शहरं
Join us  
Trending Stories
1
सणासुदीच्या तोंडावर सोन्या-चांदीचे दर घसरले! तुमच्या शहरात आज एका तोळ्याची किंमत किती?
2
POKमध्ये पाकचे अत्याचार, भारताची पहिली प्रतिक्रिया; असीम मुनीर यांचा घेतला खरपूस समाचार
3
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
4
'आता संयम ठेवणार नाही; पाकिस्तानला जगाच्या नकाशावरुन मिटवू...', लष्करप्रमुखांचा पाकला थेट इशारा
5
“मुंबईच्या गरब्यात सेलिब्रिटींवर लाखोंची उधळण, तेच पैसे शेतऱ्यांना दिले असते”: रोहित पाटील
6
इंट्राडे उच्चांकावरून थेट ११% घसरला हा शेअर, गुंतवणूकदारांना मोठा फटका; रेखा झुनझुनवालांचीही गुंतवणूक
7
Bhiwandi Crime: तोंडात कुरकुरे अन् निपचित पडलेला मृतदेह; कोर्टातून फरार झालेल्या आरोपीचा चिमुकलीवर अत्याचार
8
सचिन तेंडुलकरची गुंतवणूक असलेला शेअर रॉकेट बनला, झटक्यात 10% वधारला! दिला जातोय खरेदीचा सल्ला
9
Navi Mumbai Crime: इन्स्टाग्रावर ओळख, वाशीमध्ये भेटायला बोलावले; 16 वर्षाच्या मुलीवर कारमध्येच...
10
Kojagiri Purnima 2025:कोजागरी पौर्णिमेला चंद्र प्रकाश अंगावर घ्यावा असे म्हणतात; का ते माहितीय?
11
मुंबई-पुण्यात घरांच्या विक्रीत १७% घट; 'या' कारणांमुळे ग्राहकांनी फिरवली पाठ; किमती कमी होणार का?
12
‘आयुष्मान भारत’ योजना बंद पडली? नागपूरच्या रुग्णालयांमध्ये उघडकीस आले धक्कादायक वास्तव; रुग्णांना सेवा नाकारल्या
13
Video - "देवाने हे नियम बनवले नाहीत..."; शॉर्ट्स घालून महिलेने मंदिरात प्रवेश केल्याने मोठा गोंधळ
14
VIDEO: 'पॉवर हिटिंग'! ३ वर्षांच्या चिमुरड्याची बॅटिंग पाहून तुम्हीही म्हणाल- What a Shot!
15
मृत्यूचे कुंड : १०० हून अधिक लोकांना गायब करणारी रहस्यमयी विहीर! ४० मीटर लांब, शास्त्रज्ञांनाही उलगडेना...
16
आशिया चषकातील वादानंतर हवाई दल प्रमुखांचा मोठा दावा; भारताने पाकिस्तानची पाच लढाऊ विमाने पाडली 
17
कोजागरी शरद पौर्णिमा २०२५: पंचकाची अशुभ छाया अन् अमंगल काळ, शुभ मुहूर्त कधी? लक्ष्मी लाभेल!
18
"मी आभार मानतो, त्यांनी माझे 1000 रुपये वाचवले...!"; फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंची खिल्ली उडवली, नेमकं काय म्हणाले?
19
Dombivli Crime: मोबाईलचा पासवर्ड बदलला, कुटुंबात राडा! आई, दोन्ही मुले, आजोबामध्ये तुंबळ हाणामारी
20
अमानुष! लेकीशी भांडण... सासरच्यांनी जावयाला विष पाजलं, पळवून पळवून मारलं; झाला मृत्यू

भारताच्या वाघ यशकथेवर ‘आॅक्सफर्ड’चे प्रश्नचिन्ह

By admin | Updated: February 24, 2015 23:17 IST

भारतातील वाघांच्या संख्येत वाढ झाल्याचे सरकारने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीतून दिसून येते. मात्र, ही आकडेवारी अकाली आणि चुकीच्या संशोधन पद्धतीवर आधारित असल्याचा दावा आॅक्सफर्डमधील शास्त्रज्ञांच्या

लंडन : भारतातील वाघांच्या संख्येत वाढ झाल्याचे सरकारने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीतून दिसून येते. मात्र, ही आकडेवारी अकाली आणि चुकीच्या संशोधन पद्धतीवर आधारित असल्याचा दावा आॅक्सफर्डमधील शास्त्रज्ञांच्या एका गटाने केला आहे. या गटाने चुकीची संशोधन पद्धती अवलंबल्याने भारत सरकारच्या आकडेवारीच्या विश्वसनीयतेवरच प्रश्न उपस्थित केले आहेत.वाघ आणि इतर दुर्मिळ वन्य प्राण्यांच्या गणनेसाठी वापरात असलेल्या सर्वसाधारण पद्धतीत अचूकतेच्या दृष्टीने अनेक कमतरता आहेत. यामुळे अशा सर्वेक्षणांची अचूकता संशयाच्या भोवऱ्यात सापडते, असे या संशोधकांचे म्हणणे आहे. आॅक्सफर्ड विद्यापीठ, भारतीय सांख्यिकी संस्था आणि वन्यजीव संवर्धन संस्था यांच्या शास्त्रज्ञांचा समावेश असलेल्या एका गटाने प्रथमच वाघांच्या गणनेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. सध्या वापरात असलेल्या ‘अंश शोधन निर्देशांक’ पद्धतीत अंगभूत कमतरता आहेत. यामुळे अचूक निष्कर्ष निघणे अडचणीचे ठरते असा दावा या गटाने केला आहे. भारतीय राष्ट्रीय वाघ सर्वेक्षण संस्थेने जानेवारी २०१५ च्या अहवालात वाघांच्या संख्येत ३० टक्के वाढ झाल्याचे म्हटले आहे. गेल्या चार वर्षांत ही वाढ झाली आहे. सर्वेक्षणानुसार २०१४ मध्ये २,२२६ वाघ होते. २०१० मधील वाघांच्या तुलनेत यात ३० टक्के वाढ नोंदली गेली आहे.‘आमच्या अभ्यासातून अंश शोधन निर्देशांक अर्थात इंडेक्स कॅलिब्रेशन पद्धती संशोधनासाठी कुचकामी असल्याचे दिसून येते. भारतीय वाघ सर्वेक्षण अहवालात सादर करण्यात आलेल्या आकडेवारीचा अनुभवाधिष्ठित पद्धतीने अभ्यास केला. यात अंश शोधन पुनरुत्पादनीय आणि चुकीचे असल्याचे स्पष्ट होते,’ असा दावा या अभ्यास गटाचे प्रमुख अर्जुन गोपालस्वामी यांनी केला आहे. (वृत्तसंस्था)