उघड, रोहित पवारांचा दावा
4
IND vs PAK 1st Semi Final : जे नको तेच घडलं! या स्पर्धेत जुळून आला भारत-पाक सेमीचा योग
5
दोन मोर्चांवर वेगळे लढले...! विरूच्या निधनानंतर महिन्याभराने जयनेही प्राण सोडले; गीरचे जंगल आता त्यांच्या मैत्रीच्या गोष्टी सांगणार...
6
Aditya Infotech IPO: इश्यू उघडताच GMP मध्ये तुफान तेजी; गुंतवणुकदारांना मिळू शकतो जबरदस्त नफा
7
महाराष्ट्रासाठी काँग्रेसने रणनीती आखली; रमेश चेन्नीथेला आणि हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर मोठी जबाबदारी
8
"हा माझा नवरा"; इन्स्पेक्टरच्या मृत्यूनंतर हायव्होल्टेज ड्रामा; मृतदेहासाठी २ बायका भिडल्या, अखेर...
9
NSDL IPO: ८०० रुपये प्राईज बँड, १२७ रुपये GMP; LIC नं केली गुंतवणूक, तुमचा विचार काय?
10
सलमान खानला भेटण्यासाठी ३ अल्पवयीन मुलांनी केला मोठा कांड; २ राज्यांची पोलीस झाली हैराण
11
रश्मिका मंदानाची कॉपी? छत्रपती संभाजीनगरची लेक, विजय देवरकोंडासोबत करणार रोमान्स
12
'ऑपरेशन महादेव'नंतर आता 'ऑपरेशन शिवशक्ती' सुरू! भारतीय सैन्याने दोन दहशतवाद्यांना घातलं कंठस्नान
13
थंडबस्त्यात गेला अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' सिनेमा, रेणुका शहाणे म्हणाल्या - "मला धक्काच बसला.."
14
कमाल! स्मार्टफोन App द्वारे आतड्यांतील बॅक्टेरियावर नियंत्रण, आली ओरल कॅप्सूल, कसा होणार फायदा?
15
Kamchatka Earthquake: ५ जुलैचे भविष्य ३० जुलैला खरे होणार? रशियातील भुकंपाच्या उंच लाटा जपानच्या किनाऱ्यावर धडकू लागल्या...
16
"दीड लाख देऊन इथं आलोय, मला बोलू द्या..."; संसदेत हजेरी लावणं खासदार राशीद यांना इतकं महाग का पडलं?
17
Reliance Jio ची आपल्या ग्राहकांना मोठी भेट; फक्त ₹५९९ मध्ये घरच्या TV ला बनवा कॉम्प्यूटर
18
PM किसान योजनेचा २० वा हप्ता जाहीर! २००० रुपये थेट बँक खात्यात, लगेच 'असं' तपासा तुमचं नाव!
19
UPI मध्ये १ ऑगस्टपासून होणार बदल; बॅलन्स चेक ते ऑटो-पे पर्यंत सर्वकाही बदलणार, पाहा तुमच्यासाठी काय नवं?
20
भीक मागणाऱ्या व्यक्तीच्या दोन बायका, आता त्याची तक्रार तर ऐका; कलेक्टरकडे पोहोचला अन् म्हणाला...

भारताच्या वाघ यशकथेवर ‘आॅक्सफर्ड’चे प्रश्नचिन्ह

By admin | Updated: February 24, 2015 23:17 IST

भारतातील वाघांच्या संख्येत वाढ झाल्याचे सरकारने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीतून दिसून येते. मात्र, ही आकडेवारी अकाली आणि चुकीच्या संशोधन पद्धतीवर आधारित असल्याचा दावा आॅक्सफर्डमधील शास्त्रज्ञांच्या

लंडन : भारतातील वाघांच्या संख्येत वाढ झाल्याचे सरकारने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीतून दिसून येते. मात्र, ही आकडेवारी अकाली आणि चुकीच्या संशोधन पद्धतीवर आधारित असल्याचा दावा आॅक्सफर्डमधील शास्त्रज्ञांच्या एका गटाने केला आहे. या गटाने चुकीची संशोधन पद्धती अवलंबल्याने भारत सरकारच्या आकडेवारीच्या विश्वसनीयतेवरच प्रश्न उपस्थित केले आहेत.वाघ आणि इतर दुर्मिळ वन्य प्राण्यांच्या गणनेसाठी वापरात असलेल्या सर्वसाधारण पद्धतीत अचूकतेच्या दृष्टीने अनेक कमतरता आहेत. यामुळे अशा सर्वेक्षणांची अचूकता संशयाच्या भोवऱ्यात सापडते, असे या संशोधकांचे म्हणणे आहे. आॅक्सफर्ड विद्यापीठ, भारतीय सांख्यिकी संस्था आणि वन्यजीव संवर्धन संस्था यांच्या शास्त्रज्ञांचा समावेश असलेल्या एका गटाने प्रथमच वाघांच्या गणनेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. सध्या वापरात असलेल्या ‘अंश शोधन निर्देशांक’ पद्धतीत अंगभूत कमतरता आहेत. यामुळे अचूक निष्कर्ष निघणे अडचणीचे ठरते असा दावा या गटाने केला आहे. भारतीय राष्ट्रीय वाघ सर्वेक्षण संस्थेने जानेवारी २०१५ च्या अहवालात वाघांच्या संख्येत ३० टक्के वाढ झाल्याचे म्हटले आहे. गेल्या चार वर्षांत ही वाढ झाली आहे. सर्वेक्षणानुसार २०१४ मध्ये २,२२६ वाघ होते. २०१० मधील वाघांच्या तुलनेत यात ३० टक्के वाढ नोंदली गेली आहे.‘आमच्या अभ्यासातून अंश शोधन निर्देशांक अर्थात इंडेक्स कॅलिब्रेशन पद्धती संशोधनासाठी कुचकामी असल्याचे दिसून येते. भारतीय वाघ सर्वेक्षण अहवालात सादर करण्यात आलेल्या आकडेवारीचा अनुभवाधिष्ठित पद्धतीने अभ्यास केला. यात अंश शोधन पुनरुत्पादनीय आणि चुकीचे असल्याचे स्पष्ट होते,’ असा दावा या अभ्यास गटाचे प्रमुख अर्जुन गोपालस्वामी यांनी केला आहे. (वृत्तसंस्था)